Skip to main content

कविता

गंधार घेतले तू

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 27/06/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
कोत्या मना मनांचे, आजार घेतले तू आईस रडवण्याचे, आभार घेतले तू वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू मातीत वेदना ही, का उगवते अजूनी झाडास छाटण्याचे, औजार घेतले तू अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू - संध्या
काव्यरस

बोगदा

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 26/06/2012 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
बोगद्यामध्ये कितीही अंधार असला तरी त्याच्या दोन्ही तोंडाशी उजेड असतोच एकाबाजूने येणारा अन् दुसर्‍याबाजुने जाणारा . मी बर्‍याचदा जाणार्‍या उजेडाकडे उभा राहतो विरुद्ध दिशेला . येणार्‍या उजेडाचा अवखळपणा सोसत नाही आजकाल नाही, अजून काही मी वयोवृद्ध वगैरे नाही झालोय बरगड्यांच्या सापळ्यात धडधडणारे हृदय अजूनही न करकरता बिनविरोध चालू आहे . पण तरी जाणा-या उजेडाचे मृदुमुलायम अस्तर अंगावर वाहण्याची चटक लागलीये आता . बोगद्यातील कळकभिन्न अंधार अन् डोळ्यांपुढे काजवे चमकवणारा "येणारा उजेड" या दोघांना ओलांडून येणारा अनुभवाची शाल पांघरलेला "जाणारा उजेड" तसे खूप काही शिकवून जातो, नाही? |- मिसळलेला काव्यप्रेम
काव्यरस

वणवा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 25/06/2012 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा देखणा देह पेटवी देहात वणवा तिच्या अदा कातिल होई जीव घायाळ तिची रेशमी साडी करे पदराशी चाळा ते चोरटे कटाक्ष होई जीव खुळा उसळे कुंतलाच्या लाटा दर्वळे आसमंत सारा भरकटे गलबत माझे कोठे शोधू किनारा बिघडे श्वासाची लय तिचा धकधकणारा उर ति गौरगुलाबी काया चुंबण्या जीव आतुर

अंगाई मज गाती..

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 23/06/2012 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंगाई मज गाती इथे ओळखीचेही पक्षी, अनोळखी का होती रंगभूमीची गाणी कसली, रंग असेतो गाती भिरभिरणा-या आभाळाचे, क्षितिजामागे रडणे नभी पाहता निशिकांताला, अर्णवा ये भरती कुशल हातांचा स्पर्श लाभता, विराणशा माळाला फुललेल्या बागेतुन होते, भ्रमरांची या दाटी गेला गेला दिवस बुडाया, पश्चिमेच्या पाठी कातरवेळी लांबल्या छाया, तेवते मी वाती हिरवी माया, नयनी एका.. पाखरांची घरटी निळ्या लोचनी, हासते पणती, अंगाई मज गाती - संध्या
काव्यरस

तीट!

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 22/06/2012 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
तनुवेलीवर यौवन फुलले, पाहुनिया तुज हे जग भुलले, हरले! सगळे प्रयत्न हरले ! सांभाळावे कसे मनाला? सांग तूच गे मला, शिकावी कुठे कलंदर कला ? नुकती सरली वर्षे सोळा ज्वानीचा ह्या नूर निराळा... भाव कसा मग असेल भोळा? नजरेच्या एका घावातच जीव जाहला खुळा ॥ सावळकांती, आखिव बांधा, चालीमधला झोक न साधा, मदनालाही होइल बाधा तुला पाहता, श्वास आतला आतच गं थांबला ॥ पदराआडुन हसते काही, बघणार्‍या मग भानच नाही, तुझाच तो होउनिया राही संन्याशाला संसाराचा लावशील तू लळा ॥ मनी तुझ्या जे काही दडले, ओठ सांगताना अवघडले, ते न इथे कोणाला कळले. ह्या मौनाची 'तीट' लावुनी, देव जरा शांतला ॥ - चैतन्य दीक्षित
काव्यरस

देव वाटला- असुर निपजला !!

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/06/2012 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म लाज संस्कार शरम सोडुन बनला कसा नराधम - फासुन व्यवसायास काळिमा पैसा-पैसा करसी अधमा ! अर्भक दिसले- शस्त्र उचलले माणुसकीचे नांव न उरले ! जिरला टाहो गर्भातच तो माउलीस ना पान्हा फुटतो - स्त्रीभ्रूणहत्या नित्य करावी कशी कळावी मातृथोरवी ! धन्य होतसे का तव माता - कृष्णकृत्य तव तिजला कळता ? म्हणेल माता नक्की तुजला, देव वाटला- असुर निपजला !!

वऱ्हाडी लोकगीत -उचाट नागोबुढा

लेखक श्रीरंग_जोशी यांनी गुरुवार, 21/06/2012 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
इयत्ता पाचवीत शाळेतल्या संगीत शिक्षकांकडून शिकलेलं व आजही तोंडपाठ असलेलं एक वऱ्हाडी लोकगीत. माझे योगदान केवळ टंकण्याचे. ------------------------------ पावसानं इचीबहीन कहरच केला गावच्या नदीले पूरच काय आला अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला बुढीबी बाप्पा भल्ली गया काढून रडे अन खोपड्यामध्ये इचीबहीन उठू उठू पडे यक जन पलीकडे जाऊन बी आला अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला नागोबुढा पोरीच्या घरीबी गेला अन तुपासंगं पोयी खाऊन बी आला तरी म्हने यक रस राहूनच गेला अन लोक म्हणत नागोबुढा वाहूनच गेला पायटी पायटी बुढा कानी गावातची दिसे अन लोकाईकडे पाहून गालातची हसे लोक म्हने काबे काऊन नाही मेला अन लोक म्हणत न
काव्यरस

दुष्काळ...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 21/06/2012 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
आई पाझरत्या डोळ्यांनी तू जेव्हा मला पाठमोरा पहात होतीस जाताना... तेव्हा माझे पाय अडखळले....मी मागे वळून पाहिल्यावर मला दिसला... बाभलीखाली उभी राहिलेली तू अन तुझा तो फाटका पदर... ते रनरनत उन, बांधावर आडवा पडलेला तो नांगर... सावलीत उकिडवा बसून एक टक आभाळाकडे कोरड्या डोळ्याने पाहणारा तात्या.... हाडावंर कातडं ताणून खपाटीला गेलेलं पोट सांभाळत शेवटच्या घटका मोजणारी ढोरं.... पलिकड जमिनीचा ठाव घेत आ वासून बसलेली ती विहीर... आणि बांधावर लिंबाखाली भर उन्हात तिरपी किरणं अंगावर घेत घाम फुटल्यासारखा मक्ख बसलेला तो शेंदरी म्हसोबा... मला आता जायलाच हवं पुढं....
काव्यरस

असणं!

लेखक वेणू यांनी मंगळवार, 19/06/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्याचं निव्वळ 'असणं' इतकं सुंदर असतं? की आपल्या भावविश्वाची सारी सूत्र, त्या हाती सुपूर्द व्हावीत... आपण रिक्त होऊन! बेदरकारपणे स्वतःला आयुष्याच्या आरामखूर्चीत झोकून द्यावं, मिटल्या डोळ्यांनी आता, ते असणं अनुभवावं! नव्याने साठवावं! ते असणं मात्र टिकावं, रेंगाळावं- जगताना पुरून उरावं! कायमच, सुख मिळालं की दु:ख मागे रांगेत उभेच असतात, ह्या नियमाला तोडून...... -वेणू

जनता मागते भीक आहे.

लेखक निश यांनी मंगळवार, 19/06/2012 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनमोहन असताना सगळ काही ठीक आहे सत्ताधार्‍यांना सोनियाचा दिन, जनता मागते भीक आहे. कॉमनवेल्थ घोटाळा करुन कलमाडी सध्या घरी आहेत. पॄथ्वी राजाच राज्य सध्या टोळ लुटण्यात मग्न आहे. प्रणव आता राष्ट्रपती होतील अशी आता आशा आहे. पाऊस पडला तरी पैकाविना शेती कशी ? शेतकरी राजा निराश आहे. नव नविन कर घेण्यात सरकार घेते आघाडी आहे. सोयी सुविद्या पुरविण्यात ह्यांची नेहमीच पिछाडी आहे. सरकार म्हणावे कसे? हा तर देश लुटण्याचा लुटारुंचा खेळ आहे. आता थांबवा हे सगळ कारण झोपलेली जनता जाग व्हायची वेळ आली आहे. झोपलेली जनता जाग व्हायची वेळ आली आहे.