Skip to main content

कविता

डोळे

लेखक मनिष यांनी सोमवार, 28/01/2013 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तळ गाठलेल्या, जुन्या, जाणत्या विहिरीसारखे खोल, खोल डोळे. त्यातलंही पाणी आता आटलंय... आणि खोलवर आत, आता फक्त दु:ख साठलंय! ~ मनिष (28/1/2013)

नशिबाचे भोग -

लेखक विदेश यांनी रविवार, 27/01/2013 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
" फुलू दया ना मला जरा , बघू दया ना जग जरा - तुम्ही सजीव, मीही सजीव कळून घ्या भावना जरा -" एक कळी स्फुंदत होती , वेलीजवळ मी असताना - मन आपले उलगडत होती हितगुज माझ्याशी करताना ! " काही करू शकत नाही जगाविरुद्ध जाता येत नाही - मरणाऱ्याला जगवते जग जगणाऱ्याला मारते जग -" ...केविलवाणे होत म्हणालो , दु:ख जाणूनही कळीचे . खिन्न हसून ती वदली .. " नशिबाचे भोग ज्याचे त्याचे ! " .
काव्यरस

उरली फक्त आठवण ..

लेखक विदेश यांनी शनिवार, 26/01/2013 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
बहरलेला वृक्ष होतो , एकदा मी छानसा - गळुन गेली फूल पाने.. एकटा मी हा असा ! नाचती पक्षी कसे बघुनिया खांद्यावरी.. खेळताना, होइ मजला हर्ष माझ्या अंतरी - फूल फळ हुंगावया जमति जेव्हां पाखरे - हृदय माझे भरुनिया जातसे तेव्हां खरे ! सावली शोधावया पांथस्थ ते येती कुणी - बाहु पसरुन स्वागताला धन्यता वाटे मनीं ! आज काही नाही उरले भोवती माझे इथे - एकटा मी दु:ख माझे सांगतो मजला इथे ! .
काव्यरस

अनुनय

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 25/01/2013 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
असतात रंग ढंगहि वेडे झरतात छटा रत रुधिराच्या हृदयात बंदिशी अनोळखी डोळ्यांकाठी रति भावुकशा खल मदन उरी रण रिपुकांचे ओठांवरती नित शब्द मुका काया माया बहु काटेरी ओढाळ मती अस्वस्थ सखा चंद्रास न कळते झिजलेले पाण्यास व्यथा परि आकळते फेसाळ शिरी कल्लोळे जळ एकांत कुंद साहतो कळा सारेच कसे हे अवरोही तळ नितळ सकळ ढवळे गात्री आभाळ दूर दूरच सरके मग श्वास फिरे नत माघारी डोहात बंद अगणित रात्री गंधर्व क्षणांच्या गंध कुपी अस्पर्शधुंद हा ओलावा अनुनय समिधांचा मापारी ........................अज्ञात

मनमुक्त

लेखक समयांत यांनी मंगळवार, 22/01/2013 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
परिधान केलेला घनक्लांत तो, मनमुक्त बोल उधळत आहे.. जीवाच्या काहिलीने मी शोधत राहतो त्याच्या घनविभोर परिश्रांतीसाठी युगुल युक्त नजारा.... पण दाटून येतो निव्वळ विरहनियुक्त किनारा.. ;) त्याच्या भेटीच्या असोशीने..... n
काव्यरस

आनंदसागर

लेखक श्रिया यांनी मंगळवार, 22/01/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे.तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात" आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य,आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!

घे उत्तुंग भरारी,

लेखक अनिल तापकीर यांनी सोमवार, 21/01/2013 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
घे उत्तुंग भरारी,दाही दिशा मोकळ्या आहेत भिऊ नकोस डगमगू नकोस,अनंत वाट खुल्या आहेत रस्ते बंद आहेत म्हणून, चालायचे तू थांबू नकोस नवीन रस्ता शोधण्याचा, प्रयन्त मात्र सोडू नकोस एका जागी थांबून, तुला कोणी काही देणार नाही हात हलवल्याशिवाय, घास तोंडात जात नाही सुरुवातीच्या अपयशानंतर हि, पुढे उज्वल यश आहे दाट अंधारानंतरही, पुढे तेजस्वी प्रकाश आहे चढ उतार,सुख दुख: तर जीवनात येतच असतात इथे समर्थपणे लढनारेच, यशस्वी होत असतात

ओढ तुझी

लेखक आर्णव यांनी सोमवार, 21/01/2013 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
अद्रुश्य भावनांचे, अस्तित्व जाणवावे. विसरुनी या जगाला, तुजला मिठीत घ्यावे. स्पंदनांनी ही मग, वेगळे नसावे. असल्या एका क्षणाचे, मी काय मोल द्यावे. असता जवळ तूची, इतरत्र क्षुद्र आहे. बिन तू चातक हा मी, तव-वृष्टी वाट पाहे. आठवणी तुझ्याच, एकेक गोड आहे. या कोरड्या निशांना, तुझीच ओढ आहे.

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

लेखक मोदक यांनी शनिवार, 19/01/2013 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
******************************************************* धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले..

नकोस

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 18/01/2013 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
ती :- दिवसभराचा उजेड उतरत जातो झाडांच्या तळकोषी आरामाला झिरपत जातो हळू हळू अंधार व्यापतो आभाळाला........ तो :- नकोस हिणवू नको ओणवू सावर ग स्वतःला नभी चांदणे येइल अलगद सजविल तव मेण्याला धुके भ्रमाचे विरघळेल उदयेल नवी स्वरमाला हरवुन जाशिल तिथे सोडशिल ना या जन्माला संध्या- छाया ऊन-सावल्या खेळविती हृदयाला उमलविती रोमांकित वलये जागविती मधुशाला रंग नभाचे तसेच आपले अंत नसे क्षितिजाला शब्द कुंचले घेउन हाती हो सुसज्ज लढ्ण्याला ......................अज्ञात
काव्यरस