अक्षर
मुक्कामाचं ठि़काण ठाऊक नसतानाही चालत होते.
आजूबाजूला सगळी अनोळखी गर्दी असतानाही चालत होते.
सावलीचा स्पर्श तर कोण जाणे अखेरचा कधी झाला होता!
पावलांनी चालायचं इमान सोडलं नाही म्हणून वाट सरत होती. इतकंच.
आणि अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसली. ती लिहिणारा हात कोणाचा आहे, हे उरलीसुरली ताकद एकवटून पाहायचा यत्न केला. पण दिसलं काहीच नाही. तरी कुणीतरी आहे असं भासलं. वाळूवरच्या अक्षरांची का होईना सोबत तर लाभली. तळावलेले डोळे कितीतरी काळाने किंचित शांत झाले. नजरेला काहीतरी वेगळं दिसलं.
त्या लिहित्या हाताला आपसूकच उत्तर दिलं गेलं. तसंच. वाळूत अक्षरं रेखाटत.
आह..!
मिसळपाव