Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी- भाग ३३

ख
खेडूत
Tue, 05/15/2018 - 06:46
🗣 279 प्रतिसाद
रामराम! आधीच्या धाग्यात २५० + प्रतिसाद आल्यामुळे नवा धागा काढला आहे! आजची एक बातमी: मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे. 2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त 2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त 2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली. महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे. इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या
108438 वाचन

💬 प्रतिसाद (279)
ख
खेडूत Wed, 05/16/2018 - 13:02 नवीन
'आकांक्षांपुढे जिथे गगन ठेंगणे’ या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात आज चार आदिवासी विद्यार्थ्यांना यश आले आहे. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. . या विद्यार्थ्यांचं अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 05/16/2018 - 13:17 नवीन
व्वा, मनपूर्वक अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
प
प्रसाद_१९८२ Wed, 05/16/2018 - 13:29 नवीन
विद्यार्थ्यांचं अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
M
manguu@mail.com Wed, 05/16/2018 - 13:34 नवीन
छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 05/16/2018 - 16:52 नवीन
सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
S
sagarpdy गुरुवार, 05/17/2018 - 08:28 नवीन
भारी. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ए
एस गुरुवार, 05/17/2018 - 09:03 नवीन
गिर्यारोहण आणि त्यातही एव्हरेस्ट सर करणे ही काही खायची गोष्ट नाहीये. त्यातही आदिवासी-बहुल भागासारख्या पुरेशा संधी-सुविधांची कमतरता असलेल्या भागातील या मुलांनी जे अविरत परिश्रम घेतले आणि ध्येय जिद्दीने साध्य करून दाखवले, त्याला त्रिवार मुजरा! जियो! तुम्ही महाराष्ट्राचे नाव अजूनच मोठे केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ज
जेम्स वांड गुरुवार, 05/17/2018 - 12:33 नवीन
हल्लीच स्पार्टाकस भाऊंच्या एवरेस्ट चढाई संबंधित लेखमाला वाचल्यामुळे ह्या पोरांनी काय भीमपराक्रम केलाय ते एकदम जाणवले, जियो, देव ह्यांना अजून खूप शिखरे सर करायची ताकद देऊ दे, ह्यांना कायम सेफ ठेऊ दे, हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ज
जेम्स वांड गुरुवार, 05/17/2018 - 12:34 नवीन
हल्लीच स्पार्टाकस भाऊंच्या एवरेस्ट चढाई संबंधित लेखमाला वाचल्यामुळे ह्या पोरांनी काय भीमपराक्रम केलाय ते एकदम जाणवले, जियो, देव ह्यांना अजून खूप शिखरे सर करायची ताकद देऊ दे, ह्यांना कायम सेफ ठेऊ दे, हीच प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
पिलीयन रायडर Wed, 05/16/2018 - 14:12 नवीन
खालची पोस्ट वाचनात आली. त्यातले आरोप सोडून दिले तरी आकडे खरे आहेत का? असे असेल तर नक्की कोण सत्तास्थापन करू शकतो? कुणाला राज्यपाल आधी बोलावतात? *Goa (March 2017)* Assembly Strength - 40. Congress - 17. BJP - 12. BJP was invited to form the Govt by Governor in a post poll coalition BJP+MGP+GFP. ------------------------------------- *Manipur (March 2017)* Assembly Strength - 60. Congress - 28. BJP - 21. BJP was invited to form the Govt by Governor in a post poll coalition. _(So much so, 1 independent MLA was detained at Imphal Airport through security agencies & handed over to BJP.)_ ------------------------------------- *Meghalaya (March 2018)* Assembly Strength - 60. Congress - 21. BJP - 2. BJP was invited to form the Govt by Governor in post poll coalition with NPEP+UDP+PDF+HSDPDP. ------------------------------------- *Karnataka (May 2018)* Assembly strength - 224 (222 elections held) Congress + JDS - - > 78 + 38 = 116 BJP - 104 Inspite of Post poll coalition of Congress and JDS having enough number surpassing the half way mark was not invited to form the Government. On the other hand BJPee was given a week's time to prove the strength in floor test in a weeks time. On the basis of single largest party. Now this is Called DEATH OF DEMOCRACY... Vala is facilitating Kharidanewallas.
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश Wed, 05/16/2018 - 14:16 नवीन
अजून कोणालाच बहुमत सिद्ध करायला सांगितलेले नाही , आणि हे एकांगी आहे. आधी बरेच दाखले आहेत जिथे राज्यपालांनी / राष्ट्रपतींनी सर्वात मोठ्या पक्षाला आधी आमंत्रित केलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अनुप ढेरे Wed, 05/16/2018 - 14:44 नवीन
गोव्यात काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला नव्हता भाजपाच्या आधी. भाजपाने केला. राज्यपालांनी भाजपला बोलावलं हा मोठा फरक आहे. आणि ही उदाहरणं गेल्या दोन वर्षातली आहेत. गेल्या वीसेक वर्षातली पाहिली तर कोंग्ग्रेसने जे अनेक वर्ष केलं त्याचीच फळं मिळत आहेत आता त्यांना. हे एक.

1996 : Gujarat BJP Government was dismissed by the President on advise of the PM. Vaghela split the BJP to form Govt with backing of Congress.

Name of the BJP state unit head was VajuBhai Vala.

Name of PM was HD Devegauda.

Karma is a bitch.

— Yashwant Deshmukh (@YRDeshmukh) May 16, 2018
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 05/16/2018 - 15:37 नवीन
नाही म्हणजे प्रश्न असाय की नक्की कायदा काय म्हणतो? मोठा पक्ष आधी जाणार की जो दावा करणार स्वतःच जाऊन त्याला संधी मिळणार? तसा काही कायदा नसेल तर असायला हवा ना? (आणि मोठ्या पक्षाला आमंत्रण जायला हवे असे माझे मत. भाजप ला टुकार मतं पडली तरी अनेक राज्यात सत्ता आहे. किंवा काँग्रेसनेही हे केले असेलच. पण जनादेश बघता मोठ्या पक्षाला संधी मिळायला हवी.)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 05/16/2018 - 16:18 नवीन
मोठ्या पक्षाला किंवा निवडणूक पूर्व आघाडीला. तरीपण सर्व प्रकारच्या शक्यता विचारात घेऊन १००% लिखीत घटना बनवणे अवघड आहे. हाच विषय मायबोलीवर चालू आहे. काय हाॅरिबल भाषा वापरताहेत. मिपा खरच खूप गुणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 05/16/2018 - 16:42 नवीन
आपल्याकडे नुकताच दंडुका दाखवलाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ग
गामा पैलवान Wed, 05/16/2018 - 17:36 नवीन
शाम भागवत, मुद्देसूद व संयत शब्दांत प्रतिवाद करणाऱ्या सदस्यांना हाकलून दिल्यावर भाषेची पातळी कशी होते त्याचं ज्वलंत उदाहरण आहे ते. तिथल्या लोकांची काय लायकी आहे ते जगजाहीर आहे. मात्र अशीच लोकं कुंपणावरच्या मतदारास मोदींकडे ढकलतात. त्यामुळे जे चाललंय ते चांगलंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
व
विशुमित Wed, 05/16/2018 - 18:28 नवीन
आपल्या कडे पण आता चांगले चाललंय...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
M
mayu4u गुरुवार, 05/17/2018 - 06:50 नवीन
गा पै अजून आहेत की इथं! ह घ्या हो पै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
अ
अनुप ढेरे Wed, 05/16/2018 - 16:40 नवीन
नाही म्हणजे प्रश्न असाय की नक्की कायदा काय म्हणतो?
माझ्या माहितीप्रमाणे घटनेत असा कोणताही नियम नाही की अमुक एका सिक्वेंसने बोलवाले म्हणुन. त्यामुळेच ही लफडी उद्भवतात. प्रत्येक राष्ट्रपती (केंद्र सरकारसाठी)/राज्यपाल आपापले निर्णय घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अनुप ढेरे Wed, 05/16/2018 - 16:40 नवीन
*बोलवावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ट
ट्रेड मार्क Wed, 05/16/2018 - 16:40 नवीन
जर बहुमत असेल तर प्रश्नच नाही. पण बहुमत नसेल आणि नुसताच मोठा पक्ष असेल पण बहुमत मिळण्यासाठी लागणारा पाठिंबा जमा करू शकत नसेल तर काय उपयोग? उदाहरणासहित बघू - मणिपूर (६० सीट्स) - काँग्रेस २८ सीट्स आणि भाजप २१ सीट्स. पण निकाल लागल्याबरोबर भाजपने बाकीच्या छोट्या पक्षांचा पाठिंबा असल्याचं पत्रक देऊन सत्तेसाठी आधी अर्ज केला. आता गव्हर्नरच्या दृष्टीने काँग्रेस २८ आणि भाजप+इतर मिळून ३२ सीट्स होतात. मग सगळ्यात मोठी बाजू कुठली झाली? एकदा इतर पक्षांनी लिखित पाठिंबा दिल्यावर जर ते गट बदलून काँग्रेस कडे गेले तर नियमाप्रमाणे त्यांची निवड रद्द होते आणि त्या सीट साठी परत निवडणूक होते (हा नियम असाच आहे का यावर तज्ज्ञ प्रकाश टाकू शकतील). मग या परिस्थितीत जरी गव्हर्नरांनी मोठा पक्ष म्हणून काँग्रेस ला बोलावलं तरी ते बहुमत कसं सिद्ध करणार? या ठिकाणी सविस्तर माहिती आकडेवारीसकट दिलेली आहे. या वेळेला काँग्रेसने हुशारी दाखवून आधीच जेडीपी बरोबर हातमिळवणी केली. पण त्यातही एक गडबड करून बसले. तिसऱ्या नंबरवर असलेल्या पक्षाच्या सदस्याला मुख्यमंत्रीपद देण्याचं मेनी केलं. म्हणजेच स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना डावललं गेल्याची भावना होणं आणि सगळ्यात मोठा पक्ष असूनही दुय्यम भूमिका स्वीकारायला लागल्याचं दुःख होणं स्वाभाविक आहे. एकूणच काँग्रेसमध्ये सत्ता एका व्यक्तीभोवती एकवटल्यामुळे हा निर्णय घेताना स्थानिक नेत्यांना कितपत विश्वासात घेतलं गेलं असेल याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात सत्ता स्थापन होईपर्यंत बऱ्याच गमतीजमती बघायला मिळतील असं वाटतंय. हा प्रकार काँग्रेसनेही आधी बऱ्याच वेळेला केलेला आहे (म्हणून भाजपने करावा असं नाही आणि त्याचं समर्थनही करत नाहीये) पण आपली कर्म फिरून आपला पाठपुरावा करतात हे परत एकदा खरं ठरतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 05/16/2018 - 16:44 नवीन
हम्म.. पण हे काही बरोबर नाही. आता फोडाफोडी सुरू होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Wed, 05/16/2018 - 17:14 नवीन
फोडाफोडी करावी लागेलच असं नाही. कारण बहुमत मिळवूनही तिसऱ्या नंबरच्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री करणे ज्या काँग्रेसवाल्यांना पटणार नाही ते आपोआपच फुटतील. काठावर असलेल्यांना खेचायला (फोडायला) थोडेफार प्रयत्न करायला लागतील. पण मला तरी असं वाटतंय की काँग्रेसने हे चुकीचं पाऊल उचललं. कुमारस्वामींना उपमुख्यमंत्रीपद देणं ठीक आहे, पण स्वतःला कमीपणा घेऊन त्यांना मुख्यमंत्री करणे हे अगतिकता दर्शवते. ना तुला ना मला, घाल....... तिसऱ्यालाच या म्हणीचा प्रत्यय आला. काँग्रेसचा उद्देश स्वतः जिंकावे किंवा सत्ता मिळवावी असा दिसत नसून फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे एवढाच दिसतोय. त्यामुळे आणि नेतृत्व तेवढे कर्तृत्ववान नसल्याने काँग्रेस भरकटत असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 05/16/2018 - 18:10 नवीन
बरोबर, भाजपला लांब ठेवणे हा एकच हेतू आहे. भाजप वाले सहजा सहजी हे होऊ देतील असं वाटत नाही. (जस्ट अंदाज, मला फार कळत नाही ह्यातलं!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ब
बिटाकाका Wed, 05/16/2018 - 16:45 नवीन
भाजपला निमंत्रण मिळालंय बहुतेक! -------------------- कायदा असा काहीच नाहीये हाच मूळ प्रॉब्लेम आहे. वरील उदाहरणे फक्त एक बाजू दाखवतात. दिल्ली, झारखंड, जम्मू काश्मिर आणि वर सांगितलेली उदाहरणे आहेतच. -------------------- भाजपने या केसमध्ये दावा करू नये असे मनापासून वाटते. हे सरकार किती आणि कसं चालतं हे बघायला हवं पण दुसऱ्या बाजूला असंही वाटतं कि सगळ्यात कमी जागा मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री फक्त राजकीय फायद्यासाठी आणि भाजपच्या विरोधासाठी होऊ देणे ही लोकशाहीची विटंबना होत असताना भाजपने नैतिकता कशाला कुरवळावी? काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि जेडीएसचा पाठिंबा हे परफेक्ट कॉम्बिनेशन झालं असतं. -------------------- जर भाजपकडे बहुमत नाही असा जेडीएस काँग्रेसचा दावा आहे तर मग डर कायेका? भाजप तोंडावर पडेलच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अर्धवटराव Wed, 05/16/2018 - 16:55 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
व
विशुमित Wed, 05/16/2018 - 17:05 नवीन
<<,हे सरकार किती आणि कसं चालतं हे बघायला हवं पण दुसऱ्या बाजूला असंही वाटतं कि सगळ्यात कमी जागा मिळालेल्या पक्षाचा मुख्यमंत्री फक्त राजकीय फायद्यासाठी आणि भाजपच्या विरोधासाठी होऊ देणे ही लोकशाहीची विटंबना होत असताना भाजपने नैतिकता कशाला कुरवळावी? काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि जेडीएसचा पाठिंबा हे परफेक्ट कॉम्बिनेशन झालं असतं.>> ==>> सहमत. हरीश साळवे यांचे पण काल या प्रकारचंच मत व्यक्त केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
प
पिलीयन रायडर Wed, 05/16/2018 - 18:39 नवीन
बहुमत सिद्ध होण्याआधी शपथविधी कसा काय होऊ शकतो पण? आणि बहुमत सिद्ध करायला वर 15 दिवस देणार. हे भाजप साठी अति सोयीस्कर नाही होते का? काँग्रेस आणि जेडीसचं अजून नक्की होईना म्हणून असं होतंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Wed, 05/16/2018 - 19:07 नवीन
नाही, नियमच तसा आहे. कलम ३५६ नुसार, राज्यपाल त्यांच्या विवेकानुसार सरकार तयार करू शकेल अशा पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री नेमतात. जर त्या नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बहुमतावर कुणाला संशय असेल तर राज्यपाल बहुमत सिद्ध करायला सांगतात. बहुमत हे फक्त विधानसभेतच (पक्षी फ्लोअरवरच) सिद्ध करणे गरजेचे आहे आणि माझ्या माहितीनुसार विधानसभा ही फक्त सरकार स्थापन झाल्यावरच बोलवता येते. मग एकतर मुख्यमंत्री विश्वासदर्शक ठराव आणतात किंवा विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतात. या केसमध्ये विश्वासदर्शक ठराव येईल. ------------------- भाजप आमदार फोडून स्वतःला जोडू शकणार नाही कारण काँग्रेस व जेडीएस व्हिप काढतील. त्यानुसार आमदारांना त्यांच्या पक्षाला मतदान करणे बंधनकारक ठरेल. पण आमदार गैरहजर राहू शकत असल्याने भाजप त्यादृष्टीने प्रयत्न करेल. सद्यस्थितीत भाजपकडे १०४ संख्याबळ असल्याने ते २०९ च्या सभागृहात बहुमत सिद्ध करू शकतात. म्हणजेच कमीत कमी १३ आमदार गैरहजर राहणे गरजेचे आहे. ------------------- एकदा बहुमत सिद्ध झाले की परत सहा महिने बहुमत सिद्ध करायची गरज नसते. त्यामुळे भाजपला एकदा सिद्ध केले की फोडाफोडी/जुळवाजुळवी/घोडेबाजार करायला सहा महिने मिळू शकतात. ------------------- चुकभुल देणे घेणे, काही चुकीचे असल्यास दुरुस्ती करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 05/16/2018 - 19:22 नवीन
अच्छा! हे माहिती नव्हतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
अ
अर्धवटराव Wed, 05/16/2018 - 19:42 नवीन
तुम्ही अगदी नेमका प्लॅन सादर केला :ड उ.प्र. मधे कल्याणसींग सरकारचे वेळी हि असली नाटकं खुप झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ज
जेम्स वांड गुरुवार, 05/17/2018 - 04:44 नवीन
विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रेस्पॉंसीबीलिटी! रात्रभर कोर्ट चालवून भाजपने फक्त आपली प्रतिमा डागळुन घेतलीये, सत्ता (तूर्तास) सोडली असती तरी ही युती येत्या वर्षभरात किंवा दीड वर्षात तुटलीच असती (बिहारचे उदाहरण). आता मात्र जरा वेगळंच विचित्र वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 05/17/2018 - 06:42 नवीन
एकमेव गोष्टीमुळे या प्रकारात भाजपचं समर्थन करावं वाटतंय ते म्हणजे कुमारस्वामींचं मुख्यमंत्री होणं. २०१ पैकी फक्त ३८ जागा जिंकणार्यांना विनाशर्त मुख्यमंत्री बनवणे हे अजिबात पटले नाही. काँग्रेसने स्वतःचा मुख्यमंत्री बनवला असता, वाटाघाटी केल्या असत्या तर गोष्ट वेगळी होती. कसंही करून भाजपला बाहेर बसवायचंय हे जर नैतिक असेल तर काहीही करून भाजपने सत्तेत येणंही (दुर्दैवाने) नैतिक म्हणावं लागेल. ------------------------------------ या संपूर्ण सत्ताकारणाच्या गोंधळात कोणीही काहीही संविधानाच्या बाहेरचं करत नाही त्यामुळे प्रत्येकजण आपण कसं बरोबर आहोत हे सांगत सुटला आहे. विचित्र आहे हे सगळं. ------------------------------------ २०१९ मध्ये काँग्रेस जेडीएस एकत्र लढण्याच्या शक्यतेला गृहीत धरून भाजपने कर्नाटकची सत्ता सोडणे परवडणार नाही हे ताडले असावे. २०१९ च्या निवडणुकीआधी पॉप्युलर निर्णय घेऊन प्रभाव पाडता येईल वगैरे विचार असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
M
manguu@mail.com गुरुवार, 05/17/2018 - 07:35 नवीन
एकदा युती झाली की कुणाचा का करेनात मुख्यमंत्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 05/17/2018 - 08:13 नवीन
मंग तेच तर म्हणतोय, भाजपने पण काय पण करुदेकी कायद्यात राहून, काय फरक पडतोय. ----------------------------- काँग्रेसचे १२ आमदार या अशा आघाडीने नाराज आहेत. ते कोणाच्या बाजूने आहेत हे विधानसभेत बहुमताच्या वेळी कळेल तोपर्यंत वाट बघायला पाहिजेकी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
अ
अर्धवटराव गुरुवार, 05/17/2018 - 15:02 नवीन
फक्त ३८ जागा जिंकणार्यांना विनाशर्त मुख्यमंत्री बनवणे हे अजिबात पटले नाही.
सरकारच्या स्टेबिलिटीबद्दल हे लॉजीक असेल तर ठीक. अन्यथा या न्यायाने तर मग राज्यसभा/विधानपरिषदच्या सदस्याने मंत्रीमंडळात यायलाच नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 05/17/2018 - 15:37 नवीन
काही कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते (किंवा मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले नाही). २०१ जागांवर जनतेसमोर जाऊन ज्याला ३७ जागा मिळालेल्या त्याला जनतेने नाकारले आहे हे उघड आहे. जनादेश भाजप, काँग्रेस आणि मग जेडीएस असा आहे. भाजपला सरकार स्थापता येत नसेल, जोडाजोडी करता येत नसेल तर दुसरा पर्याय हा काँग्रेसच असायला हवा ना या परिस्थितीत? ---------------------------------- विधानपरिषद किंवा राज्यसभा सदस्यांचा निवडीचा मार्ग आणि गरज आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, त्याचा इथे काय संबंध तेही कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
M
manguu@mail.com गुरुवार, 05/17/2018 - 15:59 नवीन
पण युती झाली की दुसरा व तिसरा हे एकत्र मिळून पहिल्यापेक्षा मोठे होतात. तुमचे लॉजिक लावायचे तर गोवा, बिहार, मणिपुरातून भाजपाने तोंड काळे करायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 05/17/2018 - 18:37 नवीन
उगाच सेन्सेशनल वक्तव्य करण्यापेक्षा गोवा/मणिपूर/बिहार (नक्की बिहार?) आणि कर्नाटक यात काय साम्य यावर बोला. तुम्ही म्हणता त्या राज्यांमध्ये काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावा केला होता का? दोन पैकी एक निवड झाली की एक पैकी एक याची माहिती असेल तर द्या. मुळात स्वतः दावा केला नाही कारण तशी जुळवाजुळवच करता आली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
अ
अर्धवटराव गुरुवार, 05/17/2018 - 16:32 नवीन
सर्वात कमि सदस्य निवडुन आलेल्या पार्टीला मुख्यमंत्रीपद देऊ नये असं जर लॉजीक असेल तर जो व्यक्ती प्रत्यक्ष लोकांमधुन निवडुनच आला नाहि (विधान परिषद/राज्यसभा ) त्याला सरकारमधे काहिच स्थान असुन नये. विधानसभा/लोकसभेच्या सदस्यांनी निवडुन दिलेल्या राज्यसभा/विधानपरिषद सदस्याला जर सरकारी उच्चपद भुषवता येत असेल तर त्याच सदस्यांनी ठरवलेला, अल्प निर्वाचीत सदस्य असलेल्या पार्टीचा का असेना, व्यक्ती मुख्यमंत्री होण्यात काहिच जैर नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका गुरुवार, 05/17/2018 - 18:28 नवीन
असो, तुमचा माझा मुद्दा वेगळा आहे त्यामुळे अजून मत मांडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 05/17/2018 - 17:42 नवीन
रात्रभर कोर्ट चालवून भाजपने फक्त आपली प्रतिमा डागळुन घेतलीये भाजप का बरं कोर्टात जाईल? त्यांना पाहिजे तसा निकाल गव्हर्नरांनी दिला आहे. इथे पूर्ण बातमी वाचा. प्रत्येक वेळी फक्त भाजप/ मोदी/ शहा यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून काय होणार आहे? लगेच दुसऱ्या दिवशी शपथविधी ठरला म्हणून काँग्रेस/ जदसे यांनी पळापळ करून कोर्टात शपथविधी थांबवण्यासाठी अर्ज केला व मध्यरात्री कोर्ट चालवून शपथविधी थांबवावा अशी मागणी केली. आता यात गोम अशी आहे की बहुमत सिद्ध करायचं तर ते फक्त विधानसभेत होऊ शकतं. विधानसभा कोण बोलावू शकतं? तर ते फक्त मुख्यमंत्री करू शकतात . म्हणजे कुठलाही पक्ष जर बहुमत करू इच्छित असेल तर मुख्यमंत्री असणं आणि त्यासाठी शपथविधी होणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने तसेही कोर्ट त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ करू शकत नव्हते. मग काँग्रेसने एवढी पळापळ करून काय मिळवलं काय माहित? त्याऐवजी तीच ताकद त्यांनी भाजपला बहुमत सिद्ध करता येऊ नये यासाठी वापरली असती तर? इथे त्यांचेच काही आमदार सापडत नाहीयेत म्हणून आरडाओरडा चाललाय. थोडक्यात काय काँग्रेसला कळत नाहीये काय चाललंय आणि त्यांची पुढची चाल काय असावी हे पण ते ठरवू शकत नाहीयेत. वर पिरा म्हणल्याप्रमाणे १५ दिवस बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्त वाटत आहेत. तर त्यावर आक्षेप घेता येतो का ते बघायला पाहिजे होतं. जर १५ दिवसाचा कालावधी कमी करता आला असता तर तेवढाच वेळ भाजपाला आमदार गोळा करण्यासाठी कमी मिळाला असता. बादवे मिस्टर वांड, तुमचे माहितीचे स्रोत कोणते आहेत? जरा कुतूहल वाटलं म्हणून विचारतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ग
गामा पैलवान Wed, 05/16/2018 - 17:41 नवीन
ट्रेड मार्क,
काँग्रेसचा उद्देश स्वतः जिंकावे किंवा सत्ता मिळवावी असा दिसत नसून फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे एवढाच दिसतोय. त्यामुळे आणि नेतृत्व तेवढे कर्तृत्ववान नसल्याने काँग्रेस भरकटत असावी.
काँग्रेसचं नेमकं उद्दिष्ट काय असा प्रश्न उपस्थित होतो. जर जदसेशी युतीच करायची होती तर परस्परविरोधांत निवडणूक लढवलीच कशाला? निवडणूकपूर्व युती केली असती तर आज मतांच्या टक्केवारीत काँग्रेस + जदसे मिळून ५६ % मतं मिळाली असती. यांपुढे ३६% मतं मिळवणारा भाजप पालापाचोळ्यासारखी उडून गेला असता. पण लक्षांत कोण घेतो! तुम्ही म्हणता तशी नेतृत्वाचं कर्तृत्व कमी पडंत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Wed, 05/16/2018 - 22:13 नवीन
जर काँग्रेस आणि जदसे यांनी आधीच युती केली असती तर भाजपाला निवडणूक फारच जड गेली असती. पण त्यासाठी तेवढा दूरदर्शीपणा असलेले नेतृत्व पाहिजे. आता सुद्धा काँग्रेस अध्यक्ष कुठे गायबलेत कोण जाणे. बहुतेक निवडणुकीनंतरच्या श्रमपरिहाराला गेले असावेत, तशी घोषणा त्यांनी आधीच करून ठेवली होती. गडबड अशी आहे की, सध्याचे काँग्रेस अध्यक्ष स्वतःहून कोणाशी युती करायला जात नाहीत. दुसऱ्या कोणी यांच्याबरोबर युती करायची म्हणलं तर त्यांना काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास नाही. आपण निवडणूक का हरतोय हे सुद्धा कदाचित काँग्रेस नेत्यांना कळत नसेल मग त्याची कारणमीमांसा करून, चुका दुरुस्त करून पुढे कसा विजय मिळवता येईल याची रणनीती कोण, कधी आणि कशी ठरवणार? इथे तर युवराज सुट्टीवर गेलेले दिसतात. दुसऱ्या कोणी ठरवली तरी युवराज ती रणनीती मानतीलच याची काय खात्री? असं ऐकिवात आहे की मायावतींनी काँग्रेसला जदसे बरोबर युती करायचा आणि कुमारस्वामींना मुख्यमंत्री करायचा सल्ला दिला आणि एक से एक अनुभवी नेते असलेल्या काँग्रेसने तो जसाच्या तसा मानला. तरी मायावतींच्या पक्षाची एक सीट निवडून आलीये, नशीब त्याला मुख्यमंत्री करा असं म्हणत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
भ
भंकस बाबा गुरुवार, 05/17/2018 - 04:41 नवीन
नेतृत्वचं कमी डोक्याचे आहे, मुख्य शत्रु भाजप आहे हे माहित असून देखील व त्रिशंकु विधानसभेचे संकेत असुनदेखिल युवराज पंतप्रधान बनण्याचे शेखचिल्ली स्वप्न पहात होते आणि जाहिर ही करत होते . अशा माणसाला आपल्या डोक्यावर घेऊन नाचने कोणता पक्ष स्विकारेल , जर कोंग्रेसचा मुख्यमंत्री ही संकल्पना घेऊन जेडीएस कड़े गेले असते तर तिथेच वाटान्याच्या अक्षता मिळाल्या असत्या. कारण पुढे लोकसभा निवडणुकात कोंग्रेसने तड़जोड केली नसती वर सुधारणाचे गाजर कन्नडिगाना दाखवून आमच्या मुख्यमंत्रयाने केले असे ढोल बडवले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
M
manguu@mail.com गुरुवार, 05/17/2018 - 08:54 नवीन
पूर्वी भाजपे 2- 3 अशाच जागा जिंकायचे , तेंव्हा त्यांचे लोक पंतप्रधानपदाची स्वप्ने बघत नव्हते का ? संघ 1925 , जनसंघ असेच कधीतरी 1951 , भाजप 1980 ..... ह्यांनाही स्वप्ने बघायचा अधिकार होताच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/17/2018 - 09:46 नवीन
काँग्रेसने ताबडतोब नेतृत्व बदल केला पाहिजे असे ह्यांचे मत. काँग्रेस पक्षात नेत्यांची संख्या जास्त आहे.पूर्वी जो काही सहकारी चळवळ्, बॅन्का,जिल्हा परिषद.. पाय होता तो जवळपास संपुष्टात आला देशभरात.. राहूल ह्यांच्या आजुबाजुचे लोक नेते कमी व खुषमस्करे जास्त अहेत. पाया मजबूत होत नाही तोवर फरक पडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका गुरुवार, 05/17/2018 - 10:42 नवीन
अजूनही अधक्षमहोदय धडा घ्यायला तयार नाहीत. कर्नाटकमध्ये जे चालू आहे ते फक्त पाकिस्तानात होते म्हणे. अजूनही हे महोदय, भाजप/संघ दलितविरोधी आहे आणि वेमूला सारख्यांना वर येऊ देत नाही यातच गुरफटलेले आहेत. ----------------------- तसंही माई, तुमच्या मते कोण आहेत काँग्रेसमधले अध्यक्ष होण्याच्या लायकीचे नेते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
आ
आनन्दा Fri, 05/18/2018 - 03:24 नवीन
युवराज नाहीत ते आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
स
साहना गुरुवार, 05/17/2018 - 10:22 नवीन
JDS आणि काँग्रेस ह्यांत विस्तव जात नाही. कर्नाटकातील बहुतेक लोकांना हे ठाऊक आहे. आता सुद्धा काँग्रेस ने सपशेल लोटांगण घेऊन JDS ला बिनशर्त पाठिंबा दिला आहे म्हणून निर्ल्लज पणे कुमारस्वामी घोड्यावर बसू पाहत आहेत पण हाच निर्ल्लज पणा आधी दाखवला असता तर लोकांनी त्यांना काळे फासले असते. JDS काँग्रेस युती म्हणजे शरद पवार आणि शिवसेना युती इतकीच अशक्य गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा