Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शृंगापत्ती

स
सुबोध खरे
Fri, 08/19/2016 - 06:25
🗣 413 प्रतिसाद
शृंगापत्ती रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता. माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं. सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले. आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली. एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले. काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी. सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

प्रतिक्रिया द्या
92497 वाचन

💬 प्रतिसाद (413)
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 15:52 नवीन
वैवाहिक जोडीदाराच्या संमतीने असायला हरकत नाही. पण स्त्रीस गर्भधारणा झाल्यास संतती कुणाची हा प्रश्न निर्माण होवू शकतो म्हणून निदान स्त्रीला गर्भधारणा हवी असतानाच्या काळात तरी टाळायला हवं इतर काळात गर्भधारणा होणार नाही याची नीट काळजी घेवुन असायला हरकत नाही. पण यातला दुसरा भावनिक मुद्दाही लक्षात घ्यायला हवा की अशा प्रकारच्या विवाहबाह्य संबंधांमुळे वैवाहिक जोडिदाराबद्दलच प्रेम , आपुलकी वगैरे न वाटण्याचा धोका... थोडक्यात विवाहबाह्य शरिरिक संबंध हरकत नाही पण सदर विवाहिताने त्याकडे फक्त 'शारिरीक संबंध' म्हणून बघणे आणि भावनिक्/मानसिकदृष्ट्या न गुंतणे इष्ट. मग त्या विवाहबाह्य जोडिदाराचाही तसाच दृष्टीकोन असणे गरजेचे आहे नाहीतर ताण होवू शकतो. म्हणून विवाहबाह्य शारिरिक संबंध हे फक्त अपवादात्मक परिस्थितीतच (वैवाहिक जीवनातील शारिरिक संबंध सुरळीत नसल्याने) निर्माण झालेत तर ठीक. उदा: पती-पत्नी दीर्घकाळ एकमेकांपासून दूर असणे , कुणा एकाचा पदीर्घ आजार, कुणा एकाची प्रणयेच्छा दीर्घकाळ अत्यंत कमी वा नष्ट होणे ई ई.
↩ प्रतिसाद: राजाभाउ
न
नेत्रेश Wed, 08/24/2016 - 00:40 नवीन
> 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी. त्यासाठी "लग्नाचे अमीश देउन बलात्कार"साराखे कित्येक (कालबाह्य?) फौजदारी कायदे बदलावे लागतील नाही का? मला नाही वाटत की अद्याप बहुसंख्य भारतीयांच्या संरक्षणासाठी बनवलेले कायदे काही २ - ५ ट्क्के लोकांच्या सोयीसाठी बदलता येतील. तस्मात असे संबंध जेल मध्ये जावे लागण्याच्या रीस्क वरच ठेवावे लागतील
↩ प्रतिसाद: राही
स
संदीप डांगे Mon, 08/22/2016 - 11:13 नवीन
त्यामुळेच लग्न केव्हाही करा किंवा करू नका, पण सेक्स १६पासून पुढे लवकरात लवकर झाला पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे, मुलगा असो वा मुलगी, अनेक समस्या उद्भवणार नाहीत
↩ प्रतिसाद: राही
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 13:50 नवीन
+१ फक्त १६ ऐवजी १८ म्हणेन नाहीतर कायदेशीर गुंतागुंत वाढेल
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 11:55 नवीन
गर्भपाताचा मुद्दा गौण ठरतो
गर्भपाताचे काही दीर्घकालीन परिणाम त्या स्त्रीच्या शरीरावर होवू शकतात असे मला वाटते म्हणून इतर मेडिकल हिस्टरी इतकेच महत्व मी गर्भपाताला दिले आहे. अर्थात मला वैद्यकीय ज्ञान नाही , डॉक्टर याबाबत अधिक काही सांगतील तर बरं होईल. बाकी 'लैंगिक मुक्तता' याबद्दल तत्वतः सहमत ...ज्या वयात शरीरसुखाची फार जास्त गरज वाटते ते वय..खरेतर कित्येक वर्षे (१६ ते २५ म्हंटले तरी ९ वर्षे होतातच) त्या सुखाशिवायच काढणे चुकिचे आहे यामुळे त्यानंतरही वैवाहिक जीवनावर दुष्परिणाम होवू शकतात. पण अर्थात लैंगिक मुक्ततेचा आनंद संमजसपणे घेण्याइतकी परिपक्वता अजून समाजात आली आहे का याबद्दल शंका आहे ? व्याह्वारिकदृष्ट्या अनेक प्रश्न /क्लेष निर्माण होवू शकतात, ही परिपक्वता येण्यास काही काळ जावा लागेल.
↩ प्रतिसाद: राही
उ
उडन खटोला Mon, 08/22/2016 - 12:37 नवीन
गर्भपात वगैरे परिपक्वता आलेले लोक करतात असं म्हणणं आहे काय? लैंगिक मुक्तता हा पुरोगामित्वाचा भाग आहे काय? आपल्या सुखासाठी एखाद्या जीवाचा जगण्याचा अधिकार त्याला न देणं हे समांजसपणाचं द्योतक आहे काय? नेहमीप्रमाणे मखरात बसून दिलेले प्रतिसाद दिसत आहेत.
