Skip to main content

कविता

माझा प्रियतम

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 29/09/2009 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: ओळखा पाहू ?) माझा प्रियतम गेला रंगून आणि दूरध्वनी केला तिथून तुझी आठवण मला येते हृदयात आग माझ्या लावते मी सोडुन हिंदुस्तान खूप पस्तावलो, खूप पस्तावलो.. झाली चूकच माजी, तुला घेऊन नाही आलो घेउन नाही आलो... मी म्यान्मार्च्या गल्लीत आणि तू आहे डेराडुनात, तूझी आठवण गं येते.. तूझी आठवण गं येते.. जबरा, हाय का नाई ? हरलात ?? हरलात ???? कळवा.. खरडवहीतून उत्तर कळवण्यात येईल...
काव्यरस

एक आकाश माझही

लेखक अनुप्रिया यांनी सोमवार, 28/09/2009 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ आकाश कायम माझच असत तसही कोणी मागायला नाही येणार ते हसू नकोस.....माहीतीय मला खरच नाही येणार..........कोणीसुध्दा का याव?? अस काय विशेष तो एक तुकडा........ म्हणल तर फाटकातुटका माझ्या मनात कायमचा विसावलेला पावसाला आणणारा विजांना चमकवणारा शुभ्र धुक पाखरणारा आणि हळूच त्या तेजोगोलाच दर्शन घडवणारा म्हण म्हण पुरे त्याच कौतुक जेलस झालास ना??? नाहीच कळणार तुला आमच स्पेशल नात ए........रूसू नको ना..... लहानपणी आजी मग आई-बाबा सरतेशेवटी तू ............... सर्वांनाच घर दिलय ना?? ...........त्या आभाळात........... - सोनाली घाटपांडे

रान

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 25/09/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याच्या सावलीचा धरावा विश्वास विषवल्ली कवटाळे त्या वृक्षास जळला मोहर, झडली पालवी, दिसे रिता, पर्णहीन तो भकास विषवल्ली तरारली, फोफावली, वाढत चालली; वेढत चालली घनदाट गर्द हिरव्या रानाला, एकेका वृक्षाची गिळत सावली रान कुठे आता? उद्ध्वस्त स्मशान घोंघावतो वारा एकटा बेभान उघडे-बोडके निष्पर्ण सांगाडे फांदीफांदीवर भुतांचे थैमान क्षणात अवघे चित्र पालटेल वठल्या वृक्षाला धुमारा फुटेल मिटतील विध्वंसाच्या खाणाखुणा, पुन्हा रानात या गारवा दाटेल मन रान, विषवल्ली अहंभाव वेड्या, कर तिचा वेळीच पाडाव जाळ तिची बीजं, तोड तिच्या फांद्या, आणि जिंकून घे आयुष्याचा डाव
काव्यरस

कवी

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 24/09/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
कवितांचा एक कारखाना चालवतो मी एकाच साच्यातल्या कविता छापतो मी आठवणींचा बाजार , प्रेमाचा आजार वेड्यागत असच काहीतरी , बरळतो मी गावरान गोडवा न ठाउक मला उगाच शब्दांचे काना मात्रा, चुकवतो मी हवे ते, जेंव्हा नाही गवसत मारुन मुटकुन शब्दांना, घुसडवतो मी विषयाची गरज, प्रसंगाची मागणी अशा- गोंडस नावाखाली शिवराळ शब्द, पेरतो मी टिकाकारांना त्यांच्याच भाषेत प्रत्युतर कुठल्याही व्यासपिठावर, भुंकतो मी

व्यथा

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 24/09/2009 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा ------------------------------------ जरी वाटतो नवाच आहे ऋतु कालचा तसाच आहे.. प्रतिबिंबासही रोज वाटते मीही देखील खराच आहे.. रामासाठी सीता होणे खरा दोष हा तिचाच आहे.. इथे थांबलो घटकाभर मी प्रवास अजुनि बराच आहे.. किती भरावे सूख तरिहि अर्धा प्याला रिताच आहे.. मला नकोसा शेवट झाला किती कथांची व्यथाच आहे..! - योगेशु

गणित

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 22/09/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
कधी शब्द ते वत्सल कधी प्रहार झेलायाचे कधी ओंजारणे स्नेहाळ कधी आघात सोसाट्याचे मनात असते कायम भय आंधळ्या डोहाचे अंधारभुल होते धुसर सुसाट वारे दु:खाचे येते नभा पल्याडुन बोलावणे कधी सौख्याचे कधी कोसळणे आकाश ओझे ते अनपेक्षिततेचे कोवळ्या अन किरणांतुनी ओघळणे कधी सुर्याचे रखरखाट कुठे तप्तसा हे जगणे असंतुलनाचे मी शोधतो वाट माझी सोडवीत गुंते रस्त्यांचे सुटले नाही कधीही मज गणित आयुष्याचे विशाल.

साडेसाती

लेखक अविनाश ओगले यांनी सोमवार, 21/09/2009 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
देईल का मज कुणी दिलासा साडेसातीत हवाहवासा म्हणती साडेसातीमध्ये फिरते घर अन् फिरतो वासा नुसती तडफड साडेसाती जळावाचूनी जैसा मासा सहजासहजी होते गोची उच्छ्‌वासांचा होई उसासा साडेसातीनंतर तरी का मनासारखा पडेल फासा? -अविनाश ओगले

CPU ची गोष्ट

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी सोमवार, 21/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बायका वेळ आणि मेमरी साठी भांडतात भांडणात गुंगतात अन स्वता:चे काम विसरतात वेळेची कमतरता , मेमरीची कमतरता बायकांची मागणी , मला जरा वेळ देता एकाच आईच्या ह्या पोरी, पण भांडतात किती अन सासुबाईंनीही समजुत घालायची तरी किती Restart झाल्याशिवाय ह्यांना कळणार नाही सासुबाईंनी वाटणी केल्याशिवाय जमणार नाही कधी कधी मी स्वता:चा गजनी करुन घेतो Restart होतो अन सगळं विसरुन जातो मग सगळ्या बायका बसतात , परत एकदा बोंबलत अन सासुबाई मरतात , मेमरीची मांडवली करत आता ही नवी कोण आयुष्यात आली माझा वेळ अन मेमरी घेउन गेली मी तिच्या प्रेमात अडकत चाललोय का वायरस मध्ये फसत चाललोय ह्या बायका अन पोरांना वेळ देता देत

शोकांतिका...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 21/09/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री मो. क. गांधी भेटले होते महात्मा गांधींना पाहिलंस का? म्हणुन विचारत होते त्यांनी म्हणे कधीकाळी रामराज्याचा संकल्प सोडला होता काल सांगत होते त्यांच्या रामराज्यातला रामच हरवला होता त्यांच्या डोळ्यातलं पाणी म्हणालं पोरा.. आजकाल सगळेच गांधीवादी झालेत बहुतांशी खादी(?)वादी झालेत आज समाजात खादीला(?) मोठा मान आहे मनात गांधी नसला तरी डोईवर गांधीटोपीची शान आहे गांधीवादातला वाद राहिलाय गांधी कुठेतरी हरवलाय....! कुणी येताय का शोधायला.. हिंसेच्या गर्दीत अहिंसावादी हरवलाय.. काल रात्री मोहनदास करमचंद गांधी भेटले होते हरवलेल्या महात्म्याला.. एकटेच शोधत होते...! विशाल