सन्मान! एका रानातल्या कवीचा..!
एक अतिशय आनंदाची बातमी..!
शेतकरी कवी, रानकवी, ना धो महानोर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा जनस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे समजते..
महानोरांसारख्या अस्सल मराठी मातीतल्या एका कवीचा साक्षात कुसुमाग्रजांनीच केलेला हा गौरव आहे असेच म्हणावेसे वाटते..!
कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..!
-- तात्या अभ्यंकर.
कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..!
-- तात्या अभ्यंकर.
मिसळपाव
हा कलकत्त्यात वाढलेला आणि नंतर मुंबईत स्थायिक उत्तम गायक....
९० च्या दशकातली त्याची कित्येक गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत....
पाच वेळा फिल्म्फेअर पुरस्कार मिळवून आता इतरांना पुरस्कार देण्यासाठी मला स्पर्धेत धरू नका , असे जाहीर केले.
एका दिवशी २८ गाण्यांचे रेकॉर्डिंग करून गिनेज बुकात नाव नोंदवले.
आतापर्यंत वेगवेगळ्या भाषांमध्ये सुमारे आठ हजार गाणी गायली.
..... त्याच्या सर्वच गाण्यांवर मन डोलते..थुईथुई नाचते.
मराठी भावसंगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे, एक अत्यंत प्रतिभावान संगीतकार!
त्यांना या वर्षी भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे! मिपा परिवारातर्फे या अनवट कलाकाराचे मन:पूर्वक अभिनंदन..! त्यांची उत्तमोत्तम गाणी आम्हाला यापुढेही ऐकायला मिळोत हीच सदिच्छा!
(हृदयनाथप्रेमी) तात्या.