Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी: भाग ८

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 07/27/2017 - 17:12
🗣 215 प्रतिसाद
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे. धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join-bjp-rajya-sabha-elections-shankersinh-vaghela/ या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
42622 वाचन

💬 प्रतिसाद (215)
अ
अभिजीत अवलिया Sat, 07/29/2017 - 11:43 नवीन
अहो खरे साहेब, तुम्ही सांगताय ते कुणीही नाकारलेले नाही. फायटर विमाने खरेदी करणे खताचे पोते खरेदी करण्यासारखे नाही हे सर्वाना माहीत आहे. माझा मुद्दा होता किती वर्षे वाट बघायची ह्याचा. कारण IAF ने २००१ साली विमानांची गरज व्यक्त केली. A.K. Antony प्रमुख असलेल्या डिफेन्स कौन्सिलने २००७ साली विमान खरेदीला मान्यता दिली. म्हणजे जवळपास १७ वर्षे होत आलीत IAF ने विमानांची गरज व्यक्त केल्यापासून. माझा आक्षेप ह्या सरकारी दिरंगाईला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अप्पा जोगळेकर Sat, 07/29/2017 - 12:20 नवीन
हे सगळे वाचून देशाला पूर्ण वेळ संरक्षण मंत्री असणे किती आवश्यक आहे हे जाणवत आहे. भाजप ला गोव्यात सत्ता स्थापन करायची आहे ती कशी करायची अथवा नाही हा भाजप चा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या सत्ता हव्यासासाठी देशाने किती काळ संरक्षण मंत्र्याशिवाय राहायचे हा प्रश्नच आहे. हे अपयश मोदींचे आणि पर्यायाने सरकारचे आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गॅरी ट्रुमन Sat, 07/29/2017 - 12:30 नवीन
सहमत आहे. अमित शहांना संरक्षणमंत्री केले जाईल अशी वदंता असल्याचे पेपरात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 07/29/2017 - 18:45 नवीन
मोठे नेते आणि संघाचा ग्रिन सिग्नल मिळाल्याच्या बातम्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विशुमित Mon, 07/31/2017 - 12:28 नवीन
शहा अध्यक्षाच्या खुर्चीतच सुखी आहेत असे म्हणत आहेत. त्यांचं बरोबर म्हणा, संरक्षण मंत्री झाले तर बर्फात, वाळवंटात चालता तर आले पाहिजे ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Mon, 07/31/2017 - 13:15 नवीन
पवार, मुलायम किंवा इतर संरक्षण मंत्री कधी बर्फात, वाळवंटात चाललै होते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सचु कुळकर्णी Fri, 07/28/2017 - 22:30 नवीन
No Hindi On Bengaluru Metro, Karnataka Chief Minister Siddarmaiah Tells Centre काहि दिवसांपुर्वि ह्यांनि वेगळा झेंडा हि मागितला होता कर्नाटका करता. मस्तय. मला वाटत २०१८ नंतर जे काहि काँग्रेसि उरतिल ते एक तर दगड मारत फिरतिल किंवा एकमेकांचे कपडे तरी फाडतिल बेटर २०१८ नंतर ह्यांना नॉर्थ सेंटिनेल बेटांवर ह्यांच्या मेंटल भावि पंतप्रधाना सह सरकारी खर्चाने आगबोटिने नेहमिकरता सोडुन यावे. कारण ह्यांच राजकारण आता फारच घातक मार्गाला चाललय. २०१८ नंतर हे एकमेकांचे कपडे तरी फाडतिल किंवा मग जातिय खेळ खेळुन दंगलि तरी घडवुन आणतिल. ज्याचि सुरुवात ह्यांच्या भावि अर्थमंत्रि ममता दिदि ने बंगाल मध्ये केलिय.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Fri, 07/28/2017 - 22:59 नवीन
http://m.timesofindia.com/india/panic-stricken-congress-herds-44-gujarat-mlas-to-party-ruled-karnataka/articleshow/59815395.cms शेवटि कॉंग्रेसला गुजरात मधले आपले सगळे आमदार बँगलोर ला हलवावे लागले ;) मला आठवतय त्याप्रमाणे सेम नाट्य एकदा विलासरावांनाहि करावे लागले होते सेम व्हेन्यु :)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 07/29/2017 - 07:26 नवीन
नवाझ शरीफचे बंधु पंतप्रधान होणार ! हे म्हणजे साधारण लालू तुरुंगात गेल्यावर राबडीने गादीवर बसण्यासारखे आहे का ? सो मच इंडियन ! मग आता नवाज शरीफना इस्लामिक कायद्याप्रमाणे शिक्षा देणार काय ? इस्लाममधे भ्रष्टाचारासाठी काय शिक्षा आहे ? हातपाय तोडणे, शिरच्छेद की अजुन काही ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 07/29/2017 - 08:59 नवीन
हाहाहा, धर्मराज! तुम्हाला माहित नाही वाटतं? आगाखान बेवडा ढोसायचा तेंव्हा त्याच्या पवित्र तोंडात दारूचं शुद्धजलात परिवर्तन होत असे. आं.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
श
श्रीगुरुजी Mon, 07/31/2017 - 12:00 नवीन
Platonic Love
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Mon, 07/31/2017 - 13:22 नवीन
सरकारने आयकर विवरण पत्र भरण्याची मुदत ५ आगस्ट पर्यंत वाढविलेली आहे . वैयक्तिक रित्या सरकारचा हा निर्णय पटलेला नाही .
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 07/31/2017 - 14:38 नवीन
कालच बहुचर्चित 'इंदू सरकार' हा चित्रपट बघितला. भारतीय राजकारणात प्रचंड रस असलेल्या माझ्यासारख्याला हा चित्रपट आवडला हे वेगळे सांगायलाच नको. या चित्रपटातील नायिका इंदू सरकार आणि इतर काही पात्रे काल्पनिक आहेत. या काल्पनिक पात्रांची प्रत्यक्षात घडून गेलेल्या व्यक्तिंबरोबर आणि घटनांबरोबर सरमिसळ अगदी चांगलीच जमली आहे. घडलेल्या घटना बर्‍यापैकी जशा झाल्या त्याप्रमाणेच दाखविल्या आहेत. जुन्या दिल्लीतील तुर्कमान गेट जवळ असलेली झोपडपट्टी दिल्ली डेव्हलपमेन्ट ऑथोरिटीने संजय गांधींच्या शहरे सुंदर आणि झोपडपट्टीमुक्त असावीत या आग्रहाखातर बुलडोझर लावून पाडली. त्यावेळी तिथल्या रहिवाशांनी विरोध केल्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक लोक मारले गेले. ही घटना तुर्कमान गेटचे नावही न बदलता जशी झाली तशी दाखवली आहे. उत्तर भारतात अनेक लाख लोकांची सक्तीने नसबंदी करण्यात आली होती. अशाच एका ठिकाणी पोलिसांनी अनेकांना पकडून नसबंदी करायला नेले हे दाखविले आहे. चित्रपटामध्ये काही प्रमाणात स्वातंत्र्य घेऊन कथेतील महत्वाच्या पात्रांची नावे बदलली आहेत. उदाहरणार्थ संजय गांधींचे पात्र साकारले आहे नील नितीन मुकेशने. एकंदरीत चेहरा, वेशभूषा, डोक्यावरील विरळ झालेले केस आणि काळ्या रंगाची जाडी चष्म्याची फ्रेम यावरून या पात्राला सगळे 'चीफ' असे म्हणत असले तरी ते पात्र संजय गांधीच आहे हे समजायला काहीच कष्ट पडले नाहीत.आणीबाणीत बदनाम झालेले मंत्री ओम मेहतांचे पात्र साकारलेल्या पात्राला नाव दिले आहे 'ओम नाथ'. संजय गांधींची सहकारी रूखसाना सुलताना (बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगची आई) हिने दिल्लीतील गरीब वस्त्यांमध्ये सक्तीची नसबंदीची 'टारगेट' सरकारी अधिकार्‍यांना दिली होती. कोणतेतरी मुस्लिम नाव असलेली स्त्री संजय गांधींच्या वर्तुळात वावरत असलेली चित्रपटात दाखवली आहे. त्यावरून ती रूखसाना सुलतानाच आहे हे समजलेच. संजय गांधींच्या वर्तुळात एक फ्रेंच दाढी असलेला तरूण दाखवला आहे. बहुदा तो जगदिश टायटलर असावा. तसेच तुर्कमान गेट प्रकरणी बदनाम झालेले दिल्ली डेव्हलपमेन्ट ऑथोरिटीचे प्रमुख जगमोहन यांचे पात्र रंगवले आहे 'राममोहन' (की अन्य कुठला मोहन) हे नाव दिलेल्या पात्राने. संजय गांधींनी माहिती आणि प्रसारणमंत्री इंदरकुमार गुजरालना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना राजीनामा द्यायचा आदेश दिला होता हे माहितच आहे. इंदरकुमार गुजरालांचे पात्र रंगवले आहे 'कुमार' या नाव दिलेल्या पात्राने. गुजरालना संजय गांधींनी राजीनामा द्यायला सांगितले त्याची पार्श्वभूमी चित्रपटात दाखवले आहे त्यापेक्षा वेगळी होती. तेवढे स्वातंत्र्य चित्रपट निर्मात्याने घेतले आहे. चित्रपटाची नायिका इंदू सरकारचा पती दाखवला आहे नवीन सरकार नावाचा आय.ए.एस अधिकारी. २००८ मध्ये भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त झालेले नवीन चावला हे पण १९७५ मध्ये आणीबाणीच्या दरम्यान बदनाम झाले होते. शहा कमिशनने त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. मला बराच वेळ वाटत होते की नवीन हेच नाव आणि आणीबाणीचे समर्थन करणारा आणि आणीबाणीच्या वरवंट्याचा फायदा मिळालेला सरकारी अधिकारी यावरून ते पात्र नवीन चावलांचे असावे. पण १९७५ मध्ये या चित्रपटात दाखविले आहेत तितके नवीन चावला वरीष्ठ होते असे वाटत नाही. आणि चित्रपटात शेवटी त्या पात्राला आत्महत्या करताना दाखवले आहे. त्यावरून ते पात्र नक्की कोणाचे असावे हे समजले नाही. बहुदा ते पात्र नवीन चावलांचेच असले तरी चित्रपट निर्मात्याने कथानकात तेवढा बदल केला असावा. आणीबाणीला भूमिगत राहून विरोध करणार्‍यांमध्ये रा.स्व.संघाचे नानाजी देशमुख एक प्रमुख नाव होते. त्यांचे पात्र रंगवले आहे 'नानाजी प्रधान' (अनुपम खेर) नावाच्या पात्राने. नानाजींनी भूमिगत राहून कार्यकर्त्यांच्या जाळ्यामार्फत आणीबाणीदरम्यान जी माहिती सरकारी वरवंट्यामुळे बाहेर येत नव्हती ती बाहेर आणायचे काम केले होते. छुप्या पध्दतीने पत्रके छापून ती जनतेत वाटून सरकारी दडपशाही कशी चालू आहे याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायचे काम त्यांनी केले होते. त्यांच्याच कार्यकर्त्यांपैकी एक-- चित्रपटातील नाव शिवम रेड्डी हा डायनामाईट वापरून रेल्वेपूल, पॉवर प्लॅन्ट उडवून दिल्याशिवाय सरकारला अक्कल येणार नाही असे वारंवार म्हणतो.इथे कथानकाने प्रत्यक्षात घटना घडली त्याबरोबर फारकत घेतली आहे. आणीबाणीच्या दरम्यान गाजलेल्या 'बडोदा डायनामाईट केस' चा संदर्भ याला आहे. पण या प्रकारात रा.स्व.संघाशी आणि नानाजींशी संबंधित कोणाचा हात नव्हता तर समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस आणि उद्योगपती विरेन शाह (१९९९ ते २००३ या काळातील पश्चिम बंगालचे राज्यपाल) यांच्यावर डायनामाईटद्वारे स्फोट घडवून राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान करायचा कट आखायचा आरोप ठेवला गेला होता. अशाप्रकारे काहीकाही ठिकाणी कथानकाची प्रत्यक्षात घडलेल्या घटनेशी फारकत झालेली दाखवली आहे. माझा आणीबाणीच्या वेळी जन्मही झाला नव्हता पण त्या काळाविषयी मी नंतर बरेच वाचले आहे त्यामुळे चित्रपटातील बरीचशी पात्रे आणि घटना माझ्या परिचयाच्या होत्या. पण ज्यांना या गोष्टी माहित नसतील त्यांना मात्र चित्रपटात नक्की काय चालू आहे हे समजायला जड जाईल. चित्रपटात १९७० च्या दशकाच्या मध्यातील भारतातील पार्श्वभूमी बर्‍यापैकी व्यवस्थित उभी केली आहे. उदाहरणार्थ त्यावेळचे गोल डायल फिरवून लावायचे फोन, रस्त्यावरील अ‍ॅम्बॅसॅडरसारख्या गाड्या, लोकांची वेशभूषा इत्यादी त्याकाळाला मिळतेजुळते आहे. या चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला, काही ठिकाणी या चित्रपटाचे प्रयोग बंद पाडले त्यामागचे कारण समजतेच. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे प्रयोग बंद पाडायच्या प्रकाराला 'असहिष्णुता' असे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेली ३ वर्षे अन्यथा सतत 'असहिष्णुता', 'असहिष्णुता' ही बोंब मारणार्‍या कोणीही म्हटल्याचे ऐकिवात नाही. विशेष म्हणजे अशी असहिष्णुतेची बोंब मारणार्‍या अनेक समाजवादी विचारांच्या मंडळींच्या पूर्वसुरींनी/ वैचारिक गुरूंनी स्वतःच १९७५ ते १९७७ या काळातील आणीबाणीला कडाडून विरोध केला होता ही गोष्ट त्यांच्या गावीही आहे असे त्यांच्या सध्याच्या वर्तणुकीवरून वाटत नाही. सध्याच्या काळातील समाजवादी आणि/किंवा डाव्या विचारांच्या विचारवंतांना माझा जोरदार विरोध आहेच. आणि त्यांना माझ्यासारखे करत असलेला तो विरोध योग्यच आहे याचे एकामागोमाग दुसरे कारण ही विचारवंत मंडळी देत आहेत. त्याप्रकारे आपल्या या ढोंगातून या विचारवंतांनी त्यांना विरोध करणे योग्यच आहे याचे आणखी एक कारण दिले आहे. असो. मला तरी 'इंदू सरकार' हा चित्रपट भलताच आवडला आहे. ज्यांनाज्यांना स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय इतिहासात रस आहे त्या सर्वांनी हा चित्रपट बघावाच असे मी म्हणेन. तसेच माझ्या पिढीला आणि सध्या कॉलेजात असलेल्या अनेकांना आणीबाणीच्या नावाखाली इंदिरांच्या काँग्रेस सरकारने किती अत्याचार केले होते याची कल्पना नसते. ती कल्पना यावी म्हणून त्या राजकारणात रस नसला तरी हा चित्रपट जरूर बघावा असे मी म्हणेन. कारण भविष्यात कधीही भारतात अशी परिस्थिती उद्भवायची चिन्हे दिसली तर त्याला आपल्या परिने विरोध करता आला पाहिजे पण त्यासाठी ती चिन्हे नक्की कोणती हे माहित असणे गरजेचे आहे. चित्रपट समीक्षक या चित्रपटाला कितीही मार्क देत असले तरी माझ्याकडून मात्र या चित्रपटाला ५ पैकी ५ मार्क. (हे व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा फेसबुकवर माझ्या नावाने योग्य तो रेफरन्स देऊन फॉरवर्ड करायला काहीच हरकत नाही).
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 07/31/2017 - 15:53 नवीन
निव्वळ या प्रतिसादामुळे आत्ता ताबडतोब अर्ध्या तासानंतरच्या शो ची तिकीटे बुक करून पिच्चर बघायला जात आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मोदक Mon, 07/31/2017 - 18:48 नवीन
Empowering thoughts by Gandhi अशा भारदस्त नावाचे पुस्तक उघडावे आणि महात्मा गांधींच्या ऐवजी राहुल गांधीचे विचार वाचायला मिळावेत असे वाटतेय हा पिच्चर बघताना. नै आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 08/01/2017 - 13:11 नवीन
या चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला, काही ठिकाणी या चित्रपटाचे प्रयोग बंद पाडले त्यामागचे कारण समजतेच. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे प्रयोग बंद पाडायच्या प्रकाराला 'असहिष्णुता' असे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेली ३ वर्षे अन्यथा सतत 'असहिष्णुता', 'असहिष्णुता' ही बोंब मारणार्‍या कोणीही म्हटल्याचे ऐकिवात नाही. या बाबत सपशेल सहमत. या चित्रपटाला नक्की का विरोध केला ते काँग्रेसीच जाणोत. आणीबाणी पुकारली होती हे वास्तव आहे, ते बदलता येणार नाही. या चित्रपटात "इंदू सरकार" या सामान्य महिलेची कहाणी आहे. इंदिराबाई २ मिनीटे तर संजय गांधी १५ / २० मिनीटे पडद्यावर दाखवले आहेत. बादवे, मिपावर यावेसे वाटत नाही... यावेसे वाटत नाही... असे म्हणून बरोब्बर भाजपाविरोधी पिंका टाकणारे काँग्रेससमर्थकही अशा वेळी सोयीस्कररीत्या गायब होतात असे निरीक्षण आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
थ
थिटे मास्तर Sat, 08/05/2017 - 18:49 नवीन
फरझाना म्हणायचे होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
थ
थिटे मास्तर Sat, 08/05/2017 - 18:56 नवीन
उडता पंजाब च्या वेळेस... षष्प काहिच तर दाखवलेय नाहि मधुर भांडारकर ने. फिर भि सिट्टि गुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
थ
थिटे मास्तर Sat, 08/05/2017 - 19:00 नवीन
कोणाकडे ते फोटो आहेत का हो... आता नेट वर सापडत नाहियेत, नटवर सिंग संजय गांधिंचे जोडे उचलुन आहेत ते. बहुधा त्यावेळेस हे नेते संजय बाबा ना शुज घालुन द्यायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
थ
थिटे मास्तर Sat, 08/05/2017 - 19:11 नवीन
आपण का विदेशी कार वापरतोय ? एक ब्रांड भारतिय हि हवा ! गुड ! आले देवाजि च्या मना तेथे कोणाचे चालेना. साईट फिक्स झालि गुडगाव...साहेब पोहोचले ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट ला घेउन...पाहतात तर तिथे तिन म्हशि चरतायत. साला S.P. आणि D.M. ची ऐशि तैशि केल्यावर ३ ट्र्क मागवण्यात आले आणि हुकुम देण्यात आला कि भारताच्या ३ सिमेवर ह्या ३ म्हशि सोडुन या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
थ
थिटे मास्तर Sat, 08/05/2017 - 19:38 नवीन
मोरारजी देसाई आणि आय.के.गुजराल ह्या दोघांन्नी जेव्हढी रॉ च्या मेहनतिचि वाट लावलि तेव्हढि तर साला जन. झिया ने हि नाहि लावलि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
थ
थिटे मास्तर Sat, 08/05/2017 - 20:05 नवीन
भरत शाह प्रेझेंट पाहिल्यावरच कदाचित बंद करायला हवा होता...तरी बघितला बाबा ४० मिनिट. मधुर भांडारकर कडुन हि अपेक्षा नव्हती. छ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थिटे मास्तर
अ
अभिजीत अवलिया Mon, 07/31/2017 - 16:57 नवीन
स्टेट बॅंक आॅफ इंडियाने बचत खात्यात एक कोटीपेक्षा कमी रक्कम असल्यास व्याजदर ४ वरुन ३.५% केला.
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 07/31/2017 - 21:16 नवीन
भाजपच मुखपत्र म्हणा नायतर काहीपण म्हणा, पण इतक्या सातत्याने राजकारणातल्या बातम्या (नवीन आणि अगदी जुन्यापान्या सुद्धा ) देण्याचं काम का देव जाणे भाजप कडे झुकलेले लोकच करताना दिसतायत. आणि ते नुसतंच न करता अभ्यास आकडेवारीसकट करतायत, त्यामुळे त्यांना खोटं पाडणं इतर पक्षाच्या समर्थकांना जमत नाहीये. एकूण काय, मिसळपाव वर पण बीजेपी ला चांगला विरोधी पक्ष नाहीये :P श्री-गुरुजी पूर्णपणे भाजप कडे झुकलेले असले तरी, ट्रुमन साहेब सगळ्याच बातम्या देतायत. भाजप ला नावं पण ठेवतायत, विरोधी पक्ष कुठेच दिसत नाहीये त्याकडे पण लक्ष देतायत, मध्ये कोणी राजकारणी स्वर्गवासी झाले तर त्याची पण माहिती देतायत. जर कोणी इतर पक्षाचे समर्थक अशा प्रकारे फॅक्टस + त्यांचे त्या-त्या पक्षाचे बायस्ड मत इथे मिसळपाव वर देऊ शकले तर वाचायला खरंच आवडेल. आत्ता बरेच कुंपणावरचे लोक ज्यांना कुठल्याच पक्षाविषयी जवळीक नाहीये ते फक्त भाजप कडे झुकलेली मतच वाचतायत इथे. ट्रुमन साहेबाना विशेष धन्यवाद - सातत्याने राजकारणावरच्या माहितीपूर्ण बातम्या देण्याबद्दल .
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 07/31/2017 - 21:48 नवीन
ट्रुमन साहेबाना विशेष धन्यवाद - सातत्याने राजकारणावरच्या माहितीपूर्ण बातम्या देण्याबद्दल . >> सहमत. खरं तर मिपावर राजकारणाबद्दल चर्चा मी मागच्या ३-४ आठवड्यांतच वाचायला लागले. पण फक्त ताज्या घडामोडीच नाही, तर आधीच्याही काही रोचक घडामोडी वाचायला मिळाल्या. या धाग्यांमध्ये माझ्याकडून भर गालण्यासारखे काही नसले तरी सध्या तरी नियमितपणे धाग्यावर येऊन वाचून जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
ग
गॅरी ट्रुमन Tue, 08/01/2017 - 10:29 नवीन
धन्यवाद वीणाताई, रूपीताई आणि पिराताई.
मिसळपाव वर पण बीजेपी ला चांगला विरोधी पक्ष नाहीये :P
मिपावर सध्या भाजपविरोधक फार लिहित नाहीयेत. म्हणजे मिपावर बीजेपीला चांगला विरोधी पक्ष नाही असे नाही.अडवाणी भाजपचे सारथी असताना भाजपला कडाडून विरोध करायचे काम मिपावर मीच करत होतो :) २०१५ मधील दिल्ली विधानसभा निवडणुका किंवा बिहार विधानसभा निवडणुकांच्या वेळचे मिपावरील चर्चांचे धागे तुम्ही बघितले आहेत का याची कल्पना नाही. त्या चर्चांमध्ये भाजपविरोधकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते हे वाचायला मिळेलच. हाच प्रकार कन्हैय्याप्रकरणीही झाला होता . इतकेच काय तर ७-८ महिन्यांपूर्वी नोटाबंदीच्या वेळी मोदी-भाजपवर किती टिका झाली होती हे पण दिसेलच. गुरमेहर कौर प्रकरणावरही मिपावर धागा आला होता. त्यातही अशी टिका झालेली वाचायला मिळेल. तसेच मुंबई महापालिका निवडणुका, खा.रविंद्र गायकवाड विमान कर्मचारी मारहाण प्रकरण या चर्चांमध्येही शिवसेना समर्थकांनी भाजपवर भरपूर टिका केली आहे. उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी सगळ्या विरोधकांना झोपविल्यानंतर पूर्ण देशातील विरोधी पक्ष थंडावले तोच परिणाम मिपावरही बघायला मिळत असावा :) या गोष्टी बर्‍याच अंशी सिझनल असतात. समजा पंजाबमध्ये आपला यश मिळाले असते तर आपसमर्थकांना चेव चढला असता. तसेच मोदींनी कुठली महत्वाची चूक केली आणि त्याचे पडसाद कुठल्या निवडणुकांमध्ये उमटले तर परत विरोधी पक्ष सक्रीय होतील. सध्या मिपावर भाजपविरोधी मंडळी विशेष लिहित नसली तर त्याविषयी माझ्यासारखे काहीच करू शकणार नाहीत. असे सदस्यही लिहिते व्हावेत असे मात्र नक्कीच वाटते. गेल्या काही वर्षापासून बरेच विरोधी सदस्य 'तिकडे' गेले आहेत. तेव्हा विरोधी मते वाचायची असतील तर इकडच्या नाही तरी 'तिकडच्या' चर्चांमधून वाचायला मिळतील असे वाटते. पुरोगामी विचारवंती वातावरणात माझा तरी जीव घुसमटतो म्हणून मी तिकडे जाणे चारेक वर्षांपासून सोडून दिले आहे तेव्हा तिकडे लेटेस्ट काय चालू आहे याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
अ
अप्पा जोगळेकर Tue, 08/01/2017 - 12:53 नवीन
'तिकडच्या' सदस्यांपैकी थत्तेचाचा आणि बॅटमॅन यांनी इथे पुन्हा लिहावे असे फार वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मोदक Tue, 08/01/2017 - 13:14 नवीन
बॅटमॅनबाबत सहमत. थत्तेचाचा सोयीस्कर पिंका टाकून विषयांतर करतात आणि स्वत:वर शेकले की उत्तरे देत नाहीत असे अलिकडचे निरीक्षण आहे. तसेही थत्तेचाचा "मिपावर यावेसे वाटत नाही.. यावेसे वाटत नाही" असा अनेकदा बोललेले वाचले आहे, त्यामुळे त्यांना सिरीयस चर्चेमध्ये रस असेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर Tue, 08/01/2017 - 13:50 नवीन
थत्तेचाचा सोयीस्कर पिंका टाकून विषयांतर करतात आणि स्वत:वर शेकले की उत्तरे देत नाहीत असे अलिकडचे निरीक्षण आहे. त्यांची आत्यंतिक कॉन्ग्रेस प्रेमी मते त्यांना बर्‍याचदा पेचात टाकत. पण ते फारच अभ्यासू लिहायचे. जसे श्रीगुरुजी आणि ट्रुमन यांची चर्चा वाचायला मिळते तसे थत्तेचाचा आणि इंद्रराज पवार यांचे वादविवाद फार रंगत असत. मिपाच्या सुरुवातीच्या काळातल्या इथल्या राजकीय चर्चा त्यांच्या अभ्यासपूर्ण, कॉन्ग्रेसप्रेमी प्रतिसादांशिवाय अपूर्णच ठरतील. असो. विषयांतर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
पिलीयन रायडर Tue, 08/01/2017 - 01:23 नवीन
सहमत! मी सुद्धा आजकाल इथे चक्कर मारुन जाते. हा धागा सातत्याने अपडेट केला जातो, नवीन काढला जातो. बरीच माहिती कळते. ज्यांना इतर पक्षाबद्दल लिहायचंय त्यांना लिहायला मिपा तितकंच उपलब्ध आहे जितकं ट्रुमन आणि श्रीगुरुजींना. इतकी लोकशाही असताना पोटात दुखण्याचे कारणच काय खरं तर.. पण असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
म
मोदक Tue, 08/01/2017 - 10:58 नवीन
ज्यांना इतर पक्षाबद्दल लिहायचंय त्यांना लिहायला मिपा तितकंच उपलब्ध आहे जितकं ट्रुमन आणि श्रीगुरुजींना. इतकी लोकशाही असताना पोटात दुखण्याचे कारणच काय खरं तर.. पण असो.. +११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
व
विशुमित Tue, 08/01/2017 - 07:44 नवीन
<<<<एकूण काय, मिसळपाव वर पण बीजेपी ला चांगला विरोधी पक्ष नाहीये>>> ==>> मिपावर सुद्धा प्रबळ विरोधीपक्ष आणि निपक्ष सदस्य आहेत फक्त मिपाकर हुशार असल्या कारणाने जे विरोधीपक्ष मोदीसरकारला उठसुठ विरोधकरून चुका करत आहेत, ते कदाचित तो प्रकार इथे करत नाहीत. या मंडळींकडे भाजपकडे झुकलेलीच मतं आहेत हे उमगणे सुद्धा नसे थोडके. बाकी जनता सुज्ञ आहे, या वर माझा नितांत विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
व
विशुमित Tue, 08/01/2017 - 12:24 नवीन
भाजपीय नेते आणि समर्थक बोलण्यात /लिहण्यात पटाईत आहेत, यामध्ये काही दुमत नाही. एखादी गोष्ट इतकूस असली तरी ती फुगवून बडा चढाके कसे लोकांच्या गळी उतरायचं यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. बऱ्याच वेळा आरसा दाखवून सुद्धा फक्त सोयीच्या प्रश्नांना उत्तरे द्याची आणि अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांना बगल द्याची ही त्यांची कार्यपद्धती. नाहीतर मागील ६० वर्षातील एखादे अप्रासंगिक उदाहरण देऊन सध्य काळातील प्रश्नांना फाट्यावर मारून द्यायची. पण कामाच्या बाबतीत आउटपुट काय शून्य. नाहीतर २०१९-२०२४ची गाजरं दाखवायची. माझ्या मते भाजप/मोदी विरोधकांनी पेशियन्स ठेवून या सरकारला राहिलेले २/३ वर्ष किंवा अजून एक टर्म सरकार चालवून द्यावे. काय त्यांना करायचंय ते करून द्यावे. आखा भारत काबीज करू देत, हिंदुराष्ट्र येऊ देत, सुशासन येऊ देत, शेतकऱ्यांचं वाटोळे/कर्जमुक्ती करू देत, भटजी-शेटजीचे कल्याण होऊ देत, अल्पसंख्यांकांच्या किडा बसवू देत, पाकिस्तान निस्तनाबुद करू देत, काश्मीरचा बच्चा बच्चा ठेचून काढू देत किंवा चीनचा पार भुगा करू देत. विरोधकांनी शांत बसून हे पाहत राहावे. जनतेला आपोआप सगळे पटेल. निदान त्या नंतर पुढील ५० वर्ष तरी लोक यांच्या भूल थापांना बळी पडणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Tue, 08/01/2017 - 12:26 नवीन
हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक Tue, 08/01/2017 - 12:47 नवीन
नाहीतर मागील ६० वर्षातील एखादे अप्रासंगिक उदाहरण देऊन चला, म्हणजे गांधी / नेहरू खानदानाने देश चालवताना अप्रासंगिक उदाहरणे तयार केली आहेत हे किमान मान्य केलेत..! माझ्या मते भाजप/मोदी विरोधकांनी पेशियन्स ठेवून या सरकारला राहिलेले २/३ वर्ष किंवा अजून एक टर्म सरकार चालवून द्यावे. काय त्यांना करायचंय ते करून द्यावे. हे वाक्य टिपीकल सरंजामशाही वृत्तीचे प्रतीक आहे. विरोधक कोण आहेत जे सरकार चालू देणार..? सामान्य मतदार भाजपाला आघाडीचे सरकार म्हणून निवडून देतो आहे. मग "विरोधी पक्षाने सरकार चालवून द्यावे" म्हणजे नक्की काय करावे..? विरोधी पक्ष पूर्वी सत्तेत बसला होता आणि आता बुडाखालची खुर्ची गेली आहे हे मान्य का होत नाहीये..? आखा भारत काबीज करू देत, हिंदुराष्ट्र येऊ देत, सुशासन येऊ देत, शेतकऱ्यांचं वाटोळे/कर्जमुक्ती करू देत, भटजी-शेटजीचे कल्याण होऊ देत, अल्पसंख्यांकांच्या किडा बसवू देत, पाकिस्तान निस्तनाबुद करू देत, काश्मीरचा बच्चा बच्चा ठेचून काढू देत किंवा चीनचा पार भुगा करू देत. अजुन एक टर्म मध्ये इतके सगळे जर केलेच तर विरोधक नक्की कोणत्या भूलथापांबद्दल बोलणार ते तरी सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Tue, 08/01/2017 - 13:16 नवीन
<<<<विरोधी पक्ष पूर्वी सत्तेत बसला होता आणि आता बुडाखालची खुर्ची गेली आहे हे मान्य का होत नाहीये..?>>> ==> माझा ही तोच मुद्दा आहे. विरोधकांनी हे मान्य करून मतदारांच्या कौलाचा आदर केला पाहिजे. एकदा त्यांच्या मनासारखे होऊ देत. नंतर दूध का दूध और पाणी का पाणी जनतेला दिसेलच. <<<अजुन एक टर्म मध्ये इतके सगळे जर केलेच तर विरोधक नक्की कोणत्या भूलथापांबद्दल बोलणार ते तरी सांगा.>>> ==> करू तर देत पहिले त्यांना मग बोलू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Tue, 08/01/2017 - 11:39 नवीन
श्री-गुरुजी पूर्णपणे भाजप कडे झुकलेले असले तरी, ट्रुमन साहेब सगळ्याच बातम्या देतायत. भाजप ला नावं पण ठेवतायत, विरोधी पक्ष कुठेच दिसत नाहीये त्याकडे पण लक्ष देतायत, मध्ये कोणी राजकारणी स्वर्गवासी झाले तर त्याची पण माहिती देतायत. जर कोणी इतर पक्षाचे समर्थक अशा प्रकारे फॅक्टस + त्यांचे त्या-त्या पक्षाचे बायस्ड मत इथे मिसळपाव वर देऊ शकले तर वाचायला खरंच आवडेल. आत्ता बरेच कुंपणावरचे लोक ज्यांना कुठल्याच पक्षाविषयी जवळीक नाहीये ते फक्त भाजप कडे झुकलेली मतच वाचतायत इथे. मी भाजपच्या प्रत्येक भूमिकेचे समर्थन करीत नाही. नुकतेच झालेले बिहार प्रकरण व त्यापूर्वी भाजपने गोव्यात व मणीपूरमध्ये स्थापन केलेले सरकार याविरोधात मी लिहिले होते. इथे इतर पक्षांचे समर्थकसुद्धा आहेत. २०१४-१५ मध्ये केजरीवाल समर्थकांनी इथे अनेक धागे काढले होते व त्यावर तुंबळ युद्ध झाले होते. परंतु 'आपलाच दाम खोटा' निघाल्यामुळे ते आता केजरीवालांचे समर्थन करण्यापासून लांब राहतात. इथे एकजण राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत. इथे शिवसेनेचे कट्टर समर्थक सुद्धा अनेक आहेत. रवींद्र गायकवाड किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवसेनेच्या धाग्यावर सेना समर्थकांनी सेनेचे हिरिरीने समर्थन केले होते. पूर्वी काही जण मनसेचे समर्थक होते. परंतु त्यांचाही दाम खोटा निघाला, त्यामुळे तेही आता लिहीत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
म
मोदक Tue, 08/01/2017 - 12:50 नवीन
गुरूजी.. तुम्ही अनेकदा नको त्या गोष्टीचे पण समर्थन करता त्यामुळे असे मत तयार झाले असावे. इथे इतर पक्षांचे समर्थकसुद्धा आहेत. २०१४-१५ मध्ये केजरीवाल समर्थकांनी इथे अनेक धागे काढले होते व त्यावर तुंबळ युद्ध झाले होते. परंतु 'आपलाच दाम खोटा' निघाल्यामुळे ते आता केजरीवालांचे समर्थन करण्यापासून लांब राहतात. इथे एकजण राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आहेत. इथे शिवसेनेचे कट्टर समर्थक सुद्धा अनेक आहेत. रवींद्र गायकवाड किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवसेनेच्या धाग्यावर सेना समर्थकांनी सेनेचे हिरिरीने समर्थन केले होते. पूर्वी काही जण मनसेचे समर्थक होते. परंतु त्यांचाही दाम खोटा निघाला, त्यामुळे तेही आता लिहीत नाहीत. + २० लाख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अत्रे Tue, 08/01/2017 - 02:51 नवीन
http://abpmajha.abplive.in/mumbai/update-on-traffic-police-related-pil-filed-by-sunil-toke-in-hc-430320
हेड कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी ट्रॅफिक पोलिसांच्या भ्रष्टाचारासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेत, मुंबई उच्च न्यायालयानं याचं जनहीत याचिकेत रुपांतर करण्याचे निर्देश दिलेत. टोके यांनी पोलिसांच्या सेवेत असताना केलेल्या या आरोपांतील तथ्य पडताळून पाहण्यासाठी जनहितार्थ या याचिकेची मोठ्या स्तरावर चर्चा होणे गरजेचं आहे ही भावना हायकोर्टानं व्यक्त केली होती.
http://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/crime/cop-who-exposed-corruption-in-traffic-dept-now-moves-hc/articleshow/56385250.cms http://www.hindustantimes.com/mumbai-news/acb-report-on-no-corruption-in-mumbai-traffic-department-an-eyewash-hc/story-sppK5SPNAB1kz5aFELGqZM.html http://www.dnaindia.com/mumbai/report-curb-corruption-if-you-can-t-stop-it-hc-to-traffic-police-2500411 लढा चालू ठेवल्याबद्दल सुनील टोके यांचे अभिनंदन. यांचा मेल आयडी कोणाकडे आहे का? मराठी वर्तमानपत्रांत फार काही या केसबद्दल दिसत नाही. "व्हाट्सअप ने काढले नवीन फिचर!" छाप टुकार बातम्या देण्यापेक्षा सखोल अभ्यास करून बातम्या दिल्या तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 08/01/2017 - 16:58 नवीन
आपल्याकडे अशा एकांड्या शिलेदारीला फारसा पाठींबा मिळत नाही हे आपले दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अभिजीत अवलिया Tue, 08/01/2017 - 03:39 नवीन
डॉकलाम मध्ये भारत चीन ह्यांच्यात तणाव असतानाच उत्तराखंडच्या बाराहोती परिसरात १० चिनी सैनिकांनी २५ जुलैला घुसखोरी केली होती असे समोर आले आहे. http://economictimes.indiatimes.com/news/defence/chinese-army-entered-uttarakhands-chamoli-district-while-doklam-was-on-claims-report/articleshow/59845892.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/01/2017 - 11:34 नवीन
चिनी सैनिकांची घुसखोरी नवीन नाही. अनेक ठिकाणी भारत व चीन यांच्यातील सीमारेषा पूर्णपणे निश्चित झालेली नाही. याचा फायदा घेऊन चिनी सैनिक अनेकवेळा घुसखोरी करतात व भारताने विरोध करून उच्च पातळीवर चर्चा झाल्यानंतर काही दिवसानंतर परत जातात. यामागे अनेक उद्देश आहेत. भारत किती विरोध करतो याची चाचपणी ते करीत असावेत. तसेच आम्ही मनाला येईल तेव्हा तुमच्या प्रदेशात घुसू शकतो व तुम्ही आम्हाला प्रतिकार करू शकत नाही हे वारंवार दाखवून द्यायचा उद्देश असावा. तसेच भविष्यात सीमेवरील काही प्रदेशावर कब्जा करायचा असल्यास वारंवार त्या प्रदेशात आत जाऊन पाहणी करावी हासुद्धा उद्देश असेल. राजनैतिक पातळीवर आम्ही तुमच्यापेक्षा सामर्थ्यवान आहोत हे वारंवार दाखवून भारताला बचावात्मक भूमिका घ्यायला पार पाडणे हादेखील उद्देश असावा. १९६२ च्या पराभवानंतर भारत सावध आहे. त्यामुळेच भारतीय सैनिकांनी भारत, भूतान व चीन यांच्या सीमेवरील वादग्रस्त त्रिभुज प्रदेशात रस्ते बांधण्यापासून चीनला रोखलेले आहे. त्यामुळे चीनचा तिळपापड झालेला आहे. चीन व भूतान यांच्यात राजनैतिक संबंध नाहीत. चीनला ते सुरू करायचे आहेत. परंतु अजूनपर्यंत तरी त्यात यश आलेले नाही. भारत व भूतान यांच्यातील करारानुसार भूतानचे परराष्ट्र धोरण भारताच्या सल्ल्यानुसार ठरते. तसेच भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. त्यामुळे भूतानच्या वतीने भारताने आपल्याला आव्हान दिले आहे हे चीनला सहन झालेले नाही. मागील दीड महिन्यांपासून चीन सातत्याने आक्रमक भाषा बोलत आहे. मागील दीड महिन्यात चीनने अनेकवेळा भारताला युद्धाची धमकी दिलेली आहे. भारताची अवस्था १९६२ पेक्षा वाईट करू अशीही धमकी आलेली आहे. चीनची सरकारी वृत्तपत्रे 'ग्लोबल टाईम्स' आणि 'चायना डेली' सातत्याने भारताविरूद्ध प्रक्षोभक लेख लिहीत आहेत. १९६२ च्या युद्धाची चित्रे प्रसिद्ध करून भारताला घाबरवून सोडायचा प्रयत्न सुरू आहे. दस्तुरखुद्द चीनचे राष्ट्राध्यक्ष युद्धाची भाषा बोलत आहेत. या सर्व प्रकरणात भारताने अत्यंत प्रगल्भ व ठाम भूमिका घेतलेली आहे. चीनच्या कोणत्याही प्रपोगंडाला उत्तर न देता भारत शांत राहून आपल्या भूमिकेवर ठाम आहे. चीनच्या कोणत्याही धमकीला न जुमानता भारताने आपले सैन्य भूतानच्या सीमावर्ती भागात तयार ठेवले आहे. भारतीय नेतेही बहुतांशी शांत राहून आपले काम करीत आहेत. चीनच्या बर्‍याच धमक्यानंतर अरूण जेटलींनी "भारत आता १९६२ चा भारत राहिलेला नाही" असे सांगून युद्ध झाले तर ते १९६२ प्रमाणे एकतर्फी न होता भारत जोरदार प्रतिकार करेल व त्यात चीनचेही प्रचंड नुकसान होईल हे सूचित केले होते. सुषमा स्वराज यांनी सुद्धा चीनने सैन्य मागे घेतले तरच चर्चा होईल असे सांगून भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. चीन भारत कुरापत काढायची वाट पहात आहे. उत्तराखंडमध्ये घुसखोरी करणे हा त्याच प्रयत्नाचा भाग आहे. भारतीय सैन्याने थोडादेखील प्रतिकार केला तरी ते कारण दाखवून भारतावर हल्ला करायला निमित्त मिळेल याची चीन वाट पहात आहे. सुदैवाने भारताने अतिशय प्रगल्भ व समतोल भूमिका घेतलेली आहे. चीन लष्करीदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या भारतापेक्षा बराच प्रबळ असला तरी भूतकाळाचे ओझे न बाळगता चीनच्या कोणत्याही धमकीला घाबरायचे नाही, चीनच्या प्रक्षोभक प्रचाराला अजिबात उत्तर द्यायचे नाही, कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडून वातावरण पेटेल असे करायचे नाही आणि त्याचवेळी आपले सैन्य मागे न घेता आपल्या भूमिकेवर ठाम रहायचे अशी भारताने अत्यंत योग्य भूमिका घेतलेली आहे. भारत व चीन मध्ये युद्ध होण्याची शक्यता खूप कमी आहे. तसे झाले तर दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. युद्ध टाळण्यासाठी चीन सातत्याने दबाव वाढवित आहे. आपला दबाव भारत फार काळ सहन करू शकणार नाही व शेवटी दबावामुळे भारत माघार घेईल अशी चीनची अटकळ असावी. चीनबरोबर इतके ताणल्यानंतर भारताने चीनच्या दबावामुळे माघार घेतली तर ती मोठी चूक ठरेल. आपण भारतासारख्या मोठ्या देशाला सुद्धा दबाखाली झुकवू शकतो असा संदेश देण्यात चीन यशस्वी होईल. चीनच्या सीमेवरील इतर १३ लहान देशांनाही हा इशारा असेल व त्यांच्यावरील चीनची दादागिरी अजून वाढेल. त्याचबरोबर भविष्यात भारताला चीनसमोर पुन्हा एकदा पडेल भूमिका घ्यायला लागून भारतीय सैन्याचे व पर्यायाने संपूर्ण देशाचे मनोधैर्य खच्ची होईल. चीनलासुद्धा इतक्या पुढे आल्यानंतर आता माघार घेणे अवघड झाले आहे. त्रिभुज प्रदेशातून सैन्य माघारी घेऊन काम थांबविले तर चीनच्या सैन्याचा व चीनचा दरारा कमी होईल व सीमेवरील इतर छोटे देशसुद्धा चीनच्या नजरेला नजर भिडवून बोलायला लागतील. यामुळे चीनच्या विस्तारवादी हालचालींना काही काळ पायबंद बसेल. एकंदरीच चीनने अट्टाहासाची भूमिका घेऊन स्वतःची व भारताची अडचण करून ठेवली आहे. हा प्रश्न दीर्घकाळ लोंबकळत राहील असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभिजीत अवलिया Tue, 08/01/2017 - 11:46 नवीन
तसेच भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे.
