डाॅक्टरांची फी
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
India's Doctors, When was the last time, you heard, there is a national emergency of pending cases in Indian courts so judges and lawyers must work 16 hr a day till all cases are cleared. When was the last time, you heard, There are so many vacancies in officer cadres of Indian Army that national security is at risk, so all management graduates from IIMs must join army for 5 years When was the last time, you heard, there is a crisis in education system as we have very few teachers going to village schools, so all engineering grads must dedicate 3 years of their life after graduation for this cause When was the last time, you heard, so many children, adults and old people are suffering from mental agony and remain untreated, so all bollywood actors, musicians, artists must do a 3 month crash course in art therapy and serve this population for 3 years and not pursue any commercial activity at all When was the last time, you heard, millions of people in India are dying due to lack of medical investigations and medications so all manufacturers of medical equipment and pharma companies must set up factories at their own cost and supply entire output for almost free to rural areas When was the last time, you heard, A politician was jailed and served a lifetime bar from any elections because a clerk did not fill a form properly that was mandatory by law When was the last time, you asked, Why software companies pay residential rate property tax and doctors clinics are treated and taxed as "Commercial establishments"? When was the last time anybody gave a F*** to what is happening to medical services in India? Then why majority hardworking medical professionals are maligned and treated like criminals because of a small percent of crooks, lame regulators and apathetic short sighted governments get a free run of the country?जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजूतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!!आमच्याकडूनच औषधं घेतली पाहिजेत असं सांगणार्या हॉस्पिटल्स वर कायदेशीर खटले दाखल करावेत.खटले कोणी दाखल करावेत?अशाच प्रकारचा कायदा शाळांनाही लागू करायला हवा. इथूनच कपडे घ्या, इथूनच बूट घ्या असे यांचे नियम असतात.समजा पुण्यामध्ये काही लाख मुले शाळेत जातात. त्यातल्या ५०% शाळा असे नियम करतात. मग अशा हजारो मुलांपैकी सर्वांचे पालक अशा मुजोर आणि अन्यायकारक नियमांना बळी का पडतात..? कारण.. या असल्या शाळा आणि ही हॉस्पीटल्स या गोष्टी "Perquisites" आहेत. सक्ती नाही. (शाळा / उपचार हे मुलभूत हक्क आहेत आणि सरकारने याची तरतुद केलेली आहे) पांचगणीच्या शाळेपासून ते गल्लीतल्या नगरसेवकाने टाकलेल्या इंग्लीश मिडीयम दुकानापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तेही नको असतील तर सरकारने ZP शाळा उघडलेल्या आहेतच - कोठे जायचे हा सर्वस्वी तुमचा निर्णय असताना त्यामध्येही एखादा नियम असावा, रेग्युलेशन असावे या मागण्यांना सरकारदरबारी काडीचीही किंमत मिळणार नाही. तुम्हाला मुलांना डेहराडूनला पाठवायचे आहे परंतु ती सेवा जिल्हा परिषद शाळेच्या फी मध्ये मिळावी ही अपेक्षा रास्त नाही. आपण असे समजू की चरक शुश्रुतांच्या काळापासून डॉक्टर लोक दुनीयेला असेच लुबाडून पैसे कमावत आलेले आहेत. साधा उपाय आहे. "त्यांचे उपचार घेवू नका" समजा डॉक्टर लोकांनी बळजबरी केली तर सांगा "मला तुमच्याकडून उपचार नकोत" शक्य आहे?