नास्तिक चळवळ : काळाची गरज ?
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात.
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे.जाऊ द्या हो, तुम्ही त्या बावळट आस्तिक लोकांकडे दुर्लक्ष करा आणि विजयोत्सव (सॉरी, उत्सव म्हणालो. विजयानंद म्हणणं योग्य ठरेल) साजरा करा. आस्तिकांचा पराभव व नास्तिकांचा विजय फार पूर्वीच झालेला असताना पुन्हा पुन्हा असले लेख खरडणे म्हणजे सामना डावाने जिंकल्यावर सुद्धा विजयी संघाने मैदान न सोडता खेळत बसण्याचा हट्ट धरण्यासारखं आहे़. आस्तिक श्रद्धासमर्थनाचे लेख क्वचितच टाकताना दिसतात, पण फार पूर्वाच निर्विवाद विजयी झालेले नास्तिक असले लेख वारंवार का टाकतात खुदा जाने.नास्तिक लोकांनी आपली एक चळवळ सुरु केली आहे. देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते.थोडा सुधारणा सुचवतो. "फक्त एका विशिष्ट धर्मातीत देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते." हे वाक्य परीपूर्ण ठरेल.कोणत्याही सक्तीशिवाय आस्तिकांनी देखील आपल्या सुखाचा मार्ग शोधला आहे.जीव, आत्मे, शरीर, इंद्रिये, महाभुते, असंख्य योन्यांचा प्रवास, असल्या पाखंडाला लाथाडून ईश्वर- बिश्वर निव्वळ थापेबाजी आहे, हे त्यांना समजू लागलं आहे.हे आता इतक्या उशीरा समजायला लागलं? त्यांचा विजय फार पूर्वीच झाला होता ना? असो. आपल्या भ्रमात आनंदात रहा.बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची गोष्ट आहे. आपल्यात बदल करण्याअगोदर आपल्यावर जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले असतात त्यांना मोडून एक नवी वाट चोखाळण्याची मोजके लोक धाडस दाखवत असतात, ते धाडस नास्तिक लोकांच्या चळवळींनी करुन दाखवलं आहे, ते लोक करत आहे.LLRC भारतातील नास्तिक आणि विवेक व बुद्धीप्रामाण्य याचा दुरूनही संबंध नाही. ते जे काय करताहेत त्याला ढोंग म्हणतात. हे लोक अत्यंत भित्रट आहेत. ते खरोखरीच धाडसी असते तर गणेश विसर्जन, सत्यनारायण यांसारख्या सौम्य प्रथांविरूद्ध कंठशोष करण्याऐवजी अतिशय क्रूर प्रथांना विरोध करण्याचे धाडस त्यांनी केले असते. त्याऐवजी सॉफ्ट टारगेट पकडून आपण विवेकी, बुद्धीप्रामाण्यवादी, नास्तिक इ. आहोत या गैरसमजातच ते धुंद आहेत.आज त्यांना लोकांचे पाठबळ मिळणार नाही. पण भविष्यात ही चळवळ नक्की काही प्रमाणात यशस्वी होईल. अशाच चळवळींनी समाजातील पाखंड कमी होत जाईल.जोपर्यंत त्यांच्यात ढोंग आहे व प्रामाणिकपणाचा अभाव आहे, जोपर्यंत 'अहं ब्रह्मास्मि' हा त्यांचा दर्प कायम आहे, जोपर्यंत ते आस्तिकांना हिणवत राहतील, जोपर्यंत त्यांचा पक्षपात सुरू आहे तोपर्यंत ते कधीही यशस्वी होणार नाहीत.बाकी गर्दीच्या बाजूच्या राहण्याचा मोह अनेकांना असतो. अशावेळी आपलं बुद्धीप्रामाण्य खुंटीला गुंडाळून ठेवणारे महाभाग (मिपावरचेच) जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हाच काही टाळकरी आपले टाळ घेऊन माना डोलवायला लगेच हजर होतात. ;)असले काही धागे आले की मिपावरचे तथाकथित महाभाग प्रतिसाद देत नाहीत का आणि काही टाळकरी 'अहो रूपम् अहो ध्वनी' या उक्तीप्रमाणे टाळ कुटत माना डोलवत नाहीत का?पण आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे.नास्तिकही तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतात. त्याबरोबरीने सर्व आस्तिक महामूर्ख, गंजलेल्या मेंदूचे असून आपण सर्वज्ञानी आहोत हा अहंभावाचा दर्प वागण्यातून दिसत असतो.होळीमुळे होणारे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि अपघात, संक्रांतीमुळे होणारे अपघात यांचा खरे तर सर्वांनीच निषेध केला पाहिजे. त्या उलट आक्रस्ताळेपणाने या गोष्टींना संस्कृती म्हणून आपल्या माथी थोपविल्या जातात.होळी, फटाके इ. चा आणि आस्तिकतेचा कणभरही संबंध नाही. कालौघात काही सामाजिक समारंभ निर्माण झाले. होळीला लाकडे पेटवून व दिवाळीला किंवा इतर प्रसंगी फटाके जाळून पर्यावरणावर आघात होतो यात तसूभरही शंका नाही. किंबहुना या सर्व विघातक गोष्टींवर तातडीने बंदी यावयास हवी. बादवे, संक्रांतीमुळे कोणते अपघात होतात?काही ठिकाणी लहान मूल उंचावरून खाली फेकणे, विहिरीत पोहऱ्याला बांधून सोडणे अशा गोष्टींचे देखील आमच्या संस्कृतीवर घाला अशा अर्थाने आणि त्वेषाने त्यांचे समर्थन होते तेंव्हा आस्तिक नक्कीच टीकेला पात्र ठरतात.या प्रथा अत्यंत जीवघेण्या असून त्यावर तातडीने कायदेशीर बंदी हवी. बादवे, मूल उंचावरून फेकणे ही प्रथा मुस्लिमात सुद्धा आहे. तेव्हा याला विरोध करण्याआधी १० वेळा विचार करा. मुळात आस्तिकतेला विरोध करताना होळी, फटाके इ. गोष्टीच का समोर आणल्या जातात? लहान मुलांची व मुलींची भूल न देता केली जाणारी वेदनादायक सुंता, बुरखा, इदला होणारी कोट्यावधी बकर्यांची क्रूर पद्धतीने केली जाणारी कत्तल (आणि या कत्तलीचे नास्तिकच समर्थन करतात) इ. उदाहरणे कधीच का चर्चिली जात नाहीत?यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध. पण तो विषय देखील म्हणावा तसा सोपा राहिलेला नाही. आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो. तेंव्हा जे जे होईल ते ते पाहावे एवढेच हाती राहिले आहे असे वाटते.फक्त होळी, फटाके इ. च अघोरी आहे का? इतर अघोरी प्रथांचा कधी उल्लेख सुद्धा करायचा नाही का? त्याबाबतीत कायमच दातखीळ का बसलेली असते? होळी, फटाके इ. हानीकारक आहेतच, पण वर उल्लेखलिल्या इतर धार्मिक प्रथा याइतक्याच किंबहुना जास्तच अघोरी आहेत. त्याचे मात्र नास्तिक समर्थन करतात किंवा सोयिस्कर मौन पाळतात.....संक्रांतीमुळे होणारे अपघातहे काय नवीन वाचतोय मी ? नेमका संदर्भ कोणता ? हि पुरोगाम्यांची अंधश्रद्धा नसावी म्हणजे झाले .हे बहुतेक हलवा टोचल्यामुळे होणारे मृत्यु किंवा तिळगुळाचा लाडू घशात अडकून श्वास गुदमरल्यामुळे होणारे मृत्यु याच्याशी संबंधित असावे. तसेच तिळगुळ व हलवा करताना इंधनाची होणारी प्रचंड नासाडी याचाही संबंध असावा.