लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते.
तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते.
आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात.
प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही.
दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे.
तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.
१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?
२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?
३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?
चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.
तर,मायबोलीकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. ???
एकच लेखन अनेक संस्थळांवर कॉपी करण्यापूर्वी निदान योग्य ते बदल करण्याची खबरदारी घेतलेली बरी असते ;) :)१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?प्रत्येकाने आपापली सोय बघावी... दुसर्यांना कशाला विचारत फिरायचं :-P१ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही?नाही. लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृधापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे. अतृप्त कामेच्छेमुळे विवाहाकडे संभोगाची सोय म्हणून पाहिलं जातं.२.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्?अतृप्त कामेच्छा !३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे?अशा बाता किती जणांशी (जणींशी) करणार ? कामतृप्ती विवाह सार्थक करुन जाते."लग्न ही अपत्य जन्म, त्याचं योग्य संगोपन, तदनंतर विवाह, मग वृद्धापकाळ आणि मृत्यू अशा सर्वांचा समग्र विचार आहे."यात न समजण्यासारखं किंवा गैरसमज होईल असं काय आहे ? विवाहितांच्या जीवनात ही सर्व परिमाणं याच क्रमानं दिसत नाहीत काय ? प्रतिसाद देणारे सदस्य (कुणा दांपत्याचा) विवाह झाल्याशिवाय कौतुकाचा जन्म घेऊ शकले असते काय ? शिवाय योग्य संगोपनाशिवाय त्यांच्या सांप्रत जीवनाची जी काय घडी बसली आहे ती तशी बसली असती काय ? जर विवाह संस्थाच अस्तित्त्वात नसती तर त्यांचे विवाह झाले असते का ? आणि जेव्हा वृद्धापकाळ येईल त्यावेळी त्यांनी निर्माण केलेली कुटुंबव्यवस्था त्यांना उपयोगी ठरणार नाही का ? सरते शेवटी, मृत्यूसमयी आप्त जवळ असतील तर तो, एकट्यानं कुठे तरी (बहुदा कुणी जीवलग जवळ नसतांना), आलेल्या मृत्यूपेक्षा, सुखाचा होणार नाही काय ? आता चर्चाविषय पाहा : लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय?????? एकवेळ विचार न करु शकणारे सदस्य काहीही प्रतिसाद देतात ते ठीके पण ज्यांची जवाबदारी चर्चा लाईनवर ठेवण्याची आहे ते सुद्धा काहीही प्रश्न निर्माण करायला लागले तर चर्चेतून काय निष्पन्न होणार ?