Welcome to misalpav.com

गांधीजींबद्दलची भुमिका डावे-समाजवादी स्पष्ट करतील का?

लेखक: विकास | प्रसिद्ध:
आज निवडणुकींच्या निकालाच्या (अगदी अगदी) पूर्वसंध्येस एका बातमीत खालील वाक्ये वाचनात आली: "....गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो...त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला... 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत.


९० डिग्री साऊथ - ११

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
९० डिग्री साऊथ - १० १५ मार्चला चेरी-गॅराड आणि डिमीट्री हट पॉईंटला येऊन पोहोचले. परतीच्या प्रवासात डिमीट्रीने आपलं डोकं जडावल्याची आणि उजव्या हातात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. हट पॉईंटला पोहोचल्यावर त्याच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली होती. चेरी-गॅराडला मात्रं तो पुन्हा दक्षिणेकडे येणं टाळण्यासाठी सबब शोधतो आहे अशी पक्की खात्री वाटत होती ! स्कॉटच्या तुकडीची अवस्था आता गंभीर झाली होती. हिमवादळाचा जोर वाढतच होता. तापमान -४५ अंश सेल्सीयसपर्यंत खाली उतरलं होतं.


आलिया निवडणूक असावे सादर !!

लेखक: चिनार | प्रसिद्ध:
गेले कित्येक दिवस ज्याची वाट बघत होतो तो मतदानाचा दिवस आता चोवीस तासांवर आला होता. " उद्या मतदान करायचं " एवढा एकच विचार मनात घोळत होता . याआधी दोन -तीन वेळा मतदान केलं असलं तरी यावेळचा मतदानाचा उत्साह काही संपता संपत नव्हता. जणू काही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही माझ्या एका मतानेच हादरणार होती. मला आज सकाळपासूनच माझ्या लहानपणीचं निवडणुकीच्या वेळेस चं वातावरण आठवत होत. कोणत्यातरी एका निवडणुकीच्या वेळी गल्लीतल्या आम्हा सगळ्या मुलांमध्ये प्रचारपत्रकं गोळा करण्याची स्पर्धा लागली होती. म्हणजे अक्षरश: भोंगा लावून प्रचार करत फिरणाऱ्या ऑटो किंवा टांग्याच्या मागे धावत जाऊन आम्ही पत्रकं गोळा करायचो.


अशीच एक फँटसी..(४)

लेखक: सस्नेह | प्रसिद्ध:
अशीच एक फँटसी..(१) अशीच एक फँटसी..(२) अशीच एक फँटसी..(३) रविवारी सकाळी तो अन उर्मी श्री श्री गुरुदेवांच्या प्रशस्त हॉलमध्ये बसून भक्तजनांची गर्दी कमी होण्याची वाट पहात होते. श्रीश्रींची एकांत भेट मिळण्यासाठी त्यांना दीड तास थांबावे लागले. अखेर एकदाची भेट मिळाली अन अर्णवने आपली नवीन समस्या सविस्तरपणे गुरुदेवांच्या कानावर घातली. त्याचे बोलणे संपेपर्यंत गुरुदेव शांतपणे डोळे मिटून ऐकत होते. त्यानंतरही पाचेक मिनिटे त्यांनी डोळे उघडले नाहीत.


तुम बीन जाऊं कहां...

लेखक: Atul Thakur | प्रसिद्ध:
"तुम बीन जाऊं कहां" या गाण्याचा विषय निघाला कि रफी आणि किशोरचे चाहते तलवारी पाजळुन बसतात आणि मग खणखणाट सुरु होतो. राजेशखन्नाच्या जमान्यात चित्रपट पाहायला सुरुवात केलेली पिढी निर्विवादपणे या गाण्यात किशोरच वरचढ आहे असा निवाडा देते. मला या वादात पडायचं नाहीय. माझं रफीप्रेम मला रफीच वरचढ आहे असं म्हणायला लावणार. मात्र चित्रपटापुरतं बोलायचं झालं तर किशोरवर अन्याय झाला आहे असं नक्कीच वाटतं. चित्रपट पाहताना गाणं बेमालुमपणे सिच्युएशन मध्ये मिसळलं असेल तर त्याची लज्जत काही औरच असते.


लोकसभा २०१४ बीजेपी सरकार

लेखक: वेताळ | प्रसिद्ध:
आजच आपली लोकसभा २०१४च्या निवडणुकीचे मतदान संपले. खुपच प्रदिर्घ चाललेले जवळजवळ ९ टप्प्या पर्यत चाललेले मतदान असलेली ही पहिलीच निवडणुक होती.


सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!

लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे.


कुssssफ्लिssssये

लेखक: दिपक.कुवेत | प्रसिद्ध:
काय मंडळी, शीषर्कावरुन आरोळि/हाक ओळखीची वाटतेय का? मग दाहक उन्हाळा आणि थंडगार कुल्फि ह्यांच नातं आहेच तस घट्ट. आंब्याचा ऋतु असल्यामुळे आंबा घालुन कुल्फि तर केलीच पण ती सेट सुद्धा जssssरा वेगळ्या पद्धतीने सेट केली. कसं??? चला सांगतो बरं... Kulfi 1 साहित्यः १. तयार घट्ट आंबे - २ २. मिल्क पावडर - २ कप ३. काजु पावडर - १ कप ४. पिस्ता पावडर - १/२ कप ५. साखर - चवीप्रमाणे कमी/जास्त ६. आंब्याचा पल्प/रस - २ कप ७. कार्निशन ईव्हॅपोरेटेड मिल्क - १ टिन ८.


९० डिग्री साऊथ - १०

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
९० डिग्री साऊथ - ९ स्कॉटची तुकडी काही वेळातच आपल्या पुढील कँपवर पोहोचली. इथेच त्यांनी घोड्यांची हत्या केली होती. घोड्याचं मांस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांनी भरपेट जेवण करुन विश्रांती घेतली. इथून पुढे मध्ये असलेल्या डेपोतील सामग्रीच्या सहाय्याने एक टन डेपो गाठणं त्यांना शक्य होणार होतं. रॉस आईस शेल्फवर अर्धवट शुध्दीत असलेल्या टेडी इव्हान्ससह लॅशी आणि क्रेनची वाटचाल सुरु होती. मात्रं खराब हवामानामुळे त्यांची प्रगती खूपच हळू होती. त्यांच्याजवळ अन्नपदार्थांचा साठाही मर्यादीत प्रमाणात होता.