शब्द झाले मोती.. - २
शब्द झाले मोती..१
मागील धाग्याबद्दल :
या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले.
नियम :
तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही.
उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..
दूर चालली चिमणी माझी.. काळजाच्या आरपार... थेंब थेंब मोती ओला.. ओघळला गालावर.. रिते झाले गाव माझे.. रित्या झाल्या भावना दूर वाजते सनई चौघडे.. त्याला आभाळ पुरेना..इतके खरे कसे लिहू शकता आपण?क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला त्यांचा हा भाळ रेअंधार म्हंटले की मला आठवते हे सगळे.. अंधारतली माणसे.. अन.. पुनवेची चिमणी...मुळ कविता : गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने.. आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त. आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा..गाणे https://youtu.be/yCrF5yQKlqM माझा अर्थ मला माहीत आहे, मी उंच नभ होतो तुझ्या पुढे... प्रिये , माझ्यापुढे तू अतिशय खुजी होऊन गेली होती.. माहीत आहे मला. तरीही मला माहीत आहे तुझ्या जगाचे सारे आभाळ मी व्यापले होते.. नव्हे मीच तुझे आभाळ होतो.. पण माफ कर प्रिये.. या आभाळाला तुझ्यात कधी समरसून जाता आलेच नाही.. माझे नक्षत्रांचे देणे तुला कधी देता आलेच नाही... _____ माझ्याकडे, बोलायचे राहिलेले आता खुप सारे आहे, अताशा त्या शब्दांच्या कळ्याच राहिल्या आहेत माझ्या मनात...अजुनही... त्या शब्दांची..त्या कळ्यांची फुले कधी झालीच नव्हती..तुझ्या साठी... त्या मुळे तुझ्या आठवणींची पाने आणि माझे डोळे दोन्ही ओले आहेत.. ||१|| तू आता या जगातून जायच्या तयारीत आहेस.. तरीही तुझे हे आभाळ तुझ्याकडे अजुनही आले नव्हते..तुला पाहिजे तसे... पण या तुझ्या अखेरच्या प्रवासात.. तुझ्या अखेरच्या श्वासांसाठी मी उगाच तुझ्याकडे खोटे हसू घेवून आलोय.. दुसरे आहे तरी काय माझ्याकडे तुला देण्यासारखे..? मी ना तुला कधी काही दिले ना काही देवू शकलो.. आता तुझ्या कडे आलोय तरी, तुझ्या मनासारखे मी जगु शकत नाही.. कारण तुझ्या श्वासांची ही शेवटची तडफड पाहतोय मी.. मग आता तुझ्या शेवटापर्यंत प्रत्येक दिवस मला ओझेच वाटतोय.. तुझ्या माझ्याप्रती असलेल्या अपेक्षांचे... आणि रात्र झाली की तुझ्या बद्दलच्या राहिलेल्या गोष्टी माझे मन पोखरून टाकतात.. जनू त्या माझे रक्त शोषीत आहेत असेच वाटते.. ||२|| आता ह्या असल्या रात्री विचार करताना, मला कळते आहे, माझे मन आधी तुझ्यापाशी कधी नव्हतेच.. नव्हे त्या मनाला तुझे कधी काही सोयरसुतक वाटलेच नव्हते.. आता या क्षणी माझी चुक माझ्या लक्षात आली आहे, पण आता काय करायचे ? नक्षत्रांचे हे देणे तुला कधी या आभाळाला देता आलेच नाही. पण आता या क्षणी मी त्या मनाचा दगड ,अन तुला दिलेले दु:खाचे घाव, डोळे मिटुन उगाच आठवतोय... आणि माझ्या शब्दांची तुझ्यापाशी कधी फुले झालीच नव्हती, त्या अश्या मी न बोललेल्या शब्दकळ्यांचे निर्माल्यच झाले येथे.. तुझ्या आयुष्यापाशी... आणि तुझ्या आठवणींचा पाचोळा उडतोय सैरभैर ..... ----------- शब्दमेघतू हसलीस की फुले उमलु लागतात अन त्याचे रंग, तुझ्या ओठांवर खुलू लागतात.. तू अशीच हसत रहा.. सर्वांचे मन मोहत रहा.. माझी नसताना पुन्हा माझीच होत रहा..त्या डायरीच्या शेवटी एक गाणे लिहिले होते, ते नंतर देतो.. अश्या किती आठवणी आपल्या प्रत्येक गोष्टीला चिकटुन बसलेल्या असतात नाही ? आयुष्याच्या या परिघात आपण मात्र अश्या असंख्य गोष्टी, असंख्य आठवणी बर्याचदा विसरुन गेलेलो असतो.. पण पुन्हा जेंव्हा हे समोर येते तेंव्हा त्या आठवणी सरकन डोळ्यासमोरुन जातात.. जनु तो काळच पुन्हा अवतरतो डोळ्या पुढे... फोटोंचे पण अगदी तसेच, माझ्या कडे २-३ पेन ड्राईव्ह भरुन फोटो आहेत.. लॅपटॉप मध्ये ही आहेत.. लग्ना नंतर मात्र मी प्रत्येक ट्रीपचे फोटो.. मग सिलेक्टेड फोटोज असे फोल्डर केले आहेत. त्यात फॅमिली ट्रीप, वयक्तीक ट्रीप , ट्रेकिंग, आराध्या, आराध्या फेवरेट.. असे असंख्य फोल्डर आहेत. पण मला डिजीटल फोटो पहायला आवडत नाही.. मी ट्रीप प्रमाणे असंख्य अलबम प्रींट करुन आणले आहेत. ते अलबम पहायला जी मज्जा येते ती दुसरी कशातच नाही. बर्याचदा आराध्याचे फोटो पाहतो, काल तीच्या जन्माच्या ओळी लिहितानाच तीचे फोटो पाहिले होते.. आमचे फोटो पाह्यचे झाले तर केरळ चे किंवा हिमाचल चे फोटो पाहतो मस्त वाटते.. येथे ह्या दोन्हीचे धागे लिहलेले आहेत ते आठवले.. २०१३ नंतर प्रवासवर्णन बंदच केली मी लिहायला... सुख-दु:खाचा खेळ तर चालुच असतो.. पण तो काळ पुन्हा अनुभवने हे सुखच असते... काळाच्या विरुद्ध जाऊन जुने क्षण आनंदाने जगण्यासारखे दूसरे सुख नाहीच. --------------------------------- वरती माझेच लिहिलेले पुन्हा वाचले..अताशा एक सारखेच प्रतिसाद झालेत का काय माझे असे उगाच वाटुन गेले.. पुढच्यावेळेस असले आठवणींचे आठवण्या पेक्षा साधे सरळ काही मनात यावे असे वाटते.. म्हण्जे थोडे मजेचे.. रोजचे क्षण ... आठवणींच्या बाहेरचे आयुष्य पण सुंदर आहेच .. सुंदरता ही रोजच्या गोष्टीत असते.. म्हणुन तर त्याच्या सुंडर आठवणी असतात नाही.. ?In the hope that they will return... The blooming flowersWow, येव्हढ्याश्या चिमुकलीचे हे इतके सुंदर विचार.. मस्तच.. ---------------- तुझ्याबद्दल, अरे, तू मला सांगायचा लिही राव, अन आता इतक्यात काही उतरेल अशी आशा नाही.. कविता जाऊदे.. विचार तर लिहू शकशील कि.. वेळ मिळाला कि लिही.. तू अन किसना मुंबईत भेटलेले हे दोन मित्र कायम मला त्या तिथल्या समुद्राची आठवण करून देतात.. असे काहीसे अथांग, अनंत आपल्या बरोबर आहे असेच भासायचे... पण तो समुद्र कधीच हाती लागायचा नाही.. तुझी समुद्राची कविता मला कायम आठवते ती आता सापडत नाहीये.. देतो का?गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन माहेरवाशीन पोरिसारखी, चार भिंतीत वाचली मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र नाचलीअजुन पण हसतो आहे... ---------------- जाता जाता कुसुमाग्रज यांच्या दोन कविता आठवल्या , विशाखा मधील त्यातील ह्या दोन ओळी मला लय आवडतात "काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात दूर देशी उभे, दिवसाचे दूत" आणी त्यांनी लिहिलेली शेवटच्या कवितेतील ह्या ओळी उगवतीचे उन आता, मावळतीला चालले आहे. मार्गक्रमण मार्गापेक्षा मरणात अधिक साचले आहे..