Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नास्तिक चळवळ : काळाची गरज ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/08/2018 - 06:38
🗣 336 प्रतिसाद
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अ‍ॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात. मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्‍या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्‍या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्‍या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात. नास्तिक चळवळ मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे. (मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )

प्रतिक्रिया द्या
132255 वाचन

💬 प्रतिसाद (336)
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 12:06 नवीन
नास्तिक कुणालाच नको असतात”
नास्तिक कुणालाच नको असतात” हे वाक्य "वाद करणारे कुणालाच नको असतात" असे हवे आहे का कारण वाद करणारे आस्तीक नास्तिकांना नको असतात , आपण एकट्याने वाद केला कि थकायला होत नाही समोरची बाजूही वादाला आली की थकायला होते असे तर काही नाही ना ? नास्तिक कुणालाच नको असतात” हे वाक्य सरसकटी करणाचे म्हणून फसवे आहे. स्वामी विवेकानंदांसारखी नास्तीकांना सांभाळून घेणारी उदाहरणे आहेत , अगदी संघचालकांचे अशातले वाक्य आहे आम्ही कट्टर आहोत पण उदार असण्याबद्दल कट्टर आहोत. वस्तुतः भारतीय संस्कृती नास्तीकांसाठी बरीच उदार आहे. नास्तीक स्त्रीयांची अधिक पंचाईत होते तरी आस्तीक कुटूंबीय नास्तीक सुनांना सांभाळून घेत असल्याची नव्हे काही कारणाने घटस्फोट होऊन मुलगा आणि सूनेचे नवे विवाह झाले तरी आधीच्या सूनेचा मान कायम ठेवल्या गेल्याची विनोदी उदाहरणेही याच देशात पहावयास मिळतात. सार्वजनिक ठिकाणी नास्तीक होणे आणि भारतीय कुटूंबात स्त्रीला नास्तीकता राखणे कठीण असते. भारतीय पुरुषांना कौटूंबीक व्यक्तीगत स्तरावर नास्तीक असणे जरासे सोपे आहे. ( विभक्त कुटूंबातील मुस्लीम स्त्रीस जाहीर न करता व्यक्तीगत स्तरावर नास्तीक होणे हिंदू स्त्री पेक्षा बरेच सोपे असावे पण जाहीर पणे नास्तीकता मुस्लीमस्त्रीस अगदी प्राणघातक सिद्ध होऊ शकते हिंदू स्त्रीस फारफारत काडीमोड घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची तयारी लागेल एवड्।एच ) पण एनीवे ज्यांना आदर , प्रेरणा, विश्वास, श्रद्धा या सर्व बाबी समजतात त्यांना व्यक्तिगत स्तरावर नास्तीकता टिकवणे सहसा कठीण जाण्याचे कारण नव्हे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 12:23 नवीन
मूळ बातमीत खालील वाक्य आहे.
ती कॉन्व्हेंटमध्ये होती. तिथे .... धर्माचा पगडा जास्त. तिच्या वर्गातल्या मुलांनी तिला फार घाबरवलं होत..... "तिच्या घरात देव मानणारं कोणी नव्हतं, तिची आई (म्हणजे मी) कधी पूजा करणाऱ्यातली किंवा देवाला हात जोडणाऱ्यातली नव्हती, मग तिने का देव मानावा? पण तिच्या बरोबरीच्या सात-आठ वर्षांच्या मुलांना हे मान्य होणारं नव्हतं." देव न मानणं हे किती मोठ पाप आहे हे ती मुलं माझ्या मुलीला ठसवून सांगत होती आणि माझी मुलगी एकटी पडली होती. तिला कोणी समजून घेतलं नाही. अगदी शिक्षकांनीही नाही."
१) बहुसंख्य नास्तीक असलेल्या मुलात एखादे आस्तीक मूल गेले तर विरुद्ध दिशेने अशीच स्थिती होणार नाही का ? मुलांनी कुंकू का लावले ? मेंदी का काढली ? , छूम छूम का घातले ? म्हणून शिक्षा करणार्‍याही शाळा मुलांच्या मनावर आघातच करत असतात. पालकांनी नास्तीक असणे ठिक आहे . आस्तीकांचा सेन्स बद्दल प्रश्न विचारणार्‍यां नास्तीक पालकांनी कॉमन सेन्स शिल्लक न ठेवणे हे समजणे जरा आवघड जाते. बोलून चालून धार्मीक शाळेत घालायचे आणि शिक्षकांकडून अवास्तव अपेक्षा बाळगणे तसेही चूक आहे. पण इन एनी केस आपल्या विचाराचे नसलेले आपल्या आसपास अनेक जण असतात अशी वेळ धार्मीक बाबतीतच नव्हे अधार्मीक बाबतीत सुद्धा येऊ शकते. खासकरून आपण बहुसंख्य समाजापेक्षा वेगळे वागत असू तर मुलांच्या मनाची आधी पासून तयारी करुन घेणे शिक्षकांशी अ‍ॅडव्हान्समध्ये संवाद साधून ठेवणे हे गरजेचे असावे त्याची काळजी या बातमीतील विशीष्ट पालकानी कितपत घेतली होती याची शंका वाटते. २)
देव मानणं हे किती मोठी चूक आहे हे ती नास्तीक माझ्या आस्तीक स्नेह्याला ठसवून सांगत होते आणि माझा आस्तीक स्नेही एकटा एकटी पडला होता. त्याला कोणी समजून घेतलं नाही. त्याच्या बुद्धीला आस्तीकता प्रमाण वाटत असूनही अगदी बुद्धीप्रामाण्यवाद्याम्नी सुद्धा नाही."
आस्तीक नास्तीकांवर का आक्षेप घेऊ शकतात हे समजण्यास हे कदाचित अल्पसे साहाय्यभूत ठरावे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/08/2018 - 12:56 नवीन
नास्तिक चळवळ आणि त्यांच्या भविष्यातील वाटांबद्दलही थोडं अधिक लिहा प्लीज. म्हणजे चर्चा मूळ वाटेवर येईल.;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 13:29 नवीन
:) ठिके सर, पण नास्तीक मंडळींनी हाच मोकळेपणा जरासा आस्तीकांबद्दलही दाखवावयास हरकत नसावी . पण एनी वे . नास्तीकांनी एकत्र यावे आधारगट निर्माण करावा ते ठिक आहे पण उत्सवात असो अथवा व्यासपिठांवर असो एकटे रहावे असे व्यक्तीशः वाटत नाही. आस्तीक आणि नास्तीक दोघेही समाजाचे घटक आहेत त्यांना सन्मानाने स्वतःच्या विचारांनी जगता येण्यास हरकत नसावी. केवळ आमचेच खरे हा अट्टाहास नसावा. आकाशवाणिवर सकाळी भावगीते वाजवली जात त्या काळातला आस्तीक कुठे शोधीसी रामेश्वर , देव दगडात नाही रे ते पंढरीच्या विठू राया अशा दोन्ही गाण्यात एका मागो माग रंगून जात असत हे आठवते. कुठे शोधीसी रामेश्वर , देव दगडात नाही रे हृदयातला भगवंत राहीला उपाशी लिहिणारी मंडळी, किंवा महादेवाच्या पिंडी आधी घरातल्या जच्चा बच्चांना दूध पाजण्यास सांगणारी खूलभर दुधाची कहाणी आस्तीक ऐकत आणि समजतही असत. वेगवेगळ्या भूमिका रंगवत भातुकलीचा खेळ खेळणार्‍या लहानग्यात आणि कर्मकांडात रमलेल्यात फारसा फरक नसावा. भातुकलीच्या खेळामधली नवरा नवरी खोटी आहेत तरी तेवढ्या क्षणापुरते रमून मुले जशी बाहेर पडतात तसे बर्‍याच अंशी आस्तीकही बाहेर पडत असतात. काही अडचणी रहातात नाही असे नाही पण स्टीरीओ टायपींग करुन एकमेकांना वेगळे पाडण्याचा आणि पडण्याचा खेळ दोन्ही बाजूने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हननास कारणीभूत होऊ शकतो तो टाळला पाहीजे म्हणजे आधारगट बनवताना पंथ बनवण्याची भानगड जी आहे ती कदाचित मागे लागणार नाही आणि किमानपक्षी व्यक्तीगत जिवनात कडवटपणा न आणता एक नास्तीक म्हणून आनंदाने जगता येऊ शकेल. नास्तीकांच्या आधार गटातही आधार देऊ इच्छित आस्तीकांना त्यांना एकटे वाटणार नाही अशा पद्धतीने सामावून घेण्यास हरकत नसावी. सार्वजनिक जिवनात नाही पण व्यक्तिगत जिवनातल्या नास्तीकतेबाबत समाज सर्वसाधारण पणे अलिप्त धोरण बाळगतो. कुटूंबीय सहसा समजून घेत असतात . सार्वजनिक जिवनातही नास्तीकता हद्दीच्या बाहेर पूश केली नाहीतर भारतात तुम्हाला पंतप्रधान झालेली उदाहरणेही पहाण्यास मिळतील. सार्वजनिक जिवनातही नास्तीकता सोशल मार्केटींग टेक्नीक एवजी र्‍हेटॉरीक वापरुन पूश करणार्‍यांना मात्र अधिक आधाराची म्हणण्यापेक्षा मानसिक तणावातून वाचण्यासाठी वेळोवेळी बाब्रेपिकनक करुन रिलॅक्स होण्याची ब्रेक घेण्याची गरज असू शकते. असे वाटते असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गवि Sun, 04/08/2018 - 16:51 नवीन
निसटत्या बाजू निसटू द्या.
डीबी सर, या एका सूचना कम वाक्यासाठी तुम्हाला आर. सी. ताकाचा थंड ग्लास लागू आमच्याकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 17:12 नवीन
निसटत्या बाजू वैचारीक लोकांनी नाही दाखवल्या इतरांच्या हातात चर्चा जाऊन हाती जे लागते ते प्रत्येक वेळी लोणी नसते. निसतत्या बाजू दोन्हीकडे असतात याचे नास्तीकांना भान कितीही ताक पाजवूनही येईल का याची शंकाच वाटते . या वाटा आधीच निसरड्या आहेत, ताकाची देवाण घेवाण न सांडता केली म्हणजे थंडक मिळते. नाहीतर लोण्यावरुन पाय घसरुन ताकाच्या भांडी खणखणायला वेळ तसा मुळी लागत नाही. सरांच्या विनंतीचा मान ठेवला विषय बदलला पण नास्तिक गटाने पुन्हा विषय काढले तसे निसटत्या बाजूंचे प्रदर्शनही पुन्हा आपसूक सुरु झाले. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Sun, 04/08/2018 - 17:24 नवीन
अहो, गळलेले मुद्दे दाखवणं बरोबरच आहे हो. पण तुम्ही सम्यक मध्यम भाषेत बसवून ते सांगताना इतकं कॉम्प्लिकेटेड होतं की आपण कुठून सुरु केलं त्याचा ट्रैक सामान्य मेंदू ठेवू शकत नाही. किती लोक सहमत होतील ते माहीत नाही पण माझा मेंदू तरी निसटत्या बाजू सीरीज वाचताना भंजाळून जातो. हाच इफेक्ट चर्चा प्रस्ताव वाचतानाही येतो. विषय रोचक , म्हणून वाचायचं तर असतं, पण अहो, मुद्देसूद मांडणी याचा अर्थ मुद्देसरोवर, मुद्देसागरात बुडून वाचक गटांगळ्या खाऊ लागावा असा होत नाही. हायकोर्ट वकील किंवा न्यायाधीश यांच्याइतकी मुद्देतपशीलवाचनशक्ति सामान्य माणसाला नसू शकते किंवा कसे? ;-) असा अर्थ होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 17:32 नवीन
बारकाव्यांमध्ये राक्षस असतो अशी म्हण आहे. माझे काम मला जमणारी मांडणी करणे आहे. आपण जमेल त्या शैलीत अभिव्यक्त व्हावे सोपे करुन घेणे समोरच्यांचे काम आहे. जेव्हा मनाला विचार पटत असतात तेव्हा लोक क्लिष्टही सोपे करुन घेतात आणि इतरांपर्यंतही गरजेनुसार अधिक सोपे करुन पोहोचवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Sun, 04/08/2018 - 17:43 नवीन
आपण जमेल त्या शैलीत अभिव्यक्त व्हावे सोपे करुन घेणे समोरच्यांचे काम आहे.
निसटती बाजू. यात समोरच्याला गृहीत धरण्याचा धोका संभवतो किंवा कसे? इतकेच नव्हे तर अशा एकतर्फी समजुतीमुळे अनेक समोरचे हे इच्छित समजून घेणाऱ्या गटाच्या परीघातून नकळत बाहेर फेकले जाणे ही शक्यता कदाचित नोंदवलीसुद्धा न जाणे यात काही तात्विक जोखीम असू शकेल असे महटल्यास ते सुस्थानी ठरेल किंवा कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 17:54 नवीन
...इतकेच नव्हे तर अशा एकतर्फी समजुतीमुळे अनेक समोरचे हे इच्छित समजून घेणाऱ्या गटाच्या परीघातून नकळत बाहेर फेकले जाणे ही शक्यता कदाचित नोंदवलीसुद्धा न जाणे यात काही तात्विक जोखीम असू शकेल असे महटल्यास ते सुस्थानी ठरेल किंवा कसे?
गृहीत धरण्याचा प्रश्न कुठे येतो. ज्या क्षणी समजणे अवघड जाते लोक वाचन थांबवत असतील फारतर मनात चीड चीड करतील पण माझ्या शैलीच्या मर्यादा आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्य याचा त्यांनी आदर करावा जमेल मिळेल तेवढे घ्यावे अथवा कुणीतरी काहीतरी बरळत असेल असा विचार करुन सोडून द्यावे. यात माझी जोखीम काहीच नाही , काही असेल तर जे समजून घेण्यात कमी पडतील त्यांची असली तर असेल. जगातल्या प्रत्येक परिस्थितीला मर्यादा असतात. आपण मर्यादीत क्षमतेची माणसे असतो. आपल्याला जसे घडेल तसे करावे . माझ्या लेखनात काहीच घेण्यासारखे वाटत नाही तेव्हा लोक फाट्यावर मारतात त्यांना त्यांचे स्वातंत्र्य आहे. मला माझ्या पद्धतीने व्यक्त होण्याचे आणि आपल्याला अशी मनमोकळी टिका करण्याचे आणि असेच उत्तर देण्याचे मला स्वातंत्र्य आहे. तेव्हा आपण सर्वजण आपापल्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
असंका Mon, 04/09/2018 - 07:26 नवीन
सुरेख मांडलंत! धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
र
राही Mon, 04/09/2018 - 13:37 नवीन
आपल्या प्रतिसादाशी सहमत आहे याविषयी साशंकता नसावी असे वाटावे किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
पुंबा Tue, 04/10/2018 - 07:20 नवीन
राहीतै, आपल्या प्रतिसादातून व्यक्त झालेल्या मतांशी सहमत नसण्याचे काहीच कारण वा प्रत्यवाय दिसत नसतानासुद्धा अधिक काळजी घेऊन मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी असे मत व्यकत करणे अधिक योग्य राहिल किंवा नाही तरी निदान असहमती व सहमतीच्या सीमेव्वर असणार्‍यांना पर्याय उपलब्ध होऊन नीट सारांश निघू शकतो हे पहाणे योग्य होईल किंवा नाही याचा निर्णय प्रत्येकाने घ्यावा असे सुचवले तर ते वावगे ठरणार नाही अश्या निष्कर्षाप्रत येणे अधिक श्रेयस्कर असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/08/2018 - 19:04 नवीन
>>> डीबी सर, या एका सूचना कम वाक्यासाठी तुम्हाला आर. सी. ताकाचा थंड ग्लास लागू आमच्याकडून. भागवताची कथा सांगतांना एकही इंग्रजी शब्द येता कामा नये असा एक अलिखित नियम आहे, त्यामुळे भागवत बाटल्या जायचं. आज तुम्ही ''आर. सी.'' इंग्रजी शब्द वापरुन चक्क मला बाटवलं आहे, मी आपल्या ''आरसी'' धोरणाचा निषेध व्यक्त करुन ''ब्लाइंडर'' वरच उपवास सोडेन अशा आशावादावर आपले आभार मानतो. ';) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
र
राही Mon, 04/09/2018 - 13:23 नवीन
आमच्याकडून फक्त जोरदार टाळ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 13:04 नवीन
मूळ वृत्तपत्रीय लेखातील
...त्याला उगाच, 'ते काहीही असो, पण जगात एक शक्ती असतेच जी सगळं नियंत्रित करते', अशी तर्कशून्य शेपूट कोणी जोडत नाही.
हे वाक्य नास्तीक भूमिका तर्कशुद्ध असतात आणि आस्तीक भूमिका तर्कशुद्ध असूच शकत नाहीत असे स्व -प्रमाणपत्र देते
....आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही ही आस्तिक माणस निरर्थक वाद वाढवतात.
प्रस्थापित भूमिकेत आस्तीक असतील तर, वाद वाढवणारे प्रस्थापित विरोधी ठरतील प्रस्थापीत नव्हे . आणि म्हणून वादाची आणि जर काही तथाकथित मानसिक थकवा आला तर त्याची जबाबदारी नास्तीकांनाही शेअर करावी लागते.
...अरे म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही,"
हे असे नास्तिकांकडूनही होऊ शकते . त्याचा नास्तिक अथवा आस्तीक असण्याशी संबंध असलाच पाहीजे असे नाही. जगात मानव निसर्गतः केवळ रॅशनल विचारांवर जगला असता तर मानवी विकासास एवढी हजारो वर्षे खर्ची घालावी लागली नसती. माणसांना देवाचा शोध लागण्याच्या आधीची माणसे अधिक रॅशनल होती अथवा देव हकल्याने बहुसंख्य मानव आपोआप अधिक रॅशनल होईल असे नसावे. देव नाही म्हटले तरी त्याचे इरॅशनलपण इतर बाबतीत मानव दाखवतच राहील . मुद्द्याची गोष्ट ही की उपरोकत वाक्य हे नास्तीकांनी आस्तीकांचे अनावश्यक केलेले स्टीरीओटायपींग आहे एवढेच.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/08/2018 - 13:21 नवीन
नास्तिकता चळवळ करा किंवा जनआंदोलन करा किंवा सौदी अरेबिया/मालदीव सारखे एक धर्म सोडून इतर धर्मपालनावर बंदी आणा किंवा रशिया/चीन सारखे नास्तिकता सक्तीची करा, आस्तिकता कधीही नष्ट होणार नाही व नास्तिकता कधीही विजयी होणार नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/08/2018 - 18:35 नवीन
आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे. हजारो वर्षापासून आस्तिक लोक खोट्या समजूतीला जागत आले. कधीही कोणत्या धर्माशास्त्रात्रील देव कोणाला दिसला नाही, फाफट पसार्‍याच्या अनाकलनीय रुढी निर्माण झाल्या. कोणत्याही देवाला जगातली विषमता, दु:खे दिसली नाहीत. देवाला बोलायला जावे तर आबा तोबा करुन घेणारी विसाव्या शतकातली मंडळी बघितली की हसायला येतं आणि म्हणे नास्तिकता कधी विजयी होणार नाही. नास्तिका जिंकलीच आहे, धाडस कोणात नाही. भिती वाटते. नको देवाची कटकट कोण मागे लावून घेईल. नाय का ? नास्तिक लोकांनी आपली एक चळवळ सुरु केली आहे. देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते. कोणत्याही सक्तीशिवाय त्यांनी आपल्या सुखाचा मार्ग शोधला आहे. जीव, आत्मे, शरीर, इंद्रिये, महाभुते, असंख्य योन्यांचा प्रवास, असल्या पाखंडाला लाथाडून ईश्वर- बिश्वर निव्वळ थापेबाजी आहे, हे त्यांना समजू लागलं आहे. आपण फार फार तर आम्ही नाय बॉ येणार तुमच्या चळवळी- बिलवळीत इतकं बोलून मोकळं व्हावं. प्रवचन किर्तनाची सवय असलेल्यांना एक उदाहरण सांगतो, तसं काही सांगितल्या शिवाय त्यांचे डोळे उघडत नाही. एका स्त्रीला तीन मुलं होती. तीनही मुले आंधळी होती आणि स्त्री देखील आंधळी होती. त्या स्त्रीला चौथा मुलगा झाला त्याला चांगले डोळे होते. तो मुलगा आईला सांगायचा निसर्ग कसा हिरवा आहे. पाने फुले फळे त्याची वर्णने करायचा. त्यावेळी त्याच्या आईला वाटायचं की आपल्या या चौथ्या मुलातच काही विकृती आली आहे. माझ्यासह माझ्या तीनही मुलांना असं काही वेगळं कधी दिसलं नाही, या चौथ्या मुलालाच वेगळं कसं दिसतं. आईने विचारलं की हे सर्व कशामुळे दिसते ? मुलगा म्हणाला डोळ्यामुळे. झालं आपल्या मुलात काहीतरी विकृती आहे असे समजून त्या सर्वांनी त्याचे डोळे काढून टाकले. आस्तिकांनो, नास्तिक लोकांना जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आहे, ती आपण जपली पाहिजे. त्यांना सोबत केली पाहिजे त्यांचे डोळे काढू नये असे वाटते. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 18:56 नवीन
पुन्हा एकदा सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी आणि कमकुवत आधार. तिथे धागा लेखाची सुरवातच "नास्तिक कुणालाच नको असतात” लेखाच्या दुव्याने झाली आहे . आधार गटाची स्थापना करावी लागतीए ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
श्रीगुरुजी Sun, 04/08/2018 - 19:20 नवीन
आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे. जाऊ द्या हो, तुम्ही त्या बावळट आस्तिक लोकांकडे दुर्लक्ष करा आणि विजयोत्सव (सॉरी, उत्सव म्हणालो. विजयानंद म्हणणं योग्य ठरेल) साजरा करा. आस्तिकांचा पराभव व नास्तिकांचा विजय फार पूर्वीच झालेला असताना पुन्हा पुन्हा असले लेख खरडणे म्हणजे सामना डावाने जिंकल्यावर सुद्धा विजयी संघाने मैदान न सोडता खेळत बसण्याचा हट्ट धरण्यासारखं आहे़. आस्तिक श्रद्धासमर्थनाचे लेख क्वचितच टाकताना दिसतात, पण फार पूर्वाच निर्विवाद विजयी झालेले नास्तिक असले लेख वारंवार का टाकतात खुदा जाने. नास्तिक लोकांनी आपली एक चळवळ सुरु केली आहे. देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते. थोडा सुधारणा सुचवतो. "फक्त एका विशिष्ट धर्मातीत देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते." हे वाक्य परीपूर्ण ठरेल. कोणत्याही सक्तीशिवाय आस्तिकांनी देखील आपल्या सुखाचा मार्ग शोधला आहे. जीव, आत्मे, शरीर, इंद्रिये, महाभुते, असंख्य योन्यांचा प्रवास, असल्या पाखंडाला लाथाडून ईश्वर- बिश्वर निव्वळ थापेबाजी आहे, हे त्यांना समजू लागलं आहे. हे आता इतक्या उशीरा समजायला लागलं? त्यांचा विजय फार पूर्वीच झाला होता ना? असो. आपल्या भ्रमात आनंदात रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रसाद गोडबोले Sun, 04/08/2018 - 20:24 नवीन
आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे.
ह्या विधानाला संदर्भ हवा ! रादर हे विधान धाधांत असत्य आहे , अनैतिहासिक आहे ! कारण श्रीमदाद्यशंकराचार्यांनी ७ व्या शतकात संपुर्ण भारतभर फिरुन नास्तिकमतांचे विशेषकरुन बौध्दमताचे खंडन केले आणि अद्वैतमताची निर्विवादता सिध्द केली, हे सारे पुराव्याने शाबित करता येते ! कुमारिल भट्टांनी त्या आधी बौध्दांचे च तर्क वापरुन बौध्दमताचे खंडन केले होते ! हेही इतिहासिक साहित्य वापरुन सिध्द करता येते ! असे असताना जाणिवपुर्वक हे "आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे" असले धाधांत असत्य विधानकरणे हा असंमंजस*, अज्ञानमुलक * वाटते . तळटीप : * : दोन्ही शब्दांचा कॉपीराईट यनावाला कडे आहे तरीही आमचा उत्तरदायित्वास नकार . ख्या ख्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
श्रीगुरुजी Sun, 04/08/2018 - 20:30 नवीन
>>>> ह्या विधानाला संदर्भ हवा ! रादर हे विधान धाधांत असत्य आहे , अनैतिहासिक आहे ! ते भ्रमात वावरताहेत हे अजून समजलं नाही? ते एकीकडे म्हणतात की आस्तिकांचा फार पूर्वीच पराभव झालाय (म्हणजे नास्तिकांचा विजय झालाय) आणि दुसरीकडे नास्तिक चळवळ उभी करायला बघताहेत. राहू दे त्यांना त्यांच्या भ्रमात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/09/2018 - 20:17 नवीन
ते भ्रमात वावरताहेत हे अजून समजलं नाही?
>>> ह्म्म. मी सरांना एकदा भेटलो आहे , शिवाय आमच्या मित्रमंडळात सरांविषयी सर्वांणाच आदर आहे म्हणुन इथे थोडासा बेनिफिट ऑफ डाऊट देवुन पहात आहे . कदाचित सरांनी नास्तिकमतखंडन वाचले नसावे. म्हणुन सर कदाचित असे विधान करत असावेत. तसेही नास्तिकमत खंडन हा विषय अतिषय जुना आणि समजाय्ला अवघड आहे . तसेच त्यावरील साहित्य सहज रित्या उपल्ब्ध्द नाही. म्हणुन सरांना थोडा बेनिफिट ऑफ डाऊट देवुयात , सर प्राध्यापक आहेत ते अभ्यासकरुनच मत मांडतील अन ते यनावाला सारखे अज्ञान आणि अर्धवट वाचनातुन बनवलेल्या मतांवरुन द्वेषमुलक लिखाण करण करणार नाहीत अशी आमची गाढ श्रध्दा अहे ! ( नास्तिकमत खंडन : https://archive.org/details/in.ernet.dli.2015.404767 पान क्रमांक २६७ ते २७६ )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
A
arunjoshi123 Mon, 04/09/2018 - 10:21 नवीन
देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते.
देव नाकारणे ही भूमिका घ्यायला एक प्रचंड पातळीची निर्बुद्धता लागते. न भूतो न भविष्यति अशी मूर्खता असल्याशिवाय मनुष्य देव नाकारू शकत नाही. ------------------------------- सर्वसाधारणपणे प्रचंड निर्बुद्ध भूमिका घ्यायला धाडस लागतेच. -------------------------------------- अगदी भौतिकशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं निर्बुद्धता हिच नास्तिकता आहे. ================================================================= वरील विधाने हेत्वारोप, वा आरोप, इ स्वरुपाची नाहीत. ते तांत्रिक निष्कर्ष आहेत. आय रिपिट, दे आर सायंटिफीक स्टेटमेंट्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सांरा Sun, 04/08/2018 - 14:43 नवीन
कुठल्याही समाजात नास्तिक म्हणून राहण्यापेक्षा हिंदू समाजात नास्तिक म्हणून राहणे सोपे आणि सुरक्षित आहे. इतकंच नाही तर त्याच समाजाला ढीगभर शिव्या देता येतात, कुजका मेंदू म्हणून चिडवता येते तेही परिणामांच्या चिंत्याशिवाय. इतर समाजांत 'मी नास्तिक' नंतर 'आहे' म्हणण्याचा सुद्धा अवकाश देत नाहीत. पाश्चिमात्य देशांची गोष्ट कराल तर ते पण आत्ता आत्ताच tolerant झाले आहेत. शंभर वर्षांपूर्वी ही तिथे हीच स्थिती होती. उलट आपल्या येथे चार्वाकीय तत्वज्ञानाला ही स्वीकारले गेले. पण gratitude नावाची गोष्टच नाही आपल्यात.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sun, 04/08/2018 - 19:02 नवीन
हे खरं आहे, भारतातील नास्तिक भितरेच आहेत या सारखं काहीतरी तस्लिमा नसरीन जी म्हणाल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांरा
ग
गवि Sun, 04/08/2018 - 19:12 नवीन
त्याच ना ज्या भितरेपणा अजिबात न दाखवता निडरपणे आपल्या मूळ देशातच कायम राहिल्या त्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपक११७७
द
दीपक११७७ Sun, 04/08/2018 - 20:10 नवीन
त्या कोण माहीत नाही, ह्या भारतात अाश्रीत आहेत. स्वधर्मा विरुध्द त्यांनी बंड केला होता. नास्तिकांनी सर्व आस्थिकांनच्या प्रवृत्ती विरुध्द बंड करावे म्हणजे ह्या बाई म्हणतात तसे भ्याड ठरणार नाहीतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 15:00 नवीन
सर म्हणाले निसटत्या बाजू निसटूद्या तर थोडे तो विषय बाजूला ठेऊ. 'शुभंम करोती, कल्याणम, आरोग्यम, धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय ' इथे पर्यंतची प्रार्थना परंपरा नास्तिकांनाही जमावयास हवी . आस्तीकांच्या विरोधी शत्रुबुद्धी विनाशाय म्हणुन पसायदाना सारखे उत्तम प्रार्थना बद्दल नास्तिकांच्या गटात त्यांना विचार जमेल का ? नास्तिकांचे "पसायदान'' कसे लिहाल ? हा धागा नास्तिकां साठी प्रेमानेच काढलेला होता त्याची या निमीत्ताने जाहीरात .
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 04/08/2018 - 16:08 नवीन
अशा आंदोलनांची फार गरज आहे. यात एकच पथ्य पाळायला हवं. बुद्धीप्रामाण्यवाद लोकांना पटवुन द्यायच्या आगोदर आपण स्वतः आचरणात आणायला हवा. बुद्धीप्रामाण्याला धर्म, आस्तीकता, लिंगभेद, समाजभेद, पूर्व-पश्चिम, इ. गुंतावळ्याविरुद्ध भिडवण्याऐवजी आपलं रोजचं जगणं बुद्धीप्रामाण्याच्या कसोटीवर बेतलेलं हवं. प्रामाणीकपणे जर हि कास धरली तर दोन दिवसात आपली पैसा, प्रतिष्ठा, साधनसामुग्रीचा उपयोग आणि एकुणच स्वतःविषयीच्या धारणा अमुलाग्र बदलतील आणि प्रथम आपलं जीवन मुळापासुन रीस्ट्रक्चर करण्याची गरज जाणवेल. यातुन जन्माला येणार्‍या प्रचंड अंतर्विरोधाला जर जिंकता आलं तर आपण किती शिल्लक उरलो याचा लेखाजोखा मांडावा. मग काय वाटेल त्याच्याशी भिडावं... प्रोव्हाइदेड तसं काहि करण्याची गरज जाणवत असेल तर...तसंही आपली बुद्धी पुढील मार्ग दाखवायला समर्थ आहेच. बुद्धीप्रामाण्यवादाचं गोंडस नाव घेऊन आपल्या व्यतिरीक्त इतरांचीच कातडी सोलायची दांभीक खुमखुमी जिरवायची असेल तर मात्र काम सोपं आहे. हे महाभाग सर्वत्र सापडतील.. अगदी मिपावर सुद्धा ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/08/2018 - 16:12 नवीन
आता कुठे धागा तापायला लागलाय. त्यातली हवा आताच काढून टाकू नका हो, अर्धवटरावसाहेब ! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
पैसा Sun, 04/08/2018 - 16:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/08/2018 - 17:06 नवीन
बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची गोष्ट आहे. आपल्यात बदल करण्याअगोदर आपल्यावर जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले असतात त्यांना मोडून एक नवी वाट चोखाळण्याची मोजके लोक धाडस दाखवत असतात, ते धाडस नास्तिक लोकांच्या चळवळींनी करुन दाखवलं आहे, ते लोक करत आहे. साधं झोपतांना देवाच्या नावाने बोटं मोडून पाहा मग कळेल खरंच का इतकं सोपं असतं हे सर्व. आज त्यांना लोकांचे पाठबळ मिळणार नाही. पण भविष्यात ही चळवळ नक्की काही प्रमाणात यशस्वी होईल. अशाच चळवळींनी समाजातील पाखंड कमी होत जाईल. बाकी गर्दीच्या बाजूच्या राहण्याचा मोह अनेकांना असतो. अशावेळी आपलं बुद्धीप्रामाण्य खुंटीला गुंडाळून ठेवणारे महाभाग (मिपावरचेच) जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हाच काही टाळकरी आपले टाळ घेऊन माना डोलवायला लगेच हजर होतात. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
श
श्रीगुरुजी Sun, 04/08/2018 - 17:17 नवीन
बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची गोष्ट आहे. आपल्यात बदल करण्याअगोदर आपल्यावर जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले असतात त्यांना मोडून एक नवी वाट चोखाळण्याची मोजके लोक धाडस दाखवत असतात, ते धाडस नास्तिक लोकांच्या चळवळींनी करुन दाखवलं आहे, ते लोक करत आहे. LLRC भारतातील नास्तिक आणि विवेक व बुद्धीप्रामाण्य याचा दुरूनही संबंध नाही. ते जे काय करताहेत त्याला ढोंग म्हणतात. हे लोक अत्यंत भित्रट आहेत. ते खरोखरीच धाडसी असते तर गणेश विसर्जन, सत्यनारायण यांसारख्या सौम्य प्रथांविरूद्ध कंठशोष करण्याऐवजी अतिशय क्रूर प्रथांना विरोध करण्याचे धाडस त्यांनी केले असते. त्याऐवजी सॉफ्ट टारगेट पकडून आपण विवेकी, बुद्धीप्रामाण्यवादी, नास्तिक इ. आहोत या गैरसमजातच ते धुंद आहेत. आज त्यांना लोकांचे पाठबळ मिळणार नाही. पण भविष्यात ही चळवळ नक्की काही प्रमाणात यशस्वी होईल. अशाच चळवळींनी समाजातील पाखंड कमी होत जाईल. जोपर्यंत त्यांच्यात ढोंग आहे व प्रामाणिकपणाचा अभाव आहे, जोपर्यंत 'अहं ब्रह्मास्मि' हा त्यांचा दर्प कायम आहे, जोपर्यंत ते आस्तिकांना हिणवत राहतील, जोपर्यंत त्यांचा पक्षपात सुरू आहे तोपर्यंत ते कधीही यशस्वी होणार नाहीत. बाकी गर्दीच्या बाजूच्या राहण्याचा मोह अनेकांना असतो. अशावेळी आपलं बुद्धीप्रामाण्य खुंटीला गुंडाळून ठेवणारे महाभाग (मिपावरचेच) जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हाच काही टाळकरी आपले टाळ घेऊन माना डोलवायला लगेच हजर होतात. ;) असले काही धागे आले की मिपावरचे तथाकथित महाभाग प्रतिसाद देत नाहीत का आणि काही टाळकरी 'अहो रूपम् अहो ध्वनी' या उक्तीप्रमाणे टाळ कुटत माना डोलवत नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 17:25 नवीन
बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची गोष्ट आहे. आपल्यात बदल करण्याअगोदर आपल्यावर जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले असतात त्यांना मोडून एक नवी वाट चोखाळण्याची मोजके लोक धाडस दाखवत असतात,...
मोडतोड करण्यास बुद्धी लागते तर समृद्ध वनसंपत्तीचा मागे पुढे न पहाता नाशकरणारे बुद्धीमान मानावे लागतील. बाळाला न्हाऊ घातलेल्या पाण्यासोबत आपण बाळ सोडत नाही आहोत हे ही न पाहण्यात कोणता विवेक आणि कोणते बुद्धी प्रामाण्य. स्मजून सुधारुन सुसंस्कृत आणि सुसंस्कारी रहाण्याची सुयोग्य निवड विवेक अथवा बुद्धी प्रामाण्य म्हणवली जाऊ शकत नाही का ? बुद्धीप्रामाण्य आणि विवेक या शब्दांवरनास्ट्तीकांची मक्तेदारी समजणे अंधश्रद्धा याची खात्री करण्याची घाई मुळीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अर्धवटराव Sun, 04/08/2018 - 19:21 नवीन
या सगळ्या आंदोलनाला उद्देश नास्तिकतेचा पुरस्कार करणे हा आहे, बुद्धीप्रामाण्यवाद नव्हे, हे स्पष्ट सांगायचं ना मग. सोयीस्कर बुद्धीप्रामाण्यवाद, ज्याला शुद्ध मराठीत दांभिकता म्हणतात, स्वतःचं कौतुक करुन घ्यायला त्याचा उपयोग होतोच. नास्तिक आंदोलकांनी त्याचा आनंद उपभोगायला आमची काहिच हरकत नाहि. प्लुटो, अ‍ॅरिस्टॉटल वगैरे मंडळी आपल्या मांदियाळीत आणुन बसवणं, सशाने आपल्या कपाळाला गंडस्थळ म्हणणं वगैरे गटण्यास्टाईल गमती जमती बघायला आम्हालाही आवडतं. तुम्ही सुद्धा अ‍ॅन्जोय करत आहात. छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सर टोबी Sun, 04/08/2018 - 16:08 नवीन
सर्वसामान्यपणे खरे तर एकमेकांना अजिबात छेदत नाहीत. पण आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे. होळीमुळे होणारे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि अपघात, संक्रांतीमुळे होणारे अपघात यांचा खरे तर सर्वांनीच निषेध केला पाहिजे. त्या उलट आक्रस्ताळेपणाने या गोष्टींना संस्कृती म्हणून आपल्या माथी थोपविल्या जातात. काही ठिकाणी लहान मूल उंचावरून खाली फेकणे, विहिरीत पोहऱ्याला बांधून सोडणे अशा गोष्टींचे देखील आमच्या संस्कृतीवर घाला अशा अर्थाने आणि त्वेषाने त्यांचे समर्थन होते तेंव्हा आस्तिक नक्कीच टीकेला पात्र ठरतात. यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध. पण तो विषय देखील म्हणावा तसा सोपा राहिलेला नाही. आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो. तेंव्हा जे जे होईल ते ते पाहावे एवढेच हाती राहिले आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 04/08/2018 - 16:46 नवीन
पण आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे. नास्तिकही तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतात. त्याबरोबरीने सर्व आस्तिक महामूर्ख, गंजलेल्या मेंदूचे असून आपण सर्वज्ञानी आहोत हा अहंभावाचा दर्प वागण्यातून दिसत असतो. होळीमुळे होणारे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि अपघात, संक्रांतीमुळे होणारे अपघात यांचा खरे तर सर्वांनीच निषेध केला पाहिजे. त्या उलट आक्रस्ताळेपणाने या गोष्टींना संस्कृती म्हणून आपल्या माथी थोपविल्या जातात. होळी, फटाके इ. चा आणि आस्तिकतेचा कणभरही संबंध नाही. कालौघात काही सामाजिक समारंभ निर्माण झाले. होळीला लाकडे पेटवून व दिवाळीला किंवा इतर प्रसंगी फटाके जाळून पर्यावरणावर आघात होतो यात तसूभरही शंका नाही. किंबहुना या सर्व विघातक गोष्टींवर तातडीने बंदी यावयास हवी. बादवे, संक्रांतीमुळे कोणते अपघात होतात? काही ठिकाणी लहान मूल उंचावरून खाली फेकणे, विहिरीत पोहऱ्याला बांधून सोडणे अशा गोष्टींचे देखील आमच्या संस्कृतीवर घाला अशा अर्थाने आणि त्वेषाने त्यांचे समर्थन होते तेंव्हा आस्तिक नक्कीच टीकेला पात्र ठरतात. या प्रथा अत्यंत जीवघेण्या असून त्यावर तातडीने कायदेशीर बंदी हवी. बादवे, मूल उंचावरून फेकणे ही प्रथा मुस्लिमात सुद्धा आहे. तेव्हा याला विरोध करण्याआधी १० वेळा विचार करा. मुळात आस्तिकतेला विरोध करताना होळी, फटाके इ. गोष्टीच का समोर आणल्या जातात? लहान मुलांची व मुलींची भूल न देता केली जाणारी वेदनादायक सुंता, बुरखा, इदला होणारी कोट्यावधी बकर्‍यांची क्रूर पद्धतीने केली जाणारी कत्तल (आणि या कत्तलीचे नास्तिकच समर्थन करतात) इ. उदाहरणे कधीच का चर्चिली जात नाहीत? यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध. पण तो विषय देखील म्हणावा तसा सोपा राहिलेला नाही. आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो. तेंव्हा जे जे होईल ते ते पाहावे एवढेच हाती राहिले आहे असे वाटते. फक्त होळी, फटाके इ. च अघोरी आहे का? इतर अघोरी प्रथांचा कधी उल्लेख सुद्धा करायचा नाही का? त्याबाबतीत कायमच दातखीळ का बसलेली असते? होळी, फटाके इ. हानीकारक आहेतच, पण वर उल्लेखलिल्या इतर धार्मिक प्रथा याइतक्याच किंबहुना जास्तच अघोरी आहेत. त्याचे मात्र नास्तिक समर्थन करतात किंवा सोयिस्कर मौन पाळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
M
mayu4u Sun, 04/15/2018 - 07:17 नवीन
साधारणपणे आस्तिक-नास्तिक वादात मी प्रतिसाद देत नाही. पण तुमचा प्रतिसाद वाचून अगदीच रहावलं नाही, म्हणून हा उपप्रतिसाद:
पण आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे. नास्तिकही तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतात. त्याबरोबरीने सर्व आस्तिक महामूर्ख, गंजलेल्या मेंदूचे असून आपण सर्वज्ञानी आहोत हा अहंभावाचा दर्प वागण्यातून दिसत असतो.
यात आस्तिक-नास्तिक असा भेद नाहीये. दोन्ही बाजूंचे निर्लज्ज लोक निर्लज्जपणे, मूर्ख लोक मूर्खपणे आणि अहंकारी लोक अहंभावाने वागतात.
बादवे, संक्रांतीमुळे कोणते अपघात होतात?
भवनांच्या (इमारत) चन्द्र्शालांवरून (गच्ची) खाली पडणे, पतंग पकडताना रस्त्यावरून धावताना वाहनांच्या मध्ये येणे, आणि पतंगाचा मांजा दुचाकीस्वारांच्या गळ्यात अडकणे हे काही अपघात मी पाहिलेत.
मूल उंचावरून फेकणे ही प्रथा मुस्लिमात सुद्धा आहे. तेव्हा याला विरोध करण्याआधी १० वेळा विचार करा. मुळात आस्तिकतेला विरोध करताना होळी, फटाके इ. गोष्टीच का समोर आणल्या जातात? लहान मुलांची व मुलींची भूल न देता केली जाणारी वेदनादायक सुंता, बुरखा, इदला होणारी कोट्यावधी बकर्‍यांची क्रूर पद्धतीने केली जाणारी कत्तल (आणि या कत्तलीचे नास्तिकच समर्थन करतात) इ. उदाहरणे कधीच का चर्चिली जात नाहीत?
मूल उंचावरून फेकणे , लहान मुलांची व मुलींची भूल न देता केली जाणारी वेदनादायक सुंता, बुरखा, या प्रथा मूर्खपणाच्या आहेत आणि नास्तिक त्याला विरोधच करतात. पण एका हिंदू नास्तीकाने एका हिंदू अस्तिकाला त्याच्या वागण्यातली चूक किंवा रुधीतला फोलपणा दाखवला की मुस्लीमान्मधल्या चुकीच्या रुढींची चर्चा सुरु करून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करायचा ही जुनी आणि मूर्खपणाची स्त्रातेजी आहे. बकर्‍यांची क्रूर पद्धतीने केली जाणारी कत्तल निषेधार्ह मानण यात आस्तिक/नास्तिक पेक्षा शाकाहार/मांसाहार हा मुद्दा येतो.
वर उल्लेखलिल्या इतर धार्मिक प्रथा याइतक्याच किंबहुना जास्तच अघोरी आहेत. त्याचे मात्र नास्तिक समर्थन करतात किंवा सोयिस्कर मौन पाळतात.
काहीही हं श्री! तुमच्या मर्यादित वाचनात/अनुभवात या प्रथांचा निषेध करणारे नास्तिक आले नसतील. अभ्यास वाढवा. नेहमीसारखी अर्धवट माहितीवर छातीठोक विधानं (वैश्विक सत्य असल्याच्या थाटात) करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 16:58 नवीन
....आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो.
लहान मुलांच्या ही मानसशास्त्रज्ञांना विचारा एकाला एक दुसर्‍याला दुसरी ट्रीटमेंट दिली असे वाटले की मुले नाराज होतात. मोठे अधिक संयम दाखवतात पण स्वाभाविक प्रतिक्रीया बदलत नसतात. त्यामुळे पुरोगाम्यांनी एकास एक आणि दुसर्‍यास दुसरा नियम लावत नाही आहोत या बद्दल अत्यंत सजग असले पाहीजे पण असे प्रत्यक्षात होताना दिसत नाही तेव्हाचे आक्षेप वार्‍यावरही सोडता येत नाहीत. सुंता आणि एफजीएम या प्रथा, केंसेट बीफोर अटेनींग अ‍ॅडल्टहूड आणि अघोरी नाही असे कसे म्हणता येते मला कल्पना नाही. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी विशीष्ट देवशी केलेल्या प्राण्यांच्या कत्तली नमेक्या कोणत्या प्रकारात मोडतात ? ख्रिशन ननच्या विवाहाधीकारांचे आणि ख्रिश्चन स्त्रीयांच्या घटशोटाच्या अधिकाराचे काय ?
काही ठिकाणी लहान मूल उंचावरून खाली फेकणे, विहिरीत पोहऱ्याला बांधून सोडणे अशा गोष्टींचे देखील आमच्या संस्कृतीवर घाला अशा अर्थाने आणि त्वेषाने त्यांचे समर्थन होते तेंव्हा आस्तिक नक्कीच टीकेला पात्र ठरतात.
हे मान्य आहे असे अघोरी प्रकार थांबवण्यात आस्तीकांनी पुरोगामी संत परंपरेचा आदर्श पुढे ठेऊन पुढाकार घेतला पाहीजे .
....यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध.
यना बेसिकली इथपर्यंत मर्यादीत नाहीत, हि गोज अ लिटल बियाँड . कि जिथे वैचारीक विवादाला जागा निर्माण होतात.
....संक्रांतीमुळे होणारे अपघात
हे काय नवीन वाचतोय मी ? नेमका संदर्भ कोणता ? हि पुरोगाम्यांची अंधश्रद्धा नसावी म्हणजे झाले .
.....फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण
एकत्रित आणि थोडे फटाके उडवून सहकार्य करण्यास हरकत नाही. बेसिकली याचा आस्तीकतेपेक्षा उत्सवी आनंदाशी संबंध अधिक असावा. उत्सव हे आस्तीकतेच्या पलिकडे जाऊन चार भिंतीत न कोडता येणारी सार्वजनिक नैसर्गीक अभिव्यक्ती असते. म्हणून उत्सवांवर हाता बाहेर जाऊ लागल्यास मर्यादीत बंधने ठिक पण सरकसट बंधने घालणे प्रशस्त आणि समर्थनीय ठरत नाही.
...होळीमुळे होणारे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी,
लोकसंख्या वाढल्यामुळे प्रमाण पाण्याने लवकर धुतले जातील अशा नॉन ट्क्झीक आणि नैसर्गीक रंगाना प्रोत्साहन देऊन सहकार्य करण्यास हरकत नाही. पण आनंद साजरा करणार्‍या उत्सवांची समाजास गरज असते. अर्थात म्हैस झुंजी बैलगाडी शर्यत अशा प्र्कारातही प्राण्यांना कमी इजा होईल ख्रिसमस मध्ये लाईटचा अपव्याय कमी होईल असा पुरोगामी पणा आस्तीकांनी दाखवण्यास हरकत नसावी. पण कुणी पुरोगामी तुम्हाला पुरेसे सहकार्य करुनही उत्सव साजरा करण्यास निर्लज्ज वगैरे म्हणत असतील आणि त्यांच्या प्रमाणे तुम्हालाही त्यांनी मर्यादा ओलांडल्याचा संताप आला त्यांच्या निर्ढावलेपणाचा राग आला तर तो घटनात्मक पद्धतींनी अभिव्यक्त करण्यास मुळीच हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 17:01 नवीन
* घटशोटाच्या - घटस्फोटाच्या असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Sun, 04/08/2018 - 17:05 नवीन
....संक्रांतीमुळे होणारे अपघात हे काय नवीन वाचतोय मी ? नेमका संदर्भ कोणता ? हि पुरोगाम्यांची अंधश्रद्धा नसावी म्हणजे झाले . हे बहुतेक हलवा टोचल्यामुळे होणारे मृत्यु किंवा तिळगुळाचा लाडू घशात अडकून श्वास गुदमरल्यामुळे होणारे मृत्यु याच्याशी संबंधित असावे. तसेच तिळगुळ व हलवा करताना इंधनाची होणारी प्रचंड नासाडी याचाही संबंध असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 17:18 नवीन
सर टोबी खर नाय ना हो हे ? कि खरेच आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मार्मिक गोडसे Sun, 04/08/2018 - 18:07 नवीन
...संक्रांतीमुळे होणारे अपघात संक्रांतीला पतंगाची काटाकाटी खेळली जाते. मांज्यामुळे अनेक पक्षी,दुचाकीस्वार जखमी होतात, काहींचा मृत्यू होतो. पतंग उडवताना मुलं इमारतीवरून पडतात, वगैरे,वगैरे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 18:43 नवीन
ओह ओके असा संदर्भ आहे तर , ते मांजावगैरेच प्रॉब्लेम्स आहेत - माम्जाच्या आयातीवर तसेच उत्पादन आणि विक्रीवर बंधने घालण्यास हरकत नाही. मध्यमवर्गीयात अलिकडे पुण्यात तरी माझ्या पहाण्यात हा खेळ फारसा नाही . शहरात गरीब मुलांना खेळण्यास मैदाने नाहीत . त्यांच्या खिशाला परवडणारा खेळ त्यांच्यासाठी जागा आणि साधने पुरवून घेतला गेला पाहीजे. सामान्यांच्या खिशाला परवडनार्‍या खेळाला हात घातला तर राजकार णी त्यांच्या बाजूने बोलतील आस्तीक असोत वा नास्तीक लोकशाहीत लोकांच्या योग्य बाजूचाही विचार करावा लागतो. एनी वे बाकी याचा आस्तीकतेशी नास्तिकतेशी संबंध काय असतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/08/2018 - 17:27 नवीन
>>>>> आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे. संताप येत नाही हाच तर मुळ प्रॉब्लम आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
म
माहितगार Sun, 04/08/2018 - 17:37 नवीन
सर ज्यांच्यात तुम्हाला बदल होऊन हवा आहे त्यांच्या बद्दल ते कितीही चुकीचे असले तरी उपमर्द करणार्‍या भाषेने माणसे तथाकथित विवेक वाद्यांच्या जवळ येतील कि दुरावतील यात विवेकाचे तत्वज्ञान नेमके काय म्हणते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
A
arunjoshi123 Mon, 04/09/2018 - 13:36 नवीन
यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध.
कत्तलखान्यात मशिन्स वापरून रोज करोडो प्राणी मारणे अघोरी आहे का नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
A
arunjoshi123 Mon, 04/09/2018 - 13:52 नवीन
आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो.
देव नाही असं म्हणायचं आणि अल्ला नाही असं म्हणायचं नाही हा काही बुद्धिप्रामाण्यवाद नाही. नेमका हाच प्रश्न विचारणे विवेकवाद वा बुद्धीप्रामाण्यवाद कशामुळं नाही म्हणे? ===================== इस्लाम जगात सर्वात अघोरी आणि मागास धर्म असावा. भारतात जगातले दोन नंबरचे सर्वाधिक मुसलमान आहेत. मग नेमकं नास्तिक वि. (त्यामानानं बरे) हिंदू असेच लेख हे नतद्रष्ट, मूर्ख, डरपोक नि दांभिक नास्तिक का पाडत असतात म्हणे? झाडून १००% लेख असेच्च असतात. अस्तिक हिंदू + नास्तिक हिंदू + नास्तिक मुसलमान + लिबरल अस्तिक मुसलमान विरुद्ध कट्टर धर्मांध (अतिरेकी, गजवा ए हिंद, हलाला, तीन तलाक, बुरखा, जिहाद) असं द्वंद्व हवं. ===================== अगदी कोणत्याही गाढवाला कळेल कि "हिंदूंच्या देवाला" शिव्या घालण्याआधी "मुसलमानांच्या कुप्रथांना" शिव्या घालणं अधिक इष्ट आहे. अगोदरच आपला देश मागासलेला आहे. मग आपल्या मुसलमानांनी किमान हिंदूंइतकं तरी प्रगत जगू नये कि काय? ========================== नास्तिकांतही हिंदू नास्तिक, मुस्लिम नास्तिक आणि धर्महिन नास्तिक असे प्रकार केले जातात कि काय? पुरोगामी धर्महिन नास्तिकांना मूळात भारतीय मुस्लिमांबद्दल आपुलकी नाही. कितीही नास्तिक बनायचं नाटक केलं तरी धार्मिक द्वेष जात नाही. बिच्चार्‍या मुसलमानांचं नशीबच वाईट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
ज
जोन Mon, 02/17/2020 - 09:57 नवीन
खर आहे!! मागच्या सन्क्रान्ति मध्ये मि तिळगुळा वरुन घसरुन पडलो आणि मग माझी बाय पास झाली! अश्या ५००००० केसेस झाल्या म्हणे त्या वर्षी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा