Skip to main content

प्रकटन

(तेव्हा तुम्ही कुठे होता?) (बारा ची मती)

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 19/10/2015 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा दिल्लीहून जेट लीमिटेड़ ते उडती म्हणे आय लव्ह काकांची बारामती हे काय आज आमी डोळ्याने पाहीले का भक्तगण असे तोंडावरी पडले ? जेव्हा आलेले हे आपल्या दारी म्हणाले संपवू काका पुतण्यांची जुलुमगिरी थापा मारिल्या जनतेच्या सामोरी दिसू लागली आता ती फेकुगिरी दिले काकाला विकासपुरुषाचे सर्टिफिकेट . सिंचनघोटाळा गेला बँकसीटच्या बासनात म्हणे आमुचे सहिष्णू राजकारण भारतात. पण हे आजच कसे घडले?

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 19/10/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले.

तेव्हा तुम्ही कुठे होता?

लेखक बाप्पू यांनी रविवार, 18/10/2015 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर कुल्बर्गी यांच्या हत्ये नंतर कर्नाटकातील बऱ्याच साहित्यिकांनी आपल्याला मिळालेले पुरस्कार सरकारला परत केले. सुरवातीला हि गोष्ट कर्नाटक पुरतीच मर्यादित होती. पण हे लोन आता बऱ्याच राज्यांमध्ये पसरलेय. आणि याला कारण म्हणजे दादरी येथे झालेली घटना. नेमके आज च तुम्हाला भारतात असहिष्णुता वाढत असल्याचा साक्षात्कार झाला काय? हि घटना खरच दुर्दैवी होती. पण या घटनेचे भांडवल करून खूप राजकारण पेटले आहे. आणि या वाहत्या गंगेत हाथ धुवून घेण्याचे काम साहित्यिक करत आहेत. मला कोणत्याही प्रकारे दादरी येथील घटनेचे समर्थन करायचे नाहीये. फक्त एकच प्रश्न या सर्व साहित्यिकांना विचारायचा आहे.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 15/10/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील. तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा.

असंच काहीतरी

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 15/10/2015 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
लिहावंसं वाटतं; कधीकधी उगाचच वाटतं. काय लिहायचं ते नंतर ठरतं.

असेही मार्केटिंग

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 13/10/2015 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवा काहीतरी विकणारा एक पोरगा दारावर आला. म्हणाला आमच्याकडे एक स्कीम आहे. अमुक इतके पैसे भरायचे. तुम्हाला हा प्लॅस्टिक जार मिळेल. तो तुम्ही फ्रीजमधेही ठेवू शकता आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमधेही ठेवू शकता. याचबरोबर पुढील २ वर्षे आमचा पेपरही मिळेल. त्याच्या रद्दीचेही पैसे तुम्हाला मिळतील. एकूण काय तुम्ही फायद्यात रहाल. सगळंच चक्रावून टाकणारं होतं... त्याला विचारलं नेमकी काय स्कीम आहे, काय विकतो आहेस. तेव्हा म्हणाला आम्ही एका दैनिकाचे प्रमोशन करतो आहे. मोठा प्रश्न पडला...

आपण अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नासिक, जळगाव जिल्ह्याचे आहात ? अहमदनगरयेथे 'विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६ आयोजन'चे आमंत्रण प्रस्तावासाठी अनुमोदन हवे आहे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 12/10/2015 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिपीडियाचा लेखक आणि वाचक वर्ग संबंध महाराष्ट्रात तसेच महानगरांपलिकडे उर्वरीत भारतात पसरलेला आहे परंतु संघटनात्मक आयोजने सहसा केवळ महानगरांपुरती मर्यादीत रहातात. विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी भारतातील शहरांकडून प्रस्ताव मागितले गेले आहेत आणि महानगरांची काँपीटीशन असेल परंतु विकिमिडीया चळवळीचा मुख्य हेतु सर्वत्र पोहोचण्याचा आहे या दृष्टीने अहमदनगर येथील अनुभवी विकिपीडियन्सना विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी प्रयत्न करण्याचे आवाहनास त्यांनी प्रतिसाद दिला आहे. अहमदनगर महाराष्ट्रातील पुण्यासहीत औरंगाबाद, नासिक, जळगाव या शहरांपासून साडेतीन चार तासांच्या अंतरावर तसे मध्यवर्ती पडते.

एनरॉन पुन्हा एकदा !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 11/10/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला निराळी,मोठी कलाटणी देणारा एक कोणता विषय असेल तर तो आहे एनरॉन प्रकल्प. एनरॉन या अमेरिकन कंपनीने जीई व बेक्टेल या अन्य दोन अमेरिकन सुरोपीय कंपन्यांसमवेत दाभोळ वीज कंपनीची स्थापना केली. त्यात एनरॉनचा वाटा 67 टक्के होता. प्रकल्पाचे कागदोपत्री नाव जरी दाभोळ असेल तरी जनतेत मात्र तो एनरॉन प्रकल्पच राहिला. 1991-92 पासून ते 2001 मध्ये अंतिमतः राज्य सरकारने बंद करेपर्यंत या प्रकल्पासून वीज निर्मिती म्हणावी तशी झाली नाही. राजकारणाचे पाझर मात्र मोठ मोठे फुटत राहिले.

छि _ _

लेखक नीलमोहर यांनी शनिवार, 10/10/2015 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
छि _ ल, पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता. मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की करत पुढे आलं.

धन्यवाद

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 10/10/2015 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी, खरे तर वर्षांपूर्वी,'मिसळपाव' वरील माझ्या परिचित-अपरिचित मित्रांना मी माझ्या संशोधन प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला मला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या प्रतिसादांचे विश्लेषण करुन काही महिन्यांपूर्वी मी माझा प्रबंध सादर केला. या प्रबंधाबद्दल नुकतीच मला पुणे विद्यापीठाकडून ‘विद्यावाचस्पती’ (पी.एच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. यथावकाश या संशोधन प्रकल्पावर अधिक काही लिहिण्याचा माझा मानस आहे. पुन्हा एकदा धन्यवाद!