लेखन प्रेरणा उपक्रमाची माहिती
सर्व लेखकांना सस्नेह नमस्कार.
आला नाही
योग बापडा कधीच जमून आला नाही
भेट म्हणाला होता अजून आला नाही
.
जगास विसरून त्याच्या मध्ये गुंतत गेले
त्याला कळले होते कळून आला नाही
.
मनापासुनी किती काळजी माझी त्याला
कठीण घेणे निरोप म्हणून आला नाही
.
यश कीर्तीचे त्याला होते सदा वावडे
किर्ती सोबत माझ्या बघून आला नाही
.
वाट पाहणे सोड एकदा हारवल्यावर
काळ कधीही तुष्की वळून आला नाही
.
तुष्की नागपुरी
आठवण
"आठवणींनाही ऋतू असतात, काही उन्हाळ्यासारख्या कोरड्या, काही 'शीतल' गोड-गुलाबी तर काही पावसासारख्या अनाहूत".
हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : प्रवासाची सुरुवात आणि अनपेक्षित गोंधळ
हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : प्रवासाची सुरुवात आणि अनपेक्षित गोंधळ
१९ जानेवारी, रविवार.
उद्याच निघायचे असल्याने घरात सर्वजण तयारीत व्यस्त होते. प्रवासात बाहेरचे अन्न नेहमीच मिळेल, तरी उदया ट्रेन मधे खाण्यासाठी नेण्याच्या पदार्थांची तयारी सुरू होती. चिवडा, ठेपले, भरलेली कारली, चटणी, बिस्किटे, फळे, मिठाई आणि इतर खाऊच्या वस्तूंनी बॅगा भरू लागल्या.
कर्मकांड की १० मानवी मूल्ये? तुमच्या दैनंदिन जगण्यातली 'धर्माची' व्याख्या काय?
आजकाल 'धर्म' या शब्दाभोवती एवढं राजकारण, वादविवाद आणि कर्मकांडांचं जाळं पसरलंय की, माणसाला त्याचा मूळ गाभाच विसरायला झालाय. कोणी विविक्षित पोषाख, सण-उत्सव किंवा जत्रा-यात्रांना धर्म समजतं, तर कोणी कट्टरतेला.
पण मनुस्मृतीतील एका प्रसिद्ध श्लोकात धर्माची अतिशय सुंदर आणि वैश्विक व्याख्या दिली आहे:
> **"धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः ।**
> **धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ॥"**
>
याचा अर्थ असा की, धर्म म्हणजे कोणतंही बाह्य कर्मकांड नसून ही १० मानवी मूल्ये रोजच्या जगण्यात अंगीकारणे होय:
१. **धैर्य** (संकटात खंबीर राहणे)
आमी तर ब्वा sin, cos, tan असलं काय वापरत नाय!
आपण शिकत असताना बरीच वर्षं गणित हा विषय शिकतो. शिकत शिकताना आणि आता शिक्षण पूर्ण झाल्यावरही आपल्याला प्रश्न पडतो की sin, cos, tan तसंच (a + b)^२ हे का शिकायचं? फक्त मार्क मिळवणे किंवा हवं ते शिक्षण घेता येणे एवढाच आहे का? काय उपयोग ह्या सगळ्या गोष्टींचा?
खरंच काही नाहीये का?
तू माझा सांगाती..
माझा गुडघा दुखतो. उजवा गुडघा. खरं तर पूर्वीच म्हणजे मी पन्नाशी ओलांडली तेव्हा तो थोडा थोडा कुरकुर करायला लागला होताच. पण मी म्हटलं इतक्या लहान वयात (!?) गुडघा कसा दुखेल बरं! आणि दुखून चालणारच नाही (शब्दशः). आपल्याला तर अजून किती तरी कामं करायची आहेत.
तेव्हा असं वाटलं की, खूप काही अचिव्ह करायचं आहे. आपण काही म्हातारे झाले नाही आहोत. आपण ज्येष्ठ नागरिक व्हायला अजून दहा वर्षं बाकी आहेत.
पण माझ्या या मताशी माझा उजवा गुडघा सहमत नव्हता. तो आपला दुखतच होता.
आशा अमर...
माय मराठीचे पांग
मिसळपाव