Skip to main content

प्रकटन

मुक्तछंद

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 22/02/2012 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी खूप दिवसांनी "खट्टा मीठ " सिनेमातील " थोडा है थोडे की जरुरत है " गाणे लागले होते......आधी खूप वेळा हे गाणे ऐकले होते पण आज मूड जरा वेगळा होता....जरा विचारात पडलो ...नेमकं काय सांगायचं आहे गीतकाराला या गाण्यातून... हा विचार मनात आला ....... आपल्या रोजच्या जगण्याचे जणू प्रतिबिंब यातून डोकावते आहे ........बघा ना.....

राजा शिवछत्रपती - भवानी तलवार आणि जीवनपट !

लेखक मालोजीराव यांनी रविवार, 19/02/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
आज शिवजयंती...छत्रपतींच्या जीवनातल्या अनेक गूढ अद्याप संशोधन चालत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे भवानी तलवार, शिवजयंतीच्या निमित्ताने आज हा लेख लिहावासा वाटला.खाली दिलेल्या माहितीमध्ये मिपाकर नक्कीच अभ्यासपूर्ण भर टाकतील ! पुरेसा वेळ न मिळाल्याने लेख थोडा घाईगडबडीत झाला कृपया सांभाळून घ्या ! भवानी तलवार (जगदंबा तलवार) उगम - इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली.

प्रत्यक्षातला 'मोहन भार्गव'...

लेखक विसुनाना यांनी शनिवार, 18/02/2012 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आशुतोष गोवारीकरांच्या तुफान यशस्वी 'लगान' नंतर त्यांनी दुसर्‍या खानसाहेबांना घेऊन 'स्वदेश' नावाचा एक चित्रपट काढला. 'नासा'त काम करणारा मोहन भार्गव नामक एक तरूण शास्त्रज्ञ भारतात परततो. भारतातल्या 'कोडी' नामक खेड्यात एक पाणचक्कीवर चालणारे विद्युत जनित्र निर्माण करतो आणि त्या गावाला वीज मिळू लागते अशी काहीशी कथा. मुळात लोकांचा अशा स्वप्नवत कथेवर विश्वास बसला नसावा. त्यामुळे तो चित्रपट तितका यशस्वी झाला नाही. सांगण्याचं कारण हे की महाराष्ट्रात नुकत्याच शमलेल्या जि.प.

सुदर्शन पटनायक

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी शुक्रवार, 17/02/2012 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
वाळू! केवळ या एका शब्दात आयुष्यभराचा आठव साठवता येऊ शकतो. शंख शिंपले गोळा करत आणि खोपे बनवत वाळूच्या ढिगा-यावर घालवलेलं लहानपण; समुद्रकिना-यावर तीच्याबरोबर तासनतास बसुन बांधलेलं वाळूचं घर; वाळूत उभं राहून ते घर डोळ्यात साठवत असतांना अचानक आलेल्या लाटेबरोबर त्याचं पायाखालच्या वाळूबरोबर वाहून जाणं आणि त्यानंतर झालेला हिरमोड लपवत पुन्हा नव्याने घर बांधायला घेणं! कन्याकुमारीच्या वाळवंटात उभं राहून दिसणारं भारतमातेचं तेजोमय रूप; आणि चंद्रभागेच्या वाळवंटात वारक-यांनी धरलेले रिंगण!

" ....आभास.... "

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 16/02/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार ... हळुवार येशील आयुष्यात ...अस कधी वाटलच नव्हत .. मनाच्याही मनातल सांगशील असही कधी वाटल नव्हत .. स्पर्शाची भाषा ..सहवासाच जग ..मला कधी अनुभवायला मिळेल असही कधी वाटल नव्हत ... पण तू आलास आयुष्यात असाच अगदी हळुवार ..पावलांचा आवाजही न करता ..... बर्याच दा मागे वळून पाहिलं ..पण तू कधी दिसायचास ..तर कधी ओझरता तुझा भास व्हायचा .. मला कळायचच नाही ..मला नक्की कशाचा भास होतोय ..तुझा कि तुझ्या श्वासांचा .. सतत चाहूल लागायची कि चालताना बोलताना .तू माझ्या जवळ आहेस .. तुझ्या पावलांवर माझ पावूल पडतंय ..तुझ्या चेहेर्यावर माझी सावली पडतेय ..तुझ्या पापण्यात माझी आठवण साठ्तेय .... पण खरच तुझा म

म्हणून..

लेखक गवि यांनी मंगळवार, 14/02/2012 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही नाही रे भेंचोत.. आमचं नुसतं फ्रेंडलीये.. असं सगळ्या गँगला म्हणत म्हणत आणि आतल्या आत मोहरत जे काही केलं तेव्हाही व्हॅलेंटाईन डे येऊन गेले असणार बरेच.. लक्षात आलं नाही.. आमचं कॅलेंडर वेगळंच होतं.. म्हणून.. तेव्हाही सुरुवात झाली होती.. ग्रीटिंग कार्डांची चार्पाच दुकानं फोडायला.. पण फरक पडला नाही.. कारण ग्रीटिंग घ्यायचं नव्हतंच.. ग्रीटिंगबिटिंग कशाला.. भावनांचं प्रदर्शन नुसतं.. म्हणून.. चॉकलेटं.. हार्टशेपची नव्हती.. तिला दिलं होतं मी.. रावळगाव मला वाटतं.. अन तिनंही मला.. कॉफी बाईट.. रॅपर पडून आहे कपाटात खास कप्प्यात.. ठेवून उपयोग नसला तरी फेकायचं कुठे..

छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर

लेखक सागर यांनी शुक्रवार, 10/02/2012 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
Kurundkar आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.

नाते मुला॑शी...मनाचे...

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 09/02/2012 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
नाते मुला॑शी...मनाचे... 'मुले म्हणजे देवाघरची फुले'..सुविचार तर नेहमी आमच्या ओठावर असतो. पण अलिकडे तो ओठावरुन पोतात गेलेला फारसा दिसत नाही. या फुला॑शी मनाचे नाते जोडण्याचा प्रयत्न आम्ही फारसा करत नाही. दिवसभर अस॑ख्य विषया॑चा अभ्यास, शाळा, पुस्तके यात गुरफट्लेली मुले घरी आल्यावर ट्युशन मग टिव्ही, यातुन वेळ उरलाच तर computer, mobile games इ. मध्ये या फुला॑चा पार पाचोळा होऊन जातो. काही थोडा ताजेपणा शिल्लक राहिलाच त्यातुन तर आम्ही लगेच पुढे सरसावून अभ्यासाचे, मार्का॑चे भूत त्या॑च्या मानगुटीवर बसवायला सज्जच असतो.