Skip to main content

कविता

रक्षाबंधन.. रक्षाबंधन ..

लेखक विदेश यांनी गुरुवार, 02/08/2012 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
. रक्षाबंधन... रक्षाबंधन दोन मनांची अतूट गुंफण ! हिरा भाऊ अन् बहीण अंगठी अंगठीस हो सुरेख कोंदण ! मदतीस्तव वा संकटातही धावे बंधू करण्या रक्षण ! भावाचा बहिणीस आधार द्रौपदीसखा तो नारायण ! दुजाभाव ना मनांत कोठे दोघांचे ते एकच रिंगण ! रक्षाबंधन ... रक्षाबंधन दोन जिवांचे अतूट बंधन ! .
काव्यरस

शब्दसावल्या

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 01/08/2012 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
आलाबाई एकदाचा पाऊस तुझा,... सैरभैर एकांत माझा,.. झिंगल्या वाटेत सयी सावळ्या- थेंबाथेंबात डोलु लागल्या बाहुल्या श्वास रुंदावले गोत नादावले पावलो पावली चाहुली पावल्या,.. साचलेले तळे जाहले मोकळे- अंगणी सांडल्या मुक्त शब्दसावल्या ...............अज्ञात
काव्यरस

हर देशीही तू, हर वेशीही तू

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 31/07/2012 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
हर देशीही तू, हर वेशीही तू रूपात हरेक, असशी परी तू तुझी रंगभूमी, ही सृष्टी जरी खेळांतही तू, मेळांतही तू सागरी उठशी, मेघांतूनी तू पर्जन्य होशी, जल होऊन तू मग निर्झर, ओढा, नदी होशी प्रकार अनेक, जलाशय तू घडला मातीतुनी, अणुरेणू रूप जीवसृष्टीचे, शाश्वत तू पर्वत कधी, विशाल तरूही तू कौतूक तुझे, सत्‌ एकची तू दाविशी दिव्य, जरी हे तू गुरूदेव दयाघन, प्रसन्न तू तुकड्या सांगे, परका न कुणी एकच सगळे जण, मी आणि तू
काव्यरस

आद्य आंदोलक- गोदाईवा

लेखक खेडूत यांनी रविवार, 29/07/2012 05:03 या दिवशी प्रकाशित केले.
आता अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आणि कदाचित नेहमीप्रमाणे ते संपणार किंवा कसे याबद्दल विचार सुरु होते. कारण ‘ नेमेची येतो’ प्रमाणे दर संसद अधिवेशना आधी ते होऊ लागलंय. एकूणच आंदोलनं वगैरे कधी सुरु झाली असावीत? राजेशाहीत तर ते दुर्मिळच. लोकशाही किंवा त्यासदृश राज्य व्यवस्थेतच ते शक्य आहे. असंच एक आंदोलन इंग्लंड मध्ये झालं होतं. ते वेगळं अशासाठी की ते लोकांचं नव्हतं पण लोकांसाठीच होतं. हेच कदाचित पाहिलं आंदोलन असेल.. इंग्लंडवर पण परकीय आक्रमण करून रोमन आणि नंतर जर्मन राजानी राज्य केलं होतं. नंतर अनेक वर्षं राजेशाही सुरु होती. सन दहाशे त्रेचाळीस! अंग्लो-साक्सन राजवटीचा काळ.

शब्द .. शब्द .. शब्द ..

लेखक विदेश यांनी शनिवार, 28/07/2012 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांच थैमान डोक्यातल्या कप्प्यातून घुटमळतात शब्द तेच मनांत कधीपासून - डोकावतात संधी साधत बेटे लेखणीतून घरंगळत पहुडतात कागदावर कविता बनून !
काव्यरस

प्रदेश

लेखक पेशवा यांनी शुक्रवार, 27/07/2012 03:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे हात नाग गळ्याभोवताली सुर-केवड्याचे रान बहरून आले देहवाटेवरी मिठीचा चकवा हरवणे सापडावे नव्याने जीवघेणे सुखाचा बसे काळजास दंश शरीरावरी शरीर ठिणगी सोसणारे विष-वादळानंतर उरे दगडदेह अन मन पिसापरी तरंगणारे चांदणे रमावे असा हा प्रदेश स्पर्शाच्या समेवर निःश्वास सांडणारे -पुर्वप्रकाशित
काव्यरस

हट्ट!

लेखक चैतन्य दीक्षित यांनी गुरुवार, 26/07/2012 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
हट्ट कोणता करू तुजकडे? थिट्या मनाची झेप थिटी फिरून येती मनात इच्छा भेट हवी मज, हवी मिठी | आणि हासुनी ओळखशी तू, देउन जाशी हवे तसे मंतरल्यासम ते क्षण जाता, इच्छांचे त्या पुन्हा पिसे | 'थांब थांब तू, नकोस जाऊ' सांगावेसे तुज वाटे, त्याच क्षणी अन् सभोवताली काजळगहिरे तम दाटे | म्हणून जाशी मिठी छेडुनी झिणिझिणि वलये गात्रात अन् पुढल्या भेटीची होते मनी अनावर सुरुवात | असंख्य वेळा अशी भेटशी मिठीत घेशी हळुवार 'थांबवून ठेवावे तुज' ही इच्छा अपुरी, अनिवार | हट्ट सांग मी करू कोणता? थांबशील जो पुरवाया, थांबशील का अजून थोडी आज एवढे ठरवाया? -चैतन्य दीक्षित
काव्यरस

प्रवाह....

लेखक वेणू यांनी बुधवार, 25/07/2012 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आयुष्य, साचून राहिल्यासरखं वाटतं! सगळे मु़ख्य प्रश्न एकाच पदावर जाऊन बसलेले, अनुत्तराच्या! वेळेने तरी किती कळ सोसावी? शेवटी, आपल्याच इच्छाशक्तीची कुदळ, आपलेच दोन घाव आणि साचलेल्या आयुष्याला नवी वाट, नवा प्रवाह!! मोकळ्या झालेल्या त्याच खळग्यात, सार्‍या किचकट प्रश्नांना टाकून, मुठमाती दिलेली, कायमसाठी! आता, नव्या प्रवाहाचा उन्माद, त्याचा खळाळ, सुगंधी.... वेडावणारा! -वेणू

तुझ्या विना

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 23/07/2012 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या विना ही रात्र माझी सरते काळी काळी तुझ्या विना मी लावून आलो संसाराची होळी || तुझ्या विना हा अल्लड वारा रुंजी घालत नाही तुझ्या विना या पाउसधारा रुसून गेल्या काही || तुझ्या विना हा कुंद मोगरा गंध सांगत नाही तुझ्या विना या मैफलीचा रंग रंगत नाही || तुझ्या विना बघ उडून गेले रांगोळीचे रंग तुझ्या विना मी करत बसतो आठवणींशी संग || तुझ्या विना मी शोधात आहे जगण्याची आशा तुझ्या विना मज अवगत नाही प्रेमाची भाषा || तुझ्या विना हे सुटतच नाही विरहाचे कोडे तुझ्या विना हे मन म्हणते ‘श्वास उरले थोडे’ ||
काव्यरस

मी तसाच पुढे निघालो…

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 20/07/2012 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जवळ काय घडतय, ह्याची जानिव होवुन, काहीच करता येत नाही त्या वेळी अगतीकता जानवते. न मिळालेली उत्तरं सतावतात, त्या वेळी स्वतवर राग काढन्याशिवाय काहीच करु शकत नाही. मग एक मळीभ दाटून येते...
काव्यरस