Skip to main content

प्रकटन

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. ---

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 17/01/2012 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा. खालील अभिप्राय बोलका आहे. ...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल.

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप

लेखक यकु यांनी सोमवार, 16/01/2012 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४ सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला. झपाट्याने पुढे गेलो. मागच्या आश्रमाच्या पायर्‍यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ‍ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली.

जे काही आहे ते सगळंच 'तत्त्वमसि' आहे!

लेखक मेघवेडा यांनी सोमवार, 16/01/2012 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज कित्येक दिवसांनी आलोय तुझ्याजवळ निवांतपणे. तुझं हे सौंदर्य नेहमीच मला भुरळ घालतं, आजही घालतंय! हे मोहक रूप डोळ्यांत साठवून घ्यायला उभा जन्मही अपुरा पडावा. तुझ्याजवळ कधीही येऊन बसलो की खूप शांत, प्रसन्न वाटतं. हलकेच तुझ्या कुशीत गाढ झोप लागते नि रोजच्या दगदगीने थकलेल्या मनाला खूप आराम मिळतो. डोळ्यांना सुखावणारी ही दाट वनश्री, सोनसळी नव्हाळी ल्यालेली ही साळीची शेतं, भयाण गडगडाटांनी आसमंत भरून टाकणारे ते कृष्णमेघ, जीवाच्या आकांताने कोसळणार्‍या त्या जलधारा, त्या तिकडे मखमली गालिच्यावर लकाकणारी सोनेरी उन्हं, ही अवखळपणे डोंगरदर्‍यांना गुदगुल्या करत बागडणारी नदी - अरे आणखी किती वेड लावशील?!

कोर्टटिपा..

लेखक गवि यांनी सोमवार, 16/01/2012 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोर्टरूम या बॉलिवूडमधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर "कटहरे में खडा रेह के" अनेक भल्याबुर्‍या लोकांच्या आयुष्याचे फैसले होत असतात. काहीवेळा बाइज्जत बरी तर काहीवेळा मिलॉर्डच्या पेनाचं निब मोडून कांडकं पाडलं जातं. मुळात सिनेमात असल्याने केस कोर्टात झटपट उभी राहून झरझर चालते.. भिंतीवरची गांधीजी, गांधारी बनून हातात तराजू धरुन ताटकळणारी न्यायदेवता आणि सईदजाफरीछाप न्यायाधीश हे निकाल लावण्यासाठी पूर्ण सक्षम आहेतच.. पण तरीही..

टेकन....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 16/01/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
तूमची वयात आलेली मुलगी , तुमचे ऐकत नसेल तर तिला हा सिनेमा जरूर दाखवा.....(तिला एक्टिलाच बघू दे ही माझी विनन्ती.....काही द्रुश्ये adult आहेत...पण ती कथेला पुरक आहेत.....) खरे तर मी एवढे एकच वाक्य लिहिणार होतो....पण "वल्ली" ह्यानी सान्गीतल्या प्रमाणे, थोडी माहिती द्यायचा प्रयत्न करतो... एक माणुस असतो. तो धन्देवाइक शरीर रक्शक असतो. त्याचा घट्स्फोट झालेला असतो. ...त्याची मूलगी तिच्या मैत्रीणी बरोबर Paris ला जायचा बेत आखते....तिचा रूट बघुन ह्याचा नकार्....पण मुलगी म्हणते .....की ती वेळोवेळी फोन करेल.....पण तिचा फोन येत नाही....मग हाच फोन करतो...नेमके त्याच वेळेस तिचे अपहरण होत अस्ते....ह्याच्

"सेफ्टी लास्ट"

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 15/01/2012 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
“सेफ्टी लास्ट" गुगल वर असेच काही शोधत असताना हा सिनेमा मिळाला. स्टोरी वाचली. लगेच सिनेमा download केला. सिनेमा बघा. दीड तास मस्त जातील ह्याची खात्री. अधिक माहिती हवी असेल तर लिन्क दिली आहे..... http://en.wikipedia.org/wiki/Safety_Last! (मला जास्त लिहायचा कंटाळा येतो.शाळेत माझा निबंध ८-१०वाक्यात संपायचा. इथे पण ८-१० वाक्यातच विषय संपवला आहे..)

एका कल्पनेतलं जग

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 13/01/2012 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी रात्री संगीतावर आधारलेला तो चित्रपट अगदी रंगतदार अवस्थेत होता. शाळेच्या आणि शालेय शिक्षणाच्या पार्श्वभूमीवरची कथा असलेल्या चित्रपटातल्या त्या भागात एकूणच बदललेला काळ आणि त्या काळातली शालेय मुलांची बदललेली अभिरूची दाखवणारा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता. नेहमीप्रमाणेच मी चित्रपटाचा अगदी गंभीरपणे आस्वाद घेत होतो आणि तेवढ्यात बदललेली सांगीतिक अभिरूची दर्शवताना पार्श्वभूमीवर एक गाणं वाजू लागलं आणि ते ऐकताच काळजात कुठेतरी लक्कन् हललं. तो प्रसंग आणि चित्रपट पुढे सरकला पण ते गाणं काही माझा पिच्छा सोडत नव्हतं.

आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 11/01/2012 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो. यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.