Skip to main content

कविता

.. जगण्यात काय आहे?

लेखक राघव यांनी सोमवार, 31/08/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळ, कर्ज यात बुडालेले शेतकरी असोत का नर्मदातीरी भंगलेली घरटी असोत.. दु:ख शेवटी काळीज पिळवटणारेच असते.. नाहीच आस जेथे जगण्यात काय आहे? आयुष्य ठेवलेल्या सरणात काय आहे? दिसतात येथ सारे मिठ्ठास बोलणारे.. स्वार्थात रंगलेल्या शब्दांत काय आहे? आता नको पुन्हा ती आश्वासने, दिलासे.. बोलावयास सारे.. पोटात काय आहे? तू सांग देवराया आता कसा जगू मी.. काळीज फाटलेले.. ठिगळात काय आहे? देऊ कसा भरवसा कोमेजल्या मनाला.. तुटतात जेथ नाती मैत्रात काय आहे? असतो असाच थोडा पाऊस सांडलेला.. भेगाळल्या धरेला पुरणार काय आहे? पडत्या घरास माझ्या सोडून मीच जातो.. अवशेष दावणार्‍या दगडांत काय आहे? (विषण्ण) राघव
काव्यरस

धा धिन धिन धा

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 31/08/2009 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
मेघांचा डफ, तडीतेची थाप गगनाच्या अधरी, मल्हारराग लय.. जलतरंग, भुई छेडीता तालास येई, लयबद्ध जाग पवनाने धरिला सुर अन नाचे गणेश धा धिन धिन धा .... धा धिन धिन धा शुभसुंदर .. अरूपाचे रूप गौरीतनय .. तो गण नृप लोभस मुर्त .. मुखगजस्वरूप आल्हादघन, सांबनंदन नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा पदी पैंजणे .. झंकारती रसभाव मुखी .. साकारती तुंदील तन .. मोही मती अंगांग मीन, मुद्रेत लीन नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा आकाशगंगा .. तेजाळली नक्षत्रे नभी .. उल्हासली चैतन्यगंधी .. हर्षावली विश्वाचा मंच, अपुरे अनंत नाचे गणेश धा धिन धिन धा ... धा धिन धिन धा
काव्यरस

कावीळलेल्या भींती

लेखक ॐकार यांनी शनिवार, 29/08/2009 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलेली रास खडीची, गंजत पडलेले पत्रे निसरड्या पायरीवरती हुंगत बसलेले कुत्रे कचरापेट्यांना आली बुरशीची दमट नव्हाळी कावीळलेल्या भींती आता झाल्या शेवाळी बिथरला डांबरी रस्ता, बिचकली मातकट धरती विटकरी गांडुळे आली माना वेडावत वरती पागोळ्यांच्या गोळ्या टपर्‍यांवर तडतड करती चहाळ वाफा आल्या की मेणकापडे चळती दरवाज्यावरती आली वाळवी तरणीताठी कुरबुर करण्यात उलटली बिजागरींची साठी वैचित्र्यातील सौंदर्ये पाऊस घेऊनी आला मनातल्या चिखलाचा शिंतोडा एक उडाला
काव्यरस

मन

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 29/08/2009 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
मन गवताचे पाते ,मन मेघ पावसाचे मन पहाटवार्‍याचे , दव होउन बोलते.. मन नाजूक सतार ,मन अबोल गंधार मन सांजावल्या रानी, कृष्ण बासरीचा स्वर... मन रात्र शांततेची ,मन नक्षी चांदण्यांची मन लाट सागराची, वाट आडवळणाची मन तेज भास्कराचे,मन वार्‍याच्या वेगाचे मन अलवार सूर नभी एकटे गुंजते मन श्वास या देहात, मन पाखरु रानात मन ज्योत राउळात कधी वीज आकाशात मन पावसाचे थेंब ,मन जणु प्रतिबिंब मन सुकल्या रानात, एक नाजुकसा कोंब..
काव्यरस

ते माझे घर

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 29/08/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
ते माझे घर घर कसे असावे याबाबत निरनिराळ्या संकल्पना प्रचलित आहेत. "पोस्टातील मुलगी" सिनेमात गदिमांनी केलेले वर्णन लक्षात राहण्यायोग्य आहे. ते आहे असेः ते माझे घर, ते माझे घर जगावेगळे असेल सुंदर असेल सुंदर ! नक्षिदार अति दार तयाचे शिल्प तयावर बुद्धकलेचे चक्रे, वेली, मूर्ती मनोहर ! अंगणी कमलाकृति कारंजे वरी अप्सरा एक विराजे झरतिल धारा ओलेतीवर ! आकार मोठा, तरिही बैठा आतुन वेरुळ आणि अजिं

बाप्पा , असे ही...

लेखक हृषीकेश पतकी यांनी गुरुवार, 27/08/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी संध्याकाळी विसर्जीत होणार्‍या एका गणेशमूर्ती कडे पाहून सुचलेली ही कविता....

भेटी

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 27/08/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
उजळती दीप स्वप्नांचे अलवार क्षणांच्या भेटी बहरात गंध प्रणयाचा, त्या बकुळफुलांच्या भेटी भिरभिरता अवखळ वारा, सरसरत्या श्रावणधारा नखशिखांत भिजल्या हिरव्या पाऊसखुणांच्या भेटी उलगडली कितिक रहस्ये, गीतांत भाव अवतरले शरदात चांदण्या रात्री हळुवार सुरांच्या भेटी सुकलेल्या गजर्‍यामधल्या गंधाचा अत्तरफाया रुसव्याचे फसवे नखरे, हसर्‍या अधरांच्या भेटी तळव्यावरच्या मेंदीच्या नक्षीत रंगली प्रीती सुकुमार कंठि गुंफियल्या रेशमी करांच्या भेटी विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी अलगद टिपले तार्‍यांनी हृदयाशी मधुर क्षणांना अन् चंद्रानेही जपल्या अंतरी मनांच्या भे
काव्यरस

..मोक्ष..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 27/08/2009 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
..मोक्ष.. ------------------------------------- फुले वेचिली देवपूजेस जी तू तुझ्या कुंतलात जरा माळ काही नवा अर्थ दे तु बहरण्यास माझ्या कुणी देव काही म्हणणार नाही नको एकटी तु राहुस ऐसे नको होऊस माझ्या आठवणीत चूर तिथे तेज माझे वातीसम फडफडे कसा मंद राहु मी तारकांत दूर? भाळावरील तुझ्या मोहक ती बट अजुनि आहे तैसीच पण भासे उदास पुन्हा उमलु दे गालावरी खळ्या गं पुन्हा मुक्त उधळु दे मनी वसंतास जरा न्याय अप्सरे,दे तू तुझ्या यौवनाला दिसे मज सारे दुरुनि नभात अजुनि आहेस तु लावण्यखाणी स्वत:ला पाहा तु पुन्हा आरशात जरा मोकळे केस सोडुन..गं..तु सुकेशा होऊनि अल्लड ये पुन्हा अंगणात तिथे मी कधीचा बरसतोय इतु
काव्यरस

मन काहूर...

लेखक प्राजु यांनी बुधवार, 26/08/2009 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
काहूरले मन सांजवेळ होता होता हूरहूर लागे जीवा रात गूढ होता क्षितिजास पहुडली कंटाळली वीज डोळ्यातून परतूनी गेली आज नीज तळपता रवी थकलेला संध्याकाळी जळताना दिन सारा साचली काजळी रेखले या काजळास अवनीच्या डोळा सोनसळी आसमंत झाला गं सावळा सावळ्या नभाची चढे चांदव्याला धुंदी दूर दाट सावलीने थरारली फ़ांदी इवल्याशा घरट्यात इवलासा श्वास चोचीतल्या दाण्यालाही कोटराचा ध्यास दूरदूर डोंगराचे शिखरही नीजे काळ्या कागदास नक्षी चांदण्याची सजे काळोखाचा आवाजही किर्रर्र दाटे असा रात्रीवर उमटतो खोल खोल ठसा नटलेली निशा पण मन हे काहूर उदासच वाटे आज पावरीचा सूर खोल अंतरात जसा अडकला स्पंद गळा दाटलेला तरी फ़ुटेना का बांध??
काव्यरस