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 13:19 नवीन
गर्भपात वगैरे परिपक्वता आलेले लोक करतात असं म्हणणं आहे काय?
माझ्या प्रतिसादात असं कुठे दिसलं ?
नेहमीप्रमाणे मखरात बसून दिलेले प्रतिसाद दिसत आहेत.
हे काय लॉजिक ? शिवाय प्रतिसाद तुम्हाला नव्ह्ताच राहीं यांना होता. प्रतिसाद समजला नाहि तर त्यावर उत्तर द्यायची घाई कशाला ?
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Mon, 08/22/2016 - 15:57 नवीन
तुमच्या कथे एवढे प्रतिसाद भरकटलेले नाहीत त्यामुळे ते समजलेत. लैंगिक मुक्तते बरोबर येणारे side effects स्विकारण्याची तयारी नसताना उगाच त्या तथाकथित मुक्ततेचा स्वीकार परिपकवता आलेली नाही वगैरे कमेंट लोक करतात. म्हणजे तसं केल्यानंतर जे होईल त्याला परिपक्वता म्हणायचं असाच अर्थ होतो की. साधा प्रश्न आहे लैंगिक मुक्तता कशी स्वीकारणार नि त्याच्या मर्यादा कशा ठरवणार? मखरातला प्रतिसाद राही मॅडम नि तुम्ही (आणखी काही लोकांसारखे) दोघेही देता असं स्पष्ट नि थेट मत आहे. बाकी चालू द्या.
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 16:10 नवीन
तुमच्या कथे एवढे प्रतिसाद भरकटलेले नाहीत
ज्या कथेचं त्या त्या धाग्यावर बोला.. बाकी "मखरातला प्रतिसाद" ही नेमकी काय संकल्पना आहे हे मला माहित नाही. सांगितलेत तर बरे होईल आणि नसेल सांगता येत तर तसं सांगा
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Mon, 08/22/2016 - 16:13 नवीन
मखरात बसून दिलेले प्रतिसाद म्हणजे ग्राउंड रिअलिटी माहिती नसताना उगाच उंचावर बसून दिलेले प्रतिसाद.
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
च
चंपाबाई Mon, 08/22/2016 - 20:04 नवीन
इंग्रजीत आयव्हरी टॉवर सींड्रोम म्हणतात
↩ प्रतिसाद: उडन खटोला
म
मराठी कथालेखक Tue, 08/23/2016 - 09:25 नवीन
असं....मला कोणती ग्राउंड रिअ‍ॅलिटी माहित नाही असं तुम्हाला वाटतं ? उदाहरण द्या . उगाच नसती खुसपटं काढण्यापेक्षा तर्क मांडा..
↩ प्रतिसाद: उडन खटोला
र
राही Mon, 08/22/2016 - 13:53 नवीन
'पण अर्थात लैंगिक मुक्ततेचा आनंद समंजसपणे घेण्याइतकी परिपक्वता अजून समाजात आली आहे का याबद्दल शंका आहे' सहमतच. पण अशा केसेस ही त्या दिशेने वाटचाल आहे. मूळ धाग्यातल्या आशयावर टीप : नको असलेला गर्भ राहिल्यावर बरेच दिवस ढिम्म राहाणे हा मूर्खपणाच. जर गर्भ राहिला नसता आणि वाढला नसता तर पुढची सगळी परिस्थिती उद्भवली नसती. मग कुणालाच अपराधगंड आला नसता.
