Skip to main content

"गांधीजींनंतरचा महान नेता"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/06/2012 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
IBN Group ने महान भारतीयाची निवड शोध सुरु केला आहे. या शोधाचा मथळा "गांधीजींनंतरचा महान नेता" असा आहे मुळात नेहरू असो वा राजाजी..डॉक्टर साहेब असो वा पटेल प्रत्येक जण महानच आहेत.. प्रत्येकाने आपापल्या परीने देशाची सेवा व कार्य केलेल आहे. समस व झापडबंद पॅनेल याच्या वर कोण नेता गांधी नंतर महान असे ठरणार आहे. असो बघू यात नेमके काय होते ते.. स्वा.वीर सावरकरांचे नाव जजेस पॅनेल ने जाणीवपूर्वक वगळले आहे हे सहज लक्षात येते.

बुधाच्या माचीच्या शोधात एक दिवस

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 05/06/2012 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाराजांच्या टायमाला घोड्यावरून गडकोटांवर येणे-जाणे असायचे हे शाळेत गेलेल्या नि त्यातील इतिहासाचे पुस्तक किमान एकदा उघडलेल्या व्यक्तीला ठाऊक असतेच. आता आजच्या काळात घोड्यावरून चढाई होत नसली तर आमचा चढाईचा बेत मात्र घोड्यावरून निघाल्यासारखाच ठरला. शनिवारी सकाळी आमच्या कराडच्या मित्रवर्यांनी - अविनाशनी - फोनवरून आदेश दिला की आपण बुधाच्या माचीला भेट देण्यासाठी रविवारी प्रस्थान करणार आहोत, भिडू जमवा.

अंत्यक्रिया अथवा दहनसंस्कार

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 05/06/2012 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
Muslim boy designs green crematorium for Hindus http://timesofindia.indiatimes.com/home/environment/developmental-issue… माणसांची जी काही अनेक धर्म / पंथ आहेत त्यात माणसाच्या उत्तर्क्रियेसाठी वेगवेगळी प्रथा आणि परंपरा सांगितली आहेत. उदा हिंदुमध्ये सर्वसाधारण पणे दहन केले हाते तर मुस्लिमबांधवामध्ये दफन ( मातीत पुरण्याचा विधी) तर पारसी समाजात प्रेत पक्षांसाठी ठेवले जाते असे ऐकिवात आहे.

नियती

लेखक हरवलेल्या जहाजाचा कप्तान यांनी मंगळवार, 05/06/2012 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी, सैरभैर, प्रश्नांकित होऊन, शरिर स्वतःला हरवुन बसतं गर्दीत लहान मुलासारखं आणि कधी आपण मनाला हरवु देतो कधीकधी वेगळं जगता यावं म्हणुनसुद्धा.... पण नियती कधीच हरवुन बसत नाही स्वतःला ती आंधळ्या डोळ्यांनी नी बांधलेल्या हाताने धापा टाकत, मूकपणे चालत रहाते. तिच्यात सापळ्याआड धडधडणारं असं काहीच नसतं. कुण्याच्याही स्पर्शाने उभे रहाणारे किंवा सुटणारे प्रश्न नसतात. भंगणारी आकांक्षा, फाटलेलं ह्र्दय शोकाचे सुर पश्चातापाचे निश्वास जखमा आणि सारं काही असतं शवपेटीत बंद. आणि चालताना सोबत असते फक्त एक न संपणारी शवयात्रा

लेमन राईस

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 05/06/2012 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ वाट्या शिजवलेला भात (शिळा भात वापरला तरी चालेल) १/४ वाटी लिंबाचा रस २ हिरव्या मिरच्या चिरून १-२ लाल सुक्या मिरच्या तोडून कढीपत्ता १ टेस्पून शेंगदाणे १ टीस्पून मोहरी १/४ टीस्पून मेथीदाणे १ टीस्पून चणा-डाळ १ टीस्पून उडदाची डाळ १/४ टीस्पून हींग १/२ टीस्पून हळद मीठ चवीनुसार तेल . पाकृ: पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, मेथीदाणे, उडदाची डाळ व चण्याची डाळीची

यशाचे शिखर

लेखक शकु गोवेकर यांनी मंगळवार, 05/06/2012 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे येथिल फर्गुसन कालेज मधिल ३ अंध विद्यार्थी यांनी या वेळी मे २०१२ मधिल घेतल्या गेलेल्या बारावी च्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले ,या मध्ये प्रविण गिते याने ७८.३३ टक्के गुण मिळ्वुन प्रथम क्रमांक मिळ्वला आहे,तर ७७.८३ टक्के गुण मिळ्वुन सनी गायकवाड दुसरा आला. ७१.७७ टक्के गुण मिळालेला नितिन पवार व ६८.९ प्रतीशत गुणासह राजु नखाते हे गुणवत्ता यादित आहेत.

भावमुद्रा

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 04/06/2012 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर कलादालनात बघावं तर कधी कमळं दिसताहेत तर कधी गुलाब, कधी मासे दिसताहेत तर कधी पक्षी, मग या विचार्‍या मर्कटांवरच का अन्याय व्हावा. तर या मर्कटांवरील अन्याय दूर करण्याच्या उदात्त हेतूने आम्ही टिपलेल्या काही मर्कटभावमुद्रा येथे डकवत आहोत. १. बघा कसा आपल्याच मस्तीत आहे हा. २. ह्याचा अभिनय तर बघा ३.

उत्सव

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 04/06/2012 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्वच्छ किनारी हिरव्या दारी नभी खगांची सोनभरारी आकाशी विरघळे चांदवा दिवस; उषेच्या दरबारी पुनव जशी; शीतल अंबारी स्वप्न पापण्यांच्या मखरी ओतप्रोत गाण्यांच्या लहरी जळ; प्रतिमेच्या गाभारी गोड पिसे स्वच्छंद अंबरी दिसे दूरचे जवळ उरी उत्सव हा जुळल्या धाग्यांचा रोज असावा संसारी .............................अज्ञात
काव्यरस

मृत्यु

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 04/06/2012 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यु. जीवनातील एक सत्य. कधी हलक्या पावलांनी दबकत दबकत येत हलकेच झडप घालणार तर सुसाट वेगाने येऊन पाचोळ्यासारखा उडवुन लावणार. कधी तो यावासा वाटते तर कधी त्याने येऊ नये असे वाटते. पण तो येणार नक्की येणार हे प्रत्येकाला ठाऊक असते. प्रश्न असतो तो फक्त कधी येणार आणि कसा येणार? मृत्यु म्हटले की अनेक कल्पना मनात दाटुन येतात. जीवनाचा शेवट. जगाचा अंत. पण नक्की तो असत्तो का? आपण मेल्यावर जग चालूच रहाणार असते. अगदी मानव वंश निर्वंश होऊन गेला, मानव प्राण्याचा अंत झाला तरी जीवन चालूच राहील. कदाचित रुप बदलेल. पण आपल्या दृष्टीने जीवन संपले असेल. आपल्याला जाणीव सुद्धा होणार नाही.

...... तेथे तुझी मी वाट पहातो!

लेखक प्रास यांनी सोमवार, 04/06/2012 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसांनंतर जाणं झालं. तिथेच जिथे दोन दादरांची भेट होते. तिथे पोहोचल्यावर मनात लगेच तुझं गुणगुणणं गुंजन घालू लागलं. तू म्हणायचीस, "जिथे दादरा दादर मिळते, तेथे तुझी मी वाट पहाते, वाट पहाते," आणि तसंच कानात शिरल्यासारखं वाटलं त्यानंतरचं तुझं खळाळतं हसू. किती दिवस होतील आता ते हसणं ऐकून. कल्पना नाही. शेवटचं ते ऐकल्यालाही बहुदा खूप कॅलेंडरं मागे जावं लागेल. तू असंच सांगायचीस आणि मी माझ्या सवयीप्रमाणे तू सांगितलेल्या वेळेच्या दहा मिनिटं आधीच जाऊन उभा असायचो. तुला ते माहितही असायचं. म्हणून मग बर्‍याचदा तू उशीराची वेळ सांगायचीस मला.