Skip to main content

लाल सिंग चढ्ढा

लेखक सोत्रि यांनी रविवार, 14/08/2022 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो. काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते.

आठवण....

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 14/08/2022 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/50568/backlinks आमची बी एक आठवण... कविवर्यांची क्षमा मागीतली आहे. खिशातल्या रूमालाला घामाचा वास मनाला लागला तूझाच की ग ध्यास चार कप्प्यातला एक कप्पा होता खाली तू येणार म्हणून साफसफाई केली घरावरून मारल्या दिवसाच्या चकरा सात बात नाय बनली कारण जय विजय उभे दारात बांधीन म्हणलं सात तळाची माडी पण सावळ्या कुभांराची गाढवं मधी आली ऊगाच घेतला ध्यास डोक्याला कल्हई झाली चांदोबा नाय दिसला पण फुकट धुलाई झाली काय सांगू आता आठवणीत जगतो मनातले मांडे खाऊन रूमालाला घाम पुसतो कसरत १४-८-२२

चित्रपट समीक्षण - एकदा काय झालं...

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 13/08/2022 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
---- "एकदा काय झालं..." ही एक गोष्टींची गोष्ट -- https://youtu.be/WTxGpSs5UaY ---- ही कथा म्हणजे वडील-मुलाच्या नात्यावर खूप वेगळं, नवीन काहीतरी असावं, अशी अपेक्षा ट्रेलर मधून निर्माण होते. गोष्टींतून जगणं शिकणारा, शिकविणारा बाप, आणि त्याच्यावर भावनिकदृष्ट्या सर्वस्वी अवलंबून असणारा मुलगा, गोष्टींतून चालणारं शाळेतलं शिक्षण, सर्व काही उत्सुकता ताणणारं! तशी कथा थोडी अनपेक्षित वळण घेते मध्यावर, पण एवढीही नवीन वाटत नाही.

आठवण

लेखक सागरसाथी यांनी शनिवार, 13/08/2022 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
जपला खिशात मी तुझा रुमाल होता गुलाबी पाकळ्यांचा देही गुलाल होता. आठवणीच्या खजिना उरात साठलेला स्वप्नांच्या वाटेवरचा तो हमाल होता. बांधलेला तुझ्यासाठी शब्दांचा महाल होता शब्दांनीच उभा केला पुढती सवाल होता. चढला होता रंग तुझ्या ही गालावरती की तुझा अभिनय तेव्हा कमाल होता. ---- अभय बापट
काव्यरस

जाणिवांची बाराखडी

लेखक चक्कर_बंडा यांनी शनिवार, 13/08/2022 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
कशी पुरी पडावी शब्दांच्या भाषेची बाराखडी आभाळाएवढी चिमुकली दुःख कागदावर पेलताना ????..... कोसळणाऱ्या पावसात गळक्या छताखाली चिंब भिजल्या मनामधून पाझरणारं काळंभोरं दुःखी आभाळ आणि गालावर ओघळून सुकलेल्या आसवांच्या मागे लपून डोळ्यांच्या कडांमधून उसळणारा चिमुरड्या पोटातील भुकेचा आगडोंब..... कसा शमवता येईल शब्दांतून ???

देवकुंडच्या वाटेवर.....

लेखक चक्कर_बंडा यांनी शनिवार, 13/08/2022 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी-सकाळी सुर्यनारायण क्षितिजावर अवघा वीतभरही वर येण्याआधीच पिरंगुट ओलांडून पाऊस पिऊन हिरव्याकंच झालेल्या मुळशीच्या पांढरीतून, सह्याद्रीच्या पावलांना तुम्ही स्पर्श करावा. मालेच्या खिंडीतून जमिनीला भेटायला येणारे ढगांचे लोटच्या लोट वळणावर थांबून पाहावेत, मग मालेची खिंड ओलांडून, मुळशी धरणाचा जलाशय उजव्या हाताला ठेवत ताम्हिणीच्या अंतरंगात शिरावे. अग्नीच्या धगधगत्या वीर्यातुन जन्माला आलेला अतिप्रचंड, राकट, कणखर, काळा-कभिन्न सह्याद्री स्वतःचं आडदांड सामर्थ्य उधळत समोर यावा.

India's biggest cover up: अनुज धर ह्यांच्या २० वर्षांच्या नेताजींच्या रहस्याच्या अभ्यासाचा निष्कर्ष

लेखक मार्गी यांनी शनिवार, 13/08/2022 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि... असे सर्व प्रसंग मनावर कोरले गेले होते.

अधुनिक तीर्थक्षेत्रे....

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 12/08/2022 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
राजगुरुनगर ते हुसैनीवाला...... "मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि, मैं ‘इश्क’ भी लिखना चाहूं तो ‘इंकलाब’ लिखा जाता है..." - हुतात्मा भगतसिंग २३ मार्च १९३१ ला भगतसिंग, राजगुरू आणी सुखदेव यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी दिली.ही बातमी रत्नागिरी येथे स्थानबद्ध आसलेल्या स्वातंत्र्यवीरांना दुसरे दिवशी कळाली.निर्माण झालेल्या मनःक्षोभातून खालील कविता त्यांनी लिहीली आणी देशप्रेमी तरूणांनी गुपचूप कठंस्थ करून रत्नागिरीत प्रभातफेरी काढली आणी सारे नगर देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून सोडले होते. "हा भगतसिंग, हाय हा