Welcome to misalpav.com

अंतरंग - भगवद्गीता - भाग ४

लेखक: शीतलउवाच | प्रसिद्ध:
नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् । किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥ नासदीयसूक्त………असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण?


स्वीडन

लेखक: साहना | प्रसिद्ध:
स्वीडन नाटो मध्ये जाणार ह्या बातमीने स्वीडन देशाचे नाव खूप वेळा बातम्यांत आले. फिनलंड सुद्धा चर्चेत होता. कदाचित NOKIA मुळे भारतीयांना फिनलंड ची अगदी चांगली ओळख असेल. कारण नोकिया ११०० सारखे फोन १००% त्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. एकदा माझा नोकिया चुकून कपड्यासोबत वॉशिंग मशीन मध्ये पडला. दुसऱ्या दिवशी मी तांदळात ठेवला आणि २४ तासांनी तो मी नव्हेच प्रमाणे चालू झाला. कितीदा हा फोन खिशांतून पडला, मी किती वेळा फेकून मारला इत्यादी मला आठवत सुद्धा नाही. फिनिश लोक ह्या फोन प्रमाणेच चिवट आणि राकट आहेत. ह्या देशांतील सर्वच गोष्टी नोकिया प्रमाणेच अगदी भक्कम बनवलेल्या असतात.


माझी राधा - ७

लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
त्या क्षणी तुझ्या चेहेर्यावर खूप काही बदल घडत जातात. आभाळ भरून यावे तसे तुझे ते टप्पोरे डोळे भरून येतात. तुझ्या तोंडून हुंदका फुटत नाही इतकेच. तू कसबसे स्वतःला सावरलंस. आणि तुझ्या हातातले मोरपीस माझ्या हातावर फिरवत म्हणालीस ' मी ते मोरपीस आहे असे समज." तुझ्या शब्दांचे अर्थ समजण्याचे वय नव्हते ते माझे. पण ते कुठेतरी आत खोलवर भिडले. मी नि:शब्द झालो मागील दुवा http://misalpav.com/node/50189 माझ्या हाताला घट्ट धरून जवळजवळ ओढतच तू मला नंदवाड्यात घेऊन गेलीस. माय अंगणात माझी वाटच पहात बसली होती. मला पहाताच ती पुढे आली. तीच्या हातात माझा हात दिलास.


#तू म्हणालास

लेखक: प्राची अश्विनी | प्रसिद्ध:
#तूम्हणालास तू म्हणालास "सवय लावून घेऊ नये" "मन बिघडू देऊ नये, उगा जीव लाऊ नये." पण "नये नये" चा पाढा कधी अर्ध्यावरती चुकतोच ना? मुकाट्यानं त्याचे परिणाम भोगत आपण असतोच ना? कित्ती दिवसांत भेट सोडा, एक साधा शब्द नाही. कुणी वेडं वेड्या सारखं वेडी वाट बघतंच ना? "कामात व्यस्त" पटतं, "अपेक्षा चूक" कळतं. पण मोबाईल हातामध्ये रोज घेऊन बसतंच ना? मगं कुणी ठरवतं, आता मात्र बदलायचंच. वेडेपणा सोडून आता शहाण्यासारखं वागायचंच. यापुढे आपणहून बोलायला कधी जायचंच नाही. समोरसमोर (समजा) आलोच तरी भेटायचं तर नाहीच नाही. हो नाही च्या पुढे गाडी कधी न्यायचीच नाही एकदा ठरलं म्हणजे ठरलं, दगडावरची रेघ जणू! असूदे का डोळ्


माझे काही आवडते कम्प्युटर गेम

लेखक: कॉमी | प्रसिद्ध:
खेळ अनेक कारणांसाठी भारी असतात. काही गेम खेळायच्या पद्धतीसाठी भारी वाटतात- उदा मॉरधाऊ हा तलवारी/धनुष्य/भाले यांचा द्वंद्व खेळ त्याच्या स्वतःच्या अश्या द्वंद्व पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. काही गेम्स अवर्णनीय ग्राफिक्स आणि भलीमोठी अद्भुतरम्य कथा असल्यामुळे भारी वाटतात. उदा.- प्रिन्स ऑफ पर्शिया मालिका, गॉड ऑफ वॉर मालिका इत्यादी. हे गेम्स हेवी ड्युटी असतात, संगणकांवर बहुदा चालत नाहीत. चालले तरी भारीतलं ग्राफिक कार्ड असेल तरच. काही खेळ त्यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेसाठी प्रसिद्ध असतात. उदाहरणार्थ माझा एक खूप आवडता गेम- पेपर्स प्लिज.


औषधांचा कायाप्रवेश (१)

लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:
निसर्ग आपल्याला जन्मताच एक अमूल्य शरीर देतो. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे शरीर कधी ना कधी कुठल्या तरी रोगाची शिकार बनते. रोग म्हटला की उपचार करणे आले. उपचारांमध्ये घरगुती उपायांपासून अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. आधुनिक वैद्यकात रुग्णास औषध देण्याचे अनेक मार्ग(routes)आहेत. त्यातले सर्वपरिचित मार्ग म्हणजे औषध तोंडाने घेणे, औषधाचा वाफारा नाका/तोंडाद्वारे घेणे, स्नायू अथवा रक्तवाहिनीतून इंजेक्शन्स घेणे आणि त्वचेवर मलम लावणे. पण शरीरात औषध पोचवण्याचे याव्यतिरिक्तही अनेक मार्ग आहेत. वरील चार परिचित प्रकारांचेही अनेक उपप्रकार आहेत.


मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ३

लेखक: Trump | प्रसिद्ध:
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते. मटामधील श्रध्दांजली https://maharashtratimes.com/maharashtra/thane/chandrashekhar-abhyankar-passed-away/articleshow/69346718.cms --------------------------- त्यांचे काही निवडक साहित्य येथे देत आहे, नवीन लोकांना ओळख होण्यास मदत होईल.


50 वर्षांची चिरतरुण ‘राजधानी’

लेखक: पराग१२२६३ | प्रसिद्ध:
मुंबईहून दिल्लीला रेल्वेने जाण्या-येण्यासाठी आजही पहिली पसंती असलेली 12951/52 राजधानी एक्सप्रेस येत्या 17 मेला 50 वर्षांची होत आहे. आज ही रेल्वेगाडी हायटेक झाली असली तरी तिच्यात येत्या काळात अजूनही सुधारणा होत जाणार आहेत. विविध राज्यांच्या राजधान्या देशाच्या राजधानीशी जलद आणि आरामदायक रेल्वेसेवेने जोडण्यासाठी राजधानी एक्सप्रेस ही संकल्पना आणली. त्यानुसार भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली 1 मार्च 1969 ला नवी दिल्ली आणि हावड्यादरम्यान. संपूर्ण वातानुकुलित असलेल्या या वेगवान रेल्वेगाडीत विमानाप्रमाणे सेवा पुरवण्यात येत असल्याने पुढील काळात ही संकल्पना लोकप्रिय होत गेली.