शब्द झाले मोती.. - २
शब्द झाले मोती..१
मागील धाग्याबद्दल :
या धाग्याला पुन्हा २०१५ प्रमाणे पुन्हा सुरुवात करावी म्हणतोय.. भाग -१ मध्ये जरी धाग्याला मी सुरुवात केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी ..आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर अनेक जनांनी ही यात मजा आनली..आपण एकमेकांना ओळखत ही नव्हतो आणि काय सुंदर नाते विनले गेले.
नियम :
तेंव्हा सारखेच आता ही वाटते आहे.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले.. जसेच्या तसे ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
नोटः कृपया, +१, भारी. छान असे रिप्लाय देवू नये.. ही एक डायरीच होते एकमेकांची, नंतर कधी ही वाचावी अशी , अश्या रिप्लाय ने मध्ये निट वाचता येत नाही.
उलट तुम्ही ही काहीही लिहा .. जे वाट्टेल ते.. वरच्या रिप्लाय ला अनुसरुन किंवा आपल्या मनातले बेधडक..
पुण्यातली माणस लिहिते हळू हळू.:-)रम्य हाक आठवणींची.... उंबरठा ओलांडतांना माप सुखाचे अमाप सांडले सप्त रंगात रंगली पाऊले नको फिरू मागे .. कोणाला आठवतांना...असच होत त्या आठवणींची मौजच अनोखी....किती किती पाऊले चाललो न थकता न थांबता,म्हणूनच आजही ती धावपळ तो उत्साह मनाला आनंद देऊन जातो. मी तेव्हा अशी वेंधळी होते...कि पुण्यात आल्या आल्याच पीएमटी मध्ये माझी पर्स चोरीला गेली...हाय राम ..वेलकम वेंधळी मुलगी असच काहीस झालं...रडणार कोण पण ?मलाच हौस ना .पण पैसे एका ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याच्या सवयीमुळे बरोबर अजून पैसे होते...नतंर बाबांनी येऊन मला नवीन पर्स घेऊन दिली होती ‘विजय’ मधून जी मी आता पर्यत जपून ठेवली होती ....बरकत होती त्या पर्सला ,कधीच पैसे संपायचे नाहीत.आता ती पर्स गिरीजाला खेळायला दिली आहे.(अशाच दोन पर्स माझ्या चोरीला गेल्या ..पर्स चोरीला जाण्यापेक्षा त्या सगळ्या पर्स गिफ्ट होत्या म्हणून जास्तच वाईट वाटायचे) . तर ऑफिसासाठी मुलाखत चांगली झाली.निवड झाली ,राहायचा प्रश्न ?तर दादाकडे राहणार होते.तर तिथेच माझी ओळख नवीन मैत्रिणीशी झाली सोनाक्षी,सारिका यांच्याशी.सोनाक्षी खूपच बडबडी होती,मराठी शिकवायची,स्पष्ट बोलायची.अशी मोकळी राहणारी ,छान बोलणारी जे मनात ते ओठावर बोलणारी मुलगी मी पहिल्यांदाच पाहिली होती.तिच्याशी मारलेल्या एकूण एक गप्पा मला अजून आठवतात.सोनाक्षी सप जवळच राहायची ,तीच नवीनच लग्न झाल होत.नवर्याविषयी भरभरून बोलायची,त्यांचे दोघांचे फोटो दाखवायची. तेव्हा मला वाटायचं मलाही असाच नवरा मिळायला पाहिजे.ऑफिसमध्ये आमचे डेमो लेक्चर व्हायची ज्याचा मला पुढे खूप फायदा झाला.सोनाक्षीने मला खूप शिकवलं कसे बोलायचं ,तिच्यामुळे मी वेगळीच मला सापडले,कधी कधी मी जास्तच टेन्शन घ्यायचे ती मला बहिणीप्रमाणे समजावायची.पुढे ती मी आणि सारिका असा ग्रुप झाला .धमाल करायचो आम्ही ..तर माझ घर जवळ होत आणि दुपारी कोणीच नाही तेव्हा माझ्या घरी पावभाजी करायचा बेत सोनाक्षीनेच केला ...मला पावभाजी यायची आधीपासून पण हिने मला अजून चांगल्या प्रकारे शिकवली...नन्तर या घरी गेल्या.दादा संध्याकाळी आला,एवढी पावभाजी का केली ? विचारलं तेव्हा सांगितलं कि “मैत्रिणी आल्या होत्या...आंम्ही केली वगैरे”दादाचा चेहरा चिंताग्रस्त झाला...म्हणाला “हे पुणे आहे .अस ८-१० दिवस ओळखीच्या लोकांना घरी नाही आणायचं”,खरच मी त्याला आधी विचारलं पाहिजे होते....पण यां काळात मी स्वैपाक शिकले..पोळ्या नाही शिकले त्या आम्ही विकत आणायचो..म्हनुनच नवरा अजून पण तुला चांगल्या पोळ्या जमत नाही म्हणून ओरडतो. ..पण भाजी तूच कर अस सासरी कौतुक असत...पुढे वहिनी आल्यावर गोड पदार्थ मी शिकले..मी एक रेसिपी पुस्तक घेतलं होत,..मस्त होत ते त्यातले सगळे पदार्थ मी बनविले.तेव्हा यु ट्यूब नव्हत..बर झाल नव्हत नाहीतर अस पारंपारिक जेवण मी शिकले नसते. सोनाक्षी बरोबर मी तुळशी बागेत खूप फिरायचे,तिने पहिल्यांदा मला जीन्स घेऊन दिली जी मी अजून नाही वापरली ...तशीच पडली..पुढे दगडूशेठ ,मंडई,तुळशी बाग असा माझा बराचदा क्रम असायचा आता काय स्वत:चे पैसे मिळत होते ,मस्त खरेदी करायचे..इतके फिरायची कि दादा मला तुळशी बागेत सोडून घरी पळून गेला होता (हा हाहा).तेव्हा मी दीपिका सारखा ड्रेस घेतला होता...स्वत:वरच खुश होते,त्याचावर काढलेला फोटो आजही माझा जीमेलचा प्रोफ़ाईल फोटो आहे. मी पुण्यात वाचनालय लावलं होत ,,खरच नाव आठवत नाहीये पण हुजुरपाग्याच्या पुढेच त्या रोडवर होत ते...मस्त पुस्तक वाचायची ...लिखाण करायचे ,दादा मुद्दाम माझ्यासाठी laptop चालू ठेऊन ऑफिसला जायचा ,मी लिहिते हे मी घरी कोणा कोणालाच नाही सांगितलं..माझच विश्व होत ते...स्वप्नातलं... मी सोनाक्षी बरोबर माझे कांदे-पोहेच्या गोष्टी सांगायचे,ती मला सांगायची”लग्न तुला करायचय नीट विचार कर”,तसच ती सारिकाला पण तिच्या संसाराच्या चार गोष्टी समजावून सांगायची...हिला कस जमत हे सगळ काय माहीत?..मला वाटायचं. पुढे नवीन बॉस आला होता ,माझ्या कामच कौतुक करायचा सगळ्यांसमोर तर आमची सोना “तुझ्यासारखाच दिसतो हा ,तुझ्यावर लाईन मारतोय ,आम्ही काय चांगल काम करत नाही का म्हणायची” मी तर मनातच कोपरापासून तिला नमस्कार करायचे. पुढे अजून एक दिपाली नावाची एकदम मॉड मुलगी आली ,सोना आणि हीच कधीच पटल नाही..ह्या दोघी एकदा खूपच भांडल्या होत्या.दीपाचा नवरा दुबईला होता ती त्याला खूप मिस करायची..आमच काम संपल मी घरी जायला निघालो,तर खाली दीपाचा नवरा तिला सरप्राईज द्यायला आला होता थेट दुबुईहुन...दीपाने पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली...सगळे पाहतच बसले....मला तर हे सगळ नवीनच होत...तेव्हा मी अशी काकूबाई होते कि बस... सीमा हिंदी शिकवायची ,तीच घर नाना पेठेत होत.एकदम पुणेरी वातावरण होत तिच्या बोलण्यात वागण्यात...ती आणि मी जिम पार्टनर होतो,तीच लग्न ठरलं होत ,तर माझ ठरायच होत.तीच वय बरच होत,पण गोड पुणेरी बोलायची.एक कोकणातली देखील मैत्रीण होती....खूपच हुशार होती ,ती पिजी म्हणून राहायची ,मला पहिल्यांदा पिजी हा प्रकार समाजला.तिच्यामुळे मला कोकणातले लोक किती साधे पण हुशार असते याची झलक मिळाली. या सगळ्यांमध्ये आज फक्त सोनाक्षी माझ्या संपर्कात आहे ,,,कारण ती तशीच आहे गोड आणि मोकळी...तिच्याशी बोललं कि मला छान वाटत..शेवटी माणस मनात घर करतात आणि तिथे कायम फार थोडी राहतात ,,,अशी सोना... -भक्ती