Skip to main content

कविता

आयुष्यातील वळणे....

लेखक अथांग यांनी मंगळवार, 28/09/2010 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील वळणे, कधी पाऊस, कधी जळणे... काही नाती ओली-हळवी- काही फक्तं दळणॆ ! कित्ती सारे मोसम आलेले, भोगलेले, क्वचित – उपभोगलेले... काही फुले फुललेली तनात – काही करपून गेलेले ! तरी पण पुढच्या क्षणात, क्षणातील एक-एक कणात... खूप काही जपण्याचे – पण मनातल्या मनात ! आयुष्यातील वळणे, कधी पाऊस, कधी जळणे... काही कोडी सुटल्यासारखी, अन.. काही कधीच न कळणे... कधीच न कळणे !!!

गुपित !

लेखक अथांग यांनी सोमवार, 27/09/2010 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांचे किती-कसे, उभे आडवे वळसे.. भाव ओथंबले त्यात, ओठीं काही येत नसे ! हो, डोळे बोलतात कधी, भाषा एक साधी-सुधी.. ज्याची त्याला समजावी, कुणी-कुण्णी नको मधी ! काही हलके इशारे, उभ्या अंगाला शहारे... भर उन्हातही जणु, मनभर गार वारे ! क्षणी असे हरवणॆ, आणि पुन्हा गवसणॆ... तुझी-माझी लपाछपी, सार्‍या गावाचे बहाणे !!

पहावे अंतर्यामी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/09/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणे देव भक्ताचा भुकेला वारकरी मेला वारीतच विश्वात्मक ऐसे इथे काही नाही तुच तुला पाही आत मध्ये तुझ्या अस्तित्वाचा एकच पुरावा मी पणा पहावा अंतर्यामी अंतर्यामी घ्यावा शोध ज्याचा त्याने विचार स्पंदने निरिक्षावी सांडे अहंकार वासना विकार जेव्हा निर्विकार पाहसी तू...!!
काव्यरस

निसर्गाची भाषा

लेखक शुचि यांनी शनिवार, 25/09/2010 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
आई फक्त माणूसच बोलू शकतो का? नाही बाळा, सारी सृष्टी बोलते आपल्याशी ऐक जरा. फक्त भाषा भिन्न असते. ____ चंद्राची भाषा चांदणे, सूर्याची भाषा रवीकिरणे वार्‍याची भाषा झुळकेची, समुद्राची अलवार गाजेची ||१|| पिंपळवृक्षाची सळसळ, नदीनाल्यांची खळखळ सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||२|| कमळ बोलतसे उमलण्यामधुनी, मधमाशी ती कष्टांमधुनी पहाड बोले अचलपणांतुनी, नभ ते त्याच्या पोकळीतुनी||३|| मौन होउनी संवाद साध बघ, आकळेल निसर्ग तुला सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||४||
काव्यरस

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

तू येतोस ...

लेखक ढब्बू पैसा यांनी शुक्रवार, 24/09/2010 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न! गेलं एक वर्ष खूप वाचलंय इथे. लिहिण्याचं धाडस मात्र आज पहिल्यांदाच करतेय. थोडी धाकधुक आहेच. जे लिहिलंय त्याला कविता किंवा मुक्तक काय म्हणायचं हे मलाही ठरवता येत नाही. ह्या कवितेला मला सुचली होती ती "इश्किया" चित्रपटानंतर.
काव्यरस

भक्तीगीतः गणपती त्यांच्या घरी गेले

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 23/09/2010 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती त्यांच्या घरी गेले
गणपती त्यांच्या घरी गेले मनाला रुखरुख लावूनी गेले ||धृ|| दहा दिवस थांबले घरी आनंद आणला त्यांनी दारी पुजा अर्चनाने घर पवित्र झाले गणपती त्यांच्या घरी गेले ||१|| म्हटल्या आरत्या मोठ्या आवाजाने ओवाळले निरांजन भक्तीभावाने प्रसादाचे मोदक कितीक वाटले गणपती त्यांच्या घरी गेले ||२|| हर्षाचा उत्सव पुर्ण झाला आता नाच नाचून देहभान हरपता "पुढल्या वर्षी लौकर या" सारे बोलले गणपती त्यांच
काव्यरस