ताज्या घडामोडी: भाग ८
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे.
धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join-bjp-rajya-sabha-elections-shankersinh-vaghela/ या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.
सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदींच्या वर्चस्वाला कोणी विरोधी पक्ष आव्हान द्यायच्या स्थितीत नाहीत. ते कमी करायचे काम कोणी करत असेल तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच.सहमत.मोदी जी आणखी किती दिवस पुरणार आहेत देशासाठी. ही टर्म किंवा जास्तीत जास्त पुढची टर्म. ते एकदा सत्तरी पार झाले की राजकारणातून संन्यास घेतील. (सन्यास घेतील का ते दिसेलच बहुदा). मोदींसारखा ब्रँड होण्याच्या दुर्ष्टीने भाजप काही पाऊले उचलत आहेत का, हे कळायला मार्ग नाही. असा ब्रँड बनवण्यासाठी कमीत कमीत २० वर्ष तरी लागतील.तुम्ही गंभीरपणे हा प्रश्न विचारला आहे असे समजून उत्तर देत आहे. मोदींनी ऑक्टोबर २००१ पासून खुर्ची सांभाळल्यापासून ते १६ मे २०१४ पर्यंत उण्यापुर्या साडेबारा वर्षात इतिहास घडवला. त्यामुळे कमीतकमी वीस वर्षे हा दावा कशावरून केलात हे कळाले नाही. दुसरी गोष्ट, मोदींनी गुजरात मॉडेल यशस्वी केले आणि तो बेंचमार्क तयार झाला आहे, त्यामुळे आपल्या कामगिरीचे मूल्यमापन गुजरातच्या तुलनेत होणार हे सर्वांना माहिती असावे. हे माहिती असणारे भाजपाच्या दुसर्या फळीमध्ये भरपूर नेते आहेत आणि समजा तुमच्या मते ते कर्तबगार नसले तरी त्यांच्या पासंगाला पुरणारे नेते विरोधी पक्षात आहेत का..? बाकी मला विचाराल तर २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान नसतील. फडणवीस / योगी किंवा एखादा तरूण चेहरा पुढे येईल. (सध्याच्या कॅबीनेटमध्ये तसे कोणी पंतप्रधानपदासाठी पुढे येईल असे वाटत नाही - गडकरी सोडले तर!)फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. (कृपया ब्राह्मण आहे म्हणून व्हिक्टीम कार्ड खेळू नका. वीट आलाय त्याचा. )व्हिक्टीम कार्ड काय.. अटलजी पण ब्राह्मण होते. कसे आहे, महाराष्ट्रातले सरंजामवादी विचार सगळीकडेच लागू पडत नाहीत. कळेल हळूहळू.योगीचे नाव घेऊन तुम्ही अमंगळ करमणूक केलीत.मुख्यमंत्री होतील असे वाटले नव्हते. पंप्र होणार नाही असेही वाटून घेऊ शकता. समजा पुढे कधीतरी पंतप्रधानपदाचा उमेदवार न सांगता भाजपा एकहाती निवडून आली आणि केले योगीला पंतप्रधान.. मग काय करणार..?समजा पुढे कधीतरी पंतप्रधानपदाचा उमेदवार न सांगता भाजपा एकहाती निवडून आली आणि केले योगीला पंतप्रधान.. मग काय करणार..??फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते.वरील यादीत नितीशकुमार आणि विशेषत: पवारांचे नाव पाहून खूप हसलो.