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
च
चिनार Mon, 08/22/2016 - 09:19 नवीन
अश्या परिस्थितीत मी काय करेल ह्याविषयी थोडंसं... 1. मी जर खरे साहेबांच्या मित्राच्या जागी असतो, तर 'तुका म्हणे उगी राहावे ,जे जे होईल ते ते पाहावे' अशी भूमिका घेईल. भविष्यात जर मित्राला किंवा त्याच्या मुलाला या सगळ्या प्रकाराविषयी कळले तर " तुमच्या संसारात मला खोडा घालायचा नव्हता म्हणून मी शांत राहिलो" असे उत्तर देईल. आत्ता सुरु असलेला संसार मोडण्यापेक्षा नंतर संबन्ध बिघडलेले चालतील. ह्याचं कारण असं की त्या दोघा नवरा बायको मधील नातं कसं आहे ह्याची मला सुतराम कल्पना नाही. कदाचित तिने त्याला सगळं सांगितले असेल किंवा नसलेही. उद्या त्याला कळल्यावर त्याने निर्णय घ्यावा. शरीरसंबंधातून तिला काही STD झाले नसतील असं गृहीत धरून सांगतो की तिला स्वीकारायचे की नाही हा तात्विक प्रश्न आहे. ह्याविषयी प्रत्येकाचे तत्व/विचार वेगळे असू शकतात. कोण बरोबर कीं चूक ते परमेश्वर ठरवेल. थोडंसं अवांतर होईल पण तरी सांगतो, लग्न आणि हनिमून झाल्यावर ,एक मुलगी तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराबरोबर पळून गेलेली मी पाहिली आहे. काही दिवसांनी (साधारण 3-4 महिन्यांनी) ती नवऱ्याकडे परत आली आणि त्याने तिचा स्वीकार केला !!! कारण एकच..त्याचे तिच्यावर मनापासून प्रेम होते..!! खरे साहेब, तुमच्या मित्राला मानसिक दृष्ट्या ह्यातून बाहेर पडायला सांगा. एवढेच करणे त्यांच्या हातात आहे. 2. लग्नाआधी शरीरसंबंध असलेला/असलेली मुलगा /मुलगी मी जावई/सून म्हणून स्वीकारेल का ? सद्य स्थितीत मला एक मुलगी आहे. मुलाचे लग्नाआधी संबंध असल्याचे मला लग्नाधीच कळल्यास मी ते लग्न न होऊ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. लग्नाआधी शरीरसंबंध हे माझ्या तत्वात बसत नाहीत. पण हे कारण त्या मुलाला मी स्पष्ट सांगेल आणि त्याची बदनामी माझ्याकडून तरी होऊ देणार नाही. लग्नानंतर जर मला असे काही कळले तर त्यांच्या संसाराचा एकंदरीत रागरंग बघून मध्यस्थी करेल. कोणत्याही परिस्थितीत लग्न मोडणे हा माझ्यासाठी शेवटचा पर्याय असेल. माझ्या मुलीला या गोष्टीची कल्पना आल्यास तिचा जो काही निर्णय असेल तो मी स्वीकारेल आणि तिला पाठिंबा देईल. माझ्या मुलीने लग्नाआधी शरीरसंबंध ठेऊ नये यासाठी मी तिला तशी शिकवण जरूर देईल. पण याउपरही तसे काही झाल्यास आणि मुलीला त्याच व्यक्तशी लग्न करायचे असल्यास, मी त्या मुलाची पूर्ण चौकशी करून लग्नाला परवानगी देईल. त्या मुलाचे इतरही बऱ्याच मुलींशी संबंध आहेत असे कळल्यावर मी मुलीची योग्य प्रकारे समजूत काढून हे लग्न होउ देणार नाही. आता ह्या केसमध्ये माझ्या मुलीचे मी दुसऱ्या कोणासोबत लग्न लावून देईल का हा महत्वाचा प्रश्न आहे...पोरीचा बाप म्हणून माझी भूमिका त्यावेळी काय असेल हे मी आत्तातरी सांगू शकत नाही... पण कुठल्याही परिस्थितीत आदळआपट,भांडणतंटे, मारामारी,फसवाफसवी होणार नाही असा प्रयत्न करेल. मुळात अनुभवांती माझे असे मत झाले की...कोणाच्याही आयुष्यात आपण एका प्रमाणाबाहेर ढवळाढवळ करू शकत नाही आणि करू सुद्धा नाही... पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा !!!
ग
गामा पैलवान Mon, 08/22/2016 - 12:34 नवीन
राही,
>> 'परस्परसंमतीने लैंगिक मुक्तता' ही लग्नबंधनात नसतानाच्या काळात असावी.
पहिली गोष्ट म्हणजे, जर मुक्त लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर मग लग्न करायचंच कशाला? दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी परस्परसंमत हा शब्द वापरला असला तरी या प्रकारात स्त्री पुरुषाकडून पार नागवली जाणार आहे. विवाहासारख्या संस्काराच्या बाबतीत बाजार भरतो, तर परस्परसंमतीचा काय थोर सत्संगमेळा भरणारे का? शेवटी पैसे देऊनच व्यवहार होणार आहे आणि त्यास लग्नाचं बंधन नाही. थोडक्यात काय परस्परसंमती = गणिकाहाट . वेश्येची काय हालत होते माहितीये ना ! आ.न., -गा.पै.
स
संदीप डांगे Mon, 08/22/2016 - 13:38 नवीन
वेगळा धागा काढायची वेळ आली!
