Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नास्तिक चळवळ : काळाची गरज ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/08/2018 - 06:38
🗣 336 प्रतिसाद
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अ‍ॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात. मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्‍या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्‍या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्‍या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात. नास्तिक चळवळ मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे. (मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )

प्रतिक्रिया द्या
132255 वाचन

💬 प्रतिसाद (336)
म
मारवा गुरुवार, 04/12/2018 - 15:49 नवीन
हे ते वामनराव पै बी.ए. ( ही पदवी इतक्या कौतुकाने लावलेली फार क्वचितच पाहायला मिळते आणी ती श्री श्री या प्रीफ्रिक्स सारख बी.ए. हे सफीक्स गमतीदार आहे. ) आणी त्यांची पंचलाइन पण भारीये " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " गुरुजी सरकारी नोकरीत होते अशी जुजबी माहीती आहे. त्यांच्या व्याख्यानात एक गमतीचा भाग असा होता की जीवनवीद्या असे म्हणते जीवनवीद्या तसे म्हणते म्हणजे लेखन निर्मिती सर्व यांचीच पण मी म्हणतो ऐवजी जीवनविद्या काय म्हणते बघा अशी शैली छान आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
पगला गजोधर गुरुवार, 04/12/2018 - 16:07 नवीन
पुण्यात वडापाव खाताना यांची खूप आठवण यायची ब्वा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
र
राही गुरुवार, 04/12/2018 - 13:23 नवीन
प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आवडला. आस्तिक लोक (येथे देवधर्म- कर्मकांड मानणारे इतकाच सीमित अर्थ आहे) इतरांवर देव मानण्याची आणि कर्मकांडाची सक्ती करीत असतात. धाक दाखवत असतात. अमुक कुलाचार केला नाही म्हणून अमुक वाईट गोष्ट घडली असे टुमणे लावून ब्कॅकमेल करत असतात. एक गरोदर मोलकरीण सांगत होती की तिच्या सासूने मंगळवारी गणपतीची उपासना आणि उपास करायला सांगितले. मुलगा होण्यासाठी! सामान्य जनांत अंधश्रद्धा आणि आस्तिकता हातात हात घालून वावरतात. अलीकडे अनेक प्रकारची कर्मकांडे, उपासतापास , पदयात्रा यांचे महत्त्व वाढवले गेले आहे. सतत पालख्या, पदयात्रा निघत असतात. शंभर रुपयात शिर्डीला जेवणचहापाण्यासकट नेऊन आणणारी अनेक मंडळे निघाली आहेत. एका वेळेस वीसबावीस बसेसचा तांडा निघतो. अनेकदा अपघात होतात. लोकांना आपल्या बाजूने वळवण्याचा हा राजमार्ग झाला आहे. सणउत्सवांचे बाजारीकरण आणि राजकारण होते आहे. या सर्वात वेद, धर्मशास्त्रे, दर्शने, उपनिषदे यांचे काहीच काम नसते. या ग्रंथांत काहीही सांगितलेले असो किवा नसो, सर्वसामान्यांशी त्याचा संबंध नसतो. हे जे त्यांचे आचरण आहे, तोच खरा धर्म अथवा आराधना अशी त्यांची पक्की समजूत असते. ओळखीतले एक कुटुंब आहे. मुलगा प्राथमिक स्थितीतला जडबुद्धी (कमी बुद्ध्यांक असलेला) आहे. त्यांनी एका सुप्रसिद्ध बापूंकडे त्याला सेवेस लावले. त्याला काम मिळाले. कोणते तर येणाऱ्या शेकडो भक्तांची पादत्राणे सांभाळण्याचें. त्या मुलाला मंदमतींच्या खास शाळेत घालावे असे सांगून झाले होते. पण अनेक व्रतेवैकल्ये, दर पंधरवड्याला सत्यनारायणपूजा यातच ते कुटुंब गुंतून राहिले. असो. अशी अनेक उदाहरणे प्रत्यही अनेकांना दिसत असतील. आस्तिकता आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा अगदी पुसट असते. या बाबतीत समाजप्रबोधन व्हायला हवे असे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अर्धवटराव गुरुवार, 04/12/2018 - 13:42 नवीन
लाख रुपयेकी बात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ब
बिटाकाका गुरुवार, 04/12/2018 - 14:03 नवीन
थोडक्यात काय आस्तिक आईबापांच्या पोटी जन्माला आलेल्या मतिमंदांच्या शाळेत जाणाऱ्या जडबुद्दी मुलांची संख्या शून्य आहे. ------------------------------------------ थोडक्यात काय अंधश्रद्धा आणि आस्तिकता यातील अगदी पुसटशी सीमारेषा हि फक्त नास्तिकांना दिसते. ------------------------------------------ असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मारवा गुरुवार, 04/12/2018 - 16:06 नवीन
हे जे त्यांचे आचरण आहे, तोच खरा धर्म अथवा आराधना अशी त्यांची पक्की समजूत असते. ओळखीतले एक कुटुंब आहे. मुलगा प्राथमिक स्थितीतला जडबुद्धी (कमी बुद्ध्यांक असलेला) आहे. त्यांनी एका सुप्रसिद्ध बापूंकडे त्याला सेवेस लावले. त्याला काम मिळाले. कोणते तर येणाऱ्या शेकडो भक्तांची पादत्राणे सांभाळण्याचें. तुमच्या दिलेल्या उदाहरणातील मुलगा बिचारा मंदबुद्धी आहे. त्याचा विषय एकवेळ बाजुला ठेवा. हे पादत्राणे सांभाळण्याच काम जे आश्रमांमध्ये दिल जात. घेतल जात हा सर्वच प्रकार फारच रोचक आहे. त्याच्या काही शेड्स अशा असतात १- बघा बघा आमच्या आश्रमात तो इतका मोठा माणुस इतका श्रीमंत इतका ग्रेट पण इथे त्याला काय काम दिलय बघा तर देनेवालेके बाजुसे आम्ही त्याल्ल तुमच्या मटेरीयलीझम ला तुमच्या अचीव्हर ला किती वाकवला हा दृष्टीकोण आमच्या कडे अहंकार ठेचुन मिळतो. आमच्याकडे अहंकार वितळवुन देण्याची १००$ गॅरंटी २- दुसरीकडुन घेणारा डबल मॅसोचिस्टीकली ( नम्रतेतला टोकाचा अहंकार ज्या नम्रतेपेक्षा अहंकार परवडला ) ते तेज चेहर्‍यावर ठेवुन जोडे सांभाळतांना दिसतो. त्यातही हा "सीन" च असतो तो केवळ ठराविक वेळेसाठीच असतो. त्यात त्यांचा " बघा लेको मी किती नम्र आहे क्या तुमने देखी ऐसी नम्रता " असे वाजवुन ठणकावुन दाखवुन देतो. ३ - या नुसत्या दोन्ही बाजुनी विन विन सिच्युएशन नाहीत थर्ड डायमेन्शन ने आउटसायडर्स आकर्षित होतच असतात. नही साला नेने नही कही पर यहीपेच जस्टीस मिलेगा रे बाबा देख सब गधे घोडे बराबर है बापु के दरबार मे बाहेरच्या जगातला अन्याय बाहेरचा ताप सर्व सर्व झटक्यात संपुन एक न्यायशीर कम्युन ची तुरंत स्थापना ज्यात काही काळ तुम्ही गुंगत गुंगीत फिरा मग तुम्ही रीचार्ज झाल्यावर " जा आता पुन्हा "बाहेर" जगुन ये बेटा/ ४ आश्रमांमध्ये टाइम सेन्स जबरदस्त असतो. आश्रम आश्रम अध्यात्म अध्यात्म खेळत असलेल्या सर्व रंगकर्मींचे "बाहेर च्या " जगाचे भान जबरा असते. विकएन्ड ला ड्रेस चेंज , खाना चेंज , रुटिन चेंज मात्र बाहेरच्या लाइफ ला "जपुन " च बर का. मग पुन्हा नॉर्मल पुन्हा वीकएकंड होत काय की गुंगीत मजेत जगत लाइफ पास होउन जाते. मध्येच कधी तरी हे सर्व चुकवत चुकवत राहेले तरी क्रुर जींदगी एखाद्या बेसावध क्षणी आपला क्रुर चेहरा दाखवुन विकट हास्य करतेच तेव्हा त्या क्षणाला एक संधी असते भ्रमाचा त्याग करण्याची पण म्हणतात ना माय है भइ माया महाठगिनी ४-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही गुरुवार, 04/12/2018 - 17:29 नवीन
आपण म्हणता तशी खरोखरच ' विन विन' सिट्युएशन असते. मी वर दिलेल्या low I.Q.वाल्या मुलाच्या बाबतीत जोडे सांभाळण्यासाठी त्याला प्रत्येक चप्पलजोडामागे एक रुपया आकारण्याची परवानगी दिली गेली होती आणि काही दिवस प्रत्येक प्रवचनात त्याची बख्खळ कमाई झाली. आईवडील खूश. त्या जोरावर त्याचे लग्नही करून दिले गेले. नंतर प्रवचनेही कमी झाली आणि गर्दीही. बायकोनेही घटस्फोट मागितला. आस्तिकता आणि गुरू- बाबा वरील श्रद्धा कोणत्या थराला जाऊ शकते हे दाखवण्यासाठीच एव्हढे तपशीलवार लिहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
A
arunjoshi123 गुरुवार, 04/12/2018 - 19:12 नवीन
आस्तिकता आणि गुरू- बाबा वरील श्रद्धा कोणत्या थराला जाऊ शकते हे दाखवण्यासाठीच एव्हढे तपशीलवार लिहिले.
कोणतीही गोष्ट कोणत्याही स्तराला जाऊ शकते. अशा प्रत्येक प्रकारच्या अतिरेकाची अनेक उदाहरणे देता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
प्रकाश घाटपांडे Fri, 04/13/2018 - 06:45 नवीन
अगदी सहमत आहे. समाजप्रबोधन हा लांवचा पण परिणामकारक मार्ग आहे. पण तो क्रांतीकारी म्हणून नव्हे तर उत्क्रांती कारी म्हणून वापरला गेला पाहिजे. माझ्यामते श्रद्धा व अंधश्रद्धा यात काही फरक नाही. यनावालांच्याच भाषेत सांगायच झाल तर एक दोन अक्षरी व दुसरा चार अक्षरी शब्द आहे एवढाच फरक. अंधश्रद्धांची प्रतवारी व वर्गवारी केली पाहिजे. आमचे मित्र राजीव साने म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन या शब्दापेक्षा अंधश्रद्धा निवारण हा शब्द योग्य आहे. निर्मूलन हे समूळ उच्चाटन असते. अंधश्रद्धा या केवळ अगतिकता अज्ञान संस्कार यातून येत नाही. ती तर कारणे आहेतच पण त्या टिकून राहण्यामागे जैविक कारण देखील आहे हे विसरता कामा नये. अनेक वेळा देत असलेला दुवा पुन्हा एकदा देतो. मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्य पुस्तकातील अंधश्रद्ध व मेंदुविज्ञान हे प्रकरण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
प्रसाद गोडबोले Tue, 04/10/2018 - 05:45 नवीन
लोल ! आता मात्र मजा यायला लागली ह्या धाग्यावर =)))) ह्या लोकांना खरेच स्वतःचा मुद्दा नक्की काय आहे हे स्वतःला तरी ठावुक आहे की नाही देव जाणे . एक जण म्हणतोय की नास्तिकस्ता म्हणजे देव नाकारणे , एक म्हणातोय देव नाकारा पण तत्त्वज्ञान स्विकारा , एक म्हणतोय की नास्तिकता धर्माविरुध्द नाही ! काय चेष्टा लावलीये ....लोल !!
नास्तिकता ही कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही. खरं तर नास्तिकांतले अर्धेजण तरी आपापल्या धर्माच्या अवडंबराला, (कोणताही) धर्म रस्त्यावर आणल्याने होत असलेल्या सक्तीच्या गैरसोईला कंटाळलेले असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर नास्तिक आपले नास्तैक्य आपल्या मनात बाळगतील. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. म्हणून नास्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा आस्तिकांनी आपापल्या धर्मातील अवडंबरं, धार्मिक विधी (किमान त्यात सहभागी नसणार्‍यांना तरी) कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हळव्या भावनांची आपणच वास्तववादी चिकित्सा केली तर अश्या मेळाव्यांची गरज उरणार नाही.
हा पॅरा म्हणाजे स्वमतांधतेचे क्लासिक उदाहरण आहे , ह्यात थोडेसे बदल करुन लिहिलेला खालील पॅरा वाचा =)))) आस्तिकता ही कोणत्याच विचारसरणीच्या विरोधात नाही. खरं तर आस्तिकांतले जवळपास सर्वच्यासर्व जण आपापल्या धर्माच्या श्रध्देच्या उपासनेच्या आनंदात मग्न असतात , पण नास्तिक लोक उगाचच जिथेतिथे माझीच लाल , अन बाकीचे अज्ञानमुलक असमंजस अन मीच काय तो शहाणा असे अवडंबर माजवत असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर आस्तिक आपले आस्तैक्य आपल्या मनात बाळगतील अन संविधानिक मर्यादेत स्वतःचे धर्मस्वातंत्र्य उपभोगतील. एकदा नास्तिकांचे फुटकळ लेख मिपावर यायचे बन्द झाल्यावर कोण आस्तिक कशाला अन कुठे प्रतिसाद द्यायला येईल. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. म्हणून आस्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा नास्तिकांनी आपापल्या तील किडे सोशलमिडीवर सोडायचे बंदकरुन आस्तिकांना डिवचण्याचे प्रकास कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हुच्च सर्वज्ञ स्वमतांधतेचे लाल रंगाचे डबे स्वतःपुरते मर्यादित ठेवले कि अश्या काथ्याकुटांची गरज उरणार नाही. !!! मी आधीच म्हणल्याप्रमाणे कोणत्याच आस्तिकाने अमुक व्रत करा अन तमुक पुजा करा असले लेख मिपावर पाडल्याचे कैकवर्षात दिसले नाहीये , (फार पुर्वी कोणेतरी कोकिळाव्रत म्हणुन काहीतरी लिहिले होते त्याची पार कोकिळा करण्यात आली होती त्या धाग्यावर =))) , उलट नास्तिक लोकच अर्धवट वाचनातुन बनवलेल्या अर्धवट ज्ञानावरुन खुस्पट काढणारे अन वातावरण गढुळ करणारे लेख सतत अन वारंवार पाडत आहे ! वरुन पुरोगामित्वाचे लाल डबे फ्री फ्री फ्री !! नास्तिकलोकांमध्ये " मीच एक शहाणा , मीच म्हणतो ते खरे , ते न मानणारे काफीर" ही असली अब्राहमिक वृत्ती आली आहे जी की संपुर्ण कलहाचे कारण आहे ! तीच फक्त "इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न |यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७॥" अशी अर्थात स्वतःच्या ज्ञानालाही scope for doubt and improvement झाली तर हा कलह थांबेल असा आमचा एक अंदाज आहे !! =================================== ए बारक्या , एक प्लेट सेव फरसाण अन पाव जोडी घे रे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
प
प्रसाद गोडबोले Tue, 04/10/2018 - 05:53 नवीन
आणि हो , हे एक राहिलेच
मिपावरील प्रा. य. ना वालावलकर यांना या परिषदेत चार्वाक २०१८ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ह्या निमित्ताने त्याला इथे , आजच्या आस्तिकनास्तिकपाव वर आणि पुर्वाश्रमीच्या मिसळपाववर नेवाळे २०१८ पुरस्कार प्रदान करावा असा प्रस्ताव मी मिपावर मांडत आहे =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
र
राही गुरुवार, 04/12/2018 - 13:31 नवीन
"ह्या निमित्ताने tyaalaa इथे , आजच्या आस्तिकनास्तिकपाव वर आणि पुर्वाश्रमीच्या मिसळपाववर नेवाळे २०१८ पुरस्कार प्रदान करावा असा प्रस्ताव मी मिपावर मांडत आहे. का बरे जाणून बुजून एकवचन? तुच्छता आणि तिरकसपणा आस्तिकानाच नव्हे तर कोणाही ज्न्यानी व्यक्तीस शोभादायक नाही. असो. व्यक्ती आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
A
arunjoshi123 गुरुवार, 04/12/2018 - 13:42 नवीन
परस्परसन्मानाचे संकेत पाळावेत हे पटतं खरं. पण यनांस त्यांच्या अर्हतेपेक्षा अनेक पटींनी उत्तम संबोधले जाते. यना हे व्यक्तिगत उल्लेख करून अतिशय सभ्य भाषा वापरतात मात्र एका विशीष्ट वर्गाचा उल्लेख करतात ते अत्यंत हिन दर्जाची, हिणकस, असंसदीय, चूकीची आणि त्वेषात्मक भाषा वापरतात. या वर्गाचं नीच मूल्ये असल्याचं पूर्वीचं कोणतेही रेप्यूटेशन नाही. ================================= धिस रेसिप्रोकेशन इज जस्टीफाइड अनलेस प्रिवियस टेक्स्ट इज मॉडरेटेड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 07:29 नवीन
आस्तिकता ही कोणत्याच विचारसरणीच्या विरोधात नाही. खरं तर आस्तिकांतले जवळपास सर्वच्यासर्व जण आपापल्या धर्माच्या श्रध्देच्या उपासनेच्या आनंदात मग्न असतात , पण नास्तिक लोक उगाचच जिथेतिथे माझीच लाल , अन बाकीचे अज्ञानमुलक असमंजस अन मीच काय तो शहाणा असे अवडंबर माजवत असतात. तेव्हा ह्या गोष्टी कमी झाल्या तर आस्तिक आपले आस्तैक्य आपल्या मनात बाळगतील अन संविधानिक मर्यादेत स्वतःचे धर्मस्वातंत्र्य उपभोगतील. एकदा नास्तिकांचे फुटकळ लेख मिपावर यायचे बन्द झाल्यावर कोण आस्तिक कशाला अन कुठे प्रतिसाद द्यायला येईल. कारण मुळातच जगा आणि जगू द्या हे त्यांचं तत्व असतं. म्हणून आस्तिकांवर झोड उठवण्यापेक्षा नास्तिकांनी आपापल्या तील किडे सोशलमिडीवर सोडायचे बंदकरुन आस्तिकांना डिवचण्याचे प्रकास कमीत कमी त्रास देणारे कसे होतील याकडे लक्ष देऊन त्याबाबतीत प्रबोधन केलं आणि आपल्या हुच्च सर्वज्ञ स्वमतांधतेचे लाल रंगाचे डबे स्वतःपुरते मर्यादित ठेवले कि अश्या काथ्याकुटांची गरज उरणार नाही.
