http://indianexpress.com/article/opinion/columns/robust-job-growth-not-fake-news-narendra-modi-economy-demonetisation-gst-inflation-5154381/
देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण वरील लेखात आहे.
तुमच्या सारखे खोटे बोलून गिरे तो टांग उपर असे नाही. बाकी आमचे आदर्श असतील पण त्यांची लाल म्हणायची सक्ती आणि भक्ती नाही हे सुदैव ! तुम्ही खोटारडेपणा करुन माफी मागत नाही.
स्वतः खरे असल्याचा एकतरी पुरावा आणू शकत नाही , मागच्या वेळी सुध्दा हे सिद्ध झाले होते.
मला आणि सगळ्या मिपाला कळलं की तुम्ही ट्रोल आहात आणि खोटेपणा करताय . तुम्हाला कुठली पद्धतीने खरेबाहेबते सिद्ध करा आणि दाखवा.
यालाच म्हणतात केजरीवाल approach. एखाद्यावर बेफाम आरोप करायचे आणि त्यालाच ते आरोप खोटे आहेत हे सिद्ध करायला सांगायचे. प्रकरण अगदीच गळ्याशी आलं तर माफीपत्र लिहून मोकळं व्हायचं. अर्थात केजरीवालांसारख्या भंपक व्यक्तीच्या अंधभक्ताकडून वेगळे काय दिसणार?
तुमची चूक सगळ्या मिपाला कळली आहे , दिवसेंदिवस विनोदी होत चालला आहात . फोटो बघून शेंबडे पोरसुद्धा सांगेल ते खोटे आहेत . तुम्ही खरेपणाचा पुरावा देऊ शकत नाही . आता तोंडघशी पडला आहात
फेक फोटो टाकून बदनामी करायचा फेकू अप्रोच तुमचा आहे !
खोटारडेपणा सिद्ध झालाय . खाली चित्रगुप्त यांनी तुमचे पितळ उघडे पाडलं आहे. ज्यांना यातले कळते अशा दोन मिपा आयडी नी तुमचे फोटो खोटे म्हणाले आहेत. भाजपला पाठिंबा देणारे सुद्धा त्या फोटोला खोटे म्हणत आहेत.
आता कुठपर्यंत हे खोटे रेटता हे बघायचे आहे. यातून भक्त लोक कुठल्या थराला जातात हे समजणार आहे.
अभ्या , चित्रगुप्त व इतर सर्व सदस्यांनी तुमची चोरी पकडली आहे , तिथे थातूरमातूर प्रतिसाद देऊन तुम्हाला वाटते की शेवटचा प्रतिसाद दिला म्हणजे तुमचे म्हणणे खरे नसते.
उगा केजरीवालचे नाव घेऊन गोलपोस्ट बदलू नका. एकाचा एप्रोच तुम्हाला बायसड वाटेल पण इतरांना द्यायला तुम्हाला उत्तर नाही म्हणून फक्त इथेच लिहिताय .
http://www.misalpav.com/comment/993261#comment-993261
श्रीगुरुजींनी ट्रोलिंग केलं आहे का तर हो, माझ्यामते जे केलं गेलं ते ट्रोलिंगच होतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.
इथे बिटाकाकानी सुद्धा तुम्हाला ओळखला आहे . आता त्यांना काय म्हणणार ? केजरीवाल, आशुतोष, राघव चढ्ढा, संजय सिंह, कुमार विश्वास ??
आसारामला सपोर्ट वगैरे मुद्दा नव्हता पण सपोर्ट करायला मोर्फ केलेले धडधडीत खोटे फोटो वापरणे हा होता . आणि इथे समस्त मिपाकर एकत्र आले याचा आनंद होतोय .
विरोध वैचारीक असावा , त्यसाठी पुरावे सुद्धा द्यावेत पण खोटे मोर्फ पुरावे टाकणार्याला इथे समर्थन मिळत नाही याचा आनंद आहे .
तुम्ही टाकलेले फोटो मॉर्फ आहेत हे कबूल करा मुद्द्दा तुम्हि टाकलेले फोटो एवढाच आहे त्याची चर्चा करा.
बाकि कोण बायस्ड आहे ते कशाला चघळत आहात ?
चिमटीत सापडल्यावर दुसर्यांचा ट्रोलिंग वात्ते का ?
हा २०० व प्रतिसाद काही कामाला येतोय का बघू! फारच बेक्कार दिसतंय हो, एवढं गुऱ्हाळ घालून पण दोघांनाही दम लागला नाही अजून? मोबाईल वर तर प्रतिसाद पण दिसत नाहीये हा! बास करा कि राव! काहीतरी चांगले मुद्दे घेऊन वादविवाद चर्चा करा!
महत्वाची सूचना
बरेचदा असे लक्षात आले आहे की काही मिपा सदस्यं हे एका पक्ष विशेष बाबत कायम लिहीतात. ते तसे लिहून थांबत नाहीत तर त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर योग्य उत्तर न देता. अवांतर किंवा त्यांना त्रास देणे असे वागतात. अश्या सर्व सदस्यांनी ही जाहीर आणि सामायिक सूचना आहे की त्यांनी हे असे करने थांबवावे अन्यथा कुठल्याही पुर्वसुचनेशिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठराविक विचारसरणीचे समर्थक नाही. येथे मराठी भाषेवर प्रेम करणार्या लोकांना एकत्रित येता यावे आणि त्यांना व्यक्त होता यावे यासाठी हा प्रयत्न आहे. आपणासर्वांकडून याबाबत दक्षता घेतली जावी अशी अपेक्षा आहे.
हा हा हा... कहर आहात राव गुर्जी...
हे म्हणजे आधी मी पास झालो म्हणून मित्रांना सांगायचे आणि मित्रांनी मग अजून त्याच वर्गात का बसतोस? असं विचारलं की तुम्ही मी नापास झाल्याचे पुरावे द्या म्हणायचं असं झालं.
असो, स्वतःची चुक (अगदी ट्रिवीअल होती खरंतर, चुकून टाकले म्हटला असतात सहज सोडलं असतं लोकांनी) मान्य करायचा साधा दिलदारपणा तुमच्याकडे नाही हे या धाग्याने सिद्ध केलं.
दोन फोटो...
त्यांचा उपयोग काय?
तर दोघांचा फोटोअनालिसिस करायचा.
मंजे लुमेन पर स्क्वे. मी.
त्यावरून कळणार
उजेड कशात जास्त आहे
आणि नक्की किती जास्त आहे
व्हवलाल्यात का काई एमाराय कनेक्ट?
एखाद्या एरियात किती ल्युमेन उजेड आहे, हे बघायला ते ल्युमेनवाले मशीन त्या एरियात नेऊन मोजावे लागेल ना? का नुस्त्या फोटोवरुन ल्युमेन कळते?
( हे म्हणजे वजनाच्या मशीनवर फोटॉ ठेऊन माणसाचे वजन बघण्यागत होईल ना भाऊ ? बायोलोजीवाल्यांचे फिजिक्स कच्चे असते, पण इतकेही कच्चे नका मानू .. की ही रिसेंट डेवलपमेंट आहे ? )
लखनऊ: गोरखपूरमधील बीआरडी ऑक्सिजन कांडप्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने डॉ. कफील खान यांना मोठा दिलासा दिला आहे. कफील खान यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा कोणताच पुरावा आढळला नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
गेल्यावर्षी बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यानं ३० हून अधिक मुलं ठार झाली होती. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन डॉ. कफिल खान यांना अटक करण्यात आली होती. गेल्या आठ महिन्यांपासून ते कैदेत होते. मात्र त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न आढळल्याने खान यांना जामीन देण्यात आला होता. शनिवारी गोरखपूर तुरुंगातून त्यांची मुक्तता करण्यात आली. यावेळी कुटुंबीयांनी आणि रुग्णांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'खान हे वैद्यकीय सेवा करणारे आहेत. ते सरकारी नोकर असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही,' असं न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना नमूद केलं आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/gorakhpur-tragedy-hc-says-no-evidence-of-medical-negligence-by-dr-kafeel-khan/articleshow/63970782.cms
ते खान असोत नाही तर कोणीही असोत, त्यांच्याविरुद्ध विचहंटिंग केली जात नाही हे पाहायला हवे. न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला आहे आणि याचा आनंद असायलाच हवा.
मला एक कळत नाहीये सर्व आयडींना झालेय काय?? एवढे वैयक्तिक का होतोय आपण? संपादक मंडळींना सतत कामाला लावायचा विचार आहे काय? आपण वेगवेगळ्या विचारसरणीला पाठिंबा देत असू, वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देत असू पण याबाहेर आपण सर्वसामान्य माणसे आहोत. याची जाणीव ठेवून फक्त मुद्द्यांवर बोलायचा पण केला तर काही बिघडणार आहे का?
---------------------
प्रत्येकाला समोरचा आपल्या विरोधी विचारसरणीच्या पक्षाचा पेड ट्रोल वाटत असला तरी जमिनीवर सगळ्यांना माहीत असते आपण या कंमेंट्स आपल्या घरी सोफ्यावर तंगड्या पसरून किंवा हाफीसात मिळालेल्या मोकळ्या वेळात टाकत असतो. तेव्हा जरा सबुरीने घेऊया, कसे??
सद्या काही राजकिय पक्षांनी आणि सर्वोच्च न्यायालयातिल वरीष्ठ वकीलांनी सर्वोच्च न्यायालय व विशेषतः त्याच्या मुख्य न्यायाधिशांवर जी चिखलफेक चालवली आहे ती "न भूतो" प्रकारची आहे. त्याबाबत, सर्वोच्च न्यायालयातिल वरीष्ठ वकील असलेल्या व जागतिक स्तरावर वकिली करणासाठी प्रसिद्ध असलेल्या हरीश साळवे यांनी एका राष्ट्रीय वाहिनीवरच्या मुलाखतीत प्रकट केलेले परखड मत, जितके थक्क करणारे आहे तितकेच सद्या चाललेल्या भारतिय न्यायव्यवस्थेच्या राजकियीकरण्याच्या प्रयत्नांबद्दल किळस आणणारे आहे. नेहमी शांतपणे बोलणार्या साळवे यांच्या मुलाखतीत, या परिस्थितीबद्दलची किळस व संताप बर्याचदा स्पष्टपणे व्यक्त होताना दिसत आहे. ते या प्रकाराला न्यायव्यवस्थेला लागलेली बुरशी आहे असे म्हणतात आणि त्याबाबत जबाबदार असणार्यांना कैदेत पाठवावे असेही म्हणतात !
मुख्य म्हणजे साळवे, राम जेठलानी, पालखीवाला, इत्यादी मान्यवर वरीष्ठ विधितज्ज्ञांचे या परिस्थितीबद्दल एकमत असल्याचेही कळते.
एका मान्यवर भारतिय घटनातज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रिय कायदेतज्ज्ञाचे हे सद्य परिस्थितीवरचे मत जाणून घेण्यासाठी ही सर्व मुलाखत मुळातूनच पाहणे आवश्यक आहे...
(चित्रफीत युट्युबवरून साभार)
साळवे, राम जेठलानी, पालखीवाला, इत्यादी सहसा एकमत न होणार्या मान्यवर वरीष्ठ विधितज्ज्ञांचे एकमत झाले आहे... तेव्हा सॉलिसिटर जनरल बनवायची ऑफर त्या सगळ्यांना एकत्रितपणे दिली जाणार असेल तर मग ती एक अभूतपूर्व घटना होईल, नाही का !!! =)) =)) =))
अंध विरोधकांनी तो मुद्दा वापरायच्या आत मी वरून घेतला;);).
---------------------
जोक्स अपार्ट, पण खरंच फिक्सर असा उघड उघड आरोप कंटेम्प्ट कायद्यात बसत नाही का? कि विरोधकांना याचे भांडवल करता येऊ नये म्हणून दुर्लक्ष करण्यात येत आहे? खरच उद्या साळवे म्हणतात तसं प्रत्येकाने प्रत्येक निर्णयावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली तर मग कसे? फक्त आरोपी सुटल्यावरच आरोप करणार की दोषी ठरवल्यावर पण आरोप करणार?
पण खरंच फिक्सर असा उघड उघड आरोप कंटेम्प्ट कायद्यात बसत नाही का?
हा सरळ सरळ कैदेत टाकण्याइतका गंभीर आरोप आहे. कारण, यामुळे सर्वोच्च न्यायलयाच्या सर्व न्यायप्रक्रियेवर आणि सर्व न्यायाधिशांच्या विश्वासार्हतेवर आधात केला गेला आहे. पण, तो आरोप करणार्यांकडे मोठे राजकिय उपद्रव मुल्य (political nuisance value) असल्याने उच्च न्यायालय जरा मवाळपणे वागते आहे असे वाटते. कदाचित् ...
(अ) जर कोर्टाने त्वरीत कारवाई केली तर त्याविरुद्ध आकांडतांडव करून गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याची संधी मिळेल व त्याचा केंद्रातल्या सद्य सरकारवर ठप्पा ठेवून (केंद्र व न्यायालयाचे साटेलोटे आहे, इत्यादी) कर्नाटक निवडणूकीत त्याचा फायदा उपटता येईल, त्यामुळे ही कारवाई आताच हेतूपुर्रसर केली गेली आहे हे म्हणण्यास बराच वाव आहे. कदाचित् हा, राजकिय फायद्यासाठी न्यायालयाला प्यादे बनवण्याचा, कावा ओळखून उच्च न्यायालय सबुरीचे धोरण अबलंबत असावे,
किंवा
(आ) कोर्ट शंभर गुन्हे पूर्ण होण्याची वाट पहात असावे... (या आरोपांच्या कारस्थानांमागचा कावा स्पष्टपणे लोकांपुढे आल्यावर कारवाई झाल्यास आरोप करणार्यांना लोकांची सहानभूती मिळविणे कठीण होईल.)
नक्की काय आहे हे महिन्याभरात समोर येईलच.
फोटो बघून शेंबडे पोरसुद्धा सांगेल ते खोटे आहेत .तुम्ही सुद्धा सांगाल. असो. चालू देत केजरीवाल approach."फोटो बघून शेंबडे पोरसुद्धा सांगेल ते खोटे आहेत ."एकाचा एप्रोच तुम्हाला बायसड वाटेलनकळत सत्य बाहेर आलं.पण खरंच फिक्सर असा उघड उघड आरोप कंटेम्प्ट कायद्यात बसत नाही का?हा सरळ सरळ कैदेत टाकण्याइतका गंभीर आरोप आहे. कारण, यामुळे सर्वोच्च न्यायलयाच्या सर्व न्यायप्रक्रियेवर आणि सर्व न्यायाधिशांच्या विश्वासार्हतेवर आधात केला गेला आहे. पण, तो आरोप करणार्यांकडे मोठे राजकिय उपद्रव मुल्य (political nuisance value) असल्याने उच्च न्यायालय जरा मवाळपणे वागते आहे असे वाटते. कदाचित् ... (अ) जर कोर्टाने त्वरीत कारवाई केली तर त्याविरुद्ध आकांडतांडव करून गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याची संधी मिळेल व त्याचा केंद्रातल्या सद्य सरकारवर ठप्पा ठेवून (केंद्र व न्यायालयाचे साटेलोटे आहे, इत्यादी) कर्नाटक निवडणूकीत त्याचा फायदा उपटता येईल, त्यामुळे ही कारवाई आताच हेतूपुर्रसर केली गेली आहे हे म्हणण्यास बराच वाव आहे. कदाचित् हा, राजकिय फायद्यासाठी न्यायालयाला प्यादे बनवण्याचा, कावा ओळखून उच्च न्यायालय सबुरीचे धोरण अबलंबत असावे, किंवा (आ) कोर्ट शंभर गुन्हे पूर्ण होण्याची वाट पहात असावे... (या आरोपांच्या कारस्थानांमागचा कावा स्पष्टपणे लोकांपुढे आल्यावर कारवाई झाल्यास आरोप करणार्यांना लोकांची सहानभूती मिळविणे कठीण होईल.) नक्की काय आहे हे महिन्याभरात समोर येईलच.