Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नास्तिक चळवळ : काळाची गरज ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/08/2018 - 06:38
🗣 336 प्रतिसाद
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अ‍ॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात. मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्‍या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्‍या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्‍या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात. नास्तिक चळवळ मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे. (मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )

प्रतिक्रिया द्या
132255 वाचन

💬 प्रतिसाद (336)
प
पगला गजोधर Sun, 04/08/2018 - 07:03 नवीन
ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे बावळट कायदे रद्द व्हावे, वलेखात उल्लेख केल्या अश्या चळवळी समाज मन जिवंत असल्याचेच निदर्शक आहे, असे मी मानतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/08/2018 - 12:34 नवीन
निव्वळ ईश्वरनिंदाविरोधी कायदा रद्द करून काय होणार? पुढारी, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांच्या बदनामीविरूद्ध कायदे आहेतच की. तेसुद्धा रद्द नको व्हायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
च
चौकस२१२ Sun, 02/23/2020 - 04:12 नवीन
कोणत्याच गोष्टीतच अतिरेक करू नये .... अशी श्रद्धा कि ज्यामुळे समाजाचे नुकसान होत नाही त्यावर उगाच हल्ला चढवू नये त्याचाच बरोबर भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि त्यातून होणारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पिळवणूक थांबलीच पाहिजे ...कारखान्यात नवीन यंत्राचे उदघाटन करताना पूजा आणि नारळ फोडणे नाही केलं तरी चालतं, तसेच कोणाला त्रास होत नसेल तर प्रथा म्हणून केलं तरी चालत , तारतम्य बाळगावं या नास्तिक समूहात काह अर्थ धर्मविरोधी असा घेतलं जाऊ नये अशी अपेक्षा ,, नास्तिकांचे स्वतःचे हक्क असतील व त्याचे संरक्षण यासाठी हि निर्माण झाली असावी असे वाटते .. आणि हो यात सर्व धर्माचे ( जन्माने) सहभागी व्हावेत अशी अपेक्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 07:46 नवीन
राम राम
धर्माच्या बदनामीच्या कायद्याला
धर्माच्या बदनामी विषयक नेकमा कोणता कायदा भारतात आहे त्याच्या बेअर अ‍ॅक्टचा दुवा मिळू शकेल ? http://indiankanoon.org नावाची साईट शोधण्यासाठी सोपी आहे किंवा इअतरत्रही नेमके कायदे आणि कलमे संदर्भासह स्पस्।ट करावे ह नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 04/08/2018 - 08:20 नवीन
सर, हमरा च्युक्याच, जगभरातील, ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे बावळट कायदे रद्द व्हावेत... . असे वाचावे.. Additionally जर भारताला आपले धर्म निरपेक्षकत्व , टिकवून ठेवायचे असेल... तर अश्या (लेखातील उल्लेखलेल्या )चळवळी सामाजिक विचारमन ढवळून काढण्यास उपयुक्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बिटाकाका Sun, 04/08/2018 - 08:31 नवीन
धर्मनिरपेक्षकत्व आणि नास्तिक चळवळ याचा संबंध काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sun, 04/08/2018 - 08:44 नवीन
बिटेकरकाका , तुम्ही आधी तुमची "धर्मनिरपेक्षकत्व" याची प्रमाण व्याख्या काय ते सांगता का ? कारण हिंदुत्ववादीपणाची तुमची प्रमाण व्याख्या एका दुसऱ्या धाग्यावर तुम्ही सांगितली होती, व तुमच्या व्याख्येला तुम्हीच केंद्रस्थानी (बुल्सआय प्रमाणे) ठेवून, तुम्हीच त्याभोवती आपल्या प्रतिक्रियेचा परीघ आखला होता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sun, 04/08/2018 - 09:02 नवीन
मुद्दा एक, "बिटेकरकाका" असं तुम्ही अनावधानाने म्हणाला असाल असे मी मागच्या धाग्यावर गृहीत धरून दुर्लक्षिले होते, इथे परत दिसतेय. तुम्हाला वाचायला येत असेलच असे गृहीत धरतो. ---------------------------------- मी मागच्या धाग्यावरही सांगितले होते की माझी व्याख्या ही माझी नसून शब्दकर्त्याची आहे. ती पटत नसेल तर तुम्ही तुमची व्याख्या सांगा असा आग्रह ही धरला, तिकडे तुम्ही फिरकले नाही, ते एक असोच. -------------------------------- मागच्या अनुभवावरून शहाणा होऊन यावेळी तुम्ही आधी बाण मारण्याची वाट बघतो, वर्तुळे कशी मारायची ते मंग बघू मांगे पुडे! चला सांगा बरं तुमची व्याख्या आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sun, 04/08/2018 - 09:15 नवीन
लोकांना त्यांची हवी ती उपासना पद्धतीची परवानगी/ स्वातंत्र्य, व राज्यकारभारावर कुठल्याही धार्मिक बाबींची लुडबुड न खपवणे, सर्व धर्मियांना समान धार्मिक स्वातंत्र्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sun, 04/08/2018 - 09:50 नवीन
ओके. संविधानाने "राज्यकारभारात सर्व धर्मांना समान वागणूक" अशी गृहीत धरले आहे. तुमची व्याख्या त्याच्याशी साधर्म्य दाखवते असे मानू. आता सांगा की नास्तिक चळवळ आणि धर्मनिरपेक्षता याचा काय संबंध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Sun, 04/08/2018 - 10:12 नवीन
राज्यकारभारावर कुठल्याही धार्मिक बाबींची लुडबुड न खपवणे
माझ्या प्रतिक्रियेतील हा भाग, त्याबाबत पुरेसा प्रकाश टाकतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Sun, 04/08/2018 - 11:41 नवीन
कैच्या कै!! नास्तिकता म्हणजे कुठलाही देव-धर्म न मानणे तर निरपेक्षता म्हणजे सर्वाना समान मानणे. निरपेक्षता जपण्यासाठी नास्तिकता काय कामाची? दोन्ही गोष्टी पूर्णतः वेगळ्या आहेत असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Sun, 04/08/2018 - 12:37 नवीन
४ बायका, तोंडी ३ सेकंदात घटस्फोट, बुरखा, कौमार्य चाचणी, सुंता (मुले व मुलींची) इ. आमच्या उपासना पद्धतीचाच भाग आहे आणि या बाबींची चिकित्सा होऊच शकत नाही असे एक मोठा गट म्हणतो. मग असे करण्याचे त्यांना स्वातंत्र्य द्यावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
च
चौकस२१२ Sun, 02/23/2020 - 04:23 नवीन
"सर्व धर्मियांना समान धार्मिक स्वातंत्र्य" - हो पण स्वातंत्र्य बरोबर जबाबदारी हि येते हे आपणास मान्य असावे - "उपासना पद्धतीची परवानगी/ स्वातंत्र्य", पाहिजे ना पण त्याचा त्रास/परिणाम सार्वजनिक जीवनावर नाही झाला पाहिजे .. उदाहरण कोणत्याही धर्माचं प्रार्थना रस्त्यावर करणे ( मग तो नमाज असो कि महाआरती असो " .. दुसरे याचा अर्थ देशात सामान नागरी कायदा नसावा असं होतो का ? ख्रिस्ती बहुसंख्याक असेलेल्या देशात सुद्धा समान नागरी कायदा आहे मग भारतात की नाही? असं काय वेगळं आहे भारतात? आज कॅनडा सारखया देशात भारतासारखेच अनेक धर्माचे येवढेंचक नव्हे तर वर्णाचे लोक राहतात तिथे आहे, ऑस्ट्रेलियात आहे .. ( मी अमेरिकेचे नाव ह्यात घेत नाही कारण तिथे सतत गॉड चा उल्लेख सरकारे शपथांमध्ये असतो ) सर्वधर्मसमभावाची एवढे वर्षे न्हेरू गांधी व्याख्या म्हणजे "मला पाहिजे ते मी करेन" देश नंतर ... इतर ठिकाणी देश आधी धर्म नंतर असं अर्थ आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/08/2018 - 08:30 नवीन
धार्मिक भावना दुखावण्याचे जे प्रकार आहेत ते प्रचंड त्रासदायक असावे असे वाटते. रंगीत दगड, पूतळे, प्राचीन ग्रन्थातील काल्पनिक पात्रे, महापुरुष, पुस्तके त्यांची पाने, ओळी, वगैरे इत्यादि मुळे या नास्तिक चळवळीला कायदेशीर प्रक्रियांचा त्रास बातमीत सांगितल्या प्रमाणे सोसावा लागला असे दिसते. आमचा एक वकील मित्र म्हणतो. आयपीसी च्याप्टर पंधरा कलम दोनशे पंचान्नव नुसार ज्यात... Whoever destroys, damages or defiles any place of worship, or any object held sacred by any class of persons with the intention of thereby insulting the religion of any class of persons or with the knowledge that any class of persons is likely to consider such destruction, damage or defilement as an insult to their religion, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बिटाकाका Sun, 04/08/2018 - 08:34 नवीन
थोडक्यात काय तर आम्ही धर्म नाही संविधान मानतो असे म्हणणारे अशा वेळी संविधान कसे चुकीचे आहे दाखवायला पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 09:52 नवीन
सर '२९५ ए ' वेगळे आहे आपण त्याचा खाली वेगळा विचार करु पण आपण जे २९५ क्र.चे कलम दिले त्यात तुमचे स्वतःचे नास्तिक असण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नेमके कुठे थांबले आहे ?
Whoever destroys, damages or defiles any place of worship, or any object held sacred by any class of persons with the intention of thereby insulting the religion of any class of persons or with the knowledge that any class of persons is likely to consider such destruction, damage or defilement as an insult to their religion, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्यासाठी दुसर्‍यांच्या place of worship, अथवा object held sacred च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वाटी जाण्याचे आपल्याला काही कारणच काय ? प्रत्येकाला आपल्या अभिव्यक्ती स्वातम्त्र्याच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा आणि त्यासाठी केसेस टाकण्याचा आधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी केसेस नास्तीकांनीही टाकाव्यात आस्तीकांनीही टाकाव्यात . केसेसच टाकू द्यायच्या नाही त्यासाठी कायदाच नको म्हणणे दुसर्‍या पक्षाचे न्याय मागण्याच्या मुलभूत स्वातंत्र्यावर गदा येते. कायदे आणि खटल्यांवर विश्वास आहे म्हणून लोक न्यायालयात जातात, तुम्ही (म्हणजे सर नव्हे) न्याय यंत्रणेचा कायद्याचा आधार काढून घेतला की रस्त्यावरच्या संघर्षांची संख्या वाढते. न्यायव्यवस्था वेगवान झाली पाहिजे म्हणणे आणि प्रतिपक्षास कायदा आणि न्यायव्यवस्था नाकारण्याची अपेक्षा करणे या दोन भिन्न बाबी असाव्यात असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गवि Sun, 04/08/2018 - 10:10 नवीन
अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्यासाठी दुसर्‍यांच्या place of worship, अथवा object held sacred च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वाटी जाण्याचे आपल्याला काही कारणच काय ?
काहीच कारण नाही कोणी मुद्दाम कोणाच्या प्रतीकांना धक्का लावण्याचं. पण कोणी मुद्दाम खोडसाळपणे जरी लावला तर भा.दु. भा.दु. म्हणून जो मास हिस्टेरिया उफाळतो आणि सर्वांचंच नुकसान होतं तो प्रकार टाळण्यासाठी अशा टोकदार आणि ज्वालाग्राही भावना मुळात बनू न देणं आवश्यक आहे. बाह्य प्रतीकं ही फक्त प्रतीकं आहेत. अनटारगेटेड भडका उडवून देण्याचं निमित्त नव्हेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/08/2018 - 10:17 नवीन
>>>>>अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासण्यासाठी दुसर्‍यांच्या place of worship, अथवा object held sacred च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वाटी जाण्याचे आपल्याला काही कारणच काय ? अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहेच त्यात काही वाद नाही. पण तुमच्या देवपूजेमुळे माझं मानसिक आरोग्य बिघडत असेल तर कोणाकड़े दाद मागायची ? मला तुमच्या उपासनेचा त्रास होत नै ये तो पर्यन्त ठीक आहे. उदा. समजा तुम्ही सार्वजनिक रस्ता अडवून तिथे तंबू ठोकुन दहा दिवस स्पीकरचं तोंड माझ्या घराकडे करून मोठ्या आवाजात ''सीतेच्या चोळीचं राजकारण'' या विषयावर कीर्तन आणि तत्सम पारायण करत आहात. माझं मानसिक संतुलन बिघडनार नाही का ? अशा वेळी मी तुम्हाला तिथे येऊन म्हणालो की 'बंद करा हो हे भजन' तर तुम्ही लगेच गाशा गुंडाळणार की भावनेला ठोकर मारली म्हणून पोलिसात जाणार ? तुम्ही पोलिसात जाणे पसंत कराल. त्याचा त्रास होतो हो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 11:08 नवीन
परवानगीच्या अथवा कायद्याच्या मर्यादा ओलांडून एखादा सार्वजनिक समारंभ होत असेल तर, पोलीस आणि न्याय यंत्रणेकडे रीतसर तक्रार द्या . ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्या परस्पर तोंडी लागण्यासाठी अथवा त्यांच्या प्रतीकांचा अपमान करण्यास कुणी सांगितले ? म्हशींचे सेक्युलर फाईटींग किंवा २६ जानेवारीची परेड सार्वजनिक जागेत होऊसार्वज, मेणबत्त्या आणि भ्र्ष्टाचार विरोधी मोर्चे सार्वजनिक जागेत होऊ शकतात तर सार्वजनिक जागा वापरण्यापासून फक्त धार्मीकांनीच कोणते घोडे मारले आहे ? प्रॉपर्ट्या आणि कायदे नंतर आले संस्कृती आधी उदयास आली आणि सांस्कृतीक उत्सव साजरे सार्वजनिक पणे साजरे करणे सहज मानवी प्रवृत्ती आहे , अभिव्यक्टी नास्तीकांच्या असोत किंवा अस्तीकांच्या असोत चार भिंतीच्या आत कशा दाबता येतील ? सार्वजनीक जागा उत्सवांसाठी नाकारणे म्हणजे जंगलांचे राष्ट्रीयकरण करून आदीवासींना तुन्ही जंगलात का आलात असे विचारण्याच्याच कक्षात मोडते. बरे लोकशाही बहुमत सुद्धा अस्तीकांचे आहे , लोकशाहीत बहुमताचे प्राबल्य असणे ओघानेच येते. अल्पसंख्य नास्तीकांनाही माणूस म्हणून अधिकार हवेत हे समजता येते. सध्याच्या उपराष्ट्रपतींचे पेट्ट वाक्य आहे विरोधी पक्षांना say असावा पण way प्रस्थापितांचा असला पाहिजे आणि लोकशाहीत प्रस्थापितांचे बहुमताचे चालत नसेल तर त्याला लोकशाही म्हणण्यात अर्थ मर्यादीत होतो. तरीही भारतात घटना तुम्हाला खासगीपणासहीत विवीध अधिकार देते घेतल्या परवानग्यांच्या मर्यादे बाहेर गोष्टी होत असतील तर तुम्ही न्याय यंत्र्णेचा आधार घेऊ शकता. काही बाबतीत तरीही सर्व जण मिळून कायदा मोडतात कारण लोकशाही बहुमतावर अवलंबून असते हे वास्तव आहे. कायद्यांच्या पालना बाबत आस्तीक असोत अथवा म्हशीच्या झुंजीत रस असलेले नास्तीक / निधर्मी असोत , कुणी नास्तीक आहे म्हणजे प्रत्येक नास्तीक ट्रॅफीकचे सगळे नियम पाळतो असे होत नसावे, कायदा पालना बाबत सजगते बाबत प्रयत्न होणे जरुर्री आहे त्यासाठी विवीध माध्यमातून आपण आत्ता विषय मांडता आहात तशी जागृती साधता येतेच.
...तुमच्या देवपूजेमुळे माझं मानसिक आरोग्य बिघडत असेल तर
कायद्यांच्या आणि मुलभूत अधिकारांची पालनाची अपेक्षा व्यक्त करणे आणि तुमच्या देवपूजेमुळे माझं मानसिक आरोग्य बिघडत ही नवी कम्यूनीस्ट अंधश्रद्धा खपवून नेण्याचा प्रयत्न दोन भीन्न बाबी आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 11:13 नवीन
मी सार्वजनिक ठिकाणच्याही देवाला नमस्कार करतो पण देव भक्ताने बहुमताचा अथवा झुंडीचा आदर करण्यासाठी इतरांना त्राहीमाम वाटावे असे वागावे असे वाटत नाही. मी तुमच वरच्या प्रतिसादातून समर्थन केलय पण सार्वजनिक ठिकाणास गोंधळाचे स्वरुप आले की फक्त नास्तीकांना नव्हे सच्चा आस्तीकांनाही त्रासच होत असतो हे लक्षात घेऊन वाचकांनी या विषयावर सजगाता निर्माण करण्याचा प्रयत्न अवश्य करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ह
हेमंतकुमार Sun, 04/08/2018 - 07:48 नवीन
जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते>>>≥> +१११
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 04/08/2018 - 08:49 नवीन
सण साजरे करण्या बद्दल काय मत आहे ह्या लोकांचे ?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 04/08/2018 - 08:54 नवीन
सण साजरे करण्या बद्दल काय मत आहे ह्या लोकांचे ?
कुठले सण ? कोण लोकं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/08/2018 - 09:27 नवीन
मला वाटतं एकदा की देवाळुपण नाकारलं की सर्वच नाकारले जात असावे, त्यामुळे देवाला पुढे करून जे सण व्रत वैकल्य असतील तेही नाकारले जात असावे. उदा. वेदामधे देवासुर संग्रामात देवांच्या विजयानिमित्त इंद्राणीने हिम्मत हरलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती आता या कवीकल्पना आजच्या काळात किती रेटनार नाही का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 10:17 नवीन
मी काय म्हणतो गरबा नृत्यात देव नाही असे समजा आणि गरबा खेळाकी राव ! इतराम्चे सोडून द्या , देवावरचा राग/ नाही म्हणून स्वतःच्या आनंदा आणि उत्साहावर का पाणि टाकायचे ? आपापला गरबा इतरांना खेळू द्यात . ( तुम्हाला कुणी कृष्ण किंवा राधा समजून तुमची भक्ती केली तर तुम्ह त्यांना थांबवू थोडेच शकता : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
A
arunjoshi123 Mon, 04/09/2018 - 10:01 नवीन
दिलिप भावा, देश ही कल्पना देखील तिकडलीच आहे मंतो. काय करायचं तिचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
द
दीपक११७७ Sun, 04/08/2018 - 09:26 नवीन
' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.
यावर एक सुचवतो, नास्तिकाने आस्तिकाला तु चुक आहेस मी बरोबर हे सांगने इतरांच्या वैयक्तिक बाबीत लक्ष घालण्या सारखे आहे. कोणाला काय आवडते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे वाटते आणि संविधानालाही हेच अपेक्षित आहे. मला जर क्रिकेट आवडत असेल तर फुटबाॅल हा कमी दर्जेचा खेळ आहे किंवा बकवास आहे असे बोलने चुकीचेच आहे. हा उद्योग टाळुन नास्तिकांनी एकत्र येण्यास हरकत नाही-नसावी बाकी लेख खुपच उत्तम लिहिला आहे. चर्चे साठी आदर्श मांडणी. सध्या एवढचं,
  • Log in or register to post comments
य
यनावाला Sun, 04/08/2018 - 13:26 नवीन
......"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्‍यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे." आम्ही विवेकवादी नास्तिक हे मनापासून मानतो. देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे. असे आम्हाला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत देशबांधवांना, वैध मार्गांनी- योग्य शब्दांत- परोपरीने समजावून सांगण्याचे आम्हाला घटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे . . आमच्या देशबांधवांच्या सामाजिक आचरणाची (वागण्याची ) चिकित्सा करण्याचा आणि आमच्या दृष्टीने त्यांतील योग्य-अयोग्य काय ते सांगण्याचा अधिकार आम्हाला घटनेने दिला आहे. धूम्रपान करणे अवैध नाही (काही नियम पाळून). पण शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून धूम्रपान करू नये असे आपण सांगतोच ना? तसेच हे आहे. आम्ही आमचे विचार भाषणात व्यक्त करतो. लेखात मांडतो. कुणाच्या घरी जाऊन त्यांना सांगत नाही. त्यामुळे कुणाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिक्षेप होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 13:46 नवीन
......"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्‍यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे." सर्व आस्तीकही हे मनापासून मानतात (विवेकवाद ही केवळ नास्तीकांची मक्तेदारी असते याच्याशी ते असहमत असतात) . देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे. हे आस्तीकांनाही पटते . अस्तीकत्वाचाही दृष्टीकोण त्यांना शास्त्रीयच वाटतो आणि या बाबत नास्तीकांशी मत भिन्नता ठेवण्याचा त्यांना घटनादत्त आणि मूलभूत मानवाधिकार असतो असे आस्तीकांना विचारान्ती वाटते . त्या शिवाय आस्तीकत्व , संस्कृती आणि मुल्यांची जपणूक , मटेरीआलीझम पासून दूर रहाणे अशा अनेक बाबतीत मानवी जिवनास सुसह्य करणारे असते असे प्रामाणिक मत देशबांधवांना, वैध मार्गांनी- योग्य शब्दांत- परोपरीने समजावून सांगण्याचे आस्तीकांनाहीघटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना आस्तीक वादी दृष्टिकोन अंगीकारणे भारतीय संविधानात कर्तव्य म्हणून स्विकारला जावा त्याचा अवैज्ञानिकतेशी काही संबंध नाही आणि असा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार [ प्रत्येक आस्तीकाचे कर्तव्य आहे "अस आस्तीकांना वाटण्याचा अधिकार आहे. . . त्यांच्या नास्तिक देशबांधवांच्या सामाजिक आचरणाची (वागण्याची ) चिकित्सा करण्याचा आणि आस्तीक दृष्टीने त्यांतील योग्य-अयोग्य काय ते सांगण्याचा अधिकार आम्हाला घटनेने आणि मानवी संस्कृतीने दिला आहे. धूम्रपान करणे अवैध नाही (काही नियम पाळून). पण शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून धूम्रपान करू नये असे आपण सांगतोच ना? तसेच हे आहे. ते त्यांचे विचार भाषणात व्यक्त करतात . लेखात मांडतात. जिथे संबंधीत कुटूंब प्रमूखाची परवानगी आहे तिथे घरी जाऊन सांगण्यात काही गैर नाही . त्यामुळे कुणाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिक्षेप होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 14:19 नवीन
भारत माझा देश आहे। सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
द
दीपक११७७ Sun, 04/08/2018 - 16:20 नवीन
देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे
हे कोण ठरवणार, कोणासाठी काय हिताचे आहे? बुरखा घालावा म्हणुन सक्ती करणे जसे अतिरेकी आहे तसेच एखाद्याला घालायचा असेल तर नको घालु म्हणूनही आग्रह धरणे ही अतिरेकीच आहे. माझ्या मागील प्रतिक्रियात blockquote केलेला मुद्दा सांगूनही लोकं ऐकत नाही, नास्तिकते कडे झुकत नाहीत. यावर आहे. मग लोकं ऐकत नाही तर तुम्ही कायं करणार? केवळ नास्तिक लोकंच तार्किक असते तर सगळे शास्त्रिय शोध नास्तकांनाच लागले असते. बादवे, अजूनही भौतिक शास्त्रात युनीफाईड थेरीचा शोध लागलेला नाही. नास्तिक हे ऐवढेच ज्ञानी आहेत तर त्यांनी आपली energy unsolved problem वर खर्च करुन त्याची उत्तरं शोधुन जगाला द्यावी म्हणजे आपोआप लोकं त्याच्या कडे आकर्षित होतीलं. आणि नास्तिकांच्या हातुन मानव कल्याण होऊ शकेलं. बादवे, जगणे आणि सत्य यांचा तसा संबंध नाही. सध्या इथच थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
मराठी_माणूस Mon, 04/09/2018 - 08:03 नवीन
छान प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
प
प्रकाश घाटपांडे Mon, 04/09/2018 - 08:35 नवीन
जगणे आणि सत्य यांचा तसा संबंध नाही.
आहे ना! सर्व्हायवल इस ट्र्थ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
द
दीपक११७७ Mon, 04/09/2018 - 10:04 नवीन
आहे ना! सर्व्हायवल इस ट्र्थ
जगतांना सत्य काय आहे हे माहित असणे आवश्यक नाही! असत्या सोबतही छान जगता येते किंवा काय सत्य काय असत्य हे माहीत नसतांनाही छान जगता येते! छान जगणे महत्वाचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
र
राही Mon, 04/09/2018 - 10:44 नवीन
नास्तिकांनी, किंबहुना कोणीही एखादे कार्य आपले जीवितकार्य मानले असेल आणि त्या कार्यासाठी ती व्यक्ती तनमनधनाने झटत असेल आणि शिवाय त्यात आनंदी असेल तर त्याला तू आपले जीवितकार्य बदल आणि फिजिक्स मध्ये रिसर्च कर असे कोण कसे काय सांगू शकतो बुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
A
arunjoshi123 Mon, 04/09/2018 - 09:36 नवीन
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
अर्धे भारतीय बायका आहेत, मुली आहेत. ते कसे काय बांधव असणार? ====================== सगळ्या भारतीयांचे वय वेगवेगळे असते. ९० वर्षाच्या म्हातार्‍याला बंधू म्हणायचं? ====================== बंधू म्हणजे जेनेटिक असतो ना? ================================= भारतीय? फक्त कि सुद्धा? बाकीच्या देशातल्या लोकांनी काय घोडे मारलेत? ===================== इतर सजीव तुमचे कुणी लागत नाहीत? =============================== मागच्या पिढ्यांतील मेलेले भारतीय (इसवीसन १३०० इ) हे पण तुमचे बांधवच? =================================================================================================================================================================================================================== आपण नास्तिक आहात, असली धार्मिक वृत्तीची अर्थहीन वाक्ये कृपया वापरणे टाळा आणि वैज्ञानिक नि शास्त्रशुद्ध वाक्ये वापरा. -------------------------------- अन्य लोकांच्या धाग्यांवर देखील आपण प्रतिसाद लिहिता हे पाहून आदर दुणावला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
श
श्रीगुरुजी Mon, 04/09/2018 - 11:05 नवीन
जबरी LLRC
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मारवा Sun, 04/08/2018 - 10:15 नवीन
नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. वरील वाक्यातील गृहीतक मजेदार आहे. नास्तिकता = आधुनिकता म्हणजे चार्वाक वगैरेंचा अपमान करणारे आहे या अँगलने ते एक वेगळच एकुण लेखही फारच कॅज्युअली एक सहज लिहील्यासारखा वाटतो. असो.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 04/08/2018 - 10:18 नवीन
अस्तिकता = सनातन ता ? असे जर असेल, तर कदाचित नास्तिकता = आधुनिकता असू शकेल का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 12:26 नवीन
अस्तिकता आणि सनातन वाद या भिन्न बाबी आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/08/2018 - 15:55 नवीन
काही हजार वर्षांपासून आस्तित्वात असलेल्या आणि इसविसनपूर्व सातव्या शतकात चार्वाकाने नावारुपाला आणलेल्या 'नास्तिकता' या संकल्पनेला "आधुनिक" म्हणता येईल ?! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/08/2018 - 10:29 नवीन
>>>>>लेखही फारच कॅज्युअली एक सहज लिहील्यासारखा वाटतो. मुळात काथ्याकुटाचा उद्देश ''नास्तिक चळवळ''सुरु असून नास्तिक लोकांची ही चळवळ पुढे कोणत्या मार्गाने जाईल ? त्याची आवश्यकता किती वगैरे साधक बाधक चर्चा व्हावी इतकाच उद्देश् आहे. मिपावरील काथ्याकुटाने त्यांची मंडळी इथे येऊन लिहितील वगैरे असंही वाटलं. आणि भविष्यात अशा चळवळीवर आपण एक धागा कुटला होता त्याचीही आठवण राहील इतकाच प्रांजळ हेतूआहे. लेखातील गृहितके, लेखातील विनोद. लेखातील वाटलेला सहजपणा सोडून आपण नास्तिक चळवळीवर आपले अभ्यासपूर्ण मत लिहावे अशी अपेक्षा आहेच. नसता आपला प्रतिसादही खूपच विनोदी होता म्हणून सोडून द्यावे लागेल. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
र
रानरेडा Mon, 04/09/2018 - 21:16 नवीन
बैठक म्हणजे "चला बसू या " वाली कि लावणीची ? पहिल्या प्रकार्साठी मी कधी हि तयार आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
अ
अभ्या.. Sun, 04/08/2018 - 10:36 नवीन
मस्त मस्त. छान चळवळ आहे, करताहेत काहीनाकाहीतरी. करत राहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 04/08/2018 - 10:45 नवीन
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही.
प्राचीन काळी देखील चार्वाक पंथ होताच. चार्वाक दर्शन आहेच की. विचार चिकित्सेसाठी व वादसंवादासाठी खुले असावेत. मग ते कोणतेही विचार असोत.पंथाचे काही तोटेही होतात विचार बंदिस्त होतात. झापडे लागतात.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 04/09/2018 - 09:48 नवीन
मस्त प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
र
राही Mon, 04/09/2018 - 13:21 नवीन
चार्वाक दर्शन तर होतेच. चार्वाकाच्या मताचे काही किंवा अनेक लोक त्या काळी होते असतीलही कदाचित. पण त्यांचा पंथ होता असेल असे वाटत नाही. समविचारी लोक एकत्र येणे इतक्यापुतीच अलगता असावी. पंथ म्हटला की त्याची अशी काही वेगळी लक्षणे, आचरण, कर्मकांडे असतात. जसा पूर्वीचा नाथपंथ, महानुभाव वगैरे. सध्या जसे समतावादी, भांडवलवादी, हिंदुत्ववादी, उजवे डावे अशा विचारधारा आहेत तशीच चार्वाकदर्शन ही एक विचारधारा आहे. तसेही सर्व दर्शने ह्या विचारधारा आहेत पंथ नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 11:46 नवीन
भारतीय दंड विधानाच्या '२९५ ए' एवजी २९५ चा हवाला दिला असा हवाला बर्‍या पैकी तार्कीक उणीवेचा होता. विशीष्ट प्रतिकाला धक्का पोहोचवला तरच लागू होतो अन्यथा नाही. वस्तुतः '२५२ ए' ची व्याप्ती अधिक आणि बहिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षा कुठे कुठे ओलांडू शकेल अशी आहे. आणि बर्‍ञाच वेळेस काळजीचे कारण असू शकते.
272 [295A. Deliberate and malicious acts, intended to outrage reli­gious feelings of any class by insulting its religion or reli­gious beliefs.—Whoever, with deliberate and malicious intention of outraging the religious feelings of any class of 273 [citizens of India], 274 [by words, either spoken or written, or by signs or by visible representations or otherwise], insults or attempts to insult the religion or the religious beliefs of that class, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 4[three years], or with fine, or with both.] https://indiankanoon.org/doc/305995 वरुन साभार
एकीकडे राजकीय आणि ईतर फायद्यांसाठी भावना भडकवणारी वक्तव्ये जाणीव पूर्वक केली जातात म्हणून या कायद्याची गरज आहे. तर दुसर्‍या बाजूस अभिव्यक्ती स्वातंत्र्य सदसद विवेक बुद्धीने वापरणार्‍यांची अडचण होते हे खरे. इथे खरा प्रश्न आस्तीकतेचा अथवा नास्तीकतेचा नाही, जाणीवपूर्वक भावना न भडकवता अथवा न भडकवून घेता अधिकतम अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगता येईल अशी संस्कृती जोपासण्याचा आहे आणि तत्संबंधी सजगता निर्माण करण्याचा आहे . अनेक कायदे पुस्तकात असतात पण अपवादात्मक परिस्थिती शिवाय वापरावे लागत नाहीत अशी या कायद्याची स्थिती असावयास हवी.. इन एनी केस हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्या च्या घटनात्मक मूलभूत अधिकाराची कक्षा ओलांडू शकत नाही. प्रश्न कायद्याचे फौजदारी स्वरुप कमीत कमी अपवादात्मक स्थितीतच वापरले जाईल आणि कायद्याचा प्रभाव दिवाणि असेल हे पहाण्याचा आहे. अर्थात कायद्याचा खूप बाऊ करण्याचे ही कारण नाही. पद्मावती सारखे चित्रपट असो अथवा अनेक पुस्तके असोत न्यायालयांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू वेळोवेळी उचलून धरली आणि या कायद्याचा फार गैर वापर भारतातल्या आस्तीकांनाही शक्य नसावा कारण प्रत्येक आस्तीक दुसर्‍याच्या आस्ती कत्वाच्या स्वरुपाबाबत टिका करतच आला आहे . त्यामुळे या बाबत हा कायदा भडकाऊन राजकारणि आणि धार्मीक पुढारी सोडून इतरांसाठी शक्य तेवढा सौम्य केला जाण्याची गरज असावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 12:44 नवीन
२९५ ए मध्ये भारतीय कायदा तुमचे intention काय आहे ह्याचा विचार करतो deliberate and malicious नसल्यास तुमच्या स्वातंत्र्याला कोणतीही आच येत नाही. २९५ ए मध्ये इश्वरनिंदा हा शब्द कुठेही नाही (धार्मीक भावना शब्दात अप्रत्यक्षपणे इनक्लूड होत पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक तरतुदीतून सुटून जात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक तरतुद या कायद्या पेक्षा मोठी समजली जाते ) आणि म्हणूनच मिपावर अशा मनमोकळी चर्चा आणि मनमोकळ्या भूमिका शक्य होतात (जी पाकीस्तानात शक्य होत नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा