नास्तिक चळवळ : काळाची गरज ?
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात.
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
💬 प्रतिसाद
(336)
प
प्रसाद गोडबोले
Sun, 04/08/2018 - 16:19
नवीन
कारण बहुतांश नास्तिक हे स्पष्ट बावळट असतात. त्यांचा कोणत्याच विषयाचा धड अभ्यास नसतो. ना इतिहास ना तत्वज्ञान ना धर्मशास्त्र . ना भारतीय धर्म ना अब्राहमिक धर्म !
मुळातच भारतीय धर्मातील टोटल ९ तत्वज्ञानांपैकी ३ स्पष्ट नास्तिक अर्थात वेदांचे प्रामाण्य नाकारणारी आणि उरलेल्या ६ पैकी ५ निरीश्वरवादी अर्थात ईश्वर असे काहीतरी सुपर नॅचरल असते हे मत नाकारणारी ! केवळ अद्वैत ईश्वराचे अस्तित्व मानते पण तेही तो ईश्वर तुच आहेस हे प्रतिपादन करते ! अर्थात भारतीय तवज्ञानांना प्रामुख्याने हिंदु दर्शनांना आजच्या नास्तिकतेचे जी की खर्या अर्थाने निरीश्वरवाद आहे तिचे वावडे नाही !
पण अभ्यास करायचाच नसेल अन फक्त अभिनिवेश असेल की कचकुन लेख पाडता येतात तेही काल्पनिक कथा रचुन =)))) मला अमुक जण भेटला अन त्याने तमुक प्रश्न विचारले अन मी त्याला लसुण उत्तरे दिली अन त्याने मला फुटाणा प्रत्युत्तर दिले वगैरे वगैरे !
ही संपुर्ण नास्तिक चळवळ फळवळ अर्धवट आणि ऐकीव माहीतीतुन उभारलेली आहे ! कारण जसे अब्राहमिक धर्मात जसे एक देव , त्याचा कोण तरी प्रचारक , कोणता तरी ग्रंथ आहे तसे हे काहीच घोळ आपल्या कडे नाहीये !
आपल्याकडील तत्वद्नान समजुन घेता येणे हे तसेही सोपे नाही म्हणुनच उपासना भक्ती मार्ग बनवले आहेत लोकांनी ! पण अभ्यासच करायची इच्छाच नसेल त्याला कसे समजावणार ?
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥ ३ ॥
देखैं उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा ।
सांगैं नरु केवीं तैसा । पावे वेगा ? ॥ ४१ ॥
तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे ।
तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥ ४२ ॥
तैसे देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें ।
सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें ।
पूर्णता अवसरें । पावते होती ॥ ४४ ॥
असो किति वेळा तेच तेच दळण दळायचे ?? आमचे मित्र म्हणतात तसे मिसळपाव चे आस्तिकनास्तिकपाव झाले आहे , आता तुम्ही तर्री वाढवत असाल तर आम्हाला एक्स्ट्रा सेव फरसाण प्लेट आणि पाव मागवावाच लागणार ! पोटभरे पर्यंत मागवु , नंतर टाकुन देवु =)
नको सांडू अन्न नको सेवू वन । चिंती नारायण सर्व भोगी ।।
मातेचिये खांदी बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ।।
नको गुंफो भोगी नको पडो त्यागी । लावुनी सरें अंगी देवाचिया ।।
तुका म्हणे नको पुसू वेळोवेळा । उपदेश वेगळा उरला नाही ।।
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/08/2018 - 17:15
नवीन
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/08/2018 - 17:23
नवीन
>>>>> कारण बहुतांश नास्तिक हे स्पष्ट बावळट असतात. त्यांचा कोणत्याच विषयाचा धड अभ्यास नसतो. ना इतिहास ना तत्वज्ञान ना धर्मशास्त्र . ना भारतीय धर्म ना अब्राहमिक धर्म !
जाऊ द्या हो, तुम्ही त्या बावळट लोकांकडे दुर्लक्ष करा...! खाली पाहून चालणार्या मेंढ्याच्या कळपाला फक्त सांभाळा. जीव लावा.
>>>> आपल्याकडील तत्वद्नान समजुन घेता येणे हे तसेही सोपे नाही म्हणुनच उपासना भक्ती मार्ग बनवले आहेत लोकांनी ! पण अभ्यासच करायची इच्छाच नसेल त्याला कसे समजावणार ?
काहीही समजून सांगू नका. आपण आपल्या भजनात आपला वेळ घालवावा, आपल्याला जे पटतं ते करावं. असे प्रामाणिकपणे सुचवतो. आपण नास्तिक लोकांच्या लफर्यात पडू नका, आपण आपल्या मार्गाने जा, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. ;)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/08/2018 - 17:34
नवीन
सर निसट्या बाजू दाखवू नका म्हणताय पण "आपण नास्तिक लोकांच्या लफर्यात पडू नका, आपण आपल्या मार्गाने जा, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. ;) " इथे नास्तीकांनाही असा सल्ला देता येऊ शकतो नाही का ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/08/2018 - 17:43
नवीन
पुरोगामी भूमिकांच्या मंचांसाठी उणीव यूक्त कमकुवत आधार वापरले जाण्यात नेमका विवेक कुठे असतो ? उणीव यूक्त कमकुवत आधारांचे समर्थन व्हावे अशी भूमिका कशी काय बाळगली जाते ?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sun, 04/08/2018 - 18:35
नवीन
परत मेंढ्या =)) अहो सर, हेच सांगतोय , मेंढ्या मेढपाळ हे सारे अब्राहमिक धर्मातले संदर्भ आहेत , आपल्याकडे ह्यातले काहीच लागु पडत नाही ! आपल्या कडे उध्दरेत आत्मना आत्मानम !!
भुंकती ती द्यावी भुंको । आपण त्यांचे नये शिको ॥
भाविकांनी दुर्जनांचे । मानू नये काही साचे ॥
होईल तैसे बळ । फजित करावे ते खळ ॥
तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥
समजुन सांगायची ईच्छाच नाहीये सर ! पण मिपावर वारंवार हे बावळट लोकं खुस्पट काढत आहेत हे स्पष्टपणे दिसले आहे ! कोणत्याही आस्तिकाने मिपावर सत्यनारायण पुजा घाला , ह्यांव व्रत करा अन त्यांव पुजा करा , अन असली चळवळ अन तसली चळवळ चे समर्थन केल्याचे लेख अनेक वर्षात दिसले नाहीयेत ( फार पुर्वी कोणीतरी कोकिळाव्रत कि काय लेख पाडला होता त्यावर काय खिल्ली उडवलेली सर्वांनी ते ही आठवले . ख्याक.)
मी वर म्हणल्याप्रमाणे नास्तिक लोकं तर्री वाढवत असतील तर आम्हाला सेवफरसाणा आणि एक्स्ट्रा पाव वाढवायला मजाच येईल , पोट भरलं की आम्ही टाकुन जाऊ =))))
आस्तिकलोक तुम्हाला कोणालाही आस्त्किक व्हायची सक्ती करत नाहीयेत , मी कशाला तुम्हाला आस्तिक व्हायची सक्ती करु ?
हा प्रतिसाद वाचला नाहीये का ??
https://www.misalpav.com/comment/979007#comment-979007
परत एकदा क्वोट करतो >>>
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
- मार्कस ऑरेलियस
सीझर
श्रध्दा सबलीकरण समिती
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 04:38
नवीन
आपला आपण करावा वेव्हार ।
जिंकोनी अंतरमन ग्वाही ।।
सत्य असत्याशी मन केले ग्वाही ।
मानियले नाही बहुमता ।।
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 04/09/2018 - 16:17
नवीन
संत तुकाराम म्हणतात
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥
आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥
घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥
तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥
अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥
दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥
दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥
यापेक्षा त्यांच्याहुन जुने चक्रधर काय वाईट होते
चक्रधरस्वामींचे मासिक पाळीबद्दलचे आठशे वर्षांपूर्वीचे बोल:
‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’
प्लीज नोट चक्रधर स्वामी तुकारामांच्या किमान ४०० वर्षे अगोदरचे होते. ( ते एक टिपीकल आर्ग्युमेंट असते ना काळाप्रमाणे ते बरोबरच होते वगैरे ...
तर हा एक फरक म्हणून बघायला हरकत नसावी शास्त्रीय वगैरे दृष्टीकोण इ.इ.
बाकी चक्रधरांच्या मर्यादा होत्याच हे वेगळे सांगणे न लगे
असो
( हा प्रतिसाद चुकुन दुसर्या धाग्यावर प्रकाशित झालेला आहे संपादकांना विनंती तो रीपीट प्रतिसाद काढुन टाकावा तो याच धाग्यासाठी होता. )
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 04/09/2018 - 20:34
नवीन
सदर गोष्टीचा नास्तिक चळवळीशी काय संबंध ?
तुमच्या मते तुकारामांना शरीरधर्मांचे ज्ञान नव्हते म्हणुन त्यांच्या इतर साहित्याची महती कमी होते काय ?
आधीच विषय काय की म्हणे नास्तिकता चळवळ वगैरे कमकुवत आहेत त्यात अजुन हे Whataboutism करुन त्याचे डायल्युशन टाळा जमलं तर !
तुर्तास फक्त नास्तिकता ह्या विषयावर बोलु , तुम्हाला चक्रधर स्वामी प्रिय असतील तर त्यांची नास्तिकतेविषयी काय मते होती ते लिहा पाहु , अगदी विनम्रपणे कबुल करतो कि आमचे चक्रधर स्वामी विषयीचे ज्ञान शून्य आहे , तुम्ही काही सांगितलेत तर आमच्या ज्ञानात भरच पडेल !
बाकी संतांची ह्युमन बायलोजी ची परिक्षा नंतर घ्या सविस्तरपणे!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 04/09/2018 - 05:52
नवीन
वाल्मिकी रामायणात जाबाली आणि श्रीरामामधील आस्तिकमत, नास्तिकमताविषयीचा संवाद मूळातून वाचण्यासारखाच आहे. जाबाली नास्तिकमताचा उपदेश करुन रामास अयोध्येस चल म्हणतो तर श्रीराम आस्तिकमताचा पुरस्कार करुन अयोध्येस येण्यास नकार देतो. रामाने केलेले नास्तिकमताचे खंडन मात्र केविलवाणे वाटते.
यथा हि चोरः स तथा हि बुद्ध स्तथागतं नास्तिकमत्र विद्धि ।
तस्माद्धि यः शङ्क्यतमः प्रजानांन नास्तिके नाभिमुखो बुधः स्यात् ।।
याप्रमाणे चोर दण्डनीय असतो त्या प्रकारेच बौद्धमतावलंबीही दंडनीय आहेत. तथागत आणि नास्तिकही तसेच. म्हणून प्रजेच्या कल्याणासाठी नास्तिकास शक्य झाल्यास चोराप्रमाणे दण्ड दिला जावा. शिवाय त्या नास्तिकाशीविद्वानाने कधीही वार्तालाप करु नये
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 06:50
नवीन
ह्या, वाल्मिकी रामायणाची ( ज्यात जाबाली आणि श्रीरामामधील संवाद असलेली)
, निर्मिती साधारण ख्रिस्तपूर्व ३ऱ्या ते 2 ऱ्या शतकात झाली आहे, असे लेखन वाचनात आले आहे माझ्या.
आपल्यामते हे वाल्मिकी रामायण कुठल्या काळी निर्मिले गेले असावे ?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 06:51
नवीन
ह्या, वाल्मिकी रामायणाची ( ज्यात जाबाली आणि श्रीरामामधील संवाद असलेली)
, निर्मिती साधारण ख्रिस्तपूर्व ३ऱ्या ते 2 ऱ्या शतकात झाली आहे, असे लेखन वाचनात आले आहे माझ्या.
आपल्यामते हे वाल्मिकी रामायण कुठल्या काळी निर्मिले गेले असावे ?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 04/09/2018 - 06:57
नवीन
साधारणतः त्याच काळात व त्यानंतर इस. पाचव्या सहाव्या शतकापर्यंत त्यात भर पडत राहिली असावी.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 07:46
नवीन
धन्यवाद,
शिवाय
बंगाल मधे सेकंड ओल्डेस्ट कॉपी ५-६ व्या शतकातील सापडली अशी बातमी आहे जुनी एका न्युज पेप्रात...
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 04/09/2018 - 10:37
नवीन
पुष्यमित्र श्रीशुंग महाराज की जय!
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 04/09/2018 - 16:09
नवीन
संत तुकाराम म्हणतात
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥
आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥
घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥
तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥
अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥
दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥
दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥
यापेक्षा त्यांच्याहुन जुने चक्रधर काय वाईट होते
चक्रधरस्वामींचे मासिक पाळीबद्दलचे आठशे वर्षांपूर्वीचे बोल:
‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’
प्लीज नोट चक्रधर स्वामी तुकारामांच्या किमान ४०० वर्षे अगोदरचे होते. ( ते एक टिपीकल आर्ग्युमेंट असते ना काळाप्रमाणे ते बरोबरच होते वगैरे ...
तर हा एक फरक म्हणून बघायला हरकत नसावी शास्त्रीय वगैरे दृष्टीकोण इ.इ.
बाकी चक्रधरांच्या मर्यादा होत्याच हे वेगळे सांगणे न लगे
असो
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 04/09/2018 - 16:23
नवीन
दादुस्, मधल्या ४०० वर्षात मुसलमानी आक्रमणामुळे बरीच सामाजिक उलथापालथ झाली होती. जिथे जिथे आक्रमणाची तीव्रता जास्त होती तिथे स्त्रियांवर जास्त बंधने येत गेली.
तसे तर महाभारत काळात स्त्रियांना अधिक स्वातंत्र्य होते आणि वैदिक काळात त्याहून जास्त होते.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sun, 04/08/2018 - 17:50
नवीन
ए कोण आहे रे तिकडे? काय चाललय ते ईश्वर ईश्वर!जी गोष्ट नाहीच आहे ती गोष्ट तुम्ही मानताच कशी? याचा अर्थ तुम्ही यडपट आहात. तुमच्या बुद्धीचा विकास अजून व्हायचा आहे. जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती मानणे हा मनोविकार आहे. शहाणे करुन सोडावे सकल जन म्हणून आमचे ते कर्तव्य आहे की तुम्हाला सत्याची जाणीव करुन देणे. एवढ आम्ही कंठशोष करुन सांगतोय की जी गोष्ट नाहीये ती मानणे तद्दन मुर्खपणा आहे तर तुम्ही ऐकतच नाही. तुम्हाला (वैचारिक) झोडपूनच काढले पाहिजे.तुम्हाला विद्वान, विचारवंत, शास्त्रज्ञ म्हणून घ्यायचा काय अधिकार आहे? ईश्वर या गोष्टीला विज्ञानात काहीही आधार नाही ती मानायची कशाला? अंधश्रद्धाळू कुठले? संकल्पना पातळीवर तरी कशाला मानायचा? उगीच अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल कपोल कल्पित संकल्पना मांडत बसून फुकट वैज्ञानिक जाणीवांचा अपमान करायचा? जे विज्ञान सिद्ध आहे तेच मानावे. जर ईश्वर विज्ञानाने सिद्ध केला तर आम्ही तो तेव्हा मानू. जी गोष्ट कदापिही शक्य नाही.अन काय हो तुमचा तो निर्गुण निराकार ईश्वर मानला काय आन न मानला काय? अन जो नाहीच आहे तो काय शिक्षा देणार?तुमची सदसदविवेकबुद्धि दिलीय ना निसर्गाने ती वापरा. कशाला देव पाहिजे? मी सदसदविवेकबुद्धीला पटत नाही म्हणून खोटे बोलणार नाही. देवाला आवडत नाही म्हणून नाही. तुम्ही देवाला आवडत नाही म्हणून खोटे बोलणार नसाल तर आम्हाला ते मान्य नाही................
तुम्हाला विज्ञानाची शपथ घेउन सांगतो कि या श्रद्धा, ईश्वर, भावना या तद्दन फालतू गोष्टी आपल्या बुद्धीला लागलेले ग्रहण आहे.ही मानसिक गुलामगिरी आहे. ही चक्क बौद्धीक दिवाळखोरी आहे.वेळीच सावध व्हा अन्यथा विनाश अटळ आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/08/2018 - 17:58
नवीन
__/\__
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 04/08/2018 - 18:04
नवीन
:)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/08/2018 - 18:54
नवीन
आपण केव्हाच पाटी बदलली आहे. घाबरु नका, देव तुमचे भले करेल. =))
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
शशिकांत ओक
Sat, 02/22/2020 - 14:56
नवीन
काय खरे आहे का? काका?
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 02/24/2020 - 07:56
नवीन
हल्ली मी कृष्णधवल द्वैतात अडकलेल्यांना जरा ग्रे एरिया दाखवतो. त्यामुळे त्यांना तसे वाटते.वरची प्रतिक्रिया अर्थातच उपहासाने लिहिली आहे. कोणतही टोक गाठणे हे संतुलित करण्यासाठी.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 04/08/2018 - 18:10
नवीन
मनोरंजक चर्चा. रोज असे धागे का येत नाहीत बरे!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 04/08/2018 - 18:46
नवीन
बाकी कै असो,
इतक्या निसटत्या बाजू लावून धरणारे मिपासहस्रार्जुन माहीतगारजी आणि त्यांचे प्रतिसाद वाचणारे लोक्स ह्यांचे जाहीर कौतुक याटिकानी करु इच्छितो.
