Skip to main content

प्रकटन

राजकारण: एक आठवण

लेखक शैलेंद्रसिंह यांनी रविवार, 04/11/2012 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारण म्हणजे नक्की काय असतं? हा प्रश्न अनेकदा पडायचा. नेत्यांची विधानं/भाषणं..मोर्चे/यात्रा..आंदोलनं असंच लहानपणी वाटे. मी वृत्तपत्रांमधे राजकारणावर वाचायला सुरुवात केली असेल १९८९ सालापासुन. फ़ारसं काही कळायंच नाही. बोफ़ोर्स वरुन राजीव गांधी कसा काय चोर आहे इतकंच समजायचं. तेव्हा उल्हासनगरला रहायचो. ठाणे मतदारसंघात रामभाऊ कापसेंनी तत्कालीन कॉंग्रेसचे खासदार शांताराम घोलप ह्यांचा पराभव करुन खासदार झाले. कॉंग्रेसविरोधी लाट होती. निवडणुकीच्या स्लोगन्स वगैरे ऐकायची तेव्हा सवय झाली. त्याकाळी निवडणुक प्रचारावर भरमसाठ खर्च व्हायचा (पुढे टी.एन.शेषन निवडणुक आयुक्त झाल्यावर कमी झाला).

चावडीवरच्या गप्पा – बस डे

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 01/11/2012 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
“काय घारुअण्णा, आज काय मग बसने, मंडईत वाहिनीना घेउन?”, चिंतोपंत एकदम थट्टेखोर हसत. “अरे हो आज बस डे होता नाही का! आज काही बाहेर जायला झालेच नाही. त्यामुळे काय झाले ह्या बस डेचे काही कळलेच नाही”, नारुतात्या. “अहो कसला डोंबलाचा बस डे अन काय, आमच्या हिला पण भारीच हौस.”, घारुअण्णा भयंकर त्राग्याने. “काय झाले?”, इति नारुतात्या. “अरे, चांगले म्हणत होतो की आपली स्कूटर घेउन जाऊ, पण नाही! नवरोबाचे ऐकेल ती बायको कसली.”, घारुअण्णा घुश्श्यात. “अहो, काय झाले ते नेमके सांगाल का, का उगाच त्रागा करताय एवढा.”, इति नारुतात्या. “शिंचा बस डे म्हणे!

त्याचीच.. अटॅचमेंट (नवी बाजू).

लेखक इनिगोय यांनी गुरुवार, 01/11/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतून राहणं चांगलं की गुंतल्यानंतरही वेळ येईल तेव्हा शांतपणे विलग होणं चांगलं यावर जे बोलणं झालं त्यातून त्याची डिटॅचमेंट हे प्रकटन याआधी लिहिलं गेलं. निसर्ग हा इतका जिवंत, इतका व्हर्सटाईल आहे, की प्रत्येकाला तो वेगळा दिसतो, नवं काही देतो. लेखावर आलेल्या प्रतिसादांमधूनही हेच जाणवलं. अनेकांनी त्यांना जाणवलेल्या - पटलेल्या आणि न पटलेल्या - गोष्टी तिथे मांडल्या. ही मूळ चर्चा ज्यांच्याशी झाली, त्यांनाही तो जसा जाणवला तसा..

२१ डिसेंबरचे प्लॅन्स

लेखक औदुंबर यांनी गुरुवार, 01/11/2012 03:17 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रहो, २०१२ हे वर्ष पृथ्वीच्या इतिहासातले शेवटचे वर्ष असणार आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. २०१२ साली जग नष्ट होणार, हे भाकित माया की अ‍ॅझ्टेक लोकांनी फार वर्षांपूर्वी करून ठेवले आहे, त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे. 'सॅंडी'ने चुणूक दाखवलीच आहे. त्याप्रमाणे 'बिगिनिंग ऑफ द एंड' सुरू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. या वर्षाच्या सुरूवातीला या विषयाचा फार गहजब झाला, पण प्रत्यक्षात हा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा त्या मानाने फारसा गवगवा होताना दिसत नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे!

असेच काही उदासवाणे .....

लेखक अनघा आपटे यांनी मंगळवार, 30/10/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसला जाताना रस्त्यात एक सिग्नल लागतो, तिथे हमखास दोनतीन गरीब मुले-मुली तुमच्या गाडीपाशी येतात. हातात एक फडकं असतं, काही न बोलता गाडीची समोरची काच पुसू लागतात, जो पर्यंत तुम्ही पर्समधून पैसे काढत नाही तोपर्यंतच मात्र ...अर्थात सिग्नल ही काही सेकंदाचाच असतो. मी दर वेळी २ रु. हाती ठेवते, विचार करते किमान काम करून पैसे मिळवावेत एवढं समजलं आहे हे ही नसे थोडके. या वर माझी चेष्टा करणारी माणसे माझ्या आसपास असतातच. ज्या समाज व्यवस्थेचा आपण भाग आहोत तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे की ते कोणी एका दोघांच्याने दूर होणे शक्य नाही.

मराठी गुलामगिरी

लेखक पोप्य्लोन यांनी सोमवार, 29/10/2012 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
आता मराठी माणसांना गुलामगिरी शिवाय पर्यायच नाही . कारण आता मराठी मुले एजिनिअर आणि डाक्टर सुद्धा बनणार नाहित . देशात एकच परीक्षा असणार आहे , उत्तर भारतीय मुले सार्वजनिक कॉपी करुन महाराष्ट च्या उत्तम कॉलेजात प्रवेश मिलवितिल आणि आपल्या मुलांसाठी फक्त कारकूनाच्या नोकरया असतील . सीबीएसई अभ्यासक्रम हा उत्तर भारतीयांसाठीच बनविला गेलेला आहे . तसेच हिंदी मधून सुद्धा परीक्षा देता येते .

त्याची डिटॅचमेंट

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 29/10/2012 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरार्ध काही दिवसांपूर्वी "अटॅचमेंटमधली वेदना आणि डिटॅचमेंटमधला आनंद" याबद्दल झालेली चर्चा या छोट्याशा स्फूटाला कारणीभूत ठरली. ---------------------------------------------------------------------------- प्रिय, निसर्गाचा सगळा प्रवास डिटॅचमेंटकडे सुरू असतो, नाही का? वाळलेली पानं, फळलेला मोहोर, निगुतीने बांधलेली घरटी, मोठी झालेली पिल्लं, बरसून रिकामे झालेले ढग, कशातही गुंतून राहत नाही तो. आणि तरी सतत नव्याने प्रसन्न दिसत राहतो. 'समर्पयामि' हे माणसाला म्हणावं लागतं. तर कधी 'पुरे झालं आता' असं बजावायला लागतं.

उद्रेक भीषण स्फोटाचा

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
उद्रेक भीषण स्फोटाचा (१६-जुल-२०११) -- पण भावनांचा कधी होणार मुंबई अमुची पुन्हा हादरली ? (प्रत्येकाच्या मनात आज हा प्रश्न नसून उद्गार बनले आहेत). प्रत्येक मुंबईकराच्या मनात हा प्रश्न आणि त्याच नेहमीच 'टिपीकल' उत्तर, आता 'कॉमन' होऊ लागलं आहे. आता हें 'कॉमन' का होत चाललंय? हें तुमच्या सारख्या सुज्ञास सांगायची गरज नको. मुंबईकर खरोखरच निगरगट्ट, कोरडे, कोडगे होत चालले आहेत का ? त्यांच्या भावना मृत चालल्या किंवा मेल्या आहेत का ? स्फोट झाला ? कुठे? कधी? कसा ?, असा आहे का, ठीक आहे. मुंबई पुन्हा लागली आपल्या कामावर दुसऱ्या दिवशी !

बाप्पा मोरया रे

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवीन हो माथा....(असली गाणी ऐकायला मिळाली की समजावं बाप्पा येतोय हो लवकरच) गणेश चतुर्थी जवळ आली की सर्व वातावरण कसं आनंदाने भरून जातं. सगळीकडे ही लगबग सुरु होते पहा. मग सर्वांना मनापासून म्हणावसं वाटत, "आला पहा माझा तो श्री गणेशा, सा-यांचा तारणहार तूच प्रथमेशा; चाहूल लागली तुझी गजवदना, लगबग झाली सुरु तुझ्या रे स्वागता". (सौजन्य: "आमोद - एक आनंद कल्लोळ", के डी.) मग मखरापासून सुरुवात ते अगदी सजावटीतल्या एखाद्या डोंगराच्या शिखरापर्यंत, नुसता आनंदाचा कल्लोळ माजतो, हें पाहून सुखद वाटत. देवासाठी काय करू अन काय काय करू, असं सर्व गृहिणींना वाटत.