हे जे स्फुट रुपांतर आहे ते (म्हणजे याचं मूळ ल्लेखन) नास्तिकाचं एक क्लासी वर्णन आहे. ते कसे आपल्याकडे थोरपणा घेत असतात. स्वस्तुतीमधे कशी त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते याची मार्कस यांनी मस्त मज्जा घेतली आहे. क्लास अपार्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मारवा Tue, 04/10/2018 - 05:45 नवीन
प्रतिसाद आवडला यनावाला यांच्या विषयी आदर आहेच. पण आक्षेपही आहे तो असा की ते एका मर्यादेपर्यंतच क्रिटीकल इन्व्हेस्टीगेशन करतात त्यांच्यातला सत्यान्वेषक त्या बिंदुवर थांबतो त्या नंतर त्यांच्यातला सुधारक हा त्यांच्यातल्या सत्यान्वेषकावर हावी होतो. मग ते गृहीतकांवर विसंबुन मांडणी करतात. उदा. राष्ट्रवाद त्यांनी पुर्णपणे विदाउट इन्व्हेस्टीगेशन स्वीकारलेला दिसतो असे प्रथमदर्शनी तरी वाटते. दुसर त्यांची टेक्नीक एथोज पॅथोज लोगोज हा क्रम आदर्श आहे अधिक प्रभावी आहे ते सरळ लोगोज पासुन सुरुवात कर तात ते इथे मिसळपाववर तरी इतर कुठल्याच धागा विषयात त सहभागी होत नाहीत कधीच , स्वतः ही नास्तिकता सोडुन इतर विषयावर लिहीत नाहीत. इतर ठिकाणी लिहीलेले आहे इथे नाही. सांगायचे असे की तुम्ही अगोदर एथोज ने कनेक्ट व्हा हे गरजेचे आहे. ते एखाद्या एलियन सारखे इतरांना कदाचित भासत असावेत कोणीतरी फार दुरवरुन येतो इतर कुठेच इमोशनली कनेक्ट नाही काहीतरी बॉम्ब ( इमोशनल सांस्कृतिक म्हणा ) टाकुन जातो त्याने हेट्रेड विरोधभाव विनाकारण निर्माण होतो, गोंगाट इतका वाढतो की जे कोणी रीसेप्टीव ओपन असतील नविन वेगळ्या विचारासाठी ते ही डिस्टर्ब होतात मला इतकच म्हणायच आहे की त्यांनी स्ट्रॅटेजी बदलावी अधिक ह्युमन अधिक मोकळी अधिक भावपुर्ण करावी अंगिकारावी असे मला आपले सुरुवातीपासुन वाटते अनेकांना यनावाला म्हणजे काहीतरी भयंकर माणुस वाटतो कदाचित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
प
पुंबा Tue, 04/10/2018 - 07:49 नवीन
यनावालांनी आपण सर्वज्ञ आहोत असा दावा कधी केला आहे? त्यांच्या चिकित्सेला मर्यादा असणारच. किंबहुना त्यांची आस्तिकता-नास्तिकता संदर्भातील मांडणी त्यांच्या या विषयावर केलेल्या चिकित्सेचाच परिपाक असावी. त्यांनी इतर कुथल्यातरी बाबतीत घेतलेल्या भुमिकेतील(जसे राष्ट्रवाद) कच्चे दुवे त्यांच्या आस्तिकता-नास्तिकता या विषयवरील मतांना कसे निष्प्रभ करतात? दुसरे एक, या धाग्यावर अवांतर ठरेल असे, राष्ट्र ही संकल्पना चिकित्सातीत असू नये याच्याशी सहमत आहे. मात्र, इतर अस्मिता टोकदार न होऊ देण्यासाठी स्थीर समाज उभा रहावा यासाठी राष्ट्राची चौकट अतिनिकडीची असते असे सध्या तरी दिसते. राष्ट्र ह्या संकल्पना थोडी विसविशीत झाली की आतापर्यंत तरी असे आढळले आहे की इतर अस्मिता टोकदार होतात, त्या अस्मितांचे रिलिजन्स बनतात. अरब मुस्लिम राष्ट्रांत धर्म असेल किंवा तमिळनाडूत भाषा असेल किंवा अमेरिकेत कॅपॅटलिझम असेल. एकसंधत्व निर्माण करण्यासाठी राष्ट्र नावाच्या फिक्शनवर विसंबून राहावे लागते. अर्थात राष्ट्रवादाचा रिलिजन होऊन मग त्याची देखिल कर्मकांडे होतात व बहुसंख्याकांना अंकित करण्यासाठी राष्ट्रवाद वापरला जातो असे म्हणता येईल. बराच गुंतागुंतीचा असा हा विषय आहे, मला नीट मांडता येत नाहीये खरं तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 10:28 नवीन
त्यांच्यातला सत्यान्वेषक त्या बिंदुवर थांबतो त्या नंतर त्यांच्यातला सुधारक हा त्यांच्यातल्या सत्यान्वेषकावर हावी होतो.
+१ ==========================
ते इथे मिसळपाववर तरी इतर कुठल्याच धागा विषयात त सहभागी होत नाहीत कधीच , स्वतः ही नास्तिकता सोडुन इतर विषयावर लिहीत नाहीत. इतर ठिकाणी लिहीलेले आहे इथे नाही.
आय थिंक धिस इज ओके. असं असलं तरी व्यक्तिगत जीवनात त्यांना एक सामान्य व्यक्ती म्हणून कल्पणं सोपं आहे. ====================
ते एखाद्या एलियन सारखे इतरांना कदाचित भासत असावेत
नि
अनेकांना यनावाला म्हणजे काहीतरी भयंकर माणुस वाटतो कदाचित
असं काही नाही. ते आपल्यासारखेच नि सज्जन असावेत असं कल्पणं अजिबात अवघड नाही. -------------------- पाश्चात्य माध्यमांत स्व चं जे नास्तिकी चिंतन असतं ते कधी कधी अंगावर काटा आणतं. यना अजिबात असलं काही करत नाहीत. त्यांचेवर नको ते आरोप नको. ====================================== कोण्या ही आस्तिकाने ईश्वररहित विश्वाची संकल्पना समजून सांगायला पाहिजे. हे यना अजिबात करत नाहीत. नसलेला कायदा पाळायचा गचाळ आग्रह करत लेख पाडत बसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/10/2018 - 07:14 नवीन
अंतरा आनंद आपल्या प्रतिसादाने माझ्या धाग्याचं सार्थक झालं. धन्स.....! आणि प्रा. य. ना वालावलकर यांना या परिषदेत चार्वाक २०१८ पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन करतो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 07:24 नवीन
मिपावरील प्रा. य. ना वालावलकर यांना या परिषदेत चार्वाक २०१८ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आता बोला.काय अवस्था येऊन ठेपलीय नास्तिकतेवर! दुसरा कोणी मिळाला नाही का? आपल्या मिपावरच यनांना हजारदा चित करतील इतके उत्कृष्ट नास्तिक आहेत. यनांना काहीतरी वैचारिक लेवल आहे का? मी त्यांना मागच्या ६-७ धाग्यांवर कितीतरी प्रश्न केलेत, त्या उत्तरांतील छछोरता पाहून चार्वाकाबद्दल कीव येतेय. ================================== तसे राजीव साने पण कंसेप्च्यूअली गंडलेलेच आहेत, पण त्यांचं पॉप्यूलर अपिल थोडं जास्त आहे. ते बरेच अस्पेक्ट कवर करतात, पण अजून तरी फ्रेमवर्क बद्दल बोलताना आढळले नाहीत. ============================================= बाय द वे यना, वयाने ज्येष्ठ आहात म्हणून पुरस्कार देणे- मिळणे हे धार्मिक वर्तन झालं. अशाच तर प्रकारे घाणेरड्या धार्मिक परंपरा रुजतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 07:35 नवीन
खरं तर नास्तिकांतले अर्धेजण तरी आपापल्या धर्माच्या अवडंबराला,
नास्तिकांचा पण आपापला धर्म असतो का? लोक धार्मिक नि नास्तिक एकत्र असतात का? काय चाललंय काय? सॉलिड कंफ्यूज करतात राव हे लोक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
प
पुंबा Tue, 04/10/2018 - 07:51 नवीन
"निरपेक्ष आनंद, वासनारहित सौदर्य, सुकून(ब्लिस), धन्यवाद देण्याची गरज, सन्मार्गच घेतला याचा धन्यभाव, आश्चर्य-कौतुक, शुचिता-पावित्र्य, आदर-जोडलेपणा, साक्षीभाव मोकळेपणा, रितेपण नव्हे तर भरलेपण, म्यूच्युअलटीतून येणारी इंटिमसी, आत्ताच्या वास्तवाचा काच सोडून येणारी क्रियेटिव्हिटी याही गोष्टी हव्या आहेत. नैतिकता ही फक्त कर्तव्यांपर्यंत पोहोचते. पण कर्तव्यातीत सद्गुण म्हणजेच औदार्य, करुणा, मुदिता, क्षमा, अनसूया हे जोपासायला मनोवस्था आत्मीयतेची लागते. ती ठरवून आणता येत नसली तरी तिला येऊ देणे ‘लेट’ याकरता स्वागतशील असावे लागते. मानसोपचार हा फक्त विकारग्रस्तता घालवण्यापुरता पुरेसा नसून आंतरिक उन्नतीसाठी पुढे नेला पाहिजे."
वाह! फार आवडले.. यनावालांचे अभिनंदन.
राजीव साने यांनी "धार्मिक बाबतीत मूल्यचिकित्सा आणि त्यातून इहवादाकडे वळवण्यासाठी नास्तिकांनी प्रयत्न करण्याची गरज" अधोरेखीत केली होती त्याबाबतही, अश्या तर्‍हेने कोणाची मतं बदलण्यासाठी प्रयत्न करणं हे माझ्या पद्धतीत बसत नसल्याचंही सहस्त्रबुद्धे या अजून एका संस्थापक सदस्यांनी आभारप्रदर्शनात सांगीतलं.
सहस्रबुद्धेंचेसुद्धा अभिनंदन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 10:39 नवीन
इथे कितीही राळ उडवली गेली तरी संयमाने आणि जिद्दीने ते आपले विचार मांडत राहतात.
हे एक तद्दन निर्बुद्ध विधान आहे. कोणत्याही सामाजिक मंचावर केलेल्या विधानांवर लोकांनी प्रश्न विचारले तर त्यांची उत्तरे द्यायची असतात. माझं तितकं ज्ञान नाही अशा सफाया देण्याऐवजी असले विषयच छेडायचे नाहीत. राळ उडवणे म्हणजे भलते सलते अर्थ काढून प्रपागंडा करणे. यनांच्या एकाही वाक्याचा कोणी भलता अर्थ काढलेला नाही. उलट यनांनी त्यांच्या अज्ञानातून, संस्कारांमुळे, जे काय ते, सश्रद्ध लोकांबद्दल जी अवार्च्य विशेषणे वापरली आणि त्यावर मिपाकर नास्तिक जसे मूग गिळून गप्प आहेत ती नास्तिकी चळवळ कोण्या उपटसुंभाच्या हाती पडत आहे याची नांदी आहे. समजा अस्तिक, सश्रद्ध लोकांनी त्यांच्या बौद्धिक, ज्ञानिक, वैचारिक, इ इ मर्यादांमुळे स्वीकारलेली विचारसरणी चूक जरी असली तरी त्यांना संबोधण्याची एक संसदीय पद्धत असते. अशा बेजबाबदार लोकांना पुरस्कार देणे, वर विनम्र म्हणणे वर त्यांना प्रश्न विचारणारांना राळ ऊडवणारे म्हणजे अति आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/10/2018 - 08:05 नवीन
नमस्कार मंडळी, साहित्य समाजाचा आरसा असतो असं आम्ही एक पारंपरिक वाक्य नेहमी वापरतो. त्यात जरासा बदल करुन म्हणतो की मिपा समाजाचा आरसा आहे, समाजात जे जे दिसतं त्याचं चित्रण इथे उमटतं. नास्तिक चळवळीच्या निमित्ताने समाजमनाचं प्रातेनिधिक प्रतिसाद इथे बघायला मिळाले. रुढीप्रिय सामान्य लोकांचा रोष, आक्रोश, चीड, त्रागा आणि भाषेवरील गेलेलं भान इथे अनेक प्रतिसादांतून दिसलं. देवाळू का देव खतरेमे पडल्याप्रमाणे त्याच्यासाठीचे अनेक युक्तीवाद इथे चर्चील्या गेले. अनेक विचार नसलेल्या देवाळुंच्या झुंडी इथेही दिसून आल्या. विज्ञानाला अनेक शोध लागले नाहीत पासून देवाचा शोध लागल्याच्या आनंदातले प्रतिसादही मजा देऊन गेले. अनेकांनी चळवळींचं स्वागत केलं, काही अपेक्षा चळवळींकडून व्यक्त केल्या. नास्तिकत्व म्हणजे काय याबद्दलही अगदी शेवटी काही प्रतिसाद दिसले. नास्तिक परिषदेतील सहभागी झालेले अंतरा आनंद यांचा एक उत्तम प्रतिसाद आणि प्रा.य.न.वालावलकर यांना २०१८ चा चार्वाक पुरस्कार मिळाल्याची बातमी मला धाग्याचा आनंद देऊन गेला बाकी, प्रतिसादचर्चेच्या निमित्ताने काही गोष्टींचा उहापोह करावा वाटला. काही प्रतिसादात चक्रधर स्वामींच्या महानुभाव संप्रदायाबद्दल काही टीपा दिसून आल्या. या पंथाने खरंच काहीएक बदल करण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट खरी आहे की पारंपरिक उपासना आणि अवडंबरच्या निमित्ताने एक वेगळा पंथ म्हणून महानुभाव संप्रदायाचा विचार केला तरी अनेक गोष्टी त्यांनी त्यात मानल्या ज्यात पंचकृष्ण आणि सुत्रपाठ हा एक भाग आहेच. देवताभक्तीबरोबरच त्यांच्या प्रित्यर्थ होणारे तीर्थक्षेत्र, व्रतदान, रुढ मार्ग चक्रधरांनी निषिद्ध ठरविले, इतकेच काय व्यक्तीची निष्ठा अनेक ठिकाणी विभागणारे अनेक प्रकारचे धर्म, ग्रामधर्म, जातीधर्म, कुलधर्म चातुवर्ण, हे सर्व चक्रधरांनी अमान्य केले. विषमता निर्माण करणारा धर्म त्यांना मान्य नव्हता, हे स्पष्ट दिसते. देवाळू संप्रदाय त्यांनी पूर्ण नाकारला नाही. आणि लोकांनाही त्यातला अवैदिकता, वर्णाश्रम विरोध, मुर्तीपुजेला प्रतिबंध, दैवतांचा अधिक्षेप, जातीभेदाला अमान्यता, या गोष्टी तत्कालीन समाजमनाला मान्य न होणाया होत्या त्यामुळे तो काळ पाहता पंथ अप्रिय झाला असे म्हणावे लागते. इतिहासात डोकावल्यावर असे दिसते की, पारंपरिक देव धर्म आणि संस्कृती नाकारुन नव्या पंथाचे अनेक प्रयत्न झाले. मुर्तीपूजा नाकारुन पाद्य पुजा करणारा दत्त संप्रदाय आपणास दिसतो. परंतु त्याला कारण त्यावेळची सत्ता होती असे दिसते. यादवांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर अडीचशे वर्ष हिंदु धर्माला फ़ार मोठी शिथीलता आली होती. देवळांची मोडतोड, तीर्थक्षेत्रांचा विंध्वस, जत्रा, उत्सव यांना प्रतिबंध अशामुळे लोक गोंधळुन गेलेले होते. मुस्लीम राजवटीचे सर्व काही चांगले वाटू लागले होते. चढाव, दाढी वगैरे ठेवणे, मुस्लीम पेहराव करणे, अगदी मराठी स्त्रीयांनी गोशा पडद्याच्या चाली उचलल्या, आडनावं अनेकांनी बदलून घेतली मुस्लीम गुरु करु लागले, पिरांना नवस करु लागले, उरुसात हिंदू नाचू लागले. दत्तासारख्या हिंदु दैवताला मलंग वेषात कुत्री बरोबर घेऊन फिरावे लागले हे सर्व हिंदु धर्माला शिथीलता आल्यामुळे झालेले आपणास इतिहासात दिसते. आता काळ बदलला आहे, आपल्या सोयीप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे देव धर्म परंपरा त्यातले अडचणीचे मार्ग वगैरे टाळून नास्तिक चळवळ सुरु झालेली दिसते. आज नास्तिक चळवळीला पारंपरिक विचारधारेचा विरोध, राजसत्तेचा समाजमनावरील प्रभाव जसा अड्सर असेल तसा पारंपरिक सनातनी विचारांचा प्रभाव सुद्धा अशा चळवळींना मारक ठरण्याची शक्यता आहे. आज तरी या चळवळींनी फ़ार मोठा पल्ला गाठलेला नाही, मात्र भविष्यात ही चळवळ फोफावेल अशी आशा करुया. आजूबजूची काही भयानता पाहता, नास्तिक चळवळ ही काळाची गरज असणार आहे, असं माझं व्यक्तीगत मत आहे. बाकी, माझ्याक्डून चर्चा इथे थांबवत आहे. आपणास चर्चेची दारं खुली आहेत. माझ्याकडून नाशिककरांच्या, पुणे, मुंबैच्या नास्तिक चळवळीला तहेदिलसे शुभेछा. चर्चेत सर्व सहभागी मिपाकरांचे विशेषतः विषयावर मुळ विषय समजून प्रतिसाद लिहिणार्‍या सर्व मिपाकरांचे, वाचकांचे, संपादकांचे, मालकांचे मनपूर्वक आभार मानतो. :) -दिलीप बिरुटे (आभारी) :)
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 04/10/2018 - 09:01 नवीन
उत्तम प्रतिसाद सर.. वाचनखूण म्हणून साठवत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
श्रीगुरुजी Tue, 04/10/2018 - 09:41 नवीन
आता काळ बदलला आहे, आपल्या सोयीप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे देव धर्म परंपरा त्यातले अडचणीचे मार्ग वगैरे टाळून नास्तिक चळवळ सुरु झालेली दिसते. आज नास्तिक चळवळीला पारंपरिक विचारधारेचा विरोध, राजसत्तेचा समाजमनावरील प्रभाव जसा अड्सर असेल तसा पारंपरिक सनातनी विचारांचा प्रभाव सुद्धा अशा चळवळींना मारक ठरण्याची शक्यता आहे. आज तरी या चळवळींनी फ़ार मोठा पल्ला गाठलेला नाही, मात्र भविष्यात ही चळवळ फोफावेल अशी आशा करुया. गंमत आहे. कालच हे म्हणाले होते की फार पूर्वीच आस्तिकांचा दारूण पराभव झालेला असून नास्तिकांचा दणदणीत विजय झाला आहे. पण आज म्हणताहेत की "आज तरी या चळवळींनी फ़ार मोठा पल्ला गाठलेला नाही, मात्र भविष्यात ही चळवळ फोफावेल अशी आशा करुया.". वैचारिक गोंधळ असाच असतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 10:16 नवीन
गुरुजी ते जे काय म्हणतात ते "ते म्हणतात म्हणून" सत्य असतं. हे लोक काहीही म्हणतात आणि ते सर्व सत्य आणि इष्ट मानायचं. ----------------------- मी वर जो एक धाग्याच्या मूळ विषयावर म्हणून प्रतिसाद दिला आहे तो यांना झेपलेला पण दिसत नाही. त्यावर यांना भाष्य देखील करावं वाटलं नाही यातच यांचा सगळा बुद्धीप्रामाण्यवाद दिसून येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 11:55 नवीन
नास्तिकांचा धर्माभ्यास सखोल असतो याचा प्रत्यय आणून देणारा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 04/10/2018 - 08:38 नवीन
य.ना वालावलकरांची चार्वाक पुरस्कारासाठी निवड ही अत्यंत उचित आहे. कठोर नास्तिक म्हणून जालावरील मंडळींना त्यांचा परिचय आहेच. सगळ्यांची मते ही सारखी असणार नाहीच. मतभिन्नतेचा आदर आहेच. यनावालांची सर्व मते कुणाला पटतील असे नाहि. तो भाग अंशात्मक असतो. यनावालांच्या मताशी सहमत असणारे अनेक लोक आहेत त्यांचा आक्षेप मतांपेक्षा मते व्यक्त करण्याच्या पद्धती विषयी. आक्रमते विषयी आहे. अंनिस ची सुरवात ही मानवीय नास्तिक मंच अशा नावाने झाली होती. पण ती तशा पद्धतीने रुजेना म्हणून बदल केला व अंधश्रद्धा निर्मूलन समिती असे नाव धारण केले. तसेच धोरणात ही बदल केले.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 08:59 नवीन
कठोर नास्तिक म्हणून
नास्तिक कठोर (मंजे कट्टर) असतो तरी का? ---------------------- यनावालांना चार्वाक पुरस्कार देणे म्हणजे चार्वाकाला बदनान करणे आहे या कठोर मताचा मी झालो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 09:09 नवीन
यनावालांची सर्व मते कुणाला पटतील असे नाहि.
सर्व मते कुणाचीच कुणाला पटत नसतात. पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा लावतील इतकी विचित्र मते मांडायची नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
पगला गजोधर Tue, 04/10/2018 - 09:12 नवीन
पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा लावतील इतकी विचित्र मते मांडायची नसतात.
नास्तिकांनाही प्रतिष्ठा असू शकते म्हणता ?? __ ट्रोलअलर्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 09:32 नवीन
प्रतिष्ठा काही अस्तिक, वा अज्ञेय लोकांची मालमत्ता नाही. ========================= बा द वे, मिपावरील लेखपाडू नास्तिक मंडळी नास्तिकवादाला सरळ बदनाम करत आहेत. जगभरात नास्तिक लोक अस्तिकांना हादरवून सोडणारे प्रश्न विचारतात. इथली मंडळी पूर्वघोषी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ग
गब्रिएल Tue, 04/10/2018 - 09:40 नवीन
मिपावरील लेखपाडू नास्तिक मंडळी नास्तिकवादाला सरळ बदनाम करत आहेत. जगभरात नास्तिक लोक अस्तिकांना हादरवून सोडणारे प्रश्न विचारतात. इथली मंडळी पूर्वघोषी आहे. हैला, बोला तो क्या बोला, अजोभाय ! यक्दम बैलका डॉळाचा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रकाश घाटपांडे Tue, 04/10/2018 - 09:52 नवीन
पण नास्तिकी प्रतिष्ठेला बट्टा लावतील इतकी विचित्र मते मांडायची नसतात.
पण त्यांनी ते मांडणे हे त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे.आपल्याला पटणे न पटणे हा आपल्या स्वातंत्र्यचा भाग आहे. आणि नास्तिकी विचारांमधे विभिन्न छटा असतातच की! त्या अस्तिकांमधेही असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 10:11 नवीन
अभिव्यक्तिस्वातंत्र्य कशाला आणायचं मधे? कोण म्हणतंय त्यांना विशिष्ट विचार मांडायचं स्वातंत्र्य नाही म्हणून? पण पुरस्कार, तो हि थेट चार्वाकाच्या नावाचा, द्यायला काही आगा पिछा बघावा कि नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
श
श्रीगुरुजी Tue, 04/10/2018 - 11:40 नवीन
असले पुरस्कार 'अहो रूपम् अहो ध्वनीम्' प्रकारातील असतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पगला गजोधर Tue, 04/10/2018 - 12:14 नवीन
"बाबा वाक्यं प्रमाणाम् " या प्रकारातील नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रकाश घाटपांडे Tue, 04/10/2018 - 12:52 नवीन
अहो चार्वाकाच्या नावाने दिला म्हणूनच तो उचित वाटतो.त्यांनी नास्तिकते च्या प्रसाराचे काम हिरीरीने केले नाहि का? तो काही विवेकचूडामणी पुरस्कार नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 10:48 नवीन
माझा जो काही जालावरचा अनुभव आहे त्यामधे आपले सारे प्रतिसाद संतुलित आढळले आहेत. तुम्ही स्वतःस नास्तिक मानता का नाही माहीत नाही, पण मानत असताल तर तुम्हाला चार्वाक पुरस्कार द्यायला हरकत नाही. तुमचं ज्ञान खूप आहे. भाषा अतिशय नम्र आहे. तुमच्याशी होणारा संवाद अत्यंत अर्थपूर्ण असतो. तुमचं लॉजिक पण सॉलिड असतं. शक्यतो बायस नसतात. ---------------------------- यनांची नास्तिकता प्रामाणिक आहे म्हणून तुम्ही पुरस्कारचं समर्थन, इ करत असाल, पण प्रकाशजी ये सरासर गलत है। यना डजन्ट नो अ‍ॅनिथिंग अबाउट एथिझम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 04/10/2018 - 12:57 नवीन
बहसंख्यासाठी 'ईश्वर' हा सगळ्यात स्वस्तातला सायकियाट्रिस्ट आहे. काही लोकांना काही वेळा आपले मानसिक आरोग्य व सदसदविवेक्बुद्धी जागृत ठेवण्यासाठी ईश्वर नावाच्या संकल्पने ची गरज लागते. काहींना ती अजिबात लागत नाही. गरज वाटली तर वापरायची नाही गरज वाटली तर नाही वापरायची शिंपल आहे. मला त्याचा थेट विवेकी असण्याशी काही संबंध वाटत नाही.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Tue, 04/10/2018 - 13:02 नवीन
आपले मानसिक आरोग्य व सदसदविवेक्बुद्धी जागृत ठेवण्यासाठी ईश्वर नावाच्या संकल्पने ची गरज लागते.
. हे ५०% विधान आहे, उरलेले आपली जागृत सदसदविवेक्बुद्धी दमन करून आंधळी ठेवण्यासाठी ईश्वर नावाच्या संकल्पने ची गरज लागते. जगातील अनेक एथनिक क्लीन्सिंग ची उदा आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 13:06 नवीन
जगातील अनेक एथनिक क्लीन्सिंग ची उदा आहेत...
अस्तिक लोकांनी केलेली? ======================== जगातल्या सर्व वांशिक हत्या केवळ आणि केवळ नास्तिक लोकांनी केलेल्या आहेत. आणि करोडोनी केलेल्या आहेत. ========================= सबब नास्तिकतेचा पुळका आलेल्यांनी अगोदर नास्तिकतेचा इतिहास वाचावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Tue, 04/10/2018 - 13:15 नवीन
जगातल्या सर्व वांशिक हत्या केवळ आणि केवळ नास्तिक लोकांनी केलेल्या आहेत.
जे तथाकथित आस्तिक लोकं एथनिक क्लीन्सिंगच्या नावाखाली हत्याकांड करतात, "त्यांना" तुम्ही सरळ "नास्तिक" म्हणून प्रॉडाक्ट लेबल चेंज करून खपवत आहात, तर धन्य आहे तुम्ही सर. बा द वे "एका हातात पवित्र पुस्तक व दुसऱ्या हातात तलवार" लोकांना तुम्ही धर्मावर निष्ठा असलेले आस्तिक मानतात का ? नै तुमचा व श्रीगुरुजींच्या फार विशेष लळा आहे त्या लोकांबद्दल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 04/10/2018 - 14:37 नवीन
ही सगळी पैदावळ नास्तिक आहे. आणि त्यांचा खुनशीपणा आणि नास्तिकपणा योगायोगाने नव्हते. त्यांच्या वर्तनाची प्रेरणाच नास्तिकता होती. http://listverse.com/2010/06/05/10-people-who-give-atheism-a-bad-name/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
श
श्रीगुरुजी Tue, 04/10/2018 - 14:27 नवीन
जगातल्या सर्व वांशिक हत्या केवळ आणि केवळ नास्तिक लोकांनी केलेल्या आहेत. आणि करोडोनी केलेल्या आहेत. अगदी बरोबर. पण एक अपवाद आहे. तो म्हणजे शांततेच्या धर्मातील आस्तिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रसाद गोडबोले Tue, 04/10/2018 - 15:51 नवीन
चला , ह्या धाग्याच्या निमित्ताने परत एकदा प्रतिसाद संपादन सुरु झाल्याचे दिसले ! तर्री संपली , एक्स्ट्रा सेव फरसाण अन पाव खाऊन पोट ही भरले ! आता थंडगार ताक मागवुयात ! आस्तिकनास्तिकपाव संपुन मिसळपाव (काही काळापुरते का होईना पण) परत सुरु झाले असे मानायला हरकत नाही :) - मार्कस ऑरेलियस vi veri veniversum vivus vici
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 04/11/2018 - 04:45 नवीन
भुंकुन काम होत नसेल, तर चावा घ्यावा लागतो. गाय मारणार्याला अटकाव केला नाही तर, नंतरच वासरे मारली जातात. (मार्कस ऑरेलियस तुमच्यासाठी ही प्रतिक्रिया नाही, दुसऱ्या/ री साठी आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गामा पैलवान Tue, 04/10/2018 - 17:41 नवीन
बाकी कायपण म्हणा आपल्याला नास्तिकांच्या फलकांवरचं अक्षरवळण ( = फॉण्ट ) लै आवडलं. सनातन प्रभात सारखं वाटतंय! -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मारवा Tue, 04/10/2018 - 18:39 नवीन
ब्राइट्स अथेइस्ट कोन्फरन्स मध्ये झालेल्या व्याख्यानांचा दुवा रोचक आहे https://www.facebook.com/Wethebrights/videos/889730854485089/ राजीव सानेंचा याच संदर्भातील लेखाचा दुवा https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=2061815880811358&id=100009488997733 इंटरेस्टींग आहे अवश्य बघा वाचा
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Tue, 04/10/2018 - 20:27 नवीन
तर्कशुद्ध वाटतं नसलं तरी लोकं धर्माला-प्रथेला का चिटकुन राहतात, नास्तिकं का होतं नाहीत, हे कळेल या लेखा वरुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा