Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी: भाग ८

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 07/27/2017 - 17:12
🗣 215 प्रतिसाद
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे. धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join-bjp-rajya-sabha-elections-shankersinh-vaghela/ या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
42622 वाचन

💬 प्रतिसाद (215)
श
श्रीगुरुजी Wed, 08/02/2017 - 10:58 नवीन
तुम्ही अजूनही पवारांनी भाजपाला स्व:खुशीने मदत केली असे गृहीत धरत आहात. माझा अंदाज असा आहे -> निवडणूक निकाल लागल्यानंतर कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले न्हवते. आपण जर लगेच शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव ठेवला तर त्यांना बरीच महत्वाची पदे द्यावी लागलील हे भाजपच्या लक्षात आले. तेव्हा शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपा+राष्ट्रवादीने पडद्यामागे हालचाली केल्या. राष्ट्रवादीने महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी (?) स्थिर सरकार हवे अशा उदात्त हेतूने भाजपाला पाठिंबा द्यायचा असे वरकरणी घोषित करायचे असे ठरले असावे. त्याबदल्यात राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बगलबच्च्यांवर सरकारने कोणतीही कारवाई करायची नाही असे डील झाले असावे. त्यामुळे सिंचन घोट्याळातील पुरावे भरलेला ट्रक परत कुठे दिसलाच नाही. माझा आक्षेप ह्या पाठिंब्याला आहे. जरी राष्ट्रवादीने स्व:खुशीने पाठिंबा दिला होता असे एकवेळ मानले तरी भाजपाने तो का घेतला हा माझा प्रश्न आहे. कारण असे असण्याची बरीच शक्यता आहे. अर्थात इतरही काही शक्यता आहेत, परंतु मला हीच शक्यता सर्वाधिक आहे असे वाटते. मी वर लिहिल्याप्रमाणे निवडणुक प्रचाराच्या काळात सेना-भाजप संबंध इतके विकोपाला गेले होते की निकालानंतर हे दोन्ही पक्ष अजिबात एकत्र येणार नाहीत असे पवारांना वाटले असावे. अशा परिस्थितीत आपण बाहेरून पाठिंबा जाहीर करून आपल्याला एका दगडात अनेक पक्षी मारता येतील असे त्यांचे गणित असावे. आपल्या पाठिंब्यामुळे आपल्याविरूद्ध असलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे लांबणीवर टाकली जातील, आपला पाठिंबा स्वीकारला तर आपले काही नुकसान नाही परंतु भाजपची बदनामी होईल, आपला पाठिंबा नाकारला भाजपला शिवसेनेच्या नाकदुर्‍या काढाव्या लागतील म्हणजेच आपला पाठिंबा स्वीकारला किंवा नाकारला तरी भाजपची अडचणच होऊन भविष्यात भाजपला तोटा होईल, आपल्याला जेव्हा सोयिस्कर परिस्थिती निर्माण होईल तेव्हा पाठिंबा काढून घेऊन मध्यावधी निवडणुक लादता येईल व त्यावेळी भाजपला भरपूर तोटा होऊन आपल्याला फायदा होऊ शकेल असे काहीतरी गणित त्यांच्या मनात असावे. शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, कारण शिवसेना पूर्ण खच्ची झाली तर कॉग्रेस/राष्ट्रवादी विरोधी मते भाजपकडे एकवटतील. तसेच जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत शिवसेना आपल्यापेक्षा जास्त कट्टर विरोधकाची भूमिका पार पडेल हे पवारांनी ओळखले होते. भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेचे खच्चीकरण होऊन देणे काँग्रेस/राष्ट्रवादीला परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे ही शक्यता निकालात निघते. फडणविसांनी मागील ३ वर्षात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही नेत्यांच्या भ्रष्टाचारावर नक्कीच कारवाई केलेली आहे. परंतु सिंचन घोटाळ्याची चौकशी फार वेगाने सुरू नाही असी दिसते आहे. माझ्या मते ही चौकशी म्हणजे फडणविसांनी हातात ठेवलेला हुकुमाचा एक्का आहे. २०१९ पूर्वी निवडणुकीच्या आधी काही काळ या चौकशीला वेग येऊन अजित पवार, तटकरे हे सुद्धा भुजबळ चाचा-भतीजांप्रमाणे, रमेश कदम इ. प्रमाणे आत जातील असा माझा अंदाज आहे. अर्थात निवडणुकीवर डोळा ठेवून आपल्याला सोयीचे असेल तेव्हा कारवाई करणे हे निश्चितच अयोग्य आहे. जरी राष्ट्रवादीने स्व:खुशीने पाठिंबा दिला होता असे एकवेळ मानले तरी भाजपाने तो का घेतला हा माझा प्रश्न आहे. मग इतक्या भ्रष्ट पक्षाचा पाठिंबा जरी राष्ट्रवादीने स्वत:हुन दिला असे समजले तरी 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी जाहिरात करून स्वच्छ कारभाराची हमी देणार्या भाजपने घेतला तर हा जनतेचा विश्वासघात न्हवता का? भाजपने जसा पाठिंबा नाकारला नव्हता, तसाच तो स्वीकारलाही नव्हता. पाठिंब्याविषयी पूर्ण मौन पाळून भाजपने सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा धीर सुटला व त्यामुळे सेना सत्तेत सहभागी झाली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला १४५ तर भाजपला १३८ जागा मिळाल्या होत्या. भाजपची एकूण संख्या मित्रपक्षांसहीत १८७ होती तर काँग्रेसची एकूण संख्या मित्रपक्षांसहीत २१० च्या आसपास होती (२००४ मध्ये भाजपला हरवून काँग्रेसने विजय मिळविला हा प्रचार एक मोठा विनोद आहे कारण ५४३ सदस्यांच्या लोकसभेत दोन्ही पक्षांच्या सदस्यसंख्येत फक्त ७ चा फरक होता व दोन्ही पक्ष बहुमतापासून प्रचंड लांब होते). काँग्रेसने नंतर अजून काही मित्रपक्षांचा पाठिंबा मिळविला. त्यात भर म्हणजे ६२ जागा जिंकणार्‍या डाव्या पक्षांनीही काँग्रेसला बाहेरून पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसच्या समर्थक खासदारांची संख्या ३१० च्या पुढे जाऊन पोहोचली. आता काँग्रेसला इतर कोणाचीही गरज नव्हती. त्या निवडणुकीत सपने ३५ जागा जिंकल्या होत्या. मुलायमसिंगने १९९९ मध्ये वाजपेयींचे सरकार १ मताने पडल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी सोनिया गांधींच्या परकीय जन्माचा मुद्दा उपस्थित करून पाठिंबा देण्याचे नाकारले होते. सोनिया गांधी ते विसरल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांनी २००४ मध्ये सपकडे पूर्ण दुर्लक्ष केले. सत्ता स्थापनेपूर्वी त्यांनी काँग्रेससमर्थक पक्षांची बैठक बोलाविली होती. त्यात अर्थातच सपला निमंत्रण नव्हते. निमंत्रण नसताना सुद्धा मुलायम सिंगने स्वतःहून आपल्या पक्षाच्या वतीने अमरसिंगला बैठकीसाठी पाठविले. सोनिया गांधींनी बैठकीला आलेल्या अमरसिंगची दखलही घेतली नाही. आपल्या भाषणात त्यांनी पाठिंबा देणार्‍या सर्व पक्षांचे आभार मानले, परंतु त्यात सपचा उल्लेख नव्हता. आपल्या पक्षाचा उल्लेख नसल्याचे पाहून अमरसिंगांनी हात वर करून "हम भी है आपके साथमें" असे ओरडून सांगितले होते. अर्थात सोनिया गांधींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सुरू ठेवले. नंतर २००८ पर्यंत सप संसदेत स्वतःहून संपुआ सरकारला पाठिंबा देत होता परंतु त्यांना संपुआत घेतलेले नव्हते. सोनिया गांधींनी त्यांचा पाठिंबा स्वीकारला नाही आणि नाकारला पण नाही. फक्त योग्य वेळी म्हणजे २००८ मध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांच्या पाठिंब्याचा उपयोग करून घेतला. फडणविसांनी राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या पाठिंब्याचा स्वीकार न करता आणि न नाकारता त्याबद्दल मौन पाळून सेनेला नमविण्यासाठी असाच उपयोग करून घेतला. इथे पण तुम्ही नेहमीप्रमाणे सोईस्कर भूमिका घेतली आहे. जसे काही नितीशकुमारांनी तडकाफडकी राजीनामा दिला. हे समजल्यानंतर पंतप्रधानांना नितीशकुमारांच्या भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे कौतुक वाटले आणि ५ मिनिटात त्यांनी ट्विटर वरून नितीश कुमारांचे अभिनंदन केले. नंतर ह्या भ्रष्टाचार विरोधी उदात्त लढ्यात सामील झाल्याबद्दल लगेच नितीशकुमारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. इथे जितके ढोंगी नितीश आहेत तितकाच ढोंगी भाजप देखील. मोदीना २०१९ साली कुणीही आव्हान देऊ शकणार नाही असे परवा नितीश म्हणाले. आणि हेच कारण होते नितीशकुमारांचे महागठबंधंन सोडून भाजपच्या कळपात शिरण्याचे. तसे पण किमान २०२४ पर्यंत केंद्रात सत्ता बदल होईल असे वाटत नाही. मग पराभूतांचा राजा होण्यापेक्षा विजेत्यांच्या कळपात शिरून निदान मुख्यमंत्रीपदी तरी कायम राहू हा सोईस्कर विचार. कारण इतकाच जर त्यांना भ्रष्टाचाराचा तिटकारा होता तर मुळात लालू यादवांशी हातमिळवणी केलीच नसती. हा संधीसाधूपणा जसा नितीशकुमारांनी केला तसेच बिहारची सत्ता मिळतेय म्हटल्यावर हावऱ्यासारखी ती घेण्याचा भाजपाने देखील केला. पण तुम्ही फक्त नितीश विश्वासघातकी, पवार विश्वासघातकी, काँग्रेस विश्वासघातकी असे उच्चं आवाजाने बोलता पण भाजपाने हे जे विश्वासघात केलेत त्याबद्दल फक्त 'भाजपाने चूक केली हा' अशी सौम्य भाषा वापरता. हे म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी भूमिका आहे. कुणी कशी भूमिका घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण दाखवून द्यावेसे वाटले इतकेच. २०१७ मध्ये भाजपने गोवा, मणीपूर व उ. प्र. मध्ये (आदित्यनाथांना मुख्यमंत्री बनविणे) घेतलेले राजकीय निर्णय चुकीचे आहेत हे मी पूर्वी अनेकदा लिहिले आहे. मात्र बिहार प्रकरणात भाजपने फक्त चूक केलेली नसून मतदारांचा विश्वासघात केला आहे असे म्हणण्यास माझी मुळीच हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
ग
गॅरी ट्रुमन Tue, 08/01/2017 - 13:25 नवीन
२०१९ च्या आधी नितीश-लालू युती तुटली असती असे चित्र उभे राहिले कारण आधीपासूनच पडद्याआडून भाजप-जदयु यांच्यात बोलणी सुरू होती असे म्हणायला हरकत नसावी. तेव्हा या घडामोडी झाल्या त्या इतक्या लवकर झाल्या कारण भाजपही मागून पिना मारायचे काम करत होता. ते काम भाजपने केले नसते तर कदाचित नितीशकुमार तसेही महागठबंधनमध्येच राहिले असते ही शक्यता नाही का? म्हणजे हे महागठबंधन २०१९ पूर्वी तसेही तुटले असते असे तुम्हाला वाटते तशी परिस्थिती उभी करण्यात भाजपचाच हात आहे. तो समजा नसता तर नितीश आनंदाने त्या महागठबंधनमध्येच राहिले असते असे म्हणायला जागा नाही का? भाजपने अगदी 'इनोसन्टली' काही मिनिटात नितीशकुमारांना पाठिंबा जाहिर केला होता असे मला तरी वाटत नाही. या नाटकाची पटकथा आधीच ठरलेली होती. त्यातून भाऊ तोरसेकरांनी म्हटल्याप्रमाणे लालूंना दुसर्‍या दिवशी रांचीला चाराघोटाळ्याशी संबंधित सुनावणीसाठी जायचे होते अशा दिवशी संध्याकाळी हे सगळे नाटक घडले म्हणजे स्वतः लालूंना फार काही करता येईल अशी परिस्थिती राहिली नाही. तेव्हा मला वाटते की नितीश महागठबंधनमध्येच २०१९ पर्यंत राहतील ही शक्यता लक्षात घेऊनच भाजपने आधीपासूनच ते महागठबंधन तोडायचे प्रयत्न सुरू केले. आणि नितीशनेही असे तडकाफडकी महागठबंधन तोडले कारण भाजपच्या पाठिंब्याची हमी होती. अन्यथा नितीशकुमारांनी इतकी मोठी जोखीम घेतली असती असे वाटत नाही. तेव्हा २०१९ पूर्वी महागठबंधन तसेही तुटले असते असे तुम्ही म्हणत आहात त्याला ही पार्श्वभूमी आहे.
राज्यसरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने ओळखले जाते.... समजा जागावाटपावरून युती तुटली तर पुन्हा एकदा संजदच्या बरोबरीने भाजपची विश्वासार्हताही कमी होणार.
त्याप्रमाणेच केंद्रसरकार विशेषतः मोदी सरकार हे पंतप्रधानांच्याच नावाने ओळखले जाते. मोदींची आजची लोकप्रियता २०१९ पर्यंत कायम राहिली तर युती तुटली तरी भाजपवर फार परिणाम व्हायला नको. पण इतर राज्यांमध्ये मतदारांना कोणतीही विरोधकांची आघाडी केवळ मोदीविरोध या नावावर उभी राहिली तर ती कधीच स्थिर होऊ शकणार नाही हा जबरदस्त निर्विवाद संदेश लालू-नितीश फुटल्यामुळे गेलाच आहे. त्यावरही फार परिणाम होऊ नये.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Tue, 08/01/2017 - 13:42 नवीन
फक्त आणि फक्त मोदी ह्यांच्या जीवावर . तेजस्वी यादव ह्याची वाढती लोकप्रियता ह्याला बऱ्याच अंशी कारणीभूत आहे . गठबंधंन होऊन लालूप्रसाद जर ८० जागा मिळवत असतील तर ह्या पुढील निवडणुकांमध्ये नितीशकुमार अजून खाली जातील . मोदी ह्यांना २०१९ साठी फक्त नितीशकुमारांना आपलेसे करायचे आहे . कारण २८२ जागा आज असल्या आणि सर्व विरोधक एकत्र आले किंवा नितीशकुमार हा त्यांचा स्वच्छ चेहरा म्हणून पुढे करता आला तर मोदींना भारी पडले नसते फार पण उपद्रव मूल्य वाढले असते . त्यामुळे आयकर धाडी . हे सगळे राजकारण काही एका दिवसात नाही शिजत .नितीशकुमारांना आता राज्य हवे आहे आणि मोदींना देश . विरोधक सक्षम नसल्याचे कालखंड पहिले तर भारतीय राजकारणात हि अभूतपूर्व परिस्थिती आहे .पद्धतशीर रित्या विकासपुरुष केलेला प्रचार असो , व विरोधकांना नामोहरम करणे असो. देश आपल्या ताब्यात हवा हे प्रचारतंत्र काँग्रेस च्या १९६९ काळापासून ची आठवण करून देते . फक्त त्या काळी विवेकी लोक होती . आज विवेकी लोक कमी आहेत त्यामुळे राजकारण अजून सोपे झाले आहे . ह्या लाटेवर मोदी प्रत्येक गोष्ट कॅच करून स्वार झालेले आहेत . अवांतर _ मिपावर विरोधी नाही पण समतोल मते देणारे बरेच आहेत हो मिपाकरांनो .आताशी कुठे ३ वर्षे झाली सद्य सरकारला . निवडणूक आहेच कि पुढची बोलायला :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 08/01/2017 - 14:13 नवीन
फक्त त्या काळी विवेकी लोक होती .
म्हणजे कोण? नेते कि मतदार?
मिपावर विरोधी नाही पण समतोल मते देणारे बरेच आहेत हो मिपाकरांनो .
+१००००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
श
श्रीगुरुजी Wed, 08/02/2017 - 11:19 नवीन
एकंदरीत २-३ मुद्द्यांवर आपले मतभेद आहेत. १) भाजपने नितीशकुमारला लालूबरोबर युती तोडायला लावून स्वतः पाठिंबा दिला हे २०१९ च्या दृष्टीने योग्य झाले असे तुमचे मत आहे. परंतु भाजपने थोडी नैतिकता दाखवून नितीशकुमारांना पाठिंबा द्यायला नको होता. किंबहुना २०१९ पूर्वीच ही युती त्यातील अंतर्विरोधामुळे तुटलीच असती व अंतिमतः भाजपलाच त्याचा फायदा झाला असता असे माझे मत आहे. २) मतदारांना कोणतीही विरोधकांची आघाडी केवळ मोदीविरोध या नावावर उभी राहिली तर ती कधीच स्थिर होऊ शकणार नाही हा जबरदस्त निर्विवाद संदेश लालू-नितीश फुटल्यामुळे गेलाच आहे, असे तुमचे मत आहे. माझे मत असे आहे की विरोधकांमध्ये एकी नाही हा संदेश यापूर्वी मतदारांना अनेकवेळा गेलेला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतदानातही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशातही सप-काँग्रेस युतीबद्दलही निवडणुक संपल्यानंतर उलटसुलट बातम्या येत होत्या. ३) बिहारमध्ये राजद-संजद-काँग्रेस ही युती २०१९ पर्यंत कायम राहील या भीतिने भाजपने ती तोडण्याचा प्रयत्न केला असे तुमचे मत आहे. माझ्या मते ही युती २०१९ पूर्वी तुटण्याची बरीच शक्यता होती. विरोधकांमध्ये एकी नाही हा संदेश त्यावेळी पुन्हा एकदा गेला असता. युती स्वतःहून तुटण्याची वाट न बघता ही युती फोडून स्वत: नितीशबरोबर युती करणे योग्य नव्हते. राजद-संजद-कॉग्रेस युतीत लालूचा बराच हस्तक्षेप होता. लालूला फक्त १०-१२ आमदारांची गरज असल्याने लालू फोडाफोडी करून नितीशचे सरकार पाडून त्याजागी स्वतःच्या पक्षाचे सरकार आणण्याचा प्रयत्न करणार हे नक्की होते. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवची लोकप्रियता बर्‍यापैकी वाढत होती. नितीशकुमार परवा दुसर्‍यांदा शपथ घेताना विधानसभेत तेजस्वी यादवने केलेले भाषण त्याच्या परिपक्वतेची साक्ष देणारे होते. इतक्या लहान वयात त्याने खूपच चांगले भाषण करून नितीशकुमारांना जे बोचकारे काढले त्यावरून भविष्यात त्याचे राजकीय भविष्य उज्ज्वल आहे असा माझा अंदाज आहे. शेवटी नितीशकुमारांना युती तोडावीच लागली असती व त्या परिस्थितीत मध्यावधी निवडणुक किंवा पाठिंब्यासाठी भाजपची विनवणी या दोनच शक्यता होत्या व दोही शक्यता भाजपसाठी जास्त अनुकूल ठरल्या असत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 08/02/2017 - 12:15 नवीन
हे सगळे जर-तरचे खेळ आहेत. या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या असत्या तर सोन्याहून पिवळे पण इतिहास बघता तसे होणे सहजसाध्य होते असे मला तरी वाटत नाही. १. २०१४ मध्ये सुरवातीला वाटत होते की नितीश आणि लालू त्यांच्यातील २० वर्षांचे वैर विसरून एकत्र येणेच शक्य नाही. पण ते आले. २. नंतर वाटायला लागले की आधीच्या विधानसभेत ११५ आमदार असताना नितीशकुमार १०० जागा मान्य करणे शक्य नाही त्यामुळे जागावाटपावरून राजद-जदयु-काँग्रेस महागठबंधन तुटेल. पण तसे झाले नाही. ३. नंतर वाटायला लागले की जदयुच्या किमान १५ आमदारांचे तिकिट कापले गेल्यामुळे जदयुमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होईल. पण तसे झाले नाही. ४. नंतर वाटायला लागले की जदयुच्या आमदारांनी बंडखोरी केली नसली तरी ते आतून महागठबंधनचे नुकसान करतील. पण तसे झाले नाही. ५. नंतर वाटायला लागले की इतकी वर्षे जदयु आणि राजदचे कार्यकर्ते एकमेकांविरूध्द प्रचार करत असल्यामुळे त्यांच्यात कटुता कायमच असेल आणि ते महागठबंधनचा प्रचार व्यवस्थित करणार नाहीत. पण तसे झाले नाही. ६. नंतर वाटायला लागले की जदयुची 'महादलित' व्होटबँक लालू यादवांच्या राजवटीत झालेल्या 'यादवीच्या' त्रासामुळे महागठबंधन सत्तेत आल्यास परत तसेच होईल या भितीने भाजपला मत देईल आणि जदयु-राजदच्या नुसती मतांची बेरीज होणार नाही. पण तसे झाले नाही. इतक्या सगळ्या गोष्टी विपरीत झाल्यावर कधीनाकधी नितीश-लालू एकमेकांपासून दुरावतील आणि ती वेळ २०१९ पूर्वीच होईल यावर विसंबून राहण्यात कितपत अर्थ होता? कदाचित हे 'विशफुल थिंकिंग' ठरले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 08/02/2017 - 12:20 नवीन
२०१९ मध्ये किंवा त्यापूर्वी लालू-नितीश एकमेकांपासून वेगळे होतील हे विशफुल थिंकिंग असू शकेल. त्याचप्रमाणे त्यांची युती २०१९ पर्यंत टिकून राहील हे सुद्धा विशफुल थिंकिंग असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 08/02/2017 - 12:28 नवीन
चप्रमाणे त्यांची युती २०१९ पर्यंत टिकून राहील हे सुद्धा विशफुल थिंकिंग असू शकते.
आधीचा इतिहास लिहिला त्याचे कारण हे की त्यांच्या युती २०१९ पर्यंत टिकून राहिल हे विशफुल थिंकिंग असण्यापेक्षा नसायची (म्हणजे युती २०१९ पर्यंत टिकून राहायची) शक्यता जास्त होती हे दाखवून देणे. कारण आधीच्या ६ अडथळ्यांवर महागठबंधन फसेल असे वाटत होते त्यापैकी एकाही अडथळ्यावर ते फसले नाही. तेव्हा सातव्यावर ते फसेलच आणि ते पण २०१९ च्या आधी ही शक्यता तसे न होण्यापेक्षा कमीच असे भाजप नेतृत्वाला वाटले असले तर त्यात त्यांची चूक आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 08/02/2017 - 15:50 नवीन
ठीक आहे. बघूया २०१९ पर्यंत काय होतंय ते. शरद यादव नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत असं काही वेळापूर्वीच वाचलं. त्यांच्या मागे फार कोणी जाईल असे वाटत नाही. परंतु त्यामुळे संजदला एखादा तडा पडेल हे मात्र नक्की. कदाचित २०१९ मध्ये राजद्+काँग्रेस्+शरद यादव अशी पूर्ण नवीन युती पहावयास मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विशुमित Tue, 08/01/2017 - 14:02 नवीन
खासदारांना स्वतःचे वेतन वाढवण्याचा अधिकार असता कामा नये; यासाठी वेगळी यंत्रणा आसावी अशी स्तुत्य मागणी वरुण गांधींनी लोकसभेत केली आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/do-not-have-any-right-to-mps-to-hike-own-salaries-says-varun-gandhi-at-loksabha-1522532/
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Tue, 08/01/2017 - 18:24 नवीन
१. काही दिवसापूर्वी डॉ कलाम यांच्या स्मारकाविषयी झालेला वाद वाचला, वाचून दुःख झालं. खरतर डॉ कलाम यांच्या पुतळ्यापाशी धार्मिक ग्रंथ आणि हातात वीणा देण्याचं प्रयोजन मला कळलं नाही. DRDO च्या म्हणण्यानुसार त्यांना वरून (म्हणजे सेंट्रल मिनिस्ट्री) कडून जो प्लॅन आला तो त्यांनी अमलात आणला (संधर्भ : बातमी Read here). डॉ कलाम हे कला आसक्त असतील हि, ते अध्यात्मिक असतील हि, परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे डॉ कलाम हे विज्ञाननिष्ठ होते, त्यांचा वैज्ञानिक दृष्टीने भारतास खूप काही दिले त्यामुळं त्यांचा पुतळ्यात त्यांच्या मुख्य अंगाचं प्रतिबिंब दिसायला हवं होत. गीता काय तिथं कुराण हि नको होत हवं होत एखाद फिसिक्स किंवा गणिताचं प्रसिद्ध पुस्तक, विण्याची ऐवजी हातात एखाद यंत्र, पेन्सिल किंवा अग्निबाणाची प्रतिकृती. २. काही दिवसापूर्वी गाई च्या दूध, मूत्र आणि शेण यांच्या संशोधनासाठी एक उचस्तरीय समिती नेमण्यात आली त्यात विजय भाटकर, रघुनाथ माशेलकर आणि स्वतः मंत्री हर्षवर्धन यांचा समावेश आहे. हे पाहून सरकारच प्राथमिकता स्पष्ट होते. मुळात गाई वरील संशोधनास विरोध करण्याचं कोणतंच कारण नाही, कारण कोणतीही गोष्ट वैज्ञानिक पातळीवर संशोधन होऊन स्वीकारली किंवा नाकारली पाहिजे. विरोध आहे तो प्राधान्य ठरवायला. मुळात भाटकर आणि माशेलकर हे खूप मोठे वैज्ञानिक त्यांचा वेळ हा देशासाठी लाखमोलाचा त्यामुळे आपल्या देशास अनेक वैज्ञानिक आणि शैक्षणिक समस्या भेडसावत असताना तो तिथे उपयोगी पडला पाहिजे. गाई वरील संशोधन ह्या गोष्टी त्या क्षेत्रातील संशोधकांनी हाताळल्या पाहिजेत एवढे उच्चदर्जाचे रिसोर्सेस वापरता कामा नयेत. (संधर्भ Read here) ३. भारत सरकार ने वैज्ञानिक संस्था आणि संशोधन यावरील निधीत कपात केल्याची बातमी वाचली , अत्यंत negative स्टेप. मुळात प्रश्न असा पडतो कि हे मंत्री अधिकारी असे निर्णय का घेत असतील , याच कारण मुळात देशाचे प्रमुख मोदी आणि RSS यांच्या विचारसरणीत दडलेलं आहे. जेंव्हा मोदीच कर्णाच उदाहरण देऊन आपल्याकडे जुन्या काळी जेनेटिक science होत असे बडबडतात, गणेशाचं उदाहरण देऊन आपल्याकडे प्लास्टिक सर्जेरी तंत्रज्ञान होत असे म्हणतात तेंव्हा वैज्ञानिक आणि कॉमन सेन्स असणारी सामान्य लोक याना डोकयावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. आणि त्यांचे मंत्री अधिकारी सुद्धा मग हाच अँप्रोच घेऊन पुढे येतात. (संधर्भ : Read here)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 08/02/2017 - 07:48 नवीन
१) +१११ २) +१११ ३) +१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
A
arunjoshi123 गुरुवार, 08/03/2017 - 10:19 नवीन
कला आसक्त असतील हि, ते अध्यात्मिक असतील हि, परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे डॉ कलाम हे विज्ञाननिष्ठ होते
तुमच्या डिक्शनरीत कला आणि विज्ञाननिष्ठता तसेच अध्यात्म आणि विज्ञाननिष्ठता या एंट्रीज विरोधार्थी शब्द आहेत म्हणून आहेत का? ========================================== आम्ही जेव्हा एखादं प्रतिगामी मत मांडतो तेव्हा "उद्या तुम्ही असेही कराल" असा उद्यावाचक प्रयोग आम्हा कंजर्ववेटीवांबद्दल फारदा मिसळपावर होत असतो. हाच न्याय इथे लावला तर त्यांचे केस, किंवा पँट कशाला दाखवली, विज्ञाननिष्ठतेचा नि केसांचा / पँटचा संबंध काय असं देखिल उद्या तुम्ही विचाराल. =============== कला आसक्त असतीलही मंजे काय - भयंकर आसक्त होते, अतीव गीताप्रेमी होते. उठ सुट कुठेही गीता कोट करायची अवैज्ञानिक सवय होती त्यांना. "शांततेचं पालन करण्यासाठी हातात शस्त्र असावं लागतं" इ इ विक्षिप्त, त्यांच्या कामाशी असंबंधित विचार त्यांनी त्याच पुस्तकातून उचललेले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
A
arunjoshi123 गुरुवार, 08/03/2017 - 10:23 नवीन
त्यांचा वैज्ञानिक दृष्टीने भारतास खूप काही दिले
भारतास केवळ अध्यात्मिक दृष्टिच्या शास्त्रज्ञांनी काही दिले. नास्तिकी वैज्ञानिकांनी अजून तरी काही दिलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
A
arunjoshi123 गुरुवार, 08/03/2017 - 10:35 नवीन
मुळात भाटकर आणि माशेलकर हे खूप मोठे वैज्ञानिक त्यांचा वेळ हा देशासाठी लाखमोलाचा
हो, पण म्हणूनच ते गाईबद्दल व्यवस्थित रिपोर्ट देऊन सरकारचे भ्रम (होपफुली कायमचे) दूर करतीलना? ====================== बातमी द हींदूने दिली आहे, तेव्हा धुळीचे थर पुसून वाचायला हवी. एका मोठ्या मँडेटमधे (समितीच्या टर्म्स ऑफ रेफरन्स मधे) गाय हा शब्द आढळला कि त्यांनी सुतावरून ढग गाठला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा गुरुवार, 08/03/2017 - 10:44 नवीन
तुम्ही प्रतिसाद सॅरकॅस्टिकली दिलाय का? नसेल तर हा खालील उपप्रतिसाद.
तुमच्या डिक्शनरीत कला आणि विज्ञाननिष्ठता तसेच अध्यात्म आणि विज्ञाननिष्ठता या एंट्रीज विरोधार्थी शब्द आहेत म्हणून आहेत का?
नाही. "कला आसक्त असतील हि, ते अध्यात्मिक असतील हि, परंतु सगळ्यात महत्वाचे म्हणजे डॉ कलाम हे विज्ञाननिष्ठ होते" हे वाक्य तेच सिद्ध करताय.
हो, पण म्हणूनच ते गाईबद्दल व्यवस्थित रिपोर्ट देऊन सरकारचे भ्रम (होपफुली कायमचे) दूर करतीलना?
हे पहा मूळ प्रतिसादातील वाक्य "गाई वरील संशोधन ह्या गोष्टी त्या क्षेत्रातील संशोधकांनी हाताळल्या पाहिजेत एवढे उच्चदर्जाचे रिसोर्सेस वापरता कामा नयेत." उरलेले मुद्दे भारीच विनोदी आहेत त्यामुळं त्याचा प्रतिवाद नाही करत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 08/02/2017 - 08:40 नवीन
गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आलेल्या बेंगलोरमधील रिसॉर्टवर आयकर विभागाच्या धाडी पडल्याच्या बातम्या आहेत! योग्य कृती? कि भाजपचा अहमद पटेलांना हरवण्यासाठी चाललेला उतावळेपणा? या अशा (अ)योग्य वेळी पडलेल्या धाडींमुळे भाजप विच-हंटिंगसाठी सरकारी यंत्रणा वापरतोय असा मेसेज जाणार नाही का?
  • Log in or register to post comments
स
संग्राम Wed, 08/02/2017 - 09:11 नवीन
मी हीच बातमी लिहायला आलो होतो ...... सरकारी यंत्रणेचा गैरवापर हे "सर्व" विरोधी पक्ष कायमच सांगतात .... पण सध्याच्या घटना, त्यांचा क्रम आणि वेळ बघता असेच वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ग
गॅरी ट्रुमन Wed, 08/02/2017 - 09:22 नवीन
गुजरातमधील काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आलेल्या बेंगलोरमधील रिसॉर्टवर आयकर विभागाच्या धाडी पडल्याच्या बातम्या आहेत! योग्य कृती?
कायद्याप्रमाणे ही कृती करण्यात येत असेल तर त्यात अयोग्य काय आहे? आणि या रिझॉर्टने तशाही बर्‍याच लांड्यालबाड्या केल्या आहेत. सिद्दरामय्यांच्याच काँग्रेस सरकारने या रिझॉर्टला सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल मागच्या वर्षी नोटिस बजावली होती. आयकर विभागाच्या धाडी अशा एकाएकी पडत नसतात तर त्यापूर्वी काहीतरी हालचाली विभागीय पातळीवर होतच असतात. त्यामुळे ही कारवाई काँग्रेस आमदार तिथे गेल्यावर झाली असायची शक्यता फारच कमी. कायद्याप्रमाणे कारवाई होत असेल तर त्यात कोणीही तक्रार करू नये. कदाचित काँग्रेसने मुद्दामून अशाच रिझॉर्टमध्ये आपल्या आमदारांना पाठविले असेल असेही मला वाटायला लागले आहे. मोदी सरकार आल्यापासून विरोधकांची एक मोडस ऑपरेन्डी झाली आहे. कितीही बेकायदा गोष्टी केल्या असल्या तरी मोदींवर टिका करून ठेवलेली असली तर त्या बेकायदा गोष्टींसाठी सरकारने बडगा उगारला तर 'आम्ही मोदीविरोधी म्हणून कारवाई होत आहे' अशी ओरड करायला हे लोक मोकळे असतात. अवॉर्डवापसीमध्ये लहान प्रमाणावर हा प्रकार बघायला मिळाला होता. मागच्या वर्षी रविशकुमारच्या हिंदी एन.डी.टी.व्ही ला एक दिवस बंद ठेवायचा आदेश दिल्यावर आणि त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात प्रणॉय रॉयच्या एन.डी.टी.व्ही ला मध्यंतरी नोटिस बजावल्यावर हा प्रकार बघायला मिळाला होता. त्याप्रमाणेच काँग्रेसने मुद्दामून अशा रिझॉर्टमध्ये आमदारांना कशावरून नेले नसेल? म्हणजे धाड पडल्यावर काँग्रेसचे आमदार इथे उतरले होते म्हणून धाड पडली वगैरे वगैरे ओरड करायला काँग्रेसवाले मोकळे आणि स्वयंघोषित पुरोगामी त्यात सूर मिसळायलाही मोकळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
प
प्रसाद_१९८२ Wed, 08/02/2017 - 09:37 नवीन
आणि या धाडीचे भांडवल करुन, कॉंग्रेजने आजही राज्यसभेत गोंधळ घालून राज्यसभेचा वेळ वाया घालवला आहे. शिवाय या रिसॉर्टवर धाड पडल्याने, गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीत अहमद पटेल यांचा पराभव होणे कसे काय शक्य आहे ? मागे 'गुजरात मधील आमदार, पैसे देऊन भाजपा फोडत आहे' ह्या कॉंग्रेसने केलेल्या आरोपाचे कोणतेही पुरावे त्यांनी अजूनही दिले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्री Wed, 08/02/2017 - 10:13 नवीन
महाराष्ट्रात मुहूर्त केंव्हाचा आहे ? कि इकड्चं पंचांग गहाळ झालंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
संग्राम Wed, 08/02/2017 - 10:43 नवीन
"कायद्याप्रमाणे ही कृती करण्यात येत असेल तर त्यात अयोग्य काय आहे" - बरोबर, पण प्रश्न वेळेचा आहे ... खूपचं योगायोग वाटतो .... आयकर विभागाच्या धाडी बद्द्ल कुठेतरी वाचलं होतं .... नक्किच त्या अशा एकाएकी पडत नसतात बरीच प्रोसिजर आहे ... परवानग्या घ्याव्या लागतात अगदी असेच बिहार मध्ये सुद्धा ... कदाचित खूपच वेगवान हालचाली करतात :-) आणि हो आत्ताच नाही, आधी म्हटल्याप्रमाणे "सरकारी यंत्रणेचा गैरवापर हे "सर्व" विरोधी पक्ष कायमच सांगतात" तर ... कुछ तो गडबड होती ही होगी ... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Wed, 08/02/2017 - 11:02 नवीन
रीसॉर्टवर नेमकी आताच धाड पडणे हा योगायोग नक्कीच नाही. ज्याप्रमाणे मलिष्काने विडंबनात्मक रॅप प्रसिद्ध केल्यानंतर तिच्या घरी महापालिकेचे कर्मचारी डासांच्या अळ्या तपासण्यासाठी गेले हा योगायोग नव्हता, तसाच हासुद्धा योगायोग नाही. राजकारणात असे योगायोग क्वचितच घडतात. जयललिताच्या मृत्युनंतर २ महिन्यांनी शशिकलाने पनीरसेल्वम हटवून त्याच्या जागी स्वतःला बसविण्याची तयारी सुरू केल्यानंतर तिने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या १-२ दिवस आधीच तिच्याविरूद्ध सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्याचा निकाल लागला हा सुद्धा योगायोग नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संग्राम
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 08/03/2017 - 06:38 नवीन
सहमत आहे. पण तरी देखील कारवाई केली म्हणून काँग्रेसने थयथयाट करणे अयोग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 08/02/2017 - 15:15 नवीन
कृती योग्य कि अयोग्य हा मुद्दा नाहीये, आयकर खात्याने टाकलेली धाड हि योग्यच आहे कारण ते त्यांचे काम आहे. मुद्दा हा आहे कि स्थळ आणि वेळ हे ह्या धाडीचा संदर्भ ठरवतात. भाजपने अशा मुद्द्यांपासून लांब रहायला हरकत नाही. नाहीतरी कित्येक धाडी वर्षानुवर्षे पुढे ढकलल्या जात नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
A
arunjoshi123 गुरुवार, 08/03/2017 - 10:39 नवीन
अहमद पटेल यांना थेटच हंट केले तरी (मंजे पोलिटिकली केले) माझा पाठींबा असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 08/03/2017 - 12:17 नवीन
थेट हंट करायला हरकत नाही पण सगळ्याच भ्रष्टाचार्यांना करावं. काँग्रेसकडू तशी अपेक्षा नव्हती पण ह्या सरकारकडून आहे. उगाच वेळ काळ पाहून टार्गेट करण्याने प्रकरणाचं महत्व कमी होतं आणि एकूणच लक्ष विचहंटिंगकडे वळते असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
अ
अनुप ढेरे Wed, 08/02/2017 - 11:16 नवीन
अहमद पटेल स्वतः पैसा पावर वापरुन विरोधकांना नामोहरम करणार्‍यांपैकी आहे. त्यात त्याने मोदी आणि अमित शहांना लय त्रास दिलेला आहे चित्र विचित्र केसेस त्यांच्या मागे लाउन. अमित शहा वैयक्तिक बदला घेत आहेत आता. बोया पेड बबुल का आम कहांसे पाए.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 08/02/2017 - 13:49 नवीन
अमितदादा,
मुळात भाटकर आणि माशेलकर हे खूप मोठे वैज्ञानिक त्यांचा वेळ हा देशासाठी लाखमोलाचा त्यामुळे आपल्या देशास अनेक वैज्ञानिक आणि शैक्षणिक समस्या भेडसावत असताना तो तिथे उपयोगी पडला पाहिजे. गाई वरील संशोधन ह्या गोष्टी त्या क्षेत्रातील संशोधकांनी हाताळल्या पाहिजेत एवढे उच्चदर्जाचे रिसोर्सेस वापरता कामा नयेत.
डॉक्टर माशेलकर, डॉक्टर विजय भटकर इत्यादि बड्या संशोधकांनी गोसंशोधन गांभीर्याने घेतल्याने जनतेत एक सकारात्मक संदेश जाईल. अस्सल भारतीय वाणाच्या गायी आणि बैलांची संख्या चिंताजनक रीत्या कमी होते आहे. या हानीस पायबंद बसून बहूपयोगी गायींचं संवर्धन होणं भारतीय जनतेच्या भल्यासाठीच आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 08/02/2017 - 14:02 नवीन
देशी गोसंवर्धन हे कायम धार्मिक/राजकीय चष्म्यातूनच पाहिलं गेलं पाहिजे असं नाही (अमितदादा, तुम्ही पाहताय असा आरोप नाही बरंका, सर्वसाधारण बोलतोय) भारतातल्या कित्येक वाणाची गुरे दुग्धोत्पादना करता सर्वोत्तम आहेत, गीर, कांकरेज, नेल्लोर कॅटल वगैरे तिकडे ब्राझील मध्ये फायदेशीर म्हणुन प्रसिद्ध होतायत, आमचे मिलिटरीतले एक पाहुणे सांगतात त्याप्रमाणे, आर्मी फार्म जेव्हा सुरु होती तेव्हा फक्त साहिवाल गायी पाळत, त्यांच्यानुसार फौजेला कधीही म्हशींचे दूध पाजत नसत तर साहिवाल गायीचंच असे. (भुलचुक घेणे देणे) वैयक्तिक अनुभव हा की, ऑपरेशन फ्लड अंतर्गत दुग्धोत्पादन वाढवायला, जर्सी/संकर गायी प्रमोट केल्या गेल्या अन तो एक टेम्परवारी प्रयोग होता. ट्रॉपिकल वातावरण असलेल्या भारतात हे भारी पडलं, संकरित गायी रोगराईला जास्त बळी पडतात अन जर्सी मेंटेन करायचा खर्च नफ्याचे गणित गंडवतो. शास्त्रोक्त विचार करून देशी गायी संगोपन ह्यावर रिसर्च केल्यास फायदाच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अमितदादा गुरुवार, 08/03/2017 - 11:06 नवीन
@गामा पैलवान सहमत नाही. @जेम्स वांड
देशी गोसंवर्धन हे कायम धार्मिक/राजकीय चष्म्यातूनच पाहिलं गेलं पाहिजे असं नाही (अमितदादा, तुम्ही पाहताय असा आरोप नाही बरंका, सर्वसाधारण बोलतोय)
धन्यवाद, परंतु हे लक्ष्यात घ्या सरकार मधीलच काही लोक हा मुद्दा धार्मिक करतायत, त्यांना दूध उत्पादन, शेतकरी हित याच काही पडलेलं नाही त्यांना फक्त पोलिटिकल स्कोर वाडवायचा आहे.
वैयक्तिक अनुभव हा की, ऑपरेशन फ्लड अंतर्गत दुग्धोत्पादन वाढवायला, जर्सी/संकर गायी प्रमोट केल्या गेल्या अन तो एक टेम्परवारी प्रयोग होता. ट्रॉपिकल वातावरण असलेल्या भारतात हे भारी पडलं, संकरित गायी रोगराईला जास्त बळी पडतात अन जर्सी मेंटेन करायचा खर्च नफ्याचे गणित गंडवतो. शास्त्रोक्त विचार करून देशी गायी संगोपन ह्यावर रिसर्च केल्यास फायदाच होईल
याबाबत मी सहमत नाही माझा वैयक्तिक अनुभव वेगळा आहे, मी ज्या ग्रामीण भागातून आहे तिथे गावात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत देशी गाई आहेत बहुतांश शेतकरी जर्सी गाई वापरतात. तसेच मध्यंतरी लोकसत्ता मध्ये एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने (बहुतेक ?) इसराईल मधील दूध उत्पादन आणि संकरित गायी यावर लेख लिहलेला, यामध्ये इसराईल मध्ये गाई ची संख्या न वाढवता दूध उत्पादन कसे वाढवले यावर लिहलेलं. त्यामुळं देशी गाई च्या दूध उत्पादन वाढवण्यात मर्यादा आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. याबात तद्न्य व्यक्तीच मत आकडेवारी सह वाचाय मिळाल्यास माझं वरील मत बदलायची माझी तयारी आहे. तसेही माझ्या मूळ प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे सरकारी कमिटी दूध उत्पादन वाढवण्याबाबत काम करणार नसून गाई + औषध यावर काम करणार आहे. (संशोधनास विरोध नाही, मूळ प्रतिसाद वाचावा). इथेच थांबतो नाहीतर चर्चा गाईवर फिरण्याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
महेश हतोळकर गुरुवार, 08/03/2017 - 10:39 नवीन
http://m.maharashtratimes.com/india-news/dujana-to-armyman-congrats-you-caught-me-but-i-cant-surrender/articleshow/59894513.cms#video#video ही बातमी फार महत्वाची आहे. अशा अनेक टेप प्रसारीत व्हायला पाहिजेत मानवाधीकार आयोगाच्या बुरख्यामागे दडलेल्या अतीरेक्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी हे आवश्यक आहे
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 08/03/2017 - 13:19 नवीन
पीपल्स डेमॉक्रसी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे. नितीशकुमारांनी महागठबंधन तोडले आणि भाजपशी हातमिळवणी केली याविषयी या मुखपत्रात काही गोष्टी छापून आल्या आहेत असे इकॉनॉमिक्स टाईम्समधील या बातमीत म्हटले आहे: १. भारताच्या राजकीय इतिहासात 'बूर्झवा' राजकारण्यांनी अनेक कोलांट्या आतापर्यंत मारल्या आहेत. नितीशकुमारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करून मारलेली कोलांटीउडी त्यातील सर्वात मोठ्या कोलांट्याउड्यांपैकी असेल. म्हणजे भाजपबरोबर हातमिळवणी केल्यावर नितीशकुमार बूर्झवा झाले. त्यापूर्वी ते 'प्रोलेटॅरीएट' होते तर. २. नितीशकुमारांनी यादव कुटुंबियांविरूध्दच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे निमित्त बनवून आपले ढोंग पुर्ण केले (to enact this elaborate charade) ३. भाजपविरोधातील राष्ट्रीय पातळीवरील महागठबंधनच्या म्होरक्यानेच भाजपबरोबर हातमिळवणी केल्यामुळे भाजपविरोधातील राष्ट्रीय पातळीवरील आघाडीची संकल्पना आता संकटात पडली आहे. ("the concept of a Grand Alliance lies in tatters" ) ४. भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांची आघाडी उघडावी असे माकपला वाटते पण ते अनेकविध धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र घेऊन साध्य होणार्‍यातले नाही. (this cannot be accomplished by putting together an alliance of a motley bunch of secular parties. ) ५. बहुतेक सर्व राज्यपातळीवरील पक्षांनी आपल्या सोयीप्रमाणे भाजपबरोबर हातमिळवणी करायला मागेपुढे बघितलेले नाही. बहुतेक सर्व स्थानिक पक्षांनी 'निओ-लिबरल' अजेंडा वेळोवेळी अंमलात आणला आहे आणि अशा पक्षांचा संधीसाधू युत्या करण्याकडे कल असतो . त्यामुळे अशा संधीसाधू स्थानिक पक्षांना एकत्र घेऊन भाजपविरोधातील सर्व विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवरील आघाडी विश्वसनीय होऊ शकणार नाही. (Why such a grand alliance is unworkable is the unreliable character of many of the regional parties. Most of the regional parties have embraced the neo-liberal policies and are prone to make opportunistic alliances. The CPI-M said it had concluded "that with the regional parties as the main constituents, there can be no credible all-India alliance. ) नितीश-लालू युती तुटल्यामुळे विरोधी पक्षांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल आणि २०१९ मध्ये आपण मोदींविरोधात विश्वसनीय पर्याय देऊ शकणार नाही असे विरोधी पक्षांना वाटायला लागेल आणि अर्धी लढाई ते तिथेच हरतील आणि किंबहुना त्या कारणामुळेच महागठबंधन तोडून विरोधी पक्षांना चांगलाच दणका द्यावा असे मला वाटले होते. तो परिणाम होताना दिसत आहे. तसे असेल तर नितीशकुमारांबरोबर हातमिळवणी करून भाजपने चांगले केले असे म्हणायला हवे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/03/2017 - 16:19 नवीन
गॅरी ट्रुमन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र चक्क वाचता तुम्ही? साष्टांग दंडवत घ्या राव माझा! असो. तुमचं हे विधान पटलं :
तसे असेल तर नितीशकुमारांबरोबर हातमिळवणी करून भाजपने चांगले केले असे म्हणायला हवे.
भाजपचे उत्तरप्रदेशात जास्तीतजास्त आमदार निवडवून आणले जातात तेव्हा लबाड बोक्याचा एक डोळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर असतो. लबाड बोका २०१७ सालच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गर्क असल्याचं दाखवतो तेव्हा तो २०१९ ची पूर्वतयारी करंत असतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 08/03/2017 - 16:58 नवीन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र चक्क वाचता तुम्ही?
मी कम्युनिस्टांना कितीही विरोध करत असलो तरी मी आतून खरा कम्युनिस्टच आहे यावर अनेकांना विश्वास बसत नाही. आता खात्री पटायला हवी. जोक्स अपार्ट मी अर्थातच माकपचे मुखपत्र वाचत नाही पण इकॉनॉमिक टाईम्स मात्र वाचतो आणि त्यात माकपच्या मुखपत्रात आलेल्या लेखाची बातमी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Sat, 08/05/2017 - 17:23 नवीन
व्यंकय्या नायडू ५१६ वि. २४४ मतांनी उपराष्ट्रपती पदावर निवडून आले. यावेळी दोन्ही पदांवर खूप मिळमिळीत व्यक्ती आहेत असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 08/05/2017 - 17:24 नवीन
आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान झाले आणि मतमोजणीही आजच पार पडली. भाजप उमेदवार एन.व्यंकय्या नायडू ५१६ मते मिळवून विजयी झाले. विरोधकांचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांना २४४ मते मिळाली. नायडूंचा उपराष्ट्रपती म्हणून ११ ऑगस्टला शपथ घेतील. Image removed. याबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष या चार सर्वात मोठ्या पदांवर प्रथमच भाजपशी संबंधित असलेले नेते आले आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 08/05/2017 - 17:36 नवीन
चांगली बातमी http://www.tribuneindia.com/mobi/news/nation/sc-to-take-up-ayodhya-appeals-for-hearing-on-august-11/447129 हा वाद लवकरात लवकर मिटावा हीच सदिच्छा. न्यायालयाने अडीच महिन्यांंहून अधिक काळ राखून ठेवलेला तिहेरी तलाक सुनावणीवरील निकाल देखील लवकरात लवकर जाहीर करावा अशी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 08/06/2017 - 05:22 नवीन
http://indianexpress.com/article/india/ram-jethmalani-gone-arvind-kejriwal-seeks-time-to-find-proper-representation-court-shoots-down-request-4784400/
  • Log in or register to post comments
B
babubobade Sun, 08/06/2017 - 07:40 नवीन
Ahead of the 70th Independence Day, Prime Minister Narendra Modi on Sunday invoked the Quit India Movement and exhorted the countrymen to use the same spirit to expel problems of communalism, casteism, corruption, terrorism, poverty and dirt from the country by 2022. He asked the people to take a pledge to contribute in some way or the other to create a “New India”. चले जाव आंदोलनातून प्रेरणा घ्यावी व देश प्रगतीकडे न्यावा , असे मा. मोदीजीनी आवाहन केले. १९४२ साली संघ चले जाव आंदोलनात सहभागी नव्हता. आज ७० वर्षानंतर याच आंदोलनाची आठवण येऊन आजच्या राज्यकर्त्याना व जनतेला देशप्रेमाची प्रेरणा मिळत आहे, हे खरोखरच प्रत्येक भारतीयास अभिमानास्पद आहे. http://indianexpress.com/article/india/with-quit-india-spirit-expel-communalism-casteism-by-2022-pm-narendra-modi-mann-ki-baat-4774162/
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sun, 08/06/2017 - 09:44 नवीन
खंडोबा ला जसे शंकराचा अवतार आहे म्हणून प्रेसेंट केले अगदी तसे च चले जावं आंदोलनाचं होऊ नये म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babubobade
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 08/06/2017 - 10:13 नवीन
म्हणजे नेमकं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
B
babubobade Sun, 08/06/2017 - 10:13 नवीन
चिन्हे तशीच वाटली , म्हणूनच लिहिले. खादीवरचा बापूंचा फोटो उठला, ह्यांचा लागला. आता ७० वर्षापुर्वी चले जावला फिदीफिदी हसणारे , चले जावचाच संदर्भ देऊन स्वतःला प्रमोट करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक Sun, 08/06/2017 - 13:05 नवीन
मोगाखान, कांही लिंका पुरावे आहेत का..? का नेहमीप्रमाणे भाजपा / हिंदूद्वेष..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babubobade
M
mayu4u Mon, 08/07/2017 - 12:44 नवीन
काय म्हणायचा नवीन आयडी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अत्रे Sun, 08/06/2017 - 14:47 नवीन
https://www.facebook.com/628157246/videos/10155317215722247/ आमच्या औरंगाबादच्या नाट्यगृहाचे सार्वजनिक वाभाडे! वाईट वाटले रंगमंदिराची ही अवस्था बघून ..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 08/06/2017 - 17:23 नवीन
http://www.deccanchronicle.com/technology/mobiles-and-tabs/040817/kult-unveils-beyond-smartphone-for-rs-6999.html हा 'कल्ट' नावाचा भ्रमणध्वनी हस्तसंच भारतीय कंपनीचा आहे का एखाद्या परदेशी कंपनीचा?
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sun, 08/06/2017 - 18:11 नवीन
डाव्यांचा केरळ मधील हिंसाचार (विशेषतः rss आणि भाजप विरुद्ध) पाहून डावे सत्तेत नसताना तत्ववादी, विचारवादी आणि अहिंसाकवादी असतात आणि सत्तेत आल्यास वरील तत्वांना तिलांजली देऊन हिंसक होतात , मदमस्त होतात हे वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. बंगाल मध्ये ही हेच होत. महाराष्ट्रातील डावे जरा बरे वाटतात, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा परिणाम की सत्तेत नसल्याचा परिणाम? डावे सुधारले नाहीत तर नामशेष होणार हे नक्की. Mob हिंसेला आळा घातला पाहिजे।
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 08/07/2017 - 08:35 नवीन
हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बरालांच्या चिरंजीवांनी एका चंडीगढमध्ये एका मुलीचा पाठलाग करून stalking केले. ती मुलगी खमकी निघाली आणि त्यातून आय.ए.एस अधिकार्‍याची मुलगी असल्यामुळे इतर सामान्य घरांमधील मुलींना असते त्यापेक्षा जास्त पाठबळ तिला होतेच. तिने हे प्रकरण नेटाने लावून धरले आणि या चिरंजीवांना अटक झाली. कायदा गाढव असतो या उक्तीचे प्रत्यंतर द्यायला की काय या चिरंजीवांची काही तासात जामीनावर सुटकाही झाली. आता हरियाणा पोलिसांनी या चिरंजीवांविरूध्दचे आरोप त्याला लवकरात लवकर जामीन मिळावा या उद्देशाने 'डायल्युट' केले असा आरोप होत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे की या प्रकरणाशी या चिरंजीवांच्या वडिलांचा काहीही संबंध नाही. नसेलही. जर का या वडिलांनी आपल्या दिवट्या चिरंजीवांना यापूर्वीच घरातून हाकलून दिले नसेल (किंवा या कृत्यामुळे ते त्याला हाकलून देणार नसतील) तर या कृत्याचा जाहिरपणे निषेध करणे आणि कायद्याप्रमाणे आपल्या मुलाला शिक्षा व्हावी एवढे तरी म्हणणे या वडिलांचे उत्तरदायित्व ठरते. अजून तरी त्यांनी तसे काही केल्याचे ऐकिवात नाही. तसेच पोलिसांनी मुद्दामून आरोप 'डायल्युट' केले या आरोपाविषयी स्वतः खट्टर यांनीही काही म्हटल्याचे किंवा संबंधित पोलिस अधिकार्‍यांविरूध्द कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदींच्या वर्चस्वाला कोणी विरोधी पक्ष आव्हान द्यायच्या स्थितीत नाहीत. ते कमी करायचे काम कोणी करत असेल तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 08/07/2017 - 08:46 नवीन
<<<<सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदींच्या वर्चस्वाला कोणी विरोधी पक्ष आव्हान द्यायच्या स्थितीत नाहीत. ते कमी करायचे काम कोणी करत असेल तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच.>>> ==> मोदी जी आणखी किती दिवस पुरणार आहेत देशासाठी. ही टर्म किंवा जास्तीत जास्त पुढची टर्म. ते एकदा सत्तरी पार झाले की राजकारणातून संन्यास घेतील. (सन्यास घेतील का ते दिसेलच बहुदा). मोदींसारखा ब्रँड होण्याच्या दुर्ष्टीने भाजप काही पाऊले उचलत आहेत का, हे कळायला मार्ग नाही. असा ब्रँड बनवण्यासाठी कमीत कमीत २० वर्ष तरी लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा