राजकारण

नोव्हेंबर २०२२ - चालू घडामोडी (१)

Primary tabs

१) पाकिस्तानातील एका सभेत इम्रानखान व इतर ९ जणांवर AK-47 बंदुकीने गोळीबार झाल्याने सर्व ९ जण जखमी झाले आहेत. एक नागरिक मरण पावला आहे. इम्रानच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.

२) गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १ डिसेंबर व ५ डिसेंबर हे मत देण्याचे दिवस आहेत. मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

श्रीगुरुजी

मुद्दाम नवीन धागा काढला कारण मी कचऱ्यात हात घालत नसतो.

मोदी सरकारचा मोठा प्लान; 'त्या' ४० हजार कंपन्यांना टाळं ठोकणार; पण पै न पै वसूल करणार

https://maharashtratimes.com/india-news/central-govt-decided-to-de-regi…

हे केंद्र सरकार, योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे ...

प्रताप सरनाईकांना ईडीचा झटका, तात्पुरती ताब्यात घेतलेली ११.२ कोटींची मालमत्ता जप्त होणार!

https://www.loksatta.com/maharashtra/pratap-sarnaik-11-crore-property-to...

आता मालमत्ता जप्त झाली तरी, भाजपला दोष देण्यात येईल आणि जप्त नाही झाली तर, आयतेच कोलीत मिळेल.... ED ही केंद्रीय संस्था आहे आणि तिची स्वतःची अशी नियमावली आहे, ही मुलभूत गोष्ट, भाजपद्वेषी लक्षांत घेणारच नाहीत ...... डब्बल ढोलकी लोकांची जगांत कमतरता नाही....

तर्कवादी

हे बरंय... दोन्ही गटांनी एक एक धागा वाटून घ्यायचा.. तसंही चालू घडामोडी या धाग्यांत फक्त दोन गट आणि त्यांचे अजेंडाच तेवढे उरले आहेत.

“शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही,” महाविकास आघाडीवर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले “आम्हाला संभ्रम…”

https://www.loksatta.com/maharashtra/nana-patole-comment-on-maha-vikas-…

म्हणूनच तर काही काळा नंतर, बाळासाहेब ठाकरे यांनी, कॉंग्रेस बरोबर युती केली न्हवती....

केंद्रीय निवडणूक आयोग शंभर टक्के निष्पक्ष! ; मुख्य आयुक्त राजीव कुमार यांचा दावा

https://www.loksatta.com/desh-videsh/central-election-commission-is-100…

निवडणुकीची घोषणा केली की, राजकीय पक्ष वा उमेदवार विनाकारण नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

------

सुरिया

अरे वा.
कचर्‍यात हात न घालता जेसीबी लावून भरपूर कचरा गोळा करताय की.
करा करा,
शुभेच्छा कचराशेठ होण्यासाठी.

श्रीगुरुजी

पुरे की आता. नाहीतर घाबरून सदस्य मिपावरून पलायन करतील.

लोचटपणा करणारे, आत्मसन्मान नसलेले, डुआयडी येणारच ....

किंबहुना, अशी डुआयडी कस्पटे, (आत्मसन्मान नसलेली व्यक्ती कस्पटासमानच असते), ह्या ना रूपांत परत परत येणारच...

अशा, आत्मसन्मान नसलेल्या व्यक्तींना फाट्यावर मारणेच उत्तम ...

वरील प्रतिसाद हा, श्रीगुरूजी यांनाच आहे... उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये.....

अमृतसर येथील गोपाळ मंदिराच्या बाहेर कचऱ्यात देवांच्या मुर्ती सापडल्या होत्या. यावरून मंदिराच्या बाहेर सुधीर सुरी आंदोलनाला बसले होते. तेव्हाच गर्दीतून आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत सुधीर सुरी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर आनन-फानन रुग्णालयात सुधीर सुरी यांना दाखल करण्यात आलं आहे.
ही बातमी

हल्लेखोरांनी सुधीर सुरींचा खून करण्याचा प्रयत्न केला तर लोकसत्ताने मराठी भाषेचा खून केला. बातमी वाचल्यावर आनन फान रुग्णालय कोठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला पण शोध लागला नाही. लोकमत आणि मटा मधे पण रुग्णालयाच्या नावाचा उल्लेख नाही.

श्रीगुरुजी

दिल्ली महापालिकेच्या सर्व २५० प्रभागांसाठी ४ डिसेंबर या दिवशी निवडणूक होणार असून ७ डिसेंबरला मतमोजणी होईल.

मदनबाण

सध्या संभाजी भिडे हे कुंकावरील विधाना नंतर पुन्हा चर्चेत आणले गेले आहेत. हिंदूद्रोही मिडियाला या विषयावर खरी मिर्ची शेफाली वैद्य यांच्या नो बिंदी नो बिझनेस या कँपेनमुळे लागली होती. भिडे गुरुजी हे सॉफ्ट टार्गेट असल्याने आता हिंदू विरोधी मिडिया कुंकू-टिकलीचा महिलांच्या कर्तृत्वाशी संबंध काय ? पासुन स्त्री स्वातंत्र्य,स्त्री मुक्ती आणि काय मिळेल ते बोंबलत बसलेत, पण हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे हे कोणताही मिडिया मात्र मुद्दामुन सांगत नाही !
असो... या कुंकु-टिकली विषयावर जे काही पाहिले / वाचले ते इथे देऊन जातो.

“कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Courage is knowing what not to fear.” :- Plato

हे पण व्यक्ती स्वातंत्र्य आहे

जाऊ दे...

---------

कुंकू टिकली वादावर शरद पोंक्षे यांचा अप्रत्यक्ष टोला! चर्चचा फोटो शेअर करत म्हणाले, “पाद्रींचे आडनाव भिडे…”

https://www.loksatta.com/manoranjan/marathi-actor-sharad-ponskhe-speaki…

शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये एका चर्च बाहेरचा फोटो शेअर केला आहे. पोस्टला कॅप्शन देत म्हणाले, ‘एका चर्चच्या बाहेर लावलेला फलक. यात स्त्रियांनी काय कपडे घालावे याच्या सूचना आहेत. पाद्रींचे आडनाव भिडे/कुलकर्णी नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही.’

श्रीगुरुजी

सर्वसाधारण वर्गातील गरीबांना दिलेल्या राखीव जागांचा कायदा सर्वोच्च न्यायालयातील ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने योग्य ठरविला आहे.

या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आता मराठा राखीव जागांची मागणी पुन्हा एकदा जोरात सुरू होईल असा अंदाज आहे.

कंजूस

भारतीय आणि इतर प्रसिद्ध लोक दुसरे कावकाव संस्थळ शोधतील का? ट्विटर संस्थापक डॉर्सी नवीन संस्थळ bluesky काढत आहे.

कॉमी

तुमचे खाते सत्यापित (verified) नसल्यास, खालील परिणाम होतील.

१. इतरांच्या वितरणामध्ये (feed) तुमचे ट्विट्स शेवटी येतील.
२. एखाद्या ट्विटला जी प्रत्युत्तरे आहेत त्यात सगळी सत्यापित खात्यांची प्रत्युत्तरे वर राहतील आणि उरलेल्यांची खाली.
३. एखाद्या शब्दाचा किंवा विषयाचा शोध घेतल्यास आता ट्विटच्या लोकप्रियतेवरून परिणाम येणार नाहीत, तर सत्यापित खात्यांचे परिणाम अधिक प्रमाणात येतील.

उत्तर प्रदेश के बाद भोपाल में चल रहा धर्मांतरण का खेल... जिहादी खलील ने 9 साल तक किया हिंदू महिला के साथ दुष्कर्म.... गोमांस खिला कर करवाया धर्म परिवर्तन

https://www.sudarshannews.in/After-Uttar-Pradesh-the-game-of-conversion…

.मराठी वर्तमानपत्रांत, ही बातमी आली आहे का?

मध्य प्रदेश: 9 बच्चों का अब्बू साकिर ने पंजाबन लड़की को फंसाया... कहा- बनों मुस्लमान पहनो बुर्का...

https://www.sudarshannews.in/Abbu-Sakir-of-9-children-implicated-a-Punj…

मराठी वर्तमानपत्रांत, ही बातमी आली आहे का?

पॉल पॉट

ईडी चा गैरवापर, निवडणबक आयोगाचा गैरवापर भाजपने केल्यामूळे लोकांचा केंद्रीय संस्थाॅवरील विश्वास ऊडू लागलाय. आता लोक सर्वोच्च न्यायालयावरही टिका करू लागलेत.

काँग्रेस पक्ष आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करा, कोर्टाचा आदेश

https://www.loksatta.com/desh-videsh/bengaluru-court-order-block-congre…

भारत जोडो यात्रेतील व्हिडीओजमध्ये ‘केजीएफ-२’ चित्रपटातील संगित वापरल्याने न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. तात्पुरत्या काळासाठी ही खाती ब्लॉक करण्यात यावीत, असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

---------

परमपूज्य राहूल गांधी, ह्यावर काय टिप्पणी देतात? हे वाचणे रोचक ठरेल ....

मनीष सिसोदिया यांचा सहकारी माफीचा साक्षीदार

https://www.loksatta.com/desh-videsh/manish-sisodia-trouble-increases-e…

दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळय़ा प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढल्या असून विश्वासू सहकारी व उद्योजक दिनेश अरोरा माफीचा साक्षीदार बनले आहेत.

अरोरा यांनी सोमवारी ‘सीबीआय’ न्यायालयाचे न्या. नागपाल यांच्यासमोर जबाब नोंदवला असून माफीचा साक्षीदार म्हणून ‘इन-कॅमेरा’ कबुलीजबाब देण्याची तयारीही दाखवली आहे. हे संपूर्ण प्रकरण संवेदनशील असल्यामुळे अरोरांच्या संदर्भातील सुनावणी ‘इन-कॅमेरा’ घेतली जाणार आहे.
----------

राष्ट्रवादीने बंद पाडला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो; दिग्दर्शकाची संतप्त प्रतिक्रिया, राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

https://www.loksatta.com/maharashtra/har-har-mahadev-show-shut-down-by-…

ठाण्यातील येथील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर सिनेमागृहात बसलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने वादाचे प्रसंगही घडले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
-------

‘हर हर महादेव’वरुन NCP vs MNS: आव्हाडांचा ‘अफझल खानचे स्वयंघोषित प्रवक्ते’ असा उल्लेख करत मनसेचा हल्लाबोल

https://www.loksatta.com/thane/mns-vs-ncp-over-har-har-mahadev-film-sho…

सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने वाद...

ठाण्यात विवियाना मॉल राडाप्रकरणी जितेंद्र आव्हाडांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा

https://www.google.com/amp/s/www.lokshahi.com/amp/story/news/case-again…

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विनंती करून प्रेक्षकांनी चित्रपटागृहाबाहेर जाण्याची विनंती करीत होते. त्यावेळी काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाकडे तिकिटाचे पैसे परत मागितले. त्यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याने त्या प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली.

जितेंद्र आव्हाडांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला, ठाण्यात हाणमारीत प्रेक्षकांचे कपडे फाटले

https://www.google.com/amp/s/www.lokshahi.com/amp/story/news/case-again…

आव्हाडांनी बंद पाडलेला शो मनसेने केला सुरु

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडलेला शो पुन्हा सुरु करा, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली. त्यानंतर हा शो अविनाश जाधवांनी सुरु देखील केला.

“आव्हाडांनी बंद पाडलेला शो सुरु करा. जितेंद्र आव्हाड काही सेन्सॉर बोर्ड नाही. लोकांनी घाबरायची गरज नाही. मनसे तुमच्यासोबत आहे. संस्कृकतीची वार्ता करणाऱ्यांनी अशाप्रकारे येऊन प्रेक्षकांना मारणं ही कोणती संस्कृती आहे? हे आम्हाला पटवून सांगा”, असं अविनाश जाधव म्हणाले.

“मागच्यावेळी तुम्ही तुमच्या बंगल्यात घेऊन जाऊन एकाला मारलं होतं तेच आज इथे येऊन केलं. नक्की तुम्ही बदलत नाही आहात. तुम्ही लोकांना गृहीत धरत आहात. हा चित्रपट सुरु होऊन नऊ-दहा दिवस झाले. काहीतरी स्टंट मारु नका. महाराष्ट्राचे प्रेक्षक तुम्हाला माफ करणार नाही. राज ठाकरे प्रेक्षकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत”, असंदेखील ते म्हणाले.

------

श्रीगुरुजी

तो निर्धास्त आहे कारण गृहमंत्रीपदी "आपला" माणूस आहे.

२०१७ बांधकाम व्यावसायिक परमार आत्महत्या प्रकरण, अनंत कुरमुसे मारहाण प्रकरण आणि आता हे प्रकरण. "आपला" माणूस गृहमंत्री असल्याने हे सर्व जण निर्धास्त आहेत.

फडणवीस गृहमंत्री न्हवते ....

वरील प्रतिसाद, हा श्रीगुरूजी यांनाच आहे ..... इतरांनी उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये .....

कुणा बरोबर चर्चा करायची आणि कुणा बरोबर नाही, हा माझा वैयक्तिक मामला आहे.... उगाच कुंकू-टिकली किंवा कपाळी गंध लाऊन येऊ नये ....