Skip to main content

कविता

श्वास

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 04/03/2010 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
कधी मी उरतो ,कधी मी पुरतो एकमेव मी कधी न भुलतो साथ माझी रे जन्मापासुनी मी संपता जीव ना उरतो कधी उश्वास नधी निश्वास नावं माझी अनेक हृदयाशी मैत्री माझी फक्त श्वास म्हणूनच नेक कधी शरीर, कधी काया जेथे मी तेथे माया क्षणार्धात मी सोडूनी जाता नाती गोती सर्वही वाया काळ मी आज मी सुरवात मी शेवट मी अनादी मी अनंत मी दिव्यासारखा तेवत मी दिव्यासारखा तेवत मी

कारण ती माझी चांगली मैत्रीण होती.........

लेखक मंगेशपावसकर यांनी बुधवार, 03/03/2010 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
कारण ती माझी चांगली मैत्रीण होती......... साधी सोज्वळ निरागस होती पण जगाचे भान मित्रत्वाची सान चांगलेच ओळखून होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती ती होती तेव्हा बोलायचो खूप एकमेकांशी हातात हात नसेल कदाचित पण डोळ्यानेच मला समजून घेत होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती विचारात घेता ते आकर्षण मुळीच नव्हते फक्त तिच्या डोळ्यांनी मी प्रभावित होतो ती हि कधी हा विचार करत होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती घरी येणे जाणे नसेल एकमेकांचा कॉलेज मध्ये क्लास मध्ये एकत्रच जात होतो माझ्या साठी वाट पाहत गेट बाहेर उभी होती कारण ती माझी चांगली मैत्रीण होती कधी कधी वाटायचे हि माझी प्रेयसी

सोहम

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी मंगळवार, 02/03/2010 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
आता रोजच यावसं वाटतं तुझ्याकडे, तसे तुझ्या माझ्यामधिल आस्तित्वाचा शोध मला माझ्या जन्मापसुनच लागला, पण आता तुझ्या ओढीने मी खुपच व्याकुळ होते, माझे अश्रु शिंपडल्याशिवाय तू तुझ्या नीद्रेतून जागा होत नाहिस एरवी तुझे माझ्यातील आस्तित्व तू जरा देखिल जाणवु देत नाहिस तू अमुर्त आहेस, मुखवटे चढवायला तुझ्याकडे चेहरा, शरीर आहे कुठे तू आहेस फक्त एक भावना माझ्याच मनात पैदा झालेली. तुझे आस्तित्वच माझ्या आस्तित्वात आहे पण तरिही वेडं मन तूला माणसात शोधायला जाते तुला शोधित शोधित मी मृगजळापाठी वेडयासारखी धावते आणि धावुन धावुन थकले कि पुन्हा तुझ्याकडे येते तू सवयीप्रमाणे पुन्हा मला तुझी शितल छाया आणि अथांग प्रेम
काव्यरस

फुलांच्या थव्यांनी..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 01/03/2010 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ुलांच्या थव्यांनी तुला गं पहावे तुझा गंध लेऊन गंधीत व्हावे.. तुझे पाहुनी लाजणे गोजिरे हे वसंतास वाटे, 'पुन्हा मीच यावे' जसा चंद्र अवनीस बिलगून जावा तुझ्या सोबतीनेच मी ही जगावे सुरांना तुझा साज मंजूर व्हावा तुझे गीत ओठावरी या सजावे तुझ्या लोचनी स्वप्न रंगून जावे नि साकार ते, जीवनी मी करावे निशाणी तुझी गे प्रिये आज दे तू जगी सर्व, मी आज श्रीमंत व्हावे.. - प्राजु वृत्त : भुजंगप्रयात लगागा, लगागा , लगागा, लगागा
काव्यरस

आमचा देश

लेखक सचिन थमके यांनी सोमवार, 01/03/2010 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या सारख आष्यभर एकिवर आम्हि नाहि थांबत आणि थांबनार पण नाहि कारण आमच्या देशात असं काहिं करण नाहि आम्हि एक ना दोन ना तिन लग्न करु शकतो कारण आमच्या देशात अट एकच तिघिना सर्व काहि समान अगदि नवरा सुधा समान समजा नहिच, पट्ल तर तिन वेळा तलाख तलाख तलाख कारण आमच्या देशात पाच हजार फेकावे आणि म्हणावे तलाख तलाख तलाख कारण आमच्या देशात तलाख नंतर, तिचा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा मि दुसरीच्या शोधात ति दुसरयाच्या शोधात कारण आमच्या देशात बायकोचा शोध, बस थांब्यावर कार्याल्यात, क्लबमधे आणि महिविधालात मला एक ति मिळालि, ति सुधा अगोदरचाचि गरोदर कसा आहे आमचा देश आहो जगात आम्हि आहोत अगेसर तलाख देण्या

मैत्री

लेखक गुपचुप यांनी सोमवार, 01/03/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय... गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.. रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस.. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.. तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस.. मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा दिलं घेतलं सरेल तेव्हा..
काव्यरस

बेरंग होळी!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 01/03/2010 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
आली रंगीबेरंगी होळी पण झाली आहे महाग पुरणपोळी झाल्या महाग तांदूळ अन डाळी महागाई सर्वांचे कानपीळी रिकामीच आहे सामान्यांची झोळी... आली रंगीबेरंगी होळी पण आहे मनी दहशतीची भिती काळी नेत्यांची राजकारणी खेळी जातो जनतेचा बळी कधी सरेल दहशतीची रात्र काळी...?
काव्यरस

ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली

लेखक नितीनमहाजन यांनी गुरुवार, 25/02/2010 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना "कमला" सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही. सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्‍या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले: तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची?

प्रेमबन

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी गुरुवार, 25/02/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
कळीचे उमलणे, बहरणे तीच्या हाती नव्हते प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. भ्रमराने यावे, प्रेम बरसुन जावे, तीला उमलावे, तीने झंकारुन जावे भ्रमराचे हे येणे , तीला उमलवणे तीच्या हाती नव्हते, प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. भ्रमराने मग तीला सोडुन जावे तीला दु:खात बुडवुन टाकावे भ्रमराचे हे सोडुन जाणे, तीला कोमेजवणे तीच्या हाती नव्हते. प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते. पुन्हा नविन भ्रमराचे येणे, पुन्हा प्रेमात डुंबणे पुन्हा खंगणे आणि पुन्हा कोमेजणे सारे कसे क्रमाने, नियमाने घडत होते जरी ते घडणे तीच्या हाती नव्हते प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती
काव्यरस