ही चुकीची माहिती आहे असे मला कालच समजले. भारत भूतान मैत्री करारात कुठेही भारत भूतानचे संरक्षण करेल असे म्हटलेले नाही. सध्या देखील भारत मित्रत्वाच्या नात्याने आणि आपल्याच पूर्वोत्तर राज्यांच्या संरक्षणासाठी डोकलाम वादात उतरलाय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/01/2017 - 12:15 नवीन
बर्‍याच माध्यमातून असेच लिहिले आहे की भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. अर्थात माध्यमातून १००% अचूक लिहिले जाते असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
व
वरुण मोहिते Tue, 08/01/2017 - 13:03 नवीन
वर ह्याची सविस्तर माहिती आहे . इंडिया भूतान ट्रीटी कश्या बदलत गेल्या याची . माध्यमांतल्या बातम्या वेगळ्या आणि खात्रीशीर बातम्या वेगळ्या . शस्त्रास्त्र पुरवठा भारत करेल , भूतान स्वतः शस्त्रास्त्र बनवून कुठेही निर्यात करू शकणार नाही , भूतान च्या सार्वभौमत्वाला काही दगा झाला तर भारत सरकार भूतान सरकार कडून काही मुद्द्यावर ग्वाही घेऊन सर्व शस्त्रास्त्र पुरवठा करेल असे अनेक मुद्दे आहेत त्यात . आणि आंतराष्ट्रीय कायद्यात प्रत्येक मुद्दा कुठल्यातरी टर्म्स वर बनतो . अपवाद व्हॅटिकन सिटी .(संरक्षणाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 08/01/2017 - 12:13 नवीन
अभिजीत अवलिया व गॅरी यांच्या प्रतिसादात काही समान मुद्दे असल्याने दोघांना एकत्रित उत्तर देत आहे. राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा दिला होता ? हा पाठिंबा राष्ट्रवादीने खरोखरच न मागता दिला होता असे मला तरी वाटत नाही. पडद्याआड भाजप-राष्ट्रवादीमध्ये काहीच बोलणी न होता राष्ट्रवादीने 'महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे या उदात्त हेतूने' भाजपला पाठिंबा जाहिर केला यावर फार कोणी विश्वास ठेवणे कठिण आहे. मतदार तितके भाबडे नक्कीच नाहीत. राष्ट्रवादीने २०१४ मध्ये निवडणुक निकालांच्या दिवशी दुपारी अचानक भाजपला पाठिंबा का दिला असावा हे तसे एक गूढच आहे. त्यामागे २-३ वेगवेगळी कारणे असावीत. १) भाजपला पाठिंबा दिला तर भाजप आपल्या पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार नाही अशा समजूतीने पाठिंबा दिला असावा. २) निवडणुकपूर्व प्रचारात भाजप व शिवसेना यांच्यातील संबंध रसातळाला गेले होते. विशेषत: शिवसेनेने भाजपविरूद्ध अत्यंत जहरी भाषा वापरली होती. त्यामुळे निवडणुकीनंतर हे दोघे भविष्यात कधीच एकत्र येणार नाहीत अशी पवारांची समजूत झालेली असावी. अशा परिस्थितीत आपण बाहेरून पाठिंबा दिला तर आपल्याला हवे तसे या सरकारला नाचविता येईल व भविष्यात सरकारमध्येही सामील होऊन सत्तेची फळे चाखता येतील हा पाठिंबा देण्यामागे हेतू असावा. तसेच वेळ पडल्यास आपल्या सोयीने पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडून मध्यावधी निवडणुक घेण्यास भाग पाडता येईल अशीही समजूत असावी. आपल्या विरूद्ध सातत्याने बोलणार्‍या भाजपने आपलाच पाठिंबा घेतला तर भाजपबद्दल जनतेत अतिशय वाईट मत होईल व असे सरकार काही काळाने पाडले तर आपल्याला फारसा तोटा न होता भाजपलाच सर्वाधिक फटका बसेल असेही त्यामागे गणित असावे. ३) अजून एक वेगळी शक्यता म्हणजे न मागता पाठिंबा देऊन त्याबदल्यात काही मागण्या पदरात पाडून घ्याव्यात अशी एक योजना असावी. आपल्या नेत्यांना भविष्यात भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचवावे हा एक हेतू असणारच. त्याचवेळी असेही वाचण्यात आले होते की मुख्यमंत्रीपदावर खडसे किंवा फडणवीस किंवा इतर कोणी येण्याऐवजी गडकरींना मुख्यमंत्री करावे यासाठी पवार गुपचूप काही भाजप नेत्यांबरोबर दिल्लीत फिल्डींग लावत होते. इतर कोणापेक्षाही गडकरींना मॅनेज करणे सोपे जाईल अशी त्यांची समजूत असावी. शिवसेना तुम्हाला अजिबात पाठिंबा देणार नाही. आम्ही बाहेरून बिनशर्त पाठिंबा देऊ. परंतु त्याबदल्यात तुम्ही गडकरींना मुख्यमंत्री करा अशी काहीतरी त्यांची मागणी होती असे वाचले होते. पवारांच्या दुर्दैवाने मोदी, शहा व फडणवीस त्यांच्यापेक्षाही वरचढ निघाले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मौन बाळगून मोदी-शहांनी फडणवीसांना मुख्यमंत्री बनविले व शेवटी शिवसेनेला पाठिंबा द्यायला भाग पाडले. त्यामुळे पवारांची खेळी फसली. काहीच फरक नाहीये. जिथे सत्ता तिथे आम्ही हे सगळ्या पक्षांचे सूत्र असते. त्याला जनकल्याणाचा मुलामा चढवला की झाले. भाजप हा नावाला 'पार्टी विथ डिफरन्स' आहे. जो पक्ष गोव्यासारख्या अत्यंत छोट्या राज्याची सत्ता मिळावी म्हणून संरक्षण मंत्र्याला परत पाठवतो आणि हे महत्वाचे खाते कामचलाऊ असल्यासारखे चालवतो त्याच्याकडून बिहारच्या सत्तेचा मिळत असलेला घास सोडला जाईल हे अपेक्षित न्हवतेच. बिहार मॉडेलप्रमाणे सपा-बसपा २०१९ मध्ये खरोखरच एकत्र आले तर (ही शक्यता बरीच आहे) ही आघाडी (बिहारमध्ये झाले त्याप्रमाणे) लवकरच तुटणार म्हणून त्यांना मिळणार्‍या मतांची बेरीज न होता त्यांची बरीच मते कापली जावीत या उद्देशाने भाजपने हा उद्योग केला आहे असे मला वाटते हेच मी ४-५ वेळा लिहिले आहे. उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये ही युती झाली नाही म्हणून २०१९ मध्येही होणारच नाही आणि राष्ट्रपती निवडणुकांमध्ये विरोधकांमध्ये फाटाफूट झाली हा विरोधक एकजिनसी नसल्याचा पुरेसा संदेश आहे असे मला तरी वाटत नाही. त्यापेक्षा बराच जास्त मोठा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवायला हवा आणि त्यासाठी बिहारमध्ये झाले ते चांगलेच झाले असे मला वाटते. बिहारमध्ये जे झाले व त्यापूर्वी गोवा व मणीपूर मध्ये जे झाले ते अयोग्य होते हे मी यापूर्वीच लिहिले आहे. राजकारण कितीही वाईट असले तरी तिथे थोडी तरी नीतिमत्ता असायला हवी असे माझे मत आहे. २०१३ पासून सातत्याने भाजपवर कठोर टीका करणार्‍या व भाजपशी विश्वासघात करणार्‍या नितीशकुमारांना भाजपने काही मिनिटांत पाठिंबा देणे अयोग्य होते. याच न्यायाने उद्या भाजप केजरीवालांशीही हातमिळवणी करू शकेल. लालू व नितीश ही युती २०१९ पूर्वीच तुटण्याची बरीच शक्यता होती. तसे होताना नितीशकुमारांची विश्वासार्हता जवळपास पूर्ण नष्ट झाली असती व त्याचा फायदा भाजपला झाला असताच. त्यांची युती तुटण्याची वाट न बघता भाजपने घाई करून नितीशकुमारांना पाठिंबा देऊन सत्तेत घुसायची घाई केली. कालपरवा बिहार मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यात जदयुचे १४, भाजपचे ११ आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या लोजपचा १ असे नवे मंत्री समाविष्ट करण्यात आले. तसेच भाजपचे मंगल पांडे पाटण्यात उपस्थित नसल्यामुळे त्यांना शपथ घेता आली नाही. त्यांचाही मंत्रीमंडळात लवकरच समावेश होईल. म्हणजे जदयुचे १४ आणि भाजप+ मित्रपक्षांचे १३ मंत्री आहेत. म्हणजे भाजपला पूर्वीइतके दुय्यम स्थान दिले गेलेले नाही. राज्यसरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने ओळखले जाते. त्यामुळे कोणत्याही सरकारची बरीवाईट कामगिरी ही मुख्यमंत्र्याच्या खात्यात जमा होते. त्यामुळे भाजपचे पूर्वीपेक्षा जास्त मंत्री असले तरी हे सरकार नितीशकुमारांचे म्हणूनच ओळखले जाणार. मंत्रीमंडळाचे कोणतेही निर्णय हे त्यांच्या मान्यतेनुसारच होणार. त्याअर्थाने भाजप अजूनही दुय्यम भूमिकेतच आहे. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यातील ४० पैकी ३१ लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी २५ जागा स्वतः भाजपच्या आहेत. या जागा भाजप सोडायला तयार होईल ही शक्यता बरीच कमी. तेव्हा जदयुला जास्तीतजास्त ९ (किंवा लोजपसारख्या मित्रपक्षांना जदयुच्या तिकिटावर निवडणुक लढवायला लावून जास्तीत जास्त १५) जागा लढवायला मिळू शकतील. पूर्वी जदयु २५ आणि भाजप १५ जागांवर निवडणुक लढवत असे. ते आकडे बरोबर उलटे होतील ही शक्यता जास्त. जर युती तुटली तर २०१९ मध्ये लोकसभेच्या जागावाटपाच्या प्रश्नावरून तुटायचा संभव आहे. आणि त्यातही अमित शहा शिवसेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवले होते तसे झुलवत ठेऊन नितीशकुमारांची बार्गेनिंग पॉवर कमी करतील कारण अगदी ऐनवेळी नितीशनी युती तोडली तर भाजप-जदयु-राजद अशी तिरंगी लढत होऊन परत २०१४ ची पुनरावृत्ती होईल हे नितीशकुमारांना कळणार नाही असे नाही. सध्या भाजपचे बिहारमध्ये २५ नसून २२ खासदार आहेत. ७ खासदार लोकजनशक्ती व २ खासदार उपेंद्र कुशवाहच्या पक्षाचे आहेत. समजा ही नवीन युती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकली तर संजदला जास्तीत जास्त ९ जागा लढवायला मिळू शकतात. यापूर्वी ४० पैकी २५ जागा लढविणारा संजद २०१९ मध्ये फक्त ९ जागांवर समाधान मानेल असे वाटत नाही. समजा संजदला जास्त जागा द्यायच्या तर त्यातील जास्तीत जास्त जागा भाजपच्या कोट्यातून द्यावा लागतील. म्हणजे एका अर्थाने भाजप स्वतःचे नुकसान करून घेणार. समजा जागावाटपावरून युती तुटली तर पुन्हा एकदा संजदच्या बरोबरीने भाजपची विश्वासार्हताही कमी होणार.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 08/01/2017 - 13:45 नवीन
रात्री सविस्तर उत्तर टंकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभिजीत अवलिया Wed, 08/02/2017 - 06:19 नवीन
श्रीगुरुजी, तुम्ही राष्ट्रवादीने २०१४ मध्ये निवडणुक निकालांच्या दिवशी अचानक भाजपला पाठिंबा का दिला असावा हे त्याची वेगवेगळी कारणे तुमच्या अंदाजे सांगितलीत. शेवटी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मौन बाळगून मोदी-शहांनी फडणवीसांना मुख्यमंत्री बनविले व शेवटी शिवसेनेला पाठिंबा द्यायला भाग पाडले असेही म्हणालात. --> तुम्ही अजूनही पवारांनी भाजपाला स्व:खुशीने मदत केली असे गृहीत धरत आहात. माझा अंदाज असा आहे -> निवडणूक निकाल लागल्यानंतर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले न्हवते. आपण जर लगेच शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव ठेवला तर त्यांना बरीच महत्वाची पदे द्यावी लागलील हे भाजपच्या लक्षात आले. तेव्हा शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपा+राष्ट्रवादीने पडद्यामागे हालचाली केल्या. राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी (?) स्थिर सरकार हवे अशा उदात्त हेतूने भाजपाला पाठिंबा द्यायचा असे वरकरणी घोषित करायचे असे ठरले असावे. त्याबदल्यात राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बगलबच्च्यांवर सरकारने कोणतीही कारवाई करायची नाही असे डील झाले असावे. त्यामुळे सिंचन घोट्याळातील पुरावे भरलेला ट्रक परत कुठे दिसलाच नाही. माझा आक्षेप ह्या पाठिंब्याला आहे. जरी राष्ट्रवादीने स्व:खुशीने पाठिंबा दिला होता असे एकवेळ मानले तरी भाजपाने तो का घेतला हा माझा प्रश्न आहे. संपूर्ण निवडणुक प्रचार काळात भाजपाने राष्ट्रवादीवर NCP म्हणजे Naturally Corrupt पार्टी, हे राष्ट्रवादी नाही, हे तर भ्रष्ट्रवादी अशी टिका केली होती. राष्ट्रवादीचे १०-१० चे घड्याळ म्हणजे त्यांनी गेल्या १० वर्षात भ्रष्टाचार १० पट वाढवला आणि अजून सत्तेत आले तर १५ पट वाढवतील असे पंतप्रधानांचे मत होते. (दुवा - http://timesofindia.indiatimes.com/home/specials/assembly-elections-2014/maharashtra-news/NCP-is-Naturally-Corrupt-Party-alleges-Narendra-Modi-Sharad-Pawar-slams-PM/articleshow/44794774.cms ) मग इतक्या भ्रष्ट पक्षाचा पाठिंबा जरी राष्ट्रवादीने स्वत:हुन दिला असे समजले तरी 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी जाहिरात करून स्वच्छ कारभाराची हमी देणार्या भाजपने घेतला तर हा जनतेचा विश्वासघात न्हवता का?
भाजपशी विश्वासघात करणार्‍या नितीशकुमारांना भाजपने काही मिनिटांत पाठिंबा देणे अयोग्य होते. भाजपने घाई करून नितीशकुमारांना पाठिंबा देऊन सत्तेत घुसायची घाई केली.
इथे पण तुम्ही नेहमीप्रमाणे सोईस्कर भूमिका घेतली आहे. जसे काही नितीशकुमारांनी तडकाफडकी राजीनामा दिला. हे समजल्यानंतर पंतप्रधानांना नितीशकुमारांच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे कौतुक वाटले आणि ५ मिनिटात त्यांनी ट्विटर वरून नितीश कुमारांचे अभिनंदन केले. नंतर ह्या भ्रष्टाचार विरोधी उदात्त लढ्यात सामील झाल्याबद्दल लगेच नितीशकुमारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. इथे जितके ढोंगी नितीश आहेत तितकाच ढोंगी भाजप देखील. मोदीना २०१९ साली कुणीही आव्हान देऊ शकणार नाही असे परवा नितीश म्हणाले. आणि हेच कारण होते नितीशकुमारांचे महागठबंधंन सोडून भाजपच्या कळपात शिरण्याचे. तसे पण किमान २०२४ पर्यंत केंद्रात सत्ता बदल होईल असे वाटत नाही. मग पराभूतांचा राजा होण्यापेक्षा विजेत्यांच्या कळपात शिरून निदान मुख्यमंत्रीपदी तरी कायम राहू हा सोईस्कर विचार. कारण इतकाच जर त्यांना भ्रष्टाचाराचा तिटकारा होता तर मुळात लालू यादवांशी हातमिळवणी केलीच नसती. हा संधीसाधूपणा जसा नितीशकुमारांनी केला तसेच बिहारची सत्ता मिळतेय म्हटल्यावर हावऱ्यासारखी ती घेण्याचा भाजपाने देखील केला. पण तुम्ही फक्त नितीश विश्वासघातकी, पवार विश्वासघातकी, काँग्रेस विश्वासघातकी असे उच्चं आवाजाने बोलता पण भाजपाने हे जे विश्वासघात केलेत त्याबद्दल फक्त 'भाजपाने चूक केली हा' अशी सौम्य भाषा वापरता. हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका आहे. कुणी कशी भूमिका घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण दाखवून द्यावेसे वाटले इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वामन देशमुख Wed, 08/02/2017 - 07:13 नवीन
पण तुम्ही फक्त नितीश विश्वासघातकी, पवार विश्वासघातकी, काँग्रेस विश्वासघातकी असे उच्चं आवाजाने बोलता पण भाजपाने हे जे विश्वासघात केलेत त्याबद्दल फक्त 'भाजपाने चूक केली हा' अशी सौम्य भाषा वापरता. हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका आहे.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
व
विशुमित Wed, 08/02/2017 - 07:43 नवीन
आपले +111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा