Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान

य
यनावाला
Sat, 10/07/2017 - 18:12
🗣 285 प्रतिसाद
श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्‍यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे इच्छित काम होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?" " दत्त मंदिरात जात आहे." " पण आज तर गुरुवार नाही. रविवार आहे." " अहो, आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्हा नास्तिकांना त्याचे काय म्हणा ! " " गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात एवढी गर्दी का असते हो ?" " अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते." त्यांनी आपले ’तत्त्व’ ज्ञान (!) प्रकट केले. " गणिताच्या दृष्टीने तुमचे हे विधान सत्य आहे." क्षणभर विचार करून मी उत्तरलो. मी नास्तिक आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते कांहीशा आश्चर्यानंदाने उद्गारले, " असे म्हणता ? हे कसे काय बुवा ?" " शून्य गुणिले चौदा बरोबर किती ? " विषयाशी असंबद्ध वाटावा असा प्रश्न विचारला. " शून्य ! शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी उत्तर शून्यच येते." ते शालेय गणित विसरले नव्हते. " वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला दत्तमूर्तीतील तत्त्व शून्य असते. त्यामुळे-- गुरुपौर्णिमेला इतर दिवसांच्या तुलनेत ते दशसहस्रपट असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याची दशसहस्रपट शून्यच. !" ते रागारागाने म्हणाले, " आमच्या श्रद्धेची तुम्ही चेष्टा करता." " रागावू नका. मी सत्य तेच सांगितले." " आमच्या भावना दुखावतात." असे म्हणून ते दत्तभक्त तरा-तरा निघून गेले. सोमवारी पिंडीतील शिवतत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत शतपट असते, शिवरात्रीला सहस्रपट असते तर महाशिवरात्रीला दशसहस्रपट असते. गणपतीच्या मूर्तीत गणेश तत्त्व असते. ते गणेश चतुर्थीला दशसहस्रपट होते. मारुतीच्या मूर्तीत हनुमान तत्त्व ते शनिवारी वाढते. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते. तुळशीपत्रात विष्णुतत्त्व असते. अशा अनेक तत्त्वांच्या अस्तित्वावर भाविकांची श्रद्धा असते. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण श्रद्धावंत अशी विधाने सत्य मानतात. कारण ती देवा-धर्माशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो. हे असले देवतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे देवतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात. दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो. मातीची सुबक गणेशमूर्ती केली, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा मंदिरात नेऊन बसवली. वेदोक्त मंत्रांनी तिची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली तरी कोणतेही देवतत्त्व त्या मूर्तीत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही. हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे. पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते. त्या शक्तीने त्यांना मूर्तीतील तत्त्वे समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते हे सुद्धा सिद्ध गुरूंना कळते. अशी त्यांच्या भक्तांची धारणा असते. समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर गणेशमूर्ती आहेत. त्यांतील दोन मूर्तींची वेदोक्त मंत्रांनी यथासांग प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाह्यत: सर्वमूर्ती एकरूप (म्हणजे अगदी सारख्या) दिसत आहेत. तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याने मूर्तीत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नसते. प्राणसंचार झालेला नसतो. पूर्वी होती तशीच ती निर्जीव असते. मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही. आक्रमक मूर्तिभंजकांनी अनेक देवमूर्ती फोडल्या, विद्ध्वंस केला त्या समयी कुठल्याही प्राणप्रतिष्ठित देवाने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह ऐतिहासिक उदाहरण नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते. मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ? या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात. देवतत्त्वासंबंधी असली हास्यास्पद विधाने ( दूर्वांमध्ये गणेशतत्त्व असते. ते चतुर्थीला सहस्रपट होते इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. भाविक भक्त कितीही श्रद्धाळू असले तरी ते काही प्रमाणात तर्कनिष्ठ असतात. कारण मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal). श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे तार्किक समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरापुढील रांगेत आपण तासानुतास का बरे उभे राहतो? " याचे कारण त्यांना हवे असते. "इतर दिवसाच्या तुलनेत अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व द्वादश सहस्रपट असते." असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले की त्या श्रद्धावंतांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची गणपतीवरील श्रद्धा अधिक दृढ होते. यावर आमचे कांही श्रद्धावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही श्रद्धाळू आहोत. मूर्तीत, पिंडीत, फुलांत, पानांत, देवतत्त्व असते. दिवसाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी श्रद्धा आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. पुढे ? तुम्हांला आमच्या या श्रद्धेचा कांही त्रास होतो का ? भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि आचार पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या श्रद्धांशी तुमचा काय संबंध ? तुम्ही अशा श्रद्धा पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या श्रद्धांना हास्यास्पद का म्हणता ? यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही. पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. अशा लेखनाविषयीं माझी भूमिका काय ते प्रस्तुत पुस्तकातील "माझी भूमिका " या लेखात स्पष्ट केले आहे. इथे थोडक्यात देतो. "आपण सर्व मानव (माणसे ) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे." हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही. "हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने ते मोडीत निघतात. मग "देवतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे. ****************************************************************
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
89545 वाचन

💬 प्रतिसाद (285)
च
चौकटराजा Mon, 10/09/2017 - 13:52 नवीन
ही कल्पना अल्बर्ट आइनस्टाईन यानी मांडली. यावर ५० वर्षे संशोधन चालू आहे. प्रथम महास्फोटासंदर्भात आएनस्टाईन यानी या लहरींची कल्पना मांडली. यावर तपशीलवार माहिती 'नव्या जगाच्या दिशेने" या मथळ्याखाली दै. सकाळ दि. ८ -१०.२०१७ मधे अर्धे पान भरून आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 10/09/2017 - 14:01 नवीन
https://www.youtube.com/watch?v=iphcyNWFD10 इथे मांडलेल्या मुद्द्यांबद्दल तुमचं काय मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Mon, 10/09/2017 - 14:28 नवीन
ही फिल्म जाने २०१७ त घेतलेली आहे असे त्यावरील तारखेवरून दिसते. फिल्मच्या शेवटी आमच्या मर्यादा कळल्या आहेत असे म्ह्टले आहे पण आमचे उत्तर विदिन ग्रास्प आहे असेही तो म्हणतो. मला वाटते जाने २०१७ ते १४ सप्टे २०१७ या काळात त्याना काही प्रगतीचा मार्ग सापडला असावा. दुसरे असे की समजा नोबेल त्याना मिळाले तरी मी जे दुसरे उदा दिले आहे त्याप्रमाणे असे की विज्ञान हे चूक मान्य करते व सुधारणा करते. कदाचित यांची सिद्धता १०० टक्के बरोबर नव्हती यावरही कदाचित पुढे एखाद्याला नोबेल मिळेल. वेगळ्याच भाषेत सांगायचे झाले तर अथांग , अनादि अनंत ईशाचे खरे स्वरूप शोधण्यात मर्यादा असतातच ईश काय तो आम्हालाच समजला आहे हे अस्तिकांनी न म्हटलेले बरे ! १०० टक्के चिकित्सक वा १०० टक्के श्रद्धाळू असा माणूस जगात नसतोच. कारण मानवी मनाला नोंदी ठेवण्याला फार मर्यादा आहेत. म्हाणूनच मी वर माझा ६४ वर्षाचा निष्कर्ष दिला आहे ही परमेश अचिंत्य आहे. अगदी कलाम ही त्यापुढे फार लहान मग माझी काय कथा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 10/09/2017 - 14:34 नवीन
ग्रॅवीटी वेवचं डिटेक्शन ही किमान २-३ वर्षे जुनी घटना आहे. नोबेल आत्ता दिला. सगळा काथ्याकूट मागेच झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/12/2017 - 11:55 नवीन
१०० टक्के चिकित्सक वा १०० टक्के श्रद्धाळू असा माणूस जगात नसतोच. कारण मानवी मनाला नोंदी ठेवण्याला फार मर्यादा आहेत.
सहमत आहे. ठार अश्रद्ध जरी म्हटल तरी त्याला भावना नावाचा फॅक्टर असल्यामुळे तो १०० टक्के रॅशनल असू शकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 12:52 नवीन
विज्ञान हे चूक मान्य करते व सुधारणा करते.