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मराठी कथालेखक Mon, 08/22/2016 - 13:48 नवीन
सहमत हा नक्कीच महत्वाचा / संवेदनशील विषय आहे...(माझ्या सारख्या विनापत्यांना नाही पण )निदान पालाकांसाठी तरी ..पालकांना आपला/ली वयात आलेली मुलगा/मुलगी एखाद्या भिन्नलिंगी मित्राशी संबंध ठेवू इच्छित असेल तर त्याबद्दल आपली भूमिका आणि त्याबद्दलचे स्पष्टीकरण तयार ठेवावे लागेल.. "मी म्हंटला ना एकदा नाही, मग वाद घालायचा नाही..तंगडं तोडून हातात देईन" वगैरे शैलीत हा प्रश्न हाताळता येणार नाही..तुमचे विचार काहिही असले तरी प्रश्न खूप संयमाने हाताळावा लागेल. याकरिता वेगळा धागा काढाच.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
र
राही Mon, 08/22/2016 - 13:41 नवीन
लग्न केवळ शरीरसंबंधासाठीच करायचे हे मत आता मागे पडते आहे. आयुष्यात बर्‍यापैकी स्थैर्य आल्यावर, मुलांचे व्यवस्थित संगोपन करता येईल, राहाण्याची सोय मनाजोगती होईल अशी खात्री वाटल्यावर आजकाल मुले लग्न करतात. निदान मुंबईत आणि मराठी उच्चशिक्षित कुटुंबांत आज ही स्थिती आहे. सर्व समाजात आणि सर्व भारतात नाही हे मान्यच. पण त्या दिशेने वाटचाल आहे हे नक्की. ह्याला माणसाच्या (सुखाविषयीच्या) वाढलेल्या अपेक्षा, व्यक्तिस्वातंत्र्याचे नवीनच उमजलेले मोल आणि त्यामुळे एकत्र कुटुंबात आणि लहान जागेत राहाण्याची तयारी नसणे असे अनेक पैलू आहेत. शेतीवरचे अवलंबित्व कमी होणे किंवा कष्टाची शेती नकोशी वाटणे, पांढरपेशे व्यवसाय/नोकर्‍या वाढणे, शहरीकरण होणे, मूळ घरापासून दूर नोकर्‍या असणे, दिवसाचा मोठा वेळ त्यासाठीच्या प्रवासात जाणे असे अनेक नवे प्रश्न आहेत जे लग्नाचा विचार पुढे ढकलतात. पुरुषाशी स्वखुशीने लग्नपूर्व संबंध ठेवणार्‍या स्त्रियांना गणिका म्हणणे ही हीन आणि पुरुषी मनोवृत्ती आहे. अनेक पुरुषही ही नैसर्गिक ऊर्मी विझवता न आल्यामुळे असे संबंध ठेवतात. आपण जिथे राहाता त्या देशात आणि अनेक पाश्चिमात्य देशात हे समाजमान्य आहे. लिव इन तर आता कायदेशीरही आहे.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
र
राही Mon, 08/22/2016 - 13:44 नवीन
किंबहुना गणिकेला तुच्छ समजणे ही हीन मनोवृत्ती आहे.
↩ प्रतिसाद: राही
ग
गामा पैलवान Mon, 08/22/2016 - 14:47 नवीन
राही, मुळातून गणिकेस तुच्छ मानावेच कशाला? परस्परसंमतीने सगळा व्यवहार होतोय ना? मग तिला तुच्छ मानण्यात काय अर्थ? पुरूषांना फार आवडतील अशा गणिका. समस्या लक्षात येतेय का? पुरुषी वर्चस्ववाद ही समस्या नाहीये. परस्परसंमतीने लैंगिक संबंध ठेवणारी स्त्री गणिकाधर्माचं पालन करतच असते. पुढे जेव्हा ती कुणाचीतरी पत्नी होते, तेव्हा तिला पत्नीधर्माचं पालन करावं लागतं. तर गणिकाधर्म आणि पत्नीधर्म आपापल्या ठिकाणी शोभून दिसंत असले तरी ती पार वेगळी दोन टोकं आहेत. एकीचं लग्न नवऱ्याशी झालंय तर एकीचं स्वत:शीच झालंय. एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जातांना स्त्रीची प्रचंड भावनिक ओढाताण होईल. तिचा आत्मसन्मान कचऱ्याच्या डब्यात जाऊन पडेल. ही समस्या आहे. आ.न., -गा.पै.
र
राही Mon, 08/22/2016 - 15:10 नवीन
आनगापै., लग्नबंधनात असेपर्यंत दोघांही जोडीदारांनी एकमेकांशी निष्ठा ठेवणे नैतिक आणि कायदेशीर आहे. पण लग्नबंधन काही कारणांनी तुटले, किंवा घडलेच नाही, किंवा फार उशीरा घडले तर स्त्री-पुरुष दोघांनीही त्या त्या काळात (कधी कधी अख्ख्या आयुष्यात) शरीरसुखापासून वंचित राहावे असे म्हणणे हे क्रूरपणाचे आहे. ब्रह्मचर्य हेच जीवन, .... हे मरण' ही एकेकाळची आणि यथेच्छ टर उडवली गेलेली कल्पना तर आपल्या प्रतिसादांतून डोकावत नाहीय ना?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 08/22/2016 - 20:21 नवीन
राही,
>> शरीरसुखापासून वंचित राहावे असे म्हणणे हे क्रूरपणाचे आहे.
मग शरीरसुखासाठी न जन्मलेल्या जीवाची हत्या करणं क्रूर नाही काय? गर्भारपण कुठे थांबायला/थांबवायला हवं हे रूपालीला कळंत नव्हतं का? का थांबायची/थांबवायची इच्छाच नव्हती? मग पोर पाडलंच कशाला? आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: राही
स
संदीप डांगे Mon, 08/22/2016 - 20:24 नवीन
गर्भारपण कुठे थांबायला/थांबवायला हवं हे रूपालीला कळंत नव्हतं का?
आप महान हो _/\_
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 08/22/2016 - 20:30 नवीन
राही, रुपालीने रीतसर गर्भारपण थांबवलं होतं. माझ्याकडून चुकीने हे तथ्य निसटलं. मात्र मूळ मुद्दा तसाच आहे. आपल्या शरीरसुखासाठी न जन्मलेल्या जीवाची हत्या करावी का! आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अभ्या.. Mon, 08/22/2016 - 20:43 नवीन
अवघड आहे राव गापै.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
संदीप डांगे Mon, 08/22/2016 - 20:51 नवीन
आपल्या शरीरसुखासाठी न जन्मलेल्या जीवाची हत्या करावी का!
लै गोल गोल फिरताय राव तुम्ही. "आपल्या जिभेचे चोचले पुरवायला कोण्या जीवाची हत्या करावी काय" असा प्रश्न जणू विचारत आहात. पिरांनी योग्य उत्तर दिलंय. कोणी संभोगसुख घेत असेल तर इतर कोणालाही नक्की काय समस्या आहे? त्यांचं प्रोटेक्शन वाया गेलं असेल, गोळ्या काम करु शकलेल्या नसतील. व्हाटेव्हर. पण सगळे अगदी ह्याच मुद्द्यावर का उभे राहून जोर देतायत की "तीने मजा मारली असावी" जस्ट डॉक्टरांच्या मित्राने डॉक सांगितले की तिचे अमूक एक विचार होते म्हणून?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
आ
आजानुकर्ण Tue, 08/23/2016 - 04:16 नवीन
पैलवान, न जन्मलेल्या जिवाची हत्या कशी करतात?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
र
राजेश घासकडवी Tue, 08/23/2016 - 04:23 नवीन
न जन्मलेल्या जिवाची हत्या कशी करतात?
तुम्ही कधी एखादा कंडोम फेकून दिलेला नाहीये का? त्यात लाखो न जन्मलेले जीव मेलेले असतात.
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Tue, 08/23/2016 - 04:29 नवीन
हा हा. अर्थात तो वापरलेला कंडोम असेल तरच त्यात न जन्मलेले जीव असण्याची शक्यता आहे ना! (दादा कोंडकेंच्या ओळी आठवल्या चार आण्याचे तीन आणले काय गं तुम्ही केले, मला वाटलं सख्या ते फुगंच हाय मी पोरांना दिले. आता यात न जन्मलेले जीव असण्याची शक्यता बरीच कमी आहे असे वाटते) (दादा कोंडकेप्रेमी) आजानुकर्ण
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
उ
उडन खटोला Tue, 08/23/2016 - 05:07 नवीन
न जन्मलेला जीवाची म्हणजे गर्भाची हत्या ही हत्या नसते काय? गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत गर्भ आणि आईचा जीव वेगवेगळा नसतो काय? किती ती संवेदनाहीनता.... काही बायका वर 'चुकून' गर्भधारणा किंवा 'चुकून' सेक्स वगैरे म्हणत आहेत. त्यांचे नेहमीप्रमाणेच कौतुक वाटले.
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
स
सुबोध खरे Tue, 08/23/2016 - 06:13 नवीन
मी वर लिहिलेले आहे त्याप्रमाणे महिन्यातील एक दिवसच ( फार तर दोन दिवसच) गर्भधारणेसाठी अनुकूल आहेत. याचा अर्थ काय कि एकदाच संबंध आला आणि गर्भार राहिली हि शक्यता ३० दिवसांपैकी १ दिवस म्हणजे ३. ३३ % इतकी कमी आहे. म्हणजेच एखादी मुलगी गरोदर राहिली तर तिचे एकदाच "भावनेच्या भरात" संबंध आला हि शक्यता ३% आहे आणि ९७ % शक्यता तीचा बऱ्याच वेळेस शरीर संबंध आला आहे असा आहे. हीच गोष्ट एखाद्या पुरुषाला अर्थातच लागू आहे. म्हणजे "ती वेळच तशी होती" one night stand नाही.बरेच स्टँड्स झालेले असतात यात "चुकून सेक्स" एक वेळ मान्य करता येईल परंतु "चुकून गरोदरपण" याची ३% शक्यता आहे.
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Tue, 08/23/2016 - 06:21 नवीन
आदर नि कौतुक ९७% अधिक टॅक्सेस एवढं वाढलं.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Tue, 08/23/2016 - 11:01 नवीन
न जन्मलेला जीवाची म्हणजे गर्भाची हत्या ही हत्या नसते काय? गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत गर्भ आणि आईचा जीव वेगवेगळा नसतो काय? किती ती संवेदनाहीनता....
माझ्या मते ही हत्याच आहे. विशेषतः आईला आर्थिक, आरोग्याची, बलात्कारातून गर्भधारणा झाल्याची अशी कोणतीच समस्या नसताना, गर्भात दोष असण्याची किंवा बाळंतपण गर्भाला किंवा आईला धोकादायक ठरेल अशीही समस्या नसताना, गर्भधारणा होईल हे माहीत असताना सुद्धा आणि आपल्याला गर्भ नको आहे हेही मनाशी ठरविलेले असताना सुद्धा स्वखुशीने असुरक्षित शरीरसंबंध ठेवून गर्भधारणा होऊन दिल्यावर गर्भपात करणे हे माझ्या दृष्टीने हत्या केल्यासारखंच आहे. जर आईला विनाकारण गर्भपात करण्याचा हक्क असेल तर गर्भाला सुद्धा जन्म घेण्याचा हक्क आहे.
काही बायका वर 'चुकून' गर्भधारणा किंवा 'चुकून' सेक्स वगैरे म्हणत आहेत. त्यांचे नेहमीप्रमाणेच कौतुक वाटले.
सहमत. या विशिष्ट मुलीच्या बाबतीत गर्भपाताचे समर्थन करणार्‍यांचे मलाही कौतुक वाटते.
↩ प्रतिसाद: उडन खटोला
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 08/23/2016 - 14:23 नवीन
पूर्ण आदर, पण कायद्याच्या हिशोबात आपल्या मतास कायेक किंमत नाहीये.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मार्मिक गोडसे Tue, 08/23/2016 - 14:27 नवीन
जर आईला विनाकारण गर्भपात करण्याचा हक्क असेल तर गर्भाला सुद्धा जन्म घेण्याचा हक्क आहे.
नक्की का? कारण वरच्या प्रतिसादात ठरावीक परिस्थितीत तुम्ही गर्भपाताला मान्यता देताय. उदा:
विशेषतः आईला आर्थिक, आरोग्याची, बलात्कारातून गर्भधारणा झाल्याची अशी कोणतीच समस्या नसताना, गर्भात दोष असण्याची किंवा बाळंतपण गर्भाला किंवा आईला धोकादायक ठरेल अशीही समस्या
अशा परिस्थीतीत गर्भाचा काय दोष असतो ते सांगाल का?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पिलीयन रायडर Tue, 08/23/2016 - 14:47 नवीन
मी हेच केव्हाचं विचारतेय की ह्या केसेस मध्ये अचानक गर्भपात योग्य कसा होतो? बाळ बलात्कारातुन झालं म्हणुन त्याला मारता येतं???????
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
संदीप डांगे Tue, 08/23/2016 - 15:03 नवीन
अचूक पकडलंय पिरातै!!
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
उ
उडन खटोला Tue, 08/23/2016 - 15:13 नवीन
अचानक? तुम्हाला सगळ्या भूमिका एक सारख्याच वाटत आहेत?
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 08/23/2016 - 16:26 नवीन
परिस्थिती वेगवेगळी असली, भुमिका वेगवेगळ्या असल्या तरी शेवटी "हत्या" होतेच आहे ना? तुम्हाला कुणालाही त्या मुलीची "फर्स्ट हॅण्ड" माहिती नाही. पण तरीही तिची "भुमिका" काय हे तुम्ही ठरवुन टाकलेलं आहे आणि तिने काय करावं हे ही. तिने तो निर्णय का घेतला हा खरं तर सर्वस्वी तिचाच प्रश्न आहे. मुल न होऊ देण्यामागे अनेक कारणं असु शकतात. अगदी लग्नानंतर सुद्धा कुणी हा निर्णय घेऊ शकतं. कदाचित कुणाला कधी आई व्हायचंच नसेल. कदाचित एकटीने आई होण्याची तयारी नसेल (आपल्या समजात ते सोपंसुद्धा नाही), कदाचित बाळाच्या बापासोबत लग्न तडजोड म्हणुनही करायचं नसेल.. पण अर्थातच ह्यातलं एकही कारण तुम्हाला "योग्य" वाटणार नाही. मात्र हिच गर्भधारणा जेव्हा बलातकारातुन होते तेव्हा मात्र तो जीव मारला तर ते चालतं. जर "जीवाला जगवणे, जन्म देणे" ही गोष्ट रुपालीच्या केस मध्ये तुम्हाला इतकी महत्वाची वाटते की खरं तर ससपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट मिळणार नाही हे ठाऊक असुनही आणि महत्वाचे म्हणजे तिचीच आई होण्याची इच्छा नसतानाही तिने बाळाला जन्म द्यायला हवा होता असं तुम्हाला वाटतं. पण तोच जीव बलात्कारिता असेल तर मात्र तितका महत्वाचा ठरत नाही. असं कसं? शिवाय ह्या बाळाला जन्म देताना आईची मानसिक तयारी नाही, आई वडीलांमध्ये प्रेम नाही, पण तडजोड म्हणुन लग्न होत आहे, किंवा कदाचित लग्न होणारही नाही आणि मुलगी एकटीच बाळ वाढवेल, आई-वडील-समाज अर्थातच हे सगळं आनंदाने मान्य करणार नाही, ही परिस्थिती तर कुणीच लक्षात घेत नाहीये. त्याचे बाळावर परिणाम होणार नाहीत का? अशा घरात बाळाला जन्म द्यावा का? मला जन्म देण्यापेक्षाही वाढवणं फार मोठी गोष्ट वाटते. त्यामुळे गर्भ रहाणं ही एकच गोष्ट जीवाला जन्म देताना पुरेशी नसते हेच माझं ठाम मत आहे. आणि ह्याच कारणासाठी बलात्कारातुन झालेली गर्भधारणा, अपंग / मतिमंद गर्भ पाडल्या जातो ते तुम्हालाही योग्य वाटत आहे.
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Tue, 08/23/2016 - 17:07 नवीन
अहो त्या अनेक केसेस मध्ये होणारे परिणाम मान्य आहेतच की. डॉक्टरांनी सांगितलेल्या स्पेसिफिक किश्श्यात तशी स्थिती नाही हे त्यांनी स्पष्ट लिहिलंय म्हणूनच त्याचा राग आहे. वैयक्तिक मतानुसार जसा जीव जन्माला येईल तसा तो घालावा. ते त्या त्या जीवाचं आणि त्या बरोबर त्या पालकांचं प्राक्तन असतं.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
संदीप डांगे Tue, 08/23/2016 - 17:22 नवीन
ह्यालाच मोरल पोलिसींग म्हणतात!
↩ प्रतिसाद: उडन खटोला
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/24/2016 - 08:17 नवीन
आपण डॉक्टरकडे जाणे सोडु, सगळ्या गोळ्या ज्या काही गोळ्या वगैरे घेत होतो, ते सगळं सोडुन देउ अन जीवन प्रांक्त्नावर सोडुन देऊ असं म्ह्ण्ट्लं तर काय वाटेल?
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Wed, 08/24/2016 - 08:38 नवीन
प्रयत्न करायचे नाहीत असं मी कुठं लिहिलं आहे? काही लोक जीव जन्माला घालायच्याच विरोधात आहेत.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
श
श्रीगुरुजी Tue, 08/23/2016 - 20:22 नवीन
तुम्हाला कुणालाही त्या मुलीची "फर्स्ट हॅण्ड" माहिती नाही. पण तरीही तिची "भुमिका" काय हे तुम्ही ठरवुन टाकलेलं आहे आणि तिने काय करावं हे ही. तिने तो निर्णय का घेतला हा खरं तर सर्वस्वी तिचाच प्रश्न आहे.
बरोबर आहे आणि तिने तो निर्णय तिने आधी घेतलेलाचा आहे. हा धागा काढला नसता तर हा काथ्याकूट झालाच नसता. एकदा धागा निघाल्यावर वेगवेगळी मते येणारच.
मुल न होऊ देण्यामागे अनेक कारणं असु शकतात. अगदी लग्नानंतर सुद्धा कुणी हा निर्णय घेऊ शकतं. कदाचित कुणाला कधी आई व्हायचंच नसेल. कदाचित एकटीने आई होण्याची तयारी नसेल (आपल्या समजात ते सोपंसुद्धा नाही), कदाचित बाळाच्या बापासोबत लग्न तडजोड म्हणुनही करायचं नसेल.. पण अर्थातच ह्यातलं एकही कारण तुम्हाला "योग्य" वाटणार नाही.
मूल होऊन द्यायचंच नव्हतं तर गर्भधारणाच होऊन द्यायची नव्हती.
मात्र हिच गर्भधारणा जेव्हा बलातकारातुन होते तेव्हा मात्र तो जीव मारला तर ते चालतं. जर "जीवाला जगवणे, जन्म देणे" ही गोष्ट रुपालीच्या केस मध्ये तुम्हाला इतकी महत्वाची वाटते की खरं तर ससपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट मिळणार नाही हे ठाऊक असुनही आणि महत्वाचे म्हणजे तिचीच आई होण्याची इच्छा नसतानाही तिने बाळाला जन्म द्यायला हवा होता असं तुम्हाला वाटतं. पण तोच जीव बलात्कारिता असेल तर मात्र तितका महत्वाचा ठरत नाही. असं कसं?
बलात्कारातून झालेली गर्भधारणा ही मनातून इच्छा नसताना लादलेली गर्भधारणा आहे. या मुलीच्या बाबतीत गर्भधारणा लादलेली नव्हती. स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवून ही गर्भधारणा झालेली आहे.
शिवाय ह्या बाळाला जन्म देताना आईची मानसिक तयारी नाही, आई वडीलांमध्ये प्रेम नाही, पण तडजोड म्हणुन लग्न होत आहे, किंवा कदाचित लग्न होणारही नाही आणि मुलगी एकटीच बाळ वाढवेल, आई-वडील-समाज अर्थातच हे सगळं आनंदाने मान्य करणार नाही, ही परिस्थिती तर कुणीच लक्षात घेत नाहीये. त्याचे बाळावर परिणाम होणार नाहीत का? अशा घरात बाळाला जन्म द्यावा का?
हे सगळं माहिती होतं तर गर्भधारणा मुळातच टाळायला हवी होती.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सुबोध खरे Tue, 08/23/2016 - 15:18 नवीन
हा एक गहन विषय आहे आणि मी इतकी वर्षे बरयाच डॉक्टरांशी बोललो आहे त्यांना पण नक्की याचे उत्तर देता येत नाही. पलायन म्हणा किंवा आपली सद्सद्विवेकबुद्धी म्हणा. बहुसंख्य डॉक्टर लग्नानंतर शक्यतो गर्भपात करू नका असाच सल्ला देताना आढळतात. गर्भपातानंतर परत मूल न होण्याची शक्यता १ % पेक्षा कमी असते हे गृहीत धरले तरी कदाचित तयार झालेला गर्भ नष्ट करणे हे बहुसंख्य डॉक्टरना पटत नाही. मूळ जीव केंव्हा असतो हे हि सान्गणे कठीण आहे. मुलाचे हृदय पाळी चुकण्याचा ४० ते ४२ व्या दिवशी दिसू लागते. तेंव्हा पासून ते २८ आठवडे पर्यंत गर्भाची वाढ होत असते परंतु या कालावधीत जर गर्भ बाहेर काढला तरबहुसंख्य वेळेस तो स्वतः हुन श्वसन करू शकत नाही म्हणून तो जिवंत आहे (live) पण स्वतंत्रपणे वाढ होऊ शकेल (viable) असा नाही. २८ आठवड्यानंतर मात्र बाळ स्वतंत्रपणे वाढ होऊ शकेल (viable) असे असते त्यामुळे त्यानंतर त्याला गर्भपात म्हणत नाहीत. लग्नापूर्वीच्या गर्भधारणे बाबत डॉक्टर कायद्याचा आधार घेताना दिसतात. म्हणजे २० आठवड्या पर्यंत गर्भपात कायदेशीर आहे. ( आता हीच कालमर्यादा २४ आठवड्यापर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत कारण काही जन्मजात व्यंगे २४ आठवड्यपर्यंत दिसत नाहीत.) गर्भारपण चालू ठेवल्यामुळे मातेच्या जीवाला धोका असेल अथवा तिच्या मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्याला गंभीर धोका पोहोचेल किंवा बलात्कारातून गर्भ राहिला असेल तर अशा परीस्थितीत कायदा २० आठवड्यपर्यंत गर्भपाताची परवानगी देतो. नैतिकतेचा प्रश्न हा समाजाने सोडवायचा आहे. हा प्रश्न डॉक्टरांचा नाही.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 08/23/2016 - 16:07 नवीन
डॉक्टर तुम्हाला तो प्रश्न विचारलाच नाहीये. कारण तुम्ही फक्त त्या गेलेल्या जीवाबद्दल दु:ख व्यक्त केलंय. त्या मुलीने त्या बाळाची हत्या केली असं म्हणलेलं नाही. कारण तसं कायदाही म्हणत नाही.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
उ
उडन खटोला Tue, 08/23/2016 - 16:17 नवीन
कायदा सोयिस्कर वागतो. त्यात अनेक वेगवेगळ्या शक्यता असतात. मी त्याबद्दल सांगत नाहीये. ४ महिन्याचा गर्भ पाडायला काही वाटत नाही कारण त्याबद्दल 'तितकं' ममत्व नसतं. २ महिने/वर्षाच्या अपत्याबद्दल जीव तुटतो कारण त्याच्याबद्दल ममत्व निर्माण झालेलं असतं. त्याचा जीव वाचण्यासाठी आपण जीवाचं रान करतो.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 08/23/2016 - 16:32 नवीन
जी बाळं जन्माला येतात ती (बहुतांशी) तरी हवीच असतात पालकांना. इथे विषय नको असलेल्या बाळांचा आहे. आणि जी नको असलेली बाळं जन्माला येतात ती कचर्‍यात किंवा अनाथाश्रमात सापडतात. त्यांचे पालक त्यांच्यासाठी जीवाचे रान करत नाहीत. ते त्यांना फेकुन देतात. किंवा त्यांना नीट वाढवत नाहीत. (आई वडीलांनी लहान मुलांचे अक्षरशः हाल केले अशा किती बातम्या देऊ सांगा..) तेव्हा बहुतांश पालक मुलांसाठी जीवाचे रान करतात म्हणुन "सगळेच" करत नसतात. कायदा ह्याच "शक्यतांचा" विचार करत असतो.
↩ प्रतिसाद: उडन खटोला
उ
उडन खटोला Tue, 08/23/2016 - 17:09 नवीन
अर्धसत्य. कायद्याला जशा गोष्टी दाखवल्या जातात तशा त्या दिसत असाव्यात.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 08/23/2016 - 17:51 नवीन
?? राहु द्या...
↩ प्रतिसाद: उडन खटोला
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा