जि एस टी - गुड सर्व्हिस टॅक्स -एक देश -एक टॅक्स -एक मार्केट
दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
हे कळायला जिएसटीचे प्रोफेशनल सेमीनार अटेंड करायला लागतात. घरबसल्या वर्तमानपत्र वाचून ते कळण्याची शक्यता शून्य .आणि पुन्हा सांगतो, मला यात शून्य त्रास आहे कारण मी जिएसटीसारखी घोडे छाप कामं करत नाही. आणि नुकसान तर काहीच नाही. मी माझी रिटर्न्स भरली की झालं. तेव्हा तुमचा गैरसमज काढा म्हणजे त्या अँगलनं वारंवार प्रतिसाद देण्याचे कष्ट वाचतील.जी एस टी मुले भाव कमी होतील असे मी कुठे म्हटले आहे ते दाखवून द्या उगाच दुसऱ्यांची वाक्ये माझ्या तोंडी टाकून मुद्दा भरकटवू नका.तुम्ही स्वतःचे प्रतिसाद वाचत नाही का हल्ली विस्मरण होतंय ? हा पाहा तुमचा प्रतिसाद !मला वाटते त्याप्रमाणे जी एस टी ने महागाई कमी होणार नाहीशुद्ध मराठीत सरळ शब्दात लिहिले आहे की जी एस टी मुळे महागाई कमी होणार नाही म्हणजेच वस्तूंच्या किमती आहेत त्याच राहतील किंवा वाढतीलहे तुम्हीच म्हणातायं ना ? आणि ते तर मी सुरुवातीलाच सांगितलंय :) 23 Jun 2017 - 10:58 pm | संजय क्षीरसागर सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार ?काहीही परिणाम होणार नाही कारण कराचा एकूण दर पूर्वी इतकाच राहाणार आहेयाबद्दल मी लिहायला गेलो तर अनेकांची झोप उडेल !चि. राहुल गांधी पण असेच म्हणाले होते की नोटबंदीवर ते बोलले तर भूकंप होईल. भूकंप काय झाला नै आणि तुम्ही काय झोप उडवणार नै - उगाच कशाला कंदील जाळताय..? जे लिहायचे ते स्वच्छ लिहा. तुमच्यामते सरकार हुकुमशाही राबवत आहे का..? २०१९ ला तुमच्यासोबत आणखी १० लोकांना मतदान केंद्रावर घेऊन जा आणि भले मोदीविरोधी का असेना पण मत द्यायला लावा - हाच शेवटचा पर्याय सुचवू शकतो.कधी पुण्याच्या कट्ट्याला भेटलात तर नोटाबंदीच्या काळातील काही अनुभव नक्कीच शेयर करील (विना-पुरावा) बाकी तुम मनो या ना मनो...नक्की भेटू.व्यावसायिकांना त्रास होणार आहे यात शंका नाहीसो इट इज ऑल डन ! त्यामुळे तुमचा हा मुद्दा :`काही लोक आपलं धुणं धुवून घेत आहेत किंवा बागुलबुवा उभा करत आहेत'सर्वस्वी बाद ठरतो. त्याला काही अर्थच उरत नाही.