धर्मसंस्था विज्ञानापेक्षा फास्ट चूक मान्य करते नि सुधारणा करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 10/12/2017 - 17:49 नवीन
अगदी अगदी! तुमचा कॉन्फिडन्स मात्र भारीच आहे. म्हणजे वाट्टेल ते फेकता अगदी! :D कोणताही धर्म(अर्थातच हा त्याच्या स्वघोषित बाबा/धर्मपंडित/मौलवी/प्रिस्ट इत्यादी आणि त्यांच्या श्रद्धाळू लोकांनी बनलेला) त्याच्या प्रथांवर प्रश्न विचारले कि लगेच प्रश्न विचारणाऱ्याला जणू गुन्हा केल्या सारखा बघतो. आता साधं दिवाळीच्या फटाक्यांचा उदाहरण घ्या! Image removed. Image removed. आणि या धाग्यावर जे होत आहे ते! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
मराठी कथालेखक Fri, 10/13/2017 - 12:59 नवीन
हे आवडलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
A
arunjoshi123 Fri, 10/13/2017 - 13:38 नवीन
म्हणजे वाट्टेल ते फेकता अगदी! :D
हे
प्रश्न विचारणाऱ्याला जणू गुन्हा केल्या सारखा बघतो
चं उदाहरण आहे. =================================== या धाग्यावर नास्तिकांना इतके प्रश्न विचारले आहेत. २-४ अपवाद सोडले तर बाकीच्यांची मनोवृत्ती (उत्तर देण्याची लायकी असो) गुन्हा केल्यासारखा बघण्याचीच आहे. तुम्हाला धरून. शिवाय अस्तिक असं बघण्यात बरोबर असू शकतात ही शक्यताच तुम्हा महान चिकित्सक नास्तिकांना अमान्य आहे. ==================
आता साधं दिवाळीच्या फटाक्यांचा उदाहरण घ्या!
या निर्णयाची योग्यायोग्यता असो, याच्या विरोधात केवळ अस्तिक आहेत असं म्हणता? आणि समर्थनाथ केवळ नास्तिक? =============================================
Taught to young children
तसं विज्ञानही बालपणीच शिकवतात आणि माणूस देव देव अध्यात्म इ इ विचार करायला लागतो तेव्हा सारं शिक्षण संपलेलं असतं. पण तरीही तुमचं म्हणणं मानू. विज्ञानाच्या नियमानुसार माणसाला मोठेपणी अक्कल येते ना? का लहानपणीची सगळी मतं तशीच राहायलाच पाहीजे? आणि आता ज्या नास्तिकांच्या घरी मुलं लहानपणापासून विज्ञान शिकताहेत त्यांचे विचार अंध मानले पाहिजेत का? उगाच आपलं कैतरी.
Told to believe on evidence.
चला, ईश्वर आहे वा नाही हे ठरवायला, विश्वातल्या कोणत्याही गोष्टीसाठी "अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असलेली वैश्विक कसोटी" कोणती? तुम्हाला विज्ञानाचं आणि धर्माचं कंपॅरिजन करायला दोन्ही गोष्टींचा प्राथमिक अभ्यास तरी अपेक्षित आहे. तुम्हाला हे तरी माहित आहे का कि वैज्ञानिक सत्ये आणि मानवी बुद्धी, तर्क यांचा अधिकृतरित्या संबंध नाही. विज्ञान मानणं म्हणजे तर्काला न पटणार्‍या गोष्टी एकत्र मानणं. https://www.forbes.com/sites/startswithabang/2017/06/01/break-the-standard-model-an-ultra-rare-decay-threatens-to-do-what-the-lhc-cant/#286365a85e7e आज आपण "आजच अस्तित्वात असलेल्या विसंगतींसोबत" स्टँडर्ड मॉडेल मानतो. एक विसंगती मॉडेल खारिज करायला पुरे आहे. आणि मी या क्षेत्रातला नाही, पण माझ्या एकूण वाचनात मूलभूत भौतिकशास्त्रात विसंगतींचं भंडार आहे. ==================== मी शाळेत खूप विज्ञान शिकलो आहे. दिलेले ज्ञान गुपचूप घ्यावे असाच प्रघात असे. त्यापेक्षा जास्त प्रश्न आम्ही इतिहासाच्या किंवा मराठीच्या तासात विचारत असू. त्यामुळे शंका घेण्यास फक्त तिथेच वाव आहे असं नाही. एका उपनिषदात देव आहे का असा प्रश्न आहे असं मी ऐकलं आहे. ========================
May get Nobel prize if they find an error
अगोदर एक सत्य नीट शोधा, मग चूक काढण्याचं बघू. आम्ही आमच्या चुका बदलून नवी भूमिका घेतो हे वर्तन इ म्हणून छान आहे, पण यात शास्त्रीय काय आहे? आम्हाला प्रत्येक चूक माफ = विज्ञान असा प्रकार झालाय तो. फायनल पोझिशनच घ्यायची नाही तर किमान टेंपररी पोझिशन संपूर्ण सुसंगत घ्यायची. ---------------- उद्या मला देव दाखवण्याचं नोबेल मिळण्यासाठी आज तुम्ही ओपन आहात असा या कोटचा अर्थ होतो. ======================================================= असो. ही अशी अनेक वचनं फॅशन फॅशन मधे बनून जातात. फार सिरियसली घ्यायची नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Fri, 10/13/2017 - 20:58 नवीन
उद्या मला देव दाखवण्याचं नोबेल मिळण्यासाठी आज तुम्ही ओपन आहात असा या कोटचा अर्थ होतो.
तोच अर्थ आहे इतकं तरी समजून घ्या!
या निर्णयाची योग्यायोग्यता असो, याच्या विरोधात केवळ अस्तिक आहेत असं म्हणता? आणि समर्थनाथ केवळ नास्तिक?
सोयीचं करून बोलू नका! दिवाळीत फटाके फोडायला धर्माचे लेबल लावून समर्थन देणारे, किती का असेनात पण "आस्तिकच" आहेत ना? कुठला नास्तिक त्याला समर्थन देतोय ते दाखवा बघू जरा! लग्नात फटाके फोडायला बंदी घातलेली तेव्हा तो विषय धर्मापर्यंत आला नव्हता म्हणून तिथे आस्तिक/नास्तिक वाद न येता तो मानला गेला.
विज्ञानाच्या नियमानुसार माणसाला मोठेपणी अक्कल येते ना? का लहानपणीची सगळी मतं तशीच राहायलाच पाहीजे? आणि आता ज्या नास्तिकांच्या घरी मुलं लहानपणापासून विज्ञान शिकताहेत त्यांचे विचार अंध मानले पाहिजेत का? उगाच आपलं कैतरी.
काय लिहिताय?? माणसाला अक्कल अशी अचानक उगवत नाही, लहानपणापासून ज्या काही गोष्टी पहिल्या/शिकवल्या जातात त्यातून तो शिकतो. विज्ञानाची प्रमेय/ अणू-रेणू आधी देव/राक्षस, स्वर्ग/नरक अशा कल्पना मुलांच्या विश्वात येतात. मग मोठं झालं आणि अक्कल "आली" कि काही लोक यासगळ्यावर विचार करू लागतात आणि स्वतःचा असा मार्ग बनवू पाहतात. नास्तिकाच्या घरी जन्मलेल्या मुलाला देव हे जर कुणीच कधी सांगितले नाही तर त्याला अशी काही गोष्ट असते हे आयुष्यभर कळायचं देखील नाही. आणि तरी देखील तो प्रगती करू शकेल काय फरक पडेल त्याने? आणि हो तुम्ही प्रश्न विचारला नव्हता वरती... हे असेच विधान टाकले होते ज्याला काहीच संदर्भ नाही! त्यावर मी प्रतिसाद दिला होता. उगीच आता काहीतरी विधान करू नका. गुन्हा केल्यासारखी वागणूक वगैरे देण्यात येतीये म्हणून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sat, 10/14/2017 - 11:28 नवीन
उद्या मला देव दाखवण्याचं नोबेल मिळण्यासाठी आज तुम्ही ओपन आहात असा या कोटचा अर्थ होतो.
तोच अर्थ आहे इतकं तरी समजून घ्या!
सत्याला अंतिम स्वरुप नसतं हा नविनच सिद्धांत ऐकला.
कुठला नास्तिक त्याला समर्थन देतोय ते दाखवा बघू जरा!
घटनेतलं धर्मस्वातंत्र्य ज्या ज्या नास्तिकांना मान्य आहे त्या सर्वांचं समर्थन आहे.
माणसाला अक्कल अशी अचानक उगवत नाही, लहानपणापासून ज्या काही गोष्टी पहिल्या/शिकवल्या जातात त्यातून तो शिकतो. विज्ञानाची प्रमेय/ अणू-रेणू आधी देव/राक्षस, स्वर्ग/नरक अशा कल्पना मुलांच्या विश्वात येतात.
लहानपणावरचा नास्तिकांचा रोष अगम्य आहे. लोक लहानपणी खेड्यात राहतात, नंतर शहरात राहतात, तेव्हा जे शिकावं लागतं ते सगळं शिकतात ना? का लहानपणी आम्हाला असं वाटायचं म्हणून नव्या गोष्टी स्वीकारत नाहीत? ---------------- आणि मूळात आई वडिल करताता तेच मुलं करतात असा निसर्ग का बनला आहे?
नास्तिकाच्या घरी जन्मलेल्या मुलाला देव हे जर कुणीच कधी सांगितले नाही तर त्याला अशी काही गोष्ट असते हे आयुष्यभर कळायचं देखील नाही.
अनेक लोकांना असंच क्वांटम फिजिक्स पण असतं हे आयुश्यभर माहित होत नाही. पण ते जग काय नसतंच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
थ
थॉर माणूस गुरुवार, 10/19/2017 - 19:21 नवीन
सत्याला अंतिम स्वरुप नसतं हा नविनच सिद्धांत ऐकला.
विज्ञान हे अंतिम सत्यच सांगते हे आज तुमच्याकडून कळाले. धन्यवाद. सिद्धांत वगैरे तर फार उत्तम विनोद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
D
Duishen गुरुवार, 10/19/2017 - 18:16 नवीन
उत्तम! आणि सहमत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
A
arunjoshi123 Mon, 10/09/2017 - 07:30 नवीन
तुमच्या लॉजिकमधेच खोट आहे. भ्रष्ट राजकारण्यांचा लोकशाहीमधे पूर्ण विश्वास असतो हो. आता शरद पवारांचा, मोदींचा, मनमोहनांचा, राजीवचा, ए राजाचा, निलंगेकरांचा*** लोकशाहीवर विश्वास नव्हता कि काय? मंजे लोकशाही बकवास? ====================================================== यांना अनेक लोक भ्रष्ट मानतात हे मला सुनिश्चितपणे माहित आहे. मी मानत नाही वा ते महत्त्वाचं नाही. ====================================================================== तुमच्या लॉजिकमधे अजून एक खोट आहे. जगात ९३% अस्तिक असताना गुन्हेगारांत ते ९०% आहेत (मी आहेत असंच लिहितो चला, कारण शास्त्रीय नास्तीकी तत्त्वानुसार निराधार विधान करणं जगन्मान्य आहे, त्याचा लाभ तुम्हाला.) मंजे ते बरे आहेत ना हो? =================================================================================================== बाय द वे, नास्तिकतेचा आणि मनोरुग्णतेचा सर्वाधिक संबंध आहे. नास्तिकता सर्वाधिक असलेल्या युएस आणि कॅनडा मधे (कायदा व्यवस्था अन्य जागांपेक्षा १० पट चांगली असून) गुन्हेगारी १० पट जास्त आहे. http://www.nationmaster.com/country-info/compare/India/United-States/Crime ही पाच पाने पहा. प्रत्येकच गोष्टित अमेरिका आपल्यापेक्षा जास्त क्रिमिनल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
मृत्युन्जय Mon, 10/09/2017 - 07:39 नवीन
तुमच्या म्हणाण्याप्रमाणे नास्तिक लोक जास्त गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात असे म्हणावे लागेल. भारतातील नास्तिकांची संख्या ३% पेक्षा कमी आहे. असे असुनही एकुण गुन्हेगारांमधील ९०% लोक देवावर विश्वास ठेवणारे असतील म्हणजेच १०% लोक नसतील (याचाच अर्थ नास्तिक असतील) तर ही नास्तिकांसाठी फार शरमेची बाब आहे की एकुण लोकसंख्ये मध्ये ३% मधले असलेले लोक गुन्हेगारी बाबतीत मात्र एकुण गुन्हेगारांच्या १०% आहेत. आपलेच खरे करण्याच्या अट्टाहास, दुराग्रही वृत्ती, दुसर्‍यांच्या भावनांबद्दल कमालीची असहिष्णुत्ता, भोळ्या भाबड्या लोकांशी कुठेही, अगदी रस्त्यात भेटुन सुद्धा सतत वाद घालण्याची आणी कुरापती काढण्याची वृत्ती, चित्त थार्‍यावर नसल्याने सतत आस्तिकांचा द्वेष करण्याचा वेडेपणा अशी आणि इतर बरीच कारणे यासाठी कारणीभूत असु शकतात. अश्या लोकांनी जपजाप्य , ओंकार पठण, पूजापाठ करुन चित्तवृत्ती शांत ठेवण्याचा प्रयतन करावा. त्यामुळे अर्थात त्यांना त्यांचे फुकाचे नास्तिक(वि)त्व सोडावे लागेल. पण स्वतःच्या आणी समाजाच्या स्वास्थ्यासाठी हे करणे नक्कीच उपयुक्त ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
A
arunjoshi123 Mon, 10/09/2017 - 09:11 नवीन
आस्तिकांना कधीही उपदेश करायला जाऊ नये. उलट त्यांच्या आस्तिक रहाण्यातच आपल्या सारख्यांचा फायदा आहे.
मुळात हे जे ओरियंटेशन आहे ना, ते वाईट आहे, आणि त्याचा स्रोत तुमचा व्यक्तिगत स्वभाव इ नसून तुमची नास्तिकता आहे. मानवी जीवनाचा उद्देश फायदा करून घेणे हा आहे असं नास्तिकी तत्त्वज्ञानाचं सार निघतं. निघू शकतं. फक्त आणि फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून, जो लेखकाने (आणि भारतीय राज्यघटनेने देखिल) सांगीतला आहे पाहिलं तर तुम्ही एक पशू आहात आणि ते जसे फायदे करून घेत फिरत असतात तसं तुम्ही पण फिरावं असं नास्तिकवाद सांगतो. पण शुद्ध नास्तिकवाद असतो कसा हे कळू शकत नाही कारण आजूबाजूला अस्तिकांची प्रचंड मांदियाळी आहे आणि नास्तिक धरून सर्व मानवांच्या मूल्यांवर ईश्वरप्रणित धर्मसंस्थेचे घट्ट संस्कार आहेत. धर्माच्या लेगासीमुळे "जगात कधीच कुठेच धर्म नावाचा प्रकार नसताच तर" या सदरातला नास्तिकवाद कल्पता येत नाही. ========================== अर्थात म्हणून आपले फायदे मंदिराचे वातावरण, नक्षी, इ इ पर्यंत सिमित आहेत. पण हळूहळू नास्तिकवादाला धार येणार आहे. आजच मिलिटंट अथेइझम नावाचा एक प्रकार आहे. http://www.conservapedia.com/Militant_atheism#Criticism_of_the_position त्यातला एक पॅरा इथे देत आहे.
Kurtz has criticized the militant atheism of the Soviet Union, which he stated "persecuted religious beleivers, confiscated church properties, executed or exiled tens of thousands of clerics, and prohibited believers to engage in religious instruction or publish religious materials"Kurtz has criticized the militant atheism of the Soviet Union, which he stated "persecuted religious beleivers, confiscated church properties, executed or exiled tens of thousands of clerics, and prohibited believers to engage in religious instruction or publish religious materials"
=================================== पण माझी चिंता नास्तिक अस्तिकांचे काय करतील ही नाही. एकदा सगळे अस्तिक संपले कि नास्तिक एकमेकांचे काय करतील हा खरा चिंतेचा विषय आहे. सध्याला नास्तिकवाद प्रचंड वेगाने फोफावत आहे. जितकी कमी अक्कल तत्त्वज्ञान स्वीकारायला लागेल तितका धर्म फास्ट फोफावतो हा धर्मांतरणाचा लॉ असावा. नास्तिक व्हायला अजिबातच अक्कल लागत नसल्यानं ते सर्वात सोपं आहे. देव डोळ्यानी दिसला नाही की झाला नास्तिक इतकं ते सोपं आहे. त्यात विश्वकारण घुसडलं तर पाल्हाळ इतकं लांबतं की त्याचा धर्म होऊन जातो. आणि हे काय कुणाला झेपत नाही. तितका रस नाही. वेळ नाही. पैसा नाही. किचकटपणा झेलायला फ्रेश डोकं नाही. म्हणून शिक्षण, सत्ता, विज्ञान, पैसा, उद्योग, इ इ हे ज्यांच्या हातात आहे त्यांचं नास्तिकीकरण फास्ट होत आहे, शेवटी एक दिवस अस्तिक लोक मायक्रोमायनॉरिटी असतील. पर्यटन, प्रयोग वैगेरे म्हणून त्यांना तसे राहू दिले जाईल. अशावेळी नास्तिकांचे काय चालले असेल हा प्रश्न आहे. हा प्रश्न आम्हा अस्तिकांसाठी महत्त्वाचा यासाठी आहे की आम्ही त्यांना परके मानत नाहीत. समाजात २-३% नास्तिक असलेले बरे. ते हुशार असलेलेही बरे. त्याने धर्मव्यवस्था सुधारत असते. पण एक अस्तिक म्हणून, पुढचे सत्य १००% नास्तिक समाज हे असले तरी, त्यांचे कसे भले होइल, याचा विचार करणे आवश्यक आहे. ======================================== एकाच ईश्वराची नसलेली ही लेकरे, पुण्य कमवून स्वर्गात जायचे नसणारी, चांगले वागायला कारणच नसलेले, सद्वर्तन ही मनुष्याची अंतःप्रेरणा इ इ नाही असा शोध लावून बसलेले, भौतिक सुख मॅक्सिमाईज करण्याची अंतःप्रेरणा मान्य असलेले, स्वतःस योगायोगाने रासायनिक, इ प्रक्रियांतून बनलेले किचकट रेणूसंच मानणारे, पण आजच्या दृष्टीने आमचेच असलेले हे नास्तिक भविष्यात कोणती मानवी मूल्ये पाळणार आहेत? का? कशाच्या आधारावर? विज्ञानाने तर "कायमचे" हात झटकले आहेत कि हे मूल्य बिल्य आपला प्रांत नाही. शिवाय यांच्याकडे पर्यायी काहीही शास्त्र नाही जे या गोष्टींची चर्चा करतं. तुम्ही फायदे हा शब्द फार इनोसेंटली वापरला आहे, पण अशा भविष्यात नास्तिकांची फायदाप्रणित मानवता जगातला सर्वात काळा काळ असेल. ऑफिशियली सगळं गोग्गोड असलेल्या धर्मसंस्थेची आज ही हालत आहे, तर जिथे चांगलेपणाला कसलाच आधार नसेल तिथे काय होइल? तुम्ही एकमेकांच्या "श्रद्धांच्या" टवाळ्या करत राहिलात तर ठिक आहे, पण "कोणत्याही थराला जाऊन" स्वतःचा फायदा करू लागतात तर अवघड होईल. ====================== त्यावेळी तुम्ही आम्हाला स्मरून फुक्कटच "चांगली" मूल्ये पाळणार असाल तर तुम्ही विश्वातले सर्वात मोठे श्रद्धावंत, अंधश्रद्धाळू आणि दांभिक. ====================== आजची घडी पाहिली तर आजचे नास्तिक अस्तिकांपेक्षा सद्गूणी आहेत असं माझं व्यक्तिगत निरिक्षण आहे. याचं प्रमुख कारण ते कमी आहेत, विचारी आहेत, सखोल विज्ञानाचा नि त्यांचा संबंध नाही, लेगसी तून आलेल्या अधिकृत अस्तिक मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे, त्यांच्या विचारांचं नि वर्तनांचं सुसुत्र स्पष्टीकरण त्यांना कोणी विचारत नाही, नास्तीक असण्यामागची त्यांची प्रेरणा रिअ‍ॅक्शनरी आहे, धर्मात चूका आहेत म्हणून नास्तिक बनावे, अशी आहेत. त्यामुळं ते इतकेच राहिले आणि असाच विरोध करत राहिले तर अस्तिकांनी विरोध करायचं कारण नाही. =============== मात्र ही केस नाही. ते फार भयानक संख्येने वाढत आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Growth_of_religion इथे गेल्या शतकात जगात अज्ञेयवाद आणि नास्तिकवाद पाळणारे एकूण लोकसंख्येच्या ०.२% पासून १२% झाले आहेत. हि वाढ १२% पासून २२% झालेल्या इस्लामला लाजवील अशी आहे. यावर आज असं मानलं जात आहे कि (चीन इ चा असोच) नास्तिकवाद नीट मोजला जात नाहीय. कारण या गणनेत भारतासारख्या देशातले नास्तिक शून्यच मानले आहेत. म्हणजे हा आकडा अजून मोठा आहे. शिवाय अस्तिकवाद हा इतक्या शॅलो पद्धतीने पाळला जात आहे कि लोक फक्त नाव सांगायलाच अस्तिक. म्हणून क्वालिटेटिव डिग्रेडेशन पण आहे. त्यात उद्याचं क्वांटिटेटिव पोटेंशियल आहे. म्हणून हे नास्तिक लोक जे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करतात ते "मी चांगलं का वागावं?" अशी चिकित्सा करू लागले तर काय हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशी चिकित्सा धर्मसंस्थेमधे एकतर बॅन आहे किंवा कंक्लूडेड आहे. वास्तविक आजदेखिल अशी चिकित्सा करून अनेक क्वाझी-नास्तिक लोक आरामात फ्रॉड करत आहेत. समाज बिघडला कसा त्याचं बरंच उत्तर त्यात आहे. ================================================================== आणि तिमाजी, तुम्ही नास्तिक असल्याचे आम्हा नास्तिकांना चिकार फायदे असतात. उदा. रोज सकाळी फूले आमच्या हाताला लागतात. तुम्ही नास्तिक असल्यामुळं आम्हाला ती स्वस्त पडतात. प्रत्येक सणासुदीला, पूजेला आम्ही सगळे जमतो, भेटतो, तुम्ही त्यावेळेस शुक्रसंध्या इ इ साजरी करत असाल तर आम्हाला बसमधे जागा जास्त मिळते. पण तरीही आम्हाला वाटतं कि तुम्ही पूजेले आले असते तर बरं झालं असतं! शेवटी आम्ही अस्तिक!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
प
प्रकाश घाटपांडे Mon, 10/09/2017 - 10:04 नवीन
काय मग शेवटी आपल्याला कोण व्हायचयं? अस्तिक नास्तिक की अज्ञेयवादी? डोंट वरी आपल्याला गरजे प्रमाणे या गटातून त्या गटात जायची मुभा आहे. आता पक्ष बदलला तर तुम्हाला त्या त्या गटातील बुजुर्ग गद्दार म्हण्णार नाहीत पण 'कच्च मडकं' म्हणतील. या चर्चेतील सर्वांनी एक पुस्त्क जरुर वाचावे विवेकवाद विज्ञान आणि श्रद्धा- मे.पुं.रेगे प्रकाशक-लोकवाङ्मय गृह विशेषतः त्या पुस्तकातील विभाग तिसरा मी अस्तिक का आहे? परंपरागत श्राद्ध देवाशी भांडण धार्मिक श्रद्धा आणि ईश्वराचे अस्तित्व
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 10/09/2017 - 11:26 नवीन
इथे तुम्ही एक पुस्तक वाचायला सांगताय. पण लेखक म्हणतोय की "शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.". मग आता नक्की काय करायचं? पुस्तक वाचून ज्ञान मिळवायचं का स्वबुद्धी वापरून माणुसपणाचा सन्मान करायचा? काय मग शेवटी आपल्याला कोण व्हायचयं? अस्तिक नास्तिक की अज्ञेयवादी? मी आस्तिक आहे आणि मला आस्तिकच रहायचं आहे. जे नास्तिक आहेत त्यांना मी तुम्ही आस्तिक व्हा असे शहाजोगपणे सांगायला जात नाही किंवा त्यांच्या बुद्धीची हेटाळणी करीत नाही. तुम्ही नास्तिक असलात तरी हरकत नाही. तुमच्यावर आस्तिक होण्याची बळजबरी नाही. परंतु आस्तिकांच्या विश्वासाला अंधश्रद्धा, असत्य विधाने, कॉमनसेन्स न वापरणारे, स्वतःची बुद्धी न वापरणारे, वैज्ञानिक दृष्टीकोन नसणारे असे शब्द वापरून स्वतःच्या आस्तिकतेची प्रौढी मिरवू नका किंवा त्यांना तुम्ही आमच्यासारखे नास्तिक व्हा असे न मागता सल्लेही देऊ नका, कारण स्वतःला नास्तिक म्हणविणारे आस्तिकांपेक्षाही जास्त अंधश्रद्ध, जास्त अवैज्ञानिक दृष्टीकोन असलेले व कॉमनसेन्स न वापरणारे असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
य
यश राज Mon, 10/09/2017 - 11:57 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
mayu4u Mon, 10/09/2017 - 14:09 नवीन
करू नका गुरुजी...
स्वतःला नास्तिक म्हणविणारे आस्तिकांपेक्षाही जास्त अंधश्रद्ध, जास्त अवैज्ञानिक दृष्टीकोन असलेले व कॉमनसेन्स न वापरणारे असतात.
याविषयी बोलतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
शब्दबम्बाळ Mon, 10/09/2017 - 19:52 नवीन
जे नास्तिक आहेत त्यांना मी तुम्ही आस्तिक व्हा असे शहाजोगपणे सांगायला जात नाही किंवा त्यांच्या बुद्धीची हेटाळणी करीत नाही.
कारण स्वतःला नास्तिक म्हणविणारे आस्तिकांपेक्षाही जास्त अंधश्रद्ध, जास्त अवैज्ञानिक दृष्टीकोन असलेले व कॉमनसेन्स न वापरणारे असतात.
हि नास्तिकांची हेटाळणी नव्हे हा, स्तुती आहे... विचारांची कन्सिटन्सी भारीच आहे! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मारवा Mon, 10/09/2017 - 16:29 नवीन
स्टीफन कोव्ही हा सेव्ह्न हॅबीट्स ऑफ इफेक्टीव्ह पिपल या प्रख्यात ग्रंथाचा लेखक. मुलत": ख्रिश्चन धर्मातील मॉर्मन या पंथाचा कट्टर असा अनुयायी होता. त्याचे असे म्हणणे होते की मला माझ्या विचारसरणीचा जर प्रसार करायचा असेल. तर माझ्या मुळ धार्मिक विचारतत्वांचा ज्यांचा अंगिकार इतरांनी करावा असे मला वाटते.. त्यासाठी मी केवळ माझी शैली बदलतो व माझ्याच पंथाची तत्वे अंतिमतहा पसरवतो. स्टीफन कोव्ही चे सेव्हन हॅबिट्स अगोदरचे मुळ सरळ सरळ धार्मिक पुस्तक डिव्हाइन सेंटर असे होते. मात्र जे मॉर्मन नाही त्यांच्या साठी शैली व्होकॅब्युलरी बदलत आवरण बदलुन अंतरंग कायम ठेवत त्याने सेव्हन हॅबिट्स लिहीले Covey explains in this book that that he has discovered how to communicate Mormon truths to non-Mormons by simply changing his vocabulary. He writes, "I have found in speaking to various non-LDS groups in different cultures that we can teach and testify of many gospel principles if we are careful in selecting words which carry our meaning but come from their experience and frame of mind." [Divine Center, p. 240.] वरील विवेचनावरुन दोन बाबी स्पष्ट होतात १- यातील दांभिकता जी अत्यंत उघड आहे. यातील अप्रामाणिकपणा इ.इ. २- पण अजुन एक सकारात्मक ही बाब यातुन घेता येते. ती म्हणजे कोव्ही ची क्रिएटीव्हीटी कोव्ही जे दांभिकतेने अप्रामाणिकतेने करतो ते टाळुन आपण प्रामाणिकतेने पण कलात्मकतेने एक विचार प्रसारीत करण्याचा प्रयत्न करण्यास काय हरकत आहे ? माझ्या एक स्नेही आहेत त्यांचे समविचारी गट एक गमतीदार ड्राफ्ट अत्यंत गंभीरतेने बनवतात त्याचे नाव रमाकाकुंना फेमिनीझम कसा समजावता येइल असे काहीसे आहे. ते यावर एक स्क्रीप्ट विकसीत करत आहेत. हे एक उदाहरण आहे मला असे म्हणावयाचे आहे की नेहमी एकाच रीतीने एकच बाब मांडण्याने काय साध्य होणार ? यात कलात्मक वैविध्य हवे उदा. वैज्ञानिक विचारसरणीने जगत जीवन किती सुंदर तणाव रहीत मुक्त जगता येइल त्यासाठी काय करावे लागेल लहान मुलांमध्ये साहस निर्भयता प्रयोगशीलता आणण्यासाठी कुठले प्रयोग कुठल्या अ‍ॅक्टीव्हीटीज डिझाइन करता येइल असे काहीसे व्हावे] असे मला आपले एक वाटते.
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 10/09/2017 - 16:29 नवीन
स्टीफन कोव्ही हा सेव्ह्न हॅबीट्स ऑफ इफेक्टीव्ह पिपल या प्रख्यात ग्रंथाचा लेखक. मुलत": ख्रिश्चन धर्मातील मॉर्मन या पंथाचा कट्टर असा अनुयायी होता. त्याचे असे म्हणणे होते की मला माझ्या विचारसरणीचा जर प्रसार करायचा असेल. तर माझ्या मुळ धार्मिक विचारतत्वांचा ज्यांचा अंगिकार इतरांनी करावा असे मला वाटते.. त्यासाठी मी केवळ माझी शैली बदलतो व माझ्याच पंथाची तत्वे अंतिमतहा पसरवतो. स्टीफन कोव्ही चे सेव्हन हॅबिट्स अगोदरचे मुळ सरळ सरळ धार्मिक पुस्तक डिव्हाइन सेंटर असे होते. मात्र जे मॉर्मन नाही त्यांच्या साठी शैली व्होकॅब्युलरी बदलत आवरण बदलुन अंतरंग कायम ठेवत त्याने सेव्हन हॅबिट्स लिहीले Covey explains in this book that that he has discovered how to communicate Mormon truths to non-Mormons by simply changing his vocabulary. He writes, "I have found in speaking to various non-LDS groups in different cultures that we can teach and testify of many gospel principles if we are careful in selecting words which carry our meaning but come from their experience and frame of mind." [Divine Center, p. 240.] वरील विवेचनावरुन दोन बाबी स्पष्ट होतात १- यातील दांभिकता जी अत्यंत उघड आहे. यातील अप्रामाणिकपणा इ.इ. २- पण अजुन एक सकारात्मक ही बाब यातुन घेता येते. ती म्हणजे कोव्ही ची क्रिएटीव्हीटी कोव्ही जे दांभिकतेने अप्रामाणिकतेने करतो ते टाळुन आपण प्रामाणिकतेने पण कलात्मकतेने एक विचार प्रसारीत करण्याचा प्रयत्न करण्यास काय हरकत आहे ? माझ्या एक स्नेही आहेत त्यांचे समविचारी गट एक गमतीदार ड्राफ्ट अत्यंत गंभीरतेने बनवतात त्याचे नाव रमाकाकुंना फेमिनीझम कसा समजावता येइल असे काहीसे आहे. ते यावर एक स्क्रीप्ट विकसीत करत आहेत. हे एक उदाहरण आहे मला असे म्हणावयाचे आहे की नेहमी एकाच रीतीने एकच बाब मांडण्याने काय साध्य होणार ? यात कलात्मक वैविध्य हवे उदा. वैज्ञानिक विचारसरणीने जगत जीवन किती सुंदर तणाव रहीत मुक्त जगता येइल त्यासाठी काय करावे लागेल लहान मुलांमध्ये साहस निर्भयता प्रयोगशीलता आणण्यासाठी कुठले प्रयोग कुठल्या अ‍ॅक्टीव्हीटीज डिझाइन करता येइल असे काहीसे व्हावे] असे मला आपले एक वाटते.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 10/10/2017 - 07:55 नवीन
सेव्हन हॅबिटस मध्ये मॉर्मन पंथातील मुलतत्वेच आहेत ना? ना कसलं कर्मकांड ना मॉर्मन पंथातल्या पुजनीय संत, देवादीकाची स्तुती. त्याला चांगल्या, अनुकरणीय वाटलेल्या मुल्यांचा स्त्रोत धर्मात आहे की नाही हे इथे अप्रस्तुत ठरावे नाही का? बाकी, या पुस्तकातील एंपॅथी हे प्रकरण इतके सुंदर आहे, की बासच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
A
arunjoshi123 Fri, 10/13/2017 - 13:43 नवीन
वैज्ञानिक विचारसरणीने जगत जीवन किती सुंदर तणाव रहीत मुक्त जगता येइल त्यासाठी काय करावे लागेल.
वैज्ञानिक विचारसरणीने जीवन जगताच येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
साहना Mon, 10/09/2017 - 16:42 नवीन
इथे आणखीन एक मुद्दा मांडू इच्छिते. मुळांत आजचा दिवस "सोमवार" हे कुणी ठरवले ? जगांत सगळीकडे एकच "वार" सिस्टम वापरली जाते पोप ग्रेगोरी ह्यांनी आधी केलेंडर "सिन्क" केले. त्यामुळे ज्याला सोमवार समजतो तो कदाचित हिंदू दिनांक पद्धतीने आणखीन काही तरी होता. ह्या वर्षीचे वैद्यकीय नोबेल मात्र ऋतुचर्या ह्याच्याशी संबंधित आहे त्यामुळे सर्वच परंपरा मी थोथांड ठरविणार नाही .
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 10/09/2017 - 18:27 नवीन
मोदींच्या मार्कांच्या धाग्यापेक्षा ह्या धाग्यावर जास्त प्रतिसाद आलेत. मोदींपेक्षाही जास्त फेव्हरीट विषय या जगात आहेत तर !
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 10/09/2017 - 18:51 नवीन
'मार्क्स'वाद कालबाह्य झाल्याचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
वेशीवरचा म्हसोबा Tue, 10/10/2017 - 08:07 नवीन
मधल्या काळात पूर्णपणे "समर्थनपाव" झालेल्या मिसळपावचे पुन्हा एकदा यशस्वीरीत्या आस्तिक-नास्तिकपाव केल्याबद्दल श्री यनावाला यांचे हार्दिक अभिनंदन !!! एक नास्तिक आयटी सेलला भारी पडून टीआरपीची ऐसी लक्तरे लोळविली गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
P
palambar Mon, 10/09/2017 - 19:10 नवीन
आता प्रतिसादामधे आस्तिक लोक जास्त आहेत यावरुन सिध्द होते कि आस्तिकते मुळे काॅन्फिडन्स वाढतो, हा एक आस्तिक असण्याचा फायदा म्हणता येईल का?
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Mon, 10/09/2017 - 20:06 नवीन
असेही या धाग्यात बरेच मनोरंजन होत आहे.. :) यावरून एक विनोद आठवला... एक मुलगा एका आज्ञाधारी बेडकाला घेऊन एक प्रयोग करत असतो. १. तो बेडकाला एका ठिकाणी बसवून उडी मारायला सांगतो, बेडूक उडी मारतो. २. तो बेडकाचा एक पाय कापतो आणि बेडकाला उडी मारायला सांगतो, बेडूक उडी मारतो. ३. तो बेडकाचाअजून एक पाय कापतो आणि उडी मारायला सांगतो बेडूक तरीही उडी मारतो. ४. आता तो बेडकाचा तिसरा पाय कापतो आणि त्याला उडी मारायला सांगतो. बेडूक कशीबशी जमेल तशी उडी मारतो. ५. शेवटी तो बेडकाचा चौथा पाय देखील कापतो आणि त्याला उडी मारायला सांगतो. पण... बेडूक उडी मारत नाही!! यावरून तो निष्कर्ष काढतो: "बेडकाचे चारीही पाय कापले कि त्याला ऐकू येत नाही!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar
A
arunjoshi123 Fri, 10/13/2017 - 13:44 नवीन
यावरून तो निष्कर्ष काढतो: "बेडकाचे चारीही पाय कापले कि त्याला ऐकू येत नाही!"
याला वैज्ञानिक प्रयोग म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
र
रामपुरी Mon, 10/09/2017 - 21:58 नवीन
"असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते" तुमची मते काहीही असली आणि कितीही खरी असली तरी हि विधाने अक्षम्य आहेत. अशी विधाने करून माती खाल्ली नसती तर लेख बरा आहे म्हणता आले असते.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 10/09/2017 - 22:44 नवीन
ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी तेच तेच लोक बोलत रहातात. मग मी का नाही..! एक तर प्रत्येकाला आपल्या आयुष्याची हवी ती माती करण्याचा अधिकार आहेच. जोवर दुसर्‍यांना त्रास होत नाही तोवर कुणी काही का करेना. हो पण, आपली मते दुसर्‍याला पटवण्याचा अट्टाहासच असेल तर मग त्याचा त्रास होतो. मी फार गुंतागुंतीचे विचार करु शकत नाही. सरधोपट विचार जमतात. मी नास्तिक आहे. म्हणजे काय तर मला वाटतं की देव नावाची संकल्पना अस्तित्वात नाही जी माझ्या पाप पुण्याचा हिशोब लावेल. तेव्हा माझं आयुष्य माझ्याच निर्णयांचा परिपाक आहे. आज मी जिवंत आहे, उद्या मेले की संपलं. पुन्हा आत्मा, पुनर्जन्म, ८४ लक्ष योनी असे काही प्रकार असतील असं मला वाटत नाही. मुख्य प्रश्न येतो तो सणवार, धार्मिक - सांस्कृतिक गोष्टींचा. माझ्या घरात सगळे आस्तिक आहेत. उद्या त्यांनी काहीही करायचं म्हणलं तर माझ्यावर त्याचा काही ना काही परिणाम होणारच. तो मी टाळू शकत नाही. पण ते माझ्या घरचे आहेत. मला त्यांचे मन दुखवायचे नाही, त्यांनी माझे दुखवू नये अशी माझी माफक अपेक्षा. गणपती, गौरी, दिवाळी, संक्रांत इ. सणांना आपण जे काही करतो (गोडधोड, सजावट, पुजा इ.) ह्यात माझा पॅसिव्ह सहभाग असतो. मी स्वयंपाक दणक्यात करेन, पुजा मात्र करणार नाही. माझा ह्यात फायदा असाय की आयुष्यात काहीही वेगळे करायला जे एक "निमित्त" लागते, ते मला आपसूक मिळून जाते. माणूस उगाच अवसान आणून रोजच्या धबडग्यात काही तरी वेगळे करत नाही. त्याला एक पुश लागतोच. हे सणवार एक पुश आहेत झालं.. फक्त मला "हे करावंच लागतं" किंवा "आमच्याकडे हे असंच लागतं" वाले प्रकार झेपत नाहीत. मी आज गणपती बसवला, उद्या बसवेनच किंवा त्यात सामील होईनच असं नाही. आपण नाही का महिन्याची भिशी लावतो, जमलं तर आवर्जुन जातो, पण नाही जमलं तर आभाळ कोसळत नाही ना. बस तसंच. स्त्री म्हणून संसारात काही टिपीकल गोष्टी अंगावर पडतातच. जसं की नवर्‍याला स्वयंपाक येतो. पण नैवेद्याचा स्वयंपाक करावा इतका तो महान नाही. मी असेन तर मी नक्की करेन. पण उद्या मला दुसरं काही करायचं असेल त्याच दिवशी तर नवरा आस्तिक आहे, त्याने नैवेद्याची सोय बघावी. असा साधा हिशोब आहे. इतरांच्या आस्तिकपणाच्या जबाबदार्‍या मी घेऊन फिरत नाही. ज्याला सणवार, सोवळं वोवळं, पुजा अर्चा करायचं असेल त्याने ते आपल्या हिमतीवर करावं. मला कुणीही बळजबरी करत नाही. तो इतरांचा मोठेपणा नसून माझ्या स्वभावाच भाग आहे. जगात शक्यतो लोक आपली मतं तुमच्यावर लादायलाच बघत असतात. आपण काय करायचं हे आपण ठरवायचं. मी कुणाला नास्तिक बना हे पटवायला जात नाही. हां आता नवर्‍याला काही इल्लॉजिकल गोष्टी दाखवून देतेच (ह्यात बायकोगिरीचा भाग जास्त आहे!). जसं की अमेरिकेत येऊन श्रावण पाळणे. कॅनडात महालक्ष्म्या करत बसणे. पण जे हौसेने करतात त्यांना मी सांगायला जात नाही. जोवर मला त्रास होत नाही मी का बोलू कुणाला? लोक डोकं गहाण ठेवून वागत असतातच. आपण विषय निघालाच तर आपले मत मांडावे. भारतात डोकं गहाण ठेवल्याची आजुबाजुला सर्रास दिसणारी उदाहरणं म्हणजे महालक्ष्म्यांना अन्नदानाच्या नावाखाली घरातल्याच कुणाला तरी जेवायला बोलवणे (आणि कामवालीला मात्र उरलं सुरलं देऊन भागवणे..). सवाष्ण ब्राह्मणच हवी असा दुराग्रह ठेवणे. मला वाटतं की उद्देश समजून घ्या सणांचा आणि त्याप्रमाणे बदल करा. आंधळेपणाने कॉपी पेस्ट करू नका. माझ्या घरात मी व्होकल आहे ह्या बाबतीत. पण बाकीच्यांना काय वाटेल ते करु देत. आपण का जीव शीणवायचा? लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 10/10/2017 - 07:28 नवीन
दंडवत घ्या ..!! घरोघरी तुमच्यासारख्याच खमक्या मुली जन्माला येवोत ही श्री दत्त दिगंबर सद्गुरू चरणी सदिच्छा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पुंबा Tue, 10/10/2017 - 07:56 नवीन
+++११११ पर्फेक्ट पिराताई..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/10/2017 - 08:31 नवीन
सहमतीच्या टाळ्या ! हे जग वैविध्याने नटलेले आहे म्हणून ते रंगतदार आहे. सगळ्यांनी एकसारखा विचार करायचा आणि एकसारखे वागायचे, वेगळे काही करायचे नाही, विचारसुद्धा करायचा नाही, अशी सक्ती असलेले जग कम्युनिस्ट राजवटीसमान एकचएक करड्या शिस्तीचे आणि रंगाचे असेल... हे नास्तिक मंडळी नेहमीच विसरतात. आणि त्यापुढे जाऊन "आम्ही आणि ते" अशी एकेरी तुलना करू लागतात. अर्थातच नंतर, "केवळ आम्ही बरोबर" व "ते बिचारे नेहमीच चूक असतात आणि त्यांचा उद्धार करण्याचा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे" असा त्यांचा प्रवास असतो. या पृथ्वीवरची विविधता समजून घेण्यात असमर्थ असलेल्यांची, सर्वांनी माझ्यासारखेच असायला हवे असा (दुर्)आग्रह धरणार्‍यांची, विचारशैली शास्त्रिय आणि समतोल आहे, असे कसे म्हणता येईल ? पूर्वी या विचारसरणीबद्दल राग आणि आश्चर्य वाटायचे... हल्ली कणव वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
S
sagarpdy Tue, 10/10/2017 - 09:20 नवीन
दोन्ही प्रतिसादांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/11/2017 - 07:06 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
श
श्रीगुरुजी Tue, 10/10/2017 - 13:14 नवीन
लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही. +१ आपल्याला हिंदू समाजाला सुधारायचा ठेका मिळालेला आहे अशी नास्तिकांची गाढ श्रद्धा असते. परंतु समाजाला सुधारण्यासाठी भारतीयांच्या अत्यंत गंभीर व समाजघातक अंधश्रद्धांवर (उदा. सणाला दिले जाणारे प्राणीबळी, स्त्रियांची कौमार्यपरीक्षा इ.) बोलण्याऐवजी सत्यनारायण पूजा, उपासतापास असल्या निरूपद्रवी गोष्टींना लक्ष्य करून आपण बुद्धीप्रामाण्यवादी, विवेकवादी, विचारवंत वगैरे आहोत हे मिरविण्यातच आणि नास्तिकांना टोमणे मारण्यातच यांचे आयुष्य जाते. वास्तविक पाहता या निरूपद्रवी गोष्टींनी समाजाचे काहीही नुकसान होत नसते. या लेखातील सुरवातीला वर्णन केलेल्या काल्पनिक प्रसंगातील देवतत्व वगैरेचा उल्लेख हा त्याचाच भाग आहे. या काल्पनिक प्रसंगातील गृहस्थांनी गुरूपौर्णिमेला मूर्तीतील देवतत्व वाढते अशी श्रद्धा ठेवली असेल तर त्यात लेखकाचे काय चार चव्वल गेले का? या श्रद्धेने लेखकाचे किंवा समाजाचे काही नुकसान झाले आहे का? अशी श्रद्धा बाळगल्याने कोणावर अन्याय झाला आहे का? असे काही नसताना सुद्धा विनाकारण त्यावर टीकेचे आसूड झोडून त्यावर "श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. " असली मल्लीनाथी करणे हीच यांची वैज्ञानिक दृष्टी आहे. ज्यांना अशी श्रद्धा बाळगायची आहे त्यांनी ती बाळगू देत की, पण त्यात तुमचं काय गेलं? सणाला नवस किंवा कुर्बानी नावाखाली क्रूरपणे केलेली प्राण्यांची हत्या, लहान मुलींची धार्मिक कारणावरून केलेली सुंता असल्या धार्मिक अंधश्रद्धा समाजासाठी अत्यंत घातक आहेत. मात्र याबाबतीत बोलायला यांची दातखिळ बसलेली असते. अगदी तोंडात उलथने घालून सुद्धा या भंपकांची त्यावेळी दातखिळ उचकटत नाही. खरं सांगायचं तर आपण विज्ञानवादी आहोत, बुद्धीप्रामाण्यवादी आहोत हा यांना भ्रम झालेला आहे व यांच्या मेंदूतील या केमिकल लोच्यामुळेच यांची बुद्धी कुंठित झालेली असून विचारशक्ती बधिर झालेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/11/2017 - 07:23 नवीन
श्रीगुरुजी आपला मुद्दा अंधश्रद्धांची वर्गवारी अशा स्वरुपात येतो. खर तर प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्यासारखे आहे. सश्रद्ध व अश्रद्ध या दोन्ही कडे अतिरेकी प्रवृत्तीचे लोक आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते ," माणुस अंधश्रद्ध असतो कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते." ( संदर्भ - तिमिरातून तेजाकडे पृष्ठ ३८४ ले. नरेंद्र दाभोलकर) नुकतेच डॉ मिलिंद वाटवे यांच्या विज्ञानातील अंधश्रद्धा या विषयावरील व्याखानाला गेलो होतो. त्यात त्यांनी अंधश्रद्धा टिकून राहण्याचे कारण त्याची उपयुक्तता हा मुद्दाही मांडला होता. जिज्ञासूंनी सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात पुस्तकातील अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान हे प्रकरण ही वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सप्तरंगी Tue, 10/10/2017 - 16:01 नवीन
पीरा , मला तू , तुझे लिखाण आवडते. तू थोडीफार माझ्यासारखीच आहेस म्हणून का ? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/11/2017 - 06:56 नवीन
बाबा आमटे पुल ही मंडळी नास्तिक म्हणता येईल अशा विचारश्रेणीची होती. पण त्यांच नास्तिक्य समाजाला खटकल नाही. कारण ते इतरांच्या अस्तिक्याला डिवचणार नव्हत. बाबांना तर लोक देव न मानणारा देव माणूस म्हणायचे. नास्तिकांचीही वर्गवारी करावी लागेल. नुस्त नास्तिक म्हणून चालणार नाही. देवाला न मानणारे आणि देवाला शत्रू मानणारे तसे देवाला मानणार्‍यांना शत्रू मानणारे यात फरक केला पाहिजे. आम्ही तर देवाला मानत नाहीच पण तुम्ही मानत असाल तर तुम्ही मूर्ख अंधश्रद्धाळू अज्ञानी सनातनी निर्बुद्ध अशा विशेषणांना पात्र आहात हे वारंवार दाखवून देणे हे अस्तिकांना खटकत. तुम्ही अस्तिक असा नास्तिक असा अज्ञेयवादी असा नैतिक असा म्हणजे झाल अशी भूमिका घेतली तर सगळ्यांना बरोबर घेता येते. खाली एक दुसरा प्रतिसाद चिकटवत आहे कारण चर्चा त्याच त्याच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रकाश घाटपांडे Wed, 10/11/2017 - 07:03 नवीन
अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही लोक मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टिंब मधे जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
श
श्रीगुरुजी Wed, 10/11/2017 - 10:55 नवीन
अत्यंत उत्कृष्ट व संतुलित प्रतिसाद! काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार उत्पन्न व्हायला लागतो. या वाक्यांना पुष्टी देणारी अनेक वाक्ये या लेखात आहेत. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. लेखातील वरील वाक्यातून लेखक असे दाखवून देत आहे की श्रद्धावान निर्बुद्ध आहेत, त्यांची बुद्धी कुंठित झाली आहे, त्यांची विचारशक्ती बधीर झाली आहे, ते तर्कबुद्धीने विचार करीत नाहीत, त्यांच्या श्रद्धा हास्यास्पद आहेत इ. इ. आणि मी वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करतो, मी बुद्धीप्रामाण्यवादी, तुम्हाला सुधारायची जबाबदारी माझ्यावर आहे इ. इ. आपण काहीतरी महान कृत्य करीत आहोत असा आव आणून एक काल्पनिक कथा रचून लेखकाने लेख टाकून श्रद्धावाल्यांची हेटाळणी केली. परंतु काही थोडे अपवाद वगळता इतर सर्वांनी लेखाची व लेखकाची पिसे काढल्यानंतर लेखकाने कोणतेही स्पष्टीकरण न देता धाग्यावरून काढता पाय घेतला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
A
arunjoshi123 Fri, 10/13/2017 - 14:04 नवीन
श्रद्धावान निर्बुद्ध आहेत, त्यांची बुद्धी कुंठित झाली आहे, त्यांची विचारशक्ती बधीर झाली आहे, ते तर्कबुद्धीने विचार करीत नाहीत, त्यांच्या श्रद्धा हास्यास्पद आहेत इ. इ.
कोणत्याही चुकीच्या मार्गाने जाणार्‍या लोकांसाठी कठोर विशेषणांचा वा उपायांचा एका हद्दीपर्यंत स्वीकार्य मानायला हरकत नाही. व्यक्तिशः मला वैज्ञानिक दृष्टीकोनाचं आजचं नि भविष्यातलं स्वरुप हे धार्मिक दृष्टिकोनापेक्षा भयंकर घातक वाटतं. इथे कुणाच्याही विचारशक्तीला काहीही झालेलं नाही मात्र फॅशन पाळायची आणि होलिस्टिक विचार करायचा नाही हा चॉइस दिसतो. ===================== बाय द वे, यनावाला, त्या विचारशक्ती बधीर दत्तभक्ताला त्याची प्रॉपर्टी मला दान करायचं सांगता का जरा? बुद्धी विचार आणि तर्क यांच्या बाबतीत त्यांची अवस्था पाहून हे अवघड नसावं. आणि नसलात तर तुमची करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मृत्युन्जय Wed, 10/11/2017 - 14:55 नवीन
प्रतिसाद आवडला. एका वाक्यात मात्र थोडासा बदल करेनः म्ही मूर्ख अंधश्रद्धाळू अज्ञानी सनातनी निर्बुद्ध अशा विशेषणांना पात्र आहात हे वारंवार निर्बुद्धासार्खे बरळत राहणे हे अस्तिकांना खटकत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
A
arunjoshi123 Wed, 10/11/2017 - 15:16 नवीन
लेख लिहून बोलायचं असेलच तर मी देवदासी म्हणून मुलींना देवाच्या नावाने सोडणे किंवा नवसापोटी प्राण्यांचा बळी देणे किंवा मुलगा व्हावा म्हणून अघोरी उपाय करणे वगैरे अंधश्रद्धांविषयी बोलेन. मंदिरात जाऊन पाया का पडता अशा क्षुल्लक मुद्द्यांवर मी इतकी चर्चाच करणार नाही.
त्याच वेळी स्त्रीयांचे पोटासाठी, चोचल्यांसाठी, हौसेसाठी, देहासाठी वा स्वतःचे स्वातंत्र्य म्हणून वेश्या बनण्याचे समर्थन करेन, मांसाहारासाठी दररोज कारखान्यांत प्राण्यांचे जीव जात असतील त्याला पाठींबा देईन? ते सगळं देवदासी आणि बळी यांच्यापेक्षा फिजिकली वेगळं नाही, नास्तिकांचं त्याच पापांचं व्हर्जन आहे, आणि त्याला धर्माचं लेबल नाही म्हणून सोईचं आहे. धर्माचं कवच काढलं की सगळी पापं कशी आधुनिक दिसतात!! कायदेशीर!!! ============================ मंदिरात जाऊन पाया पडण्यावर घेतलेलं ऑब्जेक्शन हेच अस्तिकांवरचं सर्वश्रेष्ठ ऑब्जेक्शन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 10/11/2017 - 17:27 नवीन
एका वाक्यातून इतके (विपरीत) अर्थ काढण्याचं तुमचं कसब माझ्याकडे नाही बुवा. देवदासींना ऑब्जेक्शन घेतलं पण वेश्या व्यवसायाला समर्थन आहे वगैरे.. अहाहा!! पाया पडण्याविषयी मी इतका काथ्याकुट करणार नाही ह्यातून पाया पडण्याला माझं समर्थन आहे वगैरे अर्थ काढले नसतील अशी अपेक्षा. पण काढलेत तरी चालेल. बाकी तुम्ही कशावरही ऑब्जेक्शन घ्या, त्याला सर्वश्रष्ठ म्हणा, काय फरक पडतो? तुम्ही कोण लागुन गेलात वगैरे वगैरे.. आणि हाच मुद्दा आहे. असो.. आपले मोनोलॉग सुरु होऊ देत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 10/12/2017 - 07:47 नवीन
एका वाक्यातून इतके (विपरीत) अर्थ काढण्याचं तुमचं कसब माझ्याकडे नाही बुवा. देवदासींना ऑब्जेक्शन घेतलं पण वेश्या व्यवसायाला समर्थन आहे वगैरे.. अहाहा!!
तुमची स्वतःची भूमिका काय आहे यावर माझा प्रतिसाद नव्हता. प्रतिसाद आपल्याला उद्देशून आहे हा भाग वेगळा, त्यामुळे माझं मत तुमच्या विचारांवरच आहे असं वाटणं साहजिक आहे, ते मला मान्य आहे. मी एक सामान्य निरिक्षण मांडलं - भौतिक स्वरुप तेच असलेल्या गोष्टि जेव्हा धर्माच्या नावाने होतात तेव्हा पुरोगामी विरोध करतात, अन्यथा करत नाहीत हा दांभिकपणा आहे. लैंगिक स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, आहारस्वातंत्र्य या नावांखाली पुरोगामी लोकांत जेव्हा देवदासी आणि बळी हे प्रकार होतात तेव्हा ते राजरोसपणे खपतात, त्यांना आधुनिक मानण्यात येतं, ते पुरोगाम्यांच्या रडारवर नसतात हा मी मांडलेला छोट्टासा मुद्दा आहे. हे माझं जनरल समाजातलं निरिक्षण आहे. ===================================================== तुमची व्यक्तिगत मतं कशी चूक आहेत हे सिद्ध करण्यात मला काही रस नाही. ती गैर, अवाजवी आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही. "तुम्ही" हा माझ्या प्रतिसादाचा विषय नाही. ======================= अंततः पुन्हा सांगतो, तुमच्या विधानाचा तुम्हाला अभिप्रेत नसलेला कोणताही अर्थ काढण्याची मला इच्छा नाही. नसते. दॅट इज नॉट हाऊ आय आर्ग्यू. ज्या विचारसरणींस ते लागू आहे त्यांनी प्रतिवाद करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा