ताज्या घडामोडी - भाग २०
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले.
१) आजतक - कार्वी सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील.
म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल.
https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-poll-is-narendra-modi-still-india-s-first-choice-as-pm-1154288-2018-01-25
२) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-elections-were-held-today-abp-news-csds-survey-639813-639813?rs_type=internal&rs_origin=section&rs_medium=article&rs_index=4
आणि शहाजींचं सामर्थ्य गुजरातमधे बघितलच आहे.गुजरातमध्ये मार्च १९९५ पासून (१९९७-९८ मधील १ वर्षांच्या वाघेलाच्या कारकीर्दीचा अपवाद वगळता) डिसेंबर २०१७ पर्यंत तब्बल २२ वर्षे भाजप सत्तेत होता. भाजपने सलग ५ विधानसभा व ५ लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळविले होते. एखादा पक्ष सलग इतका मोठा काळ एखाद्या प्रदेशात सत्तेवर असेल तर अँटीइंक्युंबन्सी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन जनता बदल करण्यास उत्सुक असते. तशीच अँटीइंक्युंबन्सी यावेळी होती. त्याचबरोबर पटेलांना राखीव जागा प्रकरणावरून भडकावण्यात आले होते. पटेल, इतर मागासवर्गीय, दलित आणि खांग्रेस यांची अभद्र जातीय युती झाली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी रातोरात २०१५ मध्ये पोलिस गोळीबारात मारल्या गेलेल्या दंगलखोर पटेलांचे चित्र छापलेली व शहीदांचे स्मरण ठेवा असे लिहिलेली लाखो पोस्टर्स राज्यात सर्वत्र लावण्यात येऊन जातीय भावना पेटविण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. त्यात भरीला निश्चलीकरण व वसेक सारखे कठोर आर्थिक निर्णय होतेच. माध्यमे भाजपविरूद्ध रोज आग ओकत होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बहुमत मिळविणे हे काही लाडू खायचं काम नाही.शिवसेना सारखे सहकारी साथ सोडुन जायला लागले आहेत. तरिही यांचे डोळे उघडायला तयार नाहिhttps://m.maharashtratimes.com/india-news/shivsena-took-part-in-nda-meeting-resolution-passed-in-praise-of-pm-modi/articleshow/62698835.cms