Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग ३२

व
वामन देशमुख
गुरुवार, 05/03/2018 - 17:57
🗣 309 प्रतिसाद
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय. राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का? आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.

प्रतिक्रिया द्या
67142 वाचन

💬 प्रतिसाद (309)
L
lakhu risbud Mon, 05/07/2018 - 17:50 नवीन
संपादक मंडळाला पण त्यांनी दिलेल्या सूचनांमध्ये एवढा अर्थ आहे हे पण आत्ताच कळाले असेल.अर्थ लावणारे सोईस्कररित्या पाहिजे तो अर्थ लाऊन विरोधी बाजूला टोमणे (!) मारायची संधी साधून घेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Mon, 05/07/2018 - 17:53 नवीन
मिस्टर रिसबुड (पुलंचा चाहता) वांडो सोईस्कर अर्थ लावून मालकांना अन संपादक मंडळाला कोण बोल लावतोय ते वर नीट दिसतंय, तुम्हाला पण मालकच चूक वाटतायत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
ड
डँबिस००७ Mon, 05/07/2018 - 18:43 नवीन
मंगुल्या आहे थोडा डॅम्बीस आणि मी पुर्ण डँबिस आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Mon, 05/07/2018 - 18:45 नवीन
तुमचे नाही आले आजवर इतके लक्षात राहण्यालायक, स्वतःला इतकं महत्वाचं समजू नये बुआ :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
अ
अभ्या.. Mon, 05/07/2018 - 16:30 नवीन
इतका परफेक्ट अर्थ समजला तुम्हाला? आश्चर्य आहे. मला वाटले जनरल सर्वानाच सूचना आहे ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अभ्या.. Mon, 05/07/2018 - 16:32 नवीन
हा उपप्रतिसाद व्यापारचिन्हरावांसाठी आहे. बाकी मंगुल्याचे कौतुक करावे तितके थोडेच. भांडावे लागते एकडाव. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जेम्स वांड Mon, 05/07/2018 - 16:36 नवीन
स्वतःला जनरल सर्वात उठबस असणारे अन मिपा मालकांच्या शब्दाबाहेर नसलेले मानतो. बाकी "आपल्या गटाचा" शेम्बुड गोड म्हणत मालकांनाच नाक मुरडायचा प्रताप करायला खासे धारिष्ट्य लागते बुआ, आपल्यात ते नाही, काळ सोकावतो म्हणतात न बेंबट्या तो हा असा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जेम्स वांड Mon, 05/07/2018 - 16:38 नवीन

फक्त कलाकारांना स्पष्टीकरण आहे बाकी जय हरी विठ्ठल

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
अ
अर्धवटराव Tue, 05/08/2018 - 05:36 नवीन
मणिशंकर अय्यर परत एकदा भाजपा/मोदिंच्या मदतीला धाऊन येणार बहुतेक
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 05/08/2018 - 05:58 नवीन
१९३८ साली जिना यांची बैठक कुणाबरोबर झाली होती ज्यात द्विराष्ट्र कल्पना मांडली होती ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
S
sagarpdy Tue, 05/08/2018 - 07:37 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Syed_Ahmad_Khan १० वी पर्यंतची इतिहासाची पुस्तके परत वाचून घ्या.
Suppose that the English community and the army were to leave India, taking with them all their cannons and their splendid weapons and all else, who then would be the rulers of India?.... Is it possible that under these circumstances two nations—the Mohammedans and the Hindus—could sit on the same throne and remain equal in power? Most certainly not. It is necessary that one of them should conquer the other. To hope that both could remain equal is to desire the impossible and the inconceivable. But until one nation has conquered the other and made it obedient, peace cannot reign in the land - Syed_Ahmad_Khan , March १८८८ (सावरकरांचे वय : ५ वर्षे,जीनांचे वय : १२ वर्षे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Tue, 05/08/2018 - 07:39 नवीन
कैच्या कै! संदर्भ देता का? १९२३ पासून मुस्लिम नेत्यांनी द्विराष्ट्र संकल्पनेसाठी भारतातील सगळ्या नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरु केल्या होत्या असे दाखले आढळतात. १९३८ तर खूप उशिरा येतं आणि ज्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या त्यातील एक सावरकर होते. त्या बैठकीत काय निष्कर्ष काढण्यात आला याचा संदर्भ देता का? १९२४ साली लाला लजपत राय यांनी द्विराष्ट्र संकल्पनेला पाठिंबा दिला होता याचे संदर्भ खोटे आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ज
जेम्स वांड Tue, 05/08/2018 - 07:43 नवीन
मंगू तो काँग्रेस पक्षाचा मंगू आहे म्हणून तू त्याची बाजू घेऊ नको गडे, द्विराष्ट्रवाद संबंधी १९३८ मध्ये 'सावरकर - जिन्हा' भेट झाली होती तिलाच 'जिन्हा सावरकर' भेट पण म्हणता येईल, मणिशंकर शंख म्हणतोय की तुम्ही (पक्षी पाकिस्तानी) चुकीचे शिकवतायत अन द्विराष्ट्रवादाचे जनक सावरकर होत, पण जर तुझे विधान ग्राह्य धरले तर जिन्हा अन सावरकर दोघेही जनक होत द्विराष्ट्रवादाचे! असे किमान पाकिस्तानी लोकांनी म्हणायला हरकत नाही, त्यामुळे मणी चूक बोलला त्याने तिथल्या त्याच्या चेल्याचपाट्यानां 'तुम्ही अर्धवट शिकवताय' म्हणायला हवे होते. रच्याकने द्विरष्ट्रवादी विचार जर खरेच सावरकरांचे होते तर आजवर बिलं गांधींच्या नावे का फाटतायत? अन त्यांना जीव का द्यावा लागला? म्हातारबाबा उगाच खाया पिया कुछ नही ग्लास फोडा बाराना झालेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 05/08/2018 - 08:05 नवीन
दोघांनी ठरवले होते तर दोघेही जनक होतील ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ब
बिटाकाका Tue, 05/08/2018 - 08:15 नवीन
कृपया त्या बैठकीच्या निष्कर्षांचा असेल तर संदर्भ द्या! त्या एकाच बैठकीत हा निर्णय घेऊन फाळणी करण्यात आली असा चुकीचा अर्थ आपल्या वाक्यातून निघत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ग
गब्रिएल Tue, 05/08/2018 - 08:36 नवीन
या बोटावर्ची थ्युंकी त्या बोटावर कर्न्याच्या कलेत मंगूसाय्बांचा हात धर्नारा आक्क्या दुनियेत घावनार नाय. त्यात्लं नोबेल बकशीश मंगूला यक्दम नक्की बर्का ! ;) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ज
जेम्स वांड Tue, 05/08/2018 - 09:26 नवीन
तुमचा मूळ आयडी शोधण्यात कोणालाच रस नाहीये हो, कश्याला ओळख लपवायला व्याकरण आणि शुद्धलेखनाची आयमाय करताय, म्हणायचं ते नीट लिहून मांडा की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल
ज
जेम्स वांड Tue, 05/08/2018 - 09:31 नवीन
बक्षीस म्हणून २१/- देता येतीलच, नाही नाही द्याच थुंकी बोटे वगैरे करण्यासाठी, पण त्याने मांडलेल्या मुद्द्यावर प्रतीमुद्दाही द्या (असला तर), नाहीतर व्यक्तिगत टीका गणली जाऊ शकेल बहुदा ही. मुद्दे देने बिटाकाकांकडून शिकू शकता. (शिकायची इच्छा असली तर), काकांशी वादविवाद म्हणजे मजा असते एकदम रिफ्रेशिंग अन बुद्धिवर्धक प्रकार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
व
विशुमित Tue, 05/08/2018 - 09:38 नवीन
मिपावर संपादक मंडळाने भरारी पथक चालू केले पाहिजे, असे वाटते. सापडला की फाड पावती, ते पण सगळे कलम वगैरे व्यवस्थित लावून. म्हणजे सर्वाना मिपा वाहतुकीचे नियम व्यवस्थित समजतील आणि सिग्नल तोडणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
M
manguu@mail.com Tue, 05/08/2018 - 09:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ब
बिटाकाका Tue, 05/08/2018 - 08:14 नवीन
द्विराष्ट्र संकल्पना आणि फाळणीचा परिणाम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण यापैकी कशालाही फक्त गांधींना दोष लावणे बेजबाब्दारपणाचे आणि बेसलेस आहे असे मला वाटते. त्या वेळची परिस्थिती कदाचित द्विराष्ट्र संकल्पनेला रोखू शकली नसती. पण फाळणीची अंमलबजावणी, कदाचित इंग्रजांच्या दबावाखाली, अत्यंत घाईघाईने करण्यात आली असावी. अगदी सीमाही ठरल्या नसताना फाळणीची आणि स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करण्यात आली आणि हिंसेला सुरुवात झाली. त्या काळाच्या नेत्यांचा जनतेवरील प्रभाव बघता हे आधी परिपकवपणे हाताळता आले असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
S
sagarpdy Tue, 05/08/2018 - 08:51 नवीन
आंबेडकरांच्या "PAKISTAN OR THE PARTITION OF INDIA" मधील उपसंहार
We need better statesmanship than Mr. Gandhi and Mr. Jinnah have shown
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ज
जेम्स वांड Tue, 05/08/2018 - 09:33 नवीन
हा शेवटचा शब्द मानावा का ह्या बाबतीतला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
S
sagarpdy Tue, 05/08/2018 - 10:13 नवीन
:) नाही केवळ एका समकालीन व नावाजलेल्या नेत्याचे एक मत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
म
माहितगार Tue, 05/08/2018 - 10:34 नवीन
We need better statesmanship than Mr. Gandhi and Mr. Jinnah have shown
बाकी मांडणी काय आहे माहित नाही, पण आंबेडकरांशी या वाक्या पुरता सहमत आहे, जीनांनी स्वतःच्या आणि समुह स्वार्था पोटी अख्खे उपमहाद्वीप आज अण्वस्त्र युद्धाच्या कगारीवर जाऊन उभे आहे हे जीनांच्या स्टेटमनशीपचे -म्हणजे त्यांनी दाखवलेल्या उत्पात मुल्याचे- चांगले उदाहरण ठरत नाही. आणि गांधींनी जीना आणि समुदायाने दाखवलेल्या उत्पातमुल्यापुढे बोटचेपेपणा करावा हे हाती गीता ठेऊन फिरणार्‍याने नेतृत्व म्हणून श्रेयस केले का ? यात त्याम्ची स्टेटमनशीप कुठे दिसली ? या बद्दलची साशंकता वाटते. नथुरामचे कृत्य स्पृहणीय नव्हते , पण आंबेडकर म्हणतात तसे गांधींनी स्वतःच्या व्यक्ती पुजेस कुठेतरी आवार घालण्याची, काँग्रेस विसर्जनाचा विचार केला तसा स्वतःच्या व्यक्तिपुजेच्या विसर्जनाचा विचार करणे वावगे ठरले नसते म्हणजे , इतर नेत्यांना स्टेटमनशीप मध्ये सहभागाची अधिक संधी मिळाली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
म
माहितगार Tue, 05/08/2018 - 09:05 नवीन
ब्रिटीशांनी १८५७ अनुभवानंतर हिंदू - मुस्लीम फूट पाडण्याचा विडा उचलला आणि यशस्वी केला - तत्कालीन अँग्लो इंडीयन वृत्तपत्रे आता सहज उपलब्ध होत नाहीत म्हणून त्यांचा नतद्रश्टपणा ठळकपणे पुढे येत नाही , दुसरे असेकी १९ व्या शतका पासूनच रशिया व्ह्याया सेंट्रल एशिया अफगाणिस्तानातून येऊन आपल्या आर्थीक साम्राज्यास धक्का लावेल हि सातत्याची भिती पुढे कम्युनीझमच्या