जय हिंद जय महाराष्ट्र जय मिपा जय विकीमराठी
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/08/2018 - 18:58
नवीन
तुर्तास जय हिंद जय महाराष्ट्र जय मिपा इथे पर्यंतच !तिकडे दुसरा जय केला आहे, बाकी अनेक आभार
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/08/2018 - 18:51
नवीन
नास्तिक चळवळीबद्द्ल काही तरी लिहावे. ... नास्तिक चळवळ पुढे कशी जाईल वगैरे. बाकी, आपण सर्वांनी अतिशय शांत चित्ताने चर्चेत सहभाग नोंदवला आहे, भाषाही व्यवस्थित आहे. बाकी, चर्चा चालू ठेवा. मोबाईलवरुन अधेमधे वाचत राहीन. उद्या सायंकाळी लिहायला हजर होईनच.
मुखमस्तीति वक्तव्यं न तालुपतनात् भयम् ! जिव्हायाच्छेदनं नास्ति. अर्थात. जिभेला भोक नाही, त्यामुळे त्याला कुलुप घालण्याचे भय नाही. आणि तोंड आहे म्हणून काय हवे ते बोलायचे, लेखणी हातात आहे म्हणून काय हवे ते लिहायचे. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/08/2018 - 19:03
नवीन
सर व्यक्तीशः आदर आहे, पण पुरोआमी भूमिका तकलादू असतात बर्याचदा आपल्यालाही लागू पडणारी वाक्ये आणि पद्धती वापरण्याबद्दल साशंक आहे . इथेही "..लेखणी हातात आहे म्हणून काय हवे ते लिहायचे. " याला आस्तीकांनी नास्तीकां विरुद्धही का वापरु नये.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/08/2018 - 19:06
नवीन
ती डॉळ्यासारखी उदाहरणेही आस्तीकांनीही अनेक वेळा वापरली असावीत असे वाटते
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/08/2018 - 19:16
नवीन
आपापल्या भूमिका आपल्या प्रतिसादाबद्दल नेहमीच आदर आहे, आपण व्यक्तिगत काहीही घेऊ नका. मी कुठे काही बोललो असेल तर ते जनरल असतं. मला उगा डायरीतलं एक वाक्य इथे खरडायचं होतं आणि ते माझ्या स्वतःसाठीच बोललो. त्याचा इथल्या कोणत्याच प्रतिसादाशी संबंध नै ये हो.
>>> इथेही "..लेखणी हातात आहे म्हणून काय हवे ते लिहायचे. " याला आस्तीकांनी नास्तीकां विरुद्धही का वापरु नये.
काय वापरायचं ते वापरा. :)
झोपू का आता..... ??
पाहू का आयपीएल थोडा वेळ ?
का अजूनही नाराजच आहात ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/08/2018 - 19:46
नवीन
नाराज बिराज कै नै हो, पुरोगामी लोकांनी आपल्या भूमिकांची बांधणी कमकुवत नसलेल्या अधिक चांगल्या आधारावर करावी वाटते म्हणून विरुद्ध बाजूने ख्हरडतो. वेगळ्या पुरोगीमी मित्रासाठी आज लेख लिहिण्यासाठी आजचा वेळ राखला होता तो तुमच्या लेखाच्या प्रतिसादांसाठी खर्च केला, आयपीएल अगदी अवश्य चालू द्यात .
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Sun, 04/08/2018 - 19:36
नवीन
माहितगार साहेब, तुमचे प्रतिसाद आवडले. अजोंच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत!
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 04/08/2018 - 19:44
नवीन
अजोंशिवायच धाग्याची शंभरी भरली आहे. अजो आले की २-३ सेंच्युर्या नक्की :)
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 04/08/2018 - 19:50
नवीन
__/|__ बाकी आजचा मान तसा घाटपांडेजींचा हेच खरे !
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Mon, 04/09/2018 - 00:09
नवीन
लोकहो, आपण भारतासारख्या असहिष्णू देशात राहतो म्हणून हि आस्तिक / नास्तिक / अज्ञेयवादी इ. चर्चा तरी करता येते.
जरा शेजारी जाऊन सांगा बघू ... हॅट देव बिव (म्हणजे त्यांच्या भाषेतला) काही नसतो बर्र्र्र का...
इथे तो (त कॅपिटल) आहे कि नाही या विषयावर आपण भांडू शकतो हि त्याचीच कृपा, दुसरे काय?
रच्याकने सेंचुरी झाली वाटतं.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 04/09/2018 - 05:28
नवीन
नास्तिकता चळवळ म्हणजे भंपकपणा वाटते.
ज्याची त्याची आस्तिकता-नास्तिकता त्याने आपल्यापुरतीच जपावी. कुणाचे प्रबोधन करायला जाऊ नये किंवा कुणाला हिणवायला जाउ नये. जो तो सूज्ञ आहेच. आस्तिकता जशी ही गर्वाने मिरवावी अशी बाब नाही तसेच नास्तिकतेचेही आहे.
प्राडॉ सरांनी ह्या प्रकारचा धागा काढून मिपावरच्याच शिळ्या कढीला उत आणून मिपाचे आस्तिकनास्तिकपाव.कॉम हे नवीन रुजलेले नाव सार्थ केल्याचे पाहून आनंदमिश्रित खेद झाला.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 04/09/2018 - 05:48
नवीन
+१
खरतर आस्तिक वा नास्तिक ही केवळ सोयीसाठी केलेली विभागणी आहे. हा एक खूप मोठा स्पेक्ट्रम बँड आहे. या मनाच्या अवस्था आहेत. मेंदुतील रासायनिक बदलांमुळे आस्तिकता वा नास्तिकता यांची आक्रमकता वाढत वा कमी होत जाते. असो
हे टोकाचे नास्तिक किंवा अस्तिक ईश्वरनिंदा किंवा स्तुती याची पातळी कमी जास्त झाली की तुम्ही तिकडे शिफ्ट झालात असा आरोप करु लागतात.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/09/2018 - 06:34
नवीन
पहिल्या तीन ओळीतला प्रतिसाद चर्चेच्या अनुषंगाने आलेला आहे. नास्तिकता चळवळ आपल्याला भंपक वाटली त्याची काही कारणे सविस्तर सांगितली तर चर्चा अधिक योग्य मार्गाने जाईल. नास्तिकता काही अभिमानाची गोष्ट नाही, ती एक सजग प्रवृत्ती आहे. सांगितल्याशिवाय लोकांना पटत नाही, नास्तिक चळवळीचा प्रयत्न तसा असावा. नास्तिकता कोणाला हिणवायला जात नाही, लोकांचे आणि स्वतःचे प्रबोधनासाठी त्यांनी तो मार्ग स्वीकारला आहे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आपल्याला नाही पटलं आपणास अलिप्त राहता येते.
>>>>>>डॉ सरांनी ह्या प्रकारचा धागा काढून मिपावरच्याच शिळ्या कढीला उत आणून मिपाचे आस्तिकनास्तिकपाव.कॉम हे नवीन रुजलेले नाव सार्थ केल्याचे पाहून आनंदमिश्रित खेद झाला
आपणाकडून इतका बाळबोध वाक्याची अपेक्षा नव्हती. नास्तिक चळवळ सुरु आहे त्यांचे असे असे कार्यक्रम होतात आपल्याकडे नास्तिकतेचा एक मोठा प्रवाह आहे, त्याबद्दल धागा होता. यापूर्वी अशा चळवळीवर धागा आला असेल तर तो माझ्या पाहण्यात नाही. राहीलं मिपावरील शिळ्या कढीच्या गोष्टी त्या आपण सोडून द्या. मिपाने अनेक विषय अनेकदा चघळले आहेत. कधी विडंबनेच आली, कधी स्त्रीया विरुद्ध पुरुष असे विषय, कधी नुसत्या कविता, कधी कोनाडे तर कधी.. असो. अशा विषयांची लाट मिपावर राहीली आहे, तेव्हा आपण मिपाला मिपाके हालपर छोड दो, मिपाला बदलण्याचा प्रयत्न करु नका असा एक सल्ला देईन. आणि चार लोक विचार पटला नाही तरी, प्रतिसादाला उत्तम म्हणतील असे लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा, निश्चित आपला अभ्यास पाहता आपल्याला जमेल असे वाटते. वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 04/09/2018 - 07:32
नवीन
नास्तिकता चळवळ आपल्याला भंपक वाटली त्याची काही कारणे सविस्तर सांगितली तर चर्चा अधिक योग्य मार्गाने जाईल
गळ्यात पुठ्ठ्याचे बोर्ड बांधून आम्ही नाशिककर आम्ही नास्तिक असे म्हणत रामकुंडाच्या पार्श्वभूमीवर मिरवणे हे मुद्दामून श्रद्वावंतांना खिजवण्यासारखे वाटते. एकीकडे ते म्हणतात आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही आणि त्याच वेळी गळ्यात बोर्ड बांधून मिरवतात हे पंथ करण्यासारखे वाटत नाही का?
राहीलं मिपावरील शिळ्या कढीच्या गोष्टी त्या आपण सोडून द्या. मिपाने अनेक विषय अनेकदा चघळले आहेत
म्हणून तेच ते विषय परत चघळण्यात गंमत नाही, होतं काय आस्तिक नास्तिक असं काही लिहिल्या गेलं की आस्तिकांच्या झुंडी नास्तिकांच्या अंगावर धावून येतात (नास्तिक लोक संख्येने मिपावर खूप कमी आहेत म्हणून तसं लिहिलं), निसटत्या बाजू मांडणार्यांना देखील आवेश येतो मग चांगले धागे उगा मागे पडून चर्चेची पातळी गढूळ होत जाते, ह्या धाग्यावर अजून तसं झालं नाही कदाचित काही आयडी अजूनही येथे न आल्यामुळेही असं झालं असावं.
चार लोक विचार पटला नाही तरी, प्रतिसादाला उत्तम म्हणतील असे लिहिण्याचा प्रयत्न नक्की करा, निश्चित आपला अभ्यास पाहता आपल्याला जमेल असे वाटते. वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा.
=)) धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 04/09/2018 - 08:38
नवीन
बाडिस..
आस्तिक नास्तिक पाव ® स्पा.
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 04/09/2018 - 09:21
नवीन
श्री. रा. रा. प्रचेतस यांच्या प्रतिसादाला संपूर्ण अनुमोदन.
डीबीसर. नंतर सेटलमेंट करायला बसूयात.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 04/09/2018 - 07:25
नवीन
नास्तिक चळवळीला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा..!!
============
गेले ४० वर्षे आमच्या घरी श्रीमद भागवत अखंड हरिनाम सप्ताह अविरतपणे चालू आहे. अकोटचे (जि. अकोला) भागवताचार्य यांच्याकडे व्यासपीठ आहे. ते वेद पुराण, श्रुती, भगवत गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, संत कबीर आणि इतर वारकरी संतांचे साहित्य/वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत. असे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नामांकित कीर्तनकारचे मत असायचे. ते जाहीर कीर्तनात (आणि खासगीत देखील) त्यांचे कौतुक करायचे.
एवढेच नाहीतर त्यांनी भूत पिशाच्च , काला जादू, तंत्र मंत्र विद्या, जारण तारण ग्रंथांचा पण विशेष अभ्यास केला आहे असे ते सांगत.
मी या महाराजांना लहापानापासून आदर्श मानले आहे. त्यांच्या काही सल्ल्याना देखील आत्मसात केले आहे. असो.
त्यांना मी २-३ वर्षांपूर्वी एक बाळसुबोध प्रश्न विचारला होता, " महाराज, मेल्यानंतर नक्की काय असते? खरंच आपल्या पाप पुण्यामुळे स्वर्ग नरक मिळतो का ? ८४ लक्ष योनी आणि पुनर्जन्म खरंच असतो का?"
महाराजांचे उत्तर कोणते ही आढेवेढे न घेता थेट होते "असे काही नसते. मेले कि संपलं. त्यामुळे पाप पुण्याचे स्वर्ग नरकाचे पुनर्जन्माचे जास्त विचार करणे सोडून चांगले आयुष्य जाण्याचा प्रयत्न कर."
मी म्हंटले, " तुम्ही तर कीर्तनात लोकांना हेच सांगत असता तुकाराम महाराजांच्या अभंगाचे दाखले देत."
ते: " तुकाराम महारांजांकडे येणारे साधक पुराणातील प्रश्न घेऊन येत. तुकाराम महाराज त्याची उत्तरे पौराणिक वाङ्मयाचे दाखले देऊन अभंगाच्या स्वरूपात देत असत. ते दाखले तुकाराम महाराजांना पटलेलीच होती असे होते नाही. त्यात तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा बराच भाग इंद्रायणीत बुडालेला आहे. आम्ही जे समाजाला सांगत असतो ते यासाठी की लोकांना थोडी तरी भीती असावी जेणे करून ते समाजात वावरताना नीट वागतील."
त्या दिवसापासून माझी पूजा अर्चा खूप कमी पडत गेली. आता तर जवळपास ना च्या बरोबर आहे पण त्याने काही माझे विशेष वाटोळे झालेले दिसले नाही. (इनफॅक्ट व्यावहारिक बऱ्याच गोष्टीत मला चांगला फायदा झाला आहे)
आमच्या वयक्तिक मंदिरातील पांडुरंगाची मूर्ती मला खूप आवडते. रोज जाता जाता बाहेरूनच पाया पडत असतो. प्रसन्न वाटते.
कीर्तनातील "रामकृष्ण हरी " चालू होतानाचे मृदंगाची थाप ऐकली की झिंग चढते, ती नेमकी काय आहे हे माहित नाही. माझ्यासाठी तरी तोच देव आहे.
देवाला (माझ्या मते मंदिरातील मूर्तीला) काही मागायचे नाही ही वारकरी संप्रदायाची आणि आमच्या घराण्याची रीत आहे त्यामुळे तर इतर कर्मकांड करण्याच्या जास्त कोणी फंदात पडत नाही. याने परिस्थितीच्या चढउतारा व्यतिरिक्त विशेष काही वाटोळे झालेले मलातरी अद्याप निदर्शनात आले नाही. .
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 08:44
नवीन
विशुमितजी
आचार्य व तुम्ही, यान्चा एका विशिष्ठ धर्म आल्याने तुम्ही असं बोलू शकता,
, तुम्ही जर दुसऱ्या विशिष्ठ धर्मातुन असते तर तुम्ही गपगुमान बसला असता...
-
फ्रीभुर्जी
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 04/09/2018 - 09:17
नवीन
याचा एक किस्सा सांगतो...
माझी एक चुलत बहीण आणि भाऊजी सनातनचे आद्य साधक आहेत. संपूर्ण कुटुंबच म्हणा.
मध्यंतरी पंढरपूर मधील बडवे -उत्पात पुजार्यांचे अधिकार कमी करून परीक्षा घेऊन जातविरहित नवीन पुजाऱ्यांच्या निवडी झाल्या आणि त्यानुसार पांडुरंगाची पूजा अर्चा चालू झाली.
माझ्या भाउजीनी त्यावर आक्षेप घेत हे म्हंटले होते की पांडुरंगाची पूजा ब्राह्मणाकरवीच झाली पाहिजे. इतर जातीतील लोकांनी पूजा केल्याने मूर्तीचे पावित्र्य नष्ट होईल. मंत्रोउच्चर चे एक कारण सांगितले गेले.
मी याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या काकू काका आणि बहनीने मला डोळे दाखवले.
बहिणीला त्रास नको म्हणून, तुम्ही म्हणता तसे मी गपगुमान ऐकून घेतले.
====
वरच्या लेवल ला सनातनचे विचार उच्च प्रतीचे असू शकतात पण ते खाली पर्यंत झिरपताना वेगळेच काहीतरी घेऊन येतात. आणि कथित पुरोगाम्यांना सगळेच बिथरले हिंदुत्व दिसते. म्हणून स्वधर्माची विशेष काळजी वाटते.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 04/09/2018 - 09:44
नवीन
याच्याशी लै वेळा सहमत! एका धाग्यावर हेच सांगायचं प्रयत्न चालला होता. ठराविक स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या पलीकडे कायतर आहे हे समजून घ्यायचा साधा प्रयत्न पण दिसत नाही. म्हणौन खेदाने म्हणावेसे वाटते, कि पूर्वग्रहाने धर्माला बडवण्याचे काम करणारे नक्कीच दांभिक असतात.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 09:50
नवीन
.
फक्त "कुठल्या-धर्माला " बडवायचे, यावरून दांभिकतेच्या व्याख्या बदलतात.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 04/09/2018 - 10:18
नवीन
इथेच तर दांभिकतेचा जन्म आहे.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 04/09/2018 - 10:24
नवीन
तेच तर म्हणतोय ,
"अमुक धर्माला बडवले तर ते असते राष्ट्रप्रेम "
तर
तमुक धर्माला बडवले तर ते असते राष्ट्रद्वेष
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Mon, 04/09/2018 - 10:33
नवीन
अरे क्या दिन आया है. प्रा. दिलिपजींनी चक्क विशुमित, गजोधर नि बिटाकाका यांचेत सहमती घडवून आणली. आता मंगूच उरलाय शिक्कामोर्तब करायचा.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Mon, 04/09/2018 - 10:43
नवीन
हैला, मज्जाच आहे. कळतंय पण वळत नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »