Welcome to misalpav.com

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

लेखक: प्रकाश घाटपांडे | प्रसिद्ध:
फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. .


चालत राहणार

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
चालणे प्रवाह जीवनाचा थांबणे मरण यातना पर्याय नाही दुसरा शिवाय चालण्याचा. चालता चालता भेटले वाटेत जे सगे-सोयरे अनोखळी वाटसरू निघाले. क्षणभराची साथ तयांची देऊन गेली अनेक जखमा कवटाळूनी त्या जखमांना एकटाच मी चालत राहणार. दमलेल्या शरीरानी थकलेल्या मनांनी निरुदेश्य मी भटकत राहणार. चालत राहणार, चालत राहणार.


अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
उन्हाळ्याचे दिवस होते. जंगलातील टेकडी खालच्या एका गुहेत शेरखान लपून राहत होता. महाबली रेड्याच्या भीतीने शेरखानला गुहेत शरण घ्यावी लागली होती. रात्रीच्या वेळी लपत-छपत छोटे हरीण किंवा सस्याना मारून तो कशी-तरी गुजराण करत होता. गुहेत शेरखान गहन विचारात दडलेला होता, अनेक विचार त्याच्या मनात येत होते. गुहे समोर असलेल्या छोट्याशा डबक्यातले पाणी बहुतेक आठवड्यात आटून जाईल. जंगलातल्या मोठ्या तलावावर महाबलीचा कब्जा आहे. पाण्या विना जगणे अशक्य. उभे आयुष्य ज्या जंगलात गेले, कदाचित ते जंगल सोडण्याची पाळी येणार. पण कुठे जाणार? काय करावे काहीच त्याला सुचेनासे झाले होते.


बौद्धिक कृष्णविवर

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
बौद्धिक कृष्णविवर: लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते. बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४] युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात.


भयकारक भानगड

लेखक: चलत मुसाफिर | प्रसिद्ध:
माझा भुताखेतांवर किती विश्वास आहे, हे मलाच माहिती नाही. भुतासारखी अक्राळविक्राळ माणसे बरीच भेटली. त्यांना सहन केल्यामुळे कदाचित भीती थोडी कमीही झाली असेल. पण खरे सांगायचे तर, अतींद्रिय शक्ती या विषयावर माझे मत अजून तयार व्हायचे आहे. अर्थात भुताटकी म्हटले की कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला आकर्षण वाटतेच. कदाचित त्यामुळेच राजस्थानमधील "झपाटलेला" भानगड किल्ला पाहायची सुप्त इच्छा फार दिवसांपासून होती. आंतरजालावर भानगडबद्दल अनेक चर्चा होत असतात. 'सनसनी' टाईपचे टीव्ही शो सुद्धा इथे कॅमेरे घेऊन येऊन गेलेले आहेत.


ए फ्यांड्री SSSS ईई ..

लेखक: साळसकर | प्रसिद्ध:
ए फ्यांड्री SSSS ईई .. अंधारातून चाललेल्या एका सावलीला मी हाक मारली.. "ए अंड्या, XXXच्या, मर ना मेल्या.." तितक्याच उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया आली. यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच. फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय. पैकी हा एक. तितकेच स्पोर्टीगली घेणारा आणि पलटून एक कचकचीत शिवी घालणारा. दुसर्‍याला मात्र काय माहीत, ते फारसे रुचले नाहीये. काल मात्र त्याला गाठून मी विचारलेच, "काय बे रताळ्या, मोठा झालास का? राग का येऊन राहिला?" तर म्हणला कसा, "अंड्या, आमची जात एवढ्या पण खालची नाहीये रे .....


अहमदाबाद-गांधीनगर_१

लेखक: अमितसांगली | प्रसिद्ध:
तर मग ठरले! अचानक मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर उपभोग घेण्याचा निश्चय करूनच कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यास सुरुवात केली. त्याचे झाले असे कि १६ फेब्रुवारीला महारक्तदान असल्यामुळे कॉलेजमध्ये पाटी टाकावी लागली. त्याची भरपाई सुट्टी मंगळवारी व बुधवारी शिवजयंती असा भांगयोग नशिबात कधी नव्हे तो जुळून आला. पण हे सगळे सोमवारी दुपारी कळले. त्यामुळे नशेतच सगळे विचारचक्र घुमू लागले. पहिल्यांदा खिशात हात घातला व सुटकेचा निश्वास टाकला. मग सगळ्यात पहिल्यांदा ओरंगाबादचा विचार आला पण ते इथे पलीकडेच असल्याने जेवढ्या लवकर आला त्याच वेगात निघून गेला.


भुजबळचा भयानक भ्रष्टाचार!

लेखक: हुप्प्या | प्रसिद्ध:
भुजबळांच्या छगनने आपल्या कुटुंबियांसमवेत महाराष्ट्राला मनसोक्त लुटले आहे. करदात्यांचा प्रचंड पैसा आपल्या घशात घालून आपले उखळ पांढरे केले आहे. भ्रष्टाचाराच्या क्षेत्रातील अग्रणी तटकर्याशी अटीतटीची स्पर्धा सुरु आहे की काय अशी शंका यावी. http://www.loksatta.com/mumbai-news/pwd-miniter-chhagan-bhujbal-in-trouble-387788/ वरील बातमीच्या आधारे असे दिसते की छगनच्या कृपेने ठेकेदाराला ५ ते ६ हजार कोटीचा अवाजवी नफा झाला. अर्थात हे काही परोपकाराच्या भावनेतून नसावे. त्यातले कित्येक हजार कोटी "योग्य" जागी पोचवले असणारच. हे सगळे लोकलेखा समितीने म्हटले आहे.