मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
: समारोप :
आंतरजालाच्या सुसंस्कारीत, सुशिक्षित, सुजान, आणि अभ्यासू जगतात २००९ मध्ये माझा चंचूप्रवेश झाला. २००९ मधील माझ्या पहिल्या लेखावर (http://www.maayboli.com/node/12292) अर्थाचे अनर्थ करून प्रतिसादात जो गोंधळ घातला गेला तीच स्थिती आज ७ वर्षानंतरही कायमच आहे. ती १७ वर्षानंतरही अशीच कायम राहण्याची शक्यता आहे कारण ......... सांप्रत हिंदुस्थानातल्या मनुष्यजातीच्या एका झुंडीला लढायची व संघर्ष चेतवता ठेवण्याची प्रचंड आवड आहे. त्यातूनच एकटेपणाने लढण्याऐवजी झुंडीने लढण्याची प्रवृती वाढत गेली असावी. यातूनच निर्माण झाला असावा वर्गसंघर्ष. वर्गसंघर्षाची काही लक्षणे आणि वैशिष्टे : १) एका वर्गाने दुसर्या वर्गाला हीन/न्यून लेखने. २) एका वर्गाने दुसर्या वर्गाचे शोषण करून त्या वर्गाला आपल्या पायदळी ठेवण्याचा प्रयत्न करणे. ३) एका वर्गाला दुसर्या वर्गाची बरोबरी करता येत नसले तर थेट दुसर्या वर्गाचे अहीत चिंतने. ४) आपल्या प्रत्येक अपयशाला एका वर्गाने दुसर्या वर्गाला जबाबदार ठरवणे. ५) एका वर्गाने दुसर्या वर्गाच्या समस्या समजून घेण्याऐवजी त्याच्या समस्या आणखी गुंतागुंतीच्या कशा होतील, याचेच प्रयत्न करणे. ६) वगैरे वगैरे. वर्गसंघर्षाची काही उदाहरणे : १) दलित विरुद्ध सवर्ण २) हिंदू विरुद्ध मुस्लिम ३) मराठा विरुद्ध ब्राह्मण ४) बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्यांक ५) अल्पजन विरुद्ध बहुजन ६) वगैरे वगैरे खरं तर वर्गसंघर्षाची ठीणगी पाडायला आणि ज्योत पेटती ठेवायला कोणत्याही वर्गातल्या सर्वच व्यक्ती अजिबात कारणीभूत नसतातच. कारणीभूत असतात फ़क्त त्या-त्या वर्गातल्या झुंडी. झुंडीच हे कार्य इमाने इतबारे करित असतात आणि त्याचे फ़टके तो संपूर्ण वर्ग, तो संपूर्ण समाज, ती संपूर्ण जात भोगत असते. ही बाब सर्वमान्य नसली तरी माझ्या ७ वर्षाच्या आंतरजालीय अनुभवावरून या निष्कर्षाप्रत आलो आहे की, शेतकरी विरुद्ध सुशिक्षित बिगरशेतकरी असा छुपा संघर्ष अस्तित्वात आहे. हा वर्गसंघर्ष नसला तरी वर्गसंघर्षाची बहुतांशी लक्षणे आणि वैशिष्टे जशीच्या तशी लागू होत आहेत. यातून या देशाची सुटका कधी होणार आहे हे भगवंताशिवाय कोणीच सांगू शकत नाही, अशी स्थिती मात्र नक्कीच आहे.