Skip to main content

संस्कृती

२१ वे शतक आणि भारतीय संस्कृती- भाग २

लेखक त्रास यांनी सोमवार, 02/02/2009 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय आहाराला चौरस आहार मानले जाते. तुम्ही जर आपला आहार खोलवर जाउन पाहिला तर तुम्हाला असे दिसेल की, त्यात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, ई. ह्याचे योग्य मिश्रण आहे. त्याबरोबरच आयुर्वेदात वर्णन केलेले व सणवाराला खाण्याचे पदार्थ पाहिले असता, त्या त्या ऋतूत मानवाला आरोग्यास मदत होइल असे पदार्थ सुचवलेले आहेत. इतका बारीक अभ्यास कोणत्या संस्कृतीत आहे? विचार करा, जेव्हा "अग्री"कल्चर" हे एक कल्चर नव्हते, तेव्हाचा मानव खाद्यपदार्थ कोणते असावेत, कोणते नसावेत ह्याचा कसा निर्णय घेत असेल? अर्थातच प्रयोगातून आणि वेळ्प्रसंगी जीवाची किंमत मोजून तो ते शिकला असेल.

कोल्हापूरचं घर मेणाचं!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 02/02/2009 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
ढकलपत्रातून आलेल्या काही छायाचित्रांनी माझी उत्सुकता चाळवली. कोल्हापूरजवळ हे मेणाच्या पुतळ्यांचं एवढं सम्रुद्ध विश्व? आहे कुठे बुवा हे नेमकं? बरं, ढकलपत्रं तयार करणार्‍या आणि तशीच पुढे पाठवणार्‍यांना या मूळ संकल्पनेचे जनक कोण, याचं कुणालाच सोयरसुतक नसतं. हे कुणाल विचारावं, याचा विचार करताना `मिपा'ची आठवण आली. तुम्ही कुणी पाहिलंय का हे ठिकाण?

२१ वे शतक आणि भारतीय संस्कृती

लेखक त्रास यांनी रविवार, 01/02/2009 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिसळपाव वरील एक चर्चा वाचल्यानंतर हे लिहावेसे वाटले. आपण जेव्हा २१ व्या शतकात जगायचा प्रयत्न करतो, म्हणजे नक्की काय करतो? माझ्यामते, आपण विज्ञान-तंत्रज्ञानाने पुढारलेल्या समाजाचे प्रतिनीधीत्व करतो. हे मी आत्ता लिहीलेले तुम्ही वेबवर वाचू शकता ते त्याच वैज्ञानिक प्रगतीने. मेडीकल सायन्स (मानवाच्या जीनचा संगणक आराखडा तयार होणे), संगणक, अंतराळ, इ अनेक क्षेत्रातील भरारी थक्क करते.

शिंडीबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ईथे द्या

लेखक शंकरराव यांनी रविवार, 01/02/2009 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
शिंडीबाई क्रॉफर्ड २० फेबूरवारी २००९ ला ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे मान्यवर मिपकरां तर्फे शिंडीबाईंना शुभेच्छा, भावना, कविता, लेख ह्या धाग्यामर्फत पोहोचाव्या ह्या हेतूने हा खटाटोप... शिंडीबाईंना तात्याने निमंत्रण धाड्ले आहे. त्यांचा नजीकच्या काळात मुंबई दौरा होण्याची शक्यता आहे... (सदर कर्यक्रर्माचे आमंत्रण तात्या लवकरच सर्वांनां ?? देईल ) ... ह्या धाग्यावरील शुभेच्छांचे सूंदर पुस्तक, एक नउवारी व कुंकवाचा करंडा शिंडीबाईंना भेट म्हणून दिला जाईल ;-) (अधिक भेटवस्तू सुचवाव्या) शिंडीबाई कोण ? ?

आपल्याला पटते का?-२

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 31/01/2009 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज जग २१ व्या शतकात आहे? :O आपण अधोगती केली :> नवे विचार बदलले पाहिजेत हे मान्य :W पण आज काही लोक एकच आयडी घेऊन वेगवेगळ्या संकेतस्थळावर वावरतात हे पटत नाही. ~X( अनेकआयडीव्रत ती फॅशन नसून त्याला काही महत्व आहे. :B आजच्या तरुण पिढीने आयडी बनवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण पतन केले पाहिजे L) आपण अंतरजालीय आहोत आणि प्रत्येकानेच दशावतारी नाटक करणे गरजेचे आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) >:) (अधोगत)केशवसुमार :P

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 29/01/2009 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठीच्या या अभिमान गितासाठी एक प्रकल्प श्री कौशल श्री. इनामदार हाती घेत आहेत. या प्रकल्पाची माहिती सर्व मराठी लोकांना व्हावी एवढ्या साठी येथे देत आहे. या विषयी सविस्तर माहिती मराठी अस्मीता या संकेतस्थळावर आहे.

मनाच्या कुपितले-पडदा पडताना

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 28/01/2009 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा पाचवा लेख
पडदा पडताना !
पार्श्वसंगीत चालू ......... "चालत राहील हे युध्द विचारांचे..........." असं म्हणत सर्व कलाकार स्तब्ध. आवाज वाढत जातो आणि पडदा पडतो, एका प्रयोगाचा शेवट होतो. नाटक ............. मानवी मनाला थेट भिडणारे माध्यम ..... जशी मैफलीतील एखादी चीज काळीज चर्र करते. तसेच नाटकातला एखादा संवाद हृदय फाडून टाकतो. म्हणूनच जशी एखादी शास्त्रीय संगीताची मैफल संपताना सर्वांची समाधी लागते. तशीच अगदी तशीच समाधी एखादा अत्युत्तम प्रयोग संपल्यानंतर होते.

भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)

लेखक दशानन यांनी बुधवार, 28/01/2009 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुरातनकाळात पांडव व कौरव ह्यांना शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य ह्यांना आपल्या उपजाविकेसाठी हे गाव दान दिले होते म्हणून ह्याचे नाव गुडगाव (गुरु गाव) ह्या गावात एक प्राचीन शितला माताचे मंदिर सोडले व गुरु द्रोणाचार्याचा एक पुतळा सोडला तर ह्या बद्दल काहीच पुरावा सापडत नाही, तसेच हा भाग नेहमीच युध्दाच्या सावली खालीच राहीला ते दिल्ली मुळे.. दिल्ली फक्त १८ किलोमिटर दुर. इतिहासाचे साक्ष देणारे असे काहीच बांधकाम आसपास दिसत नाही ते मोगलांच्या आक्रमणामुळे..

सावरकर आणि आपण

लेखक ए. प्रशांत यांनी बुधवार, 28/01/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक - अभिनय कुलकर्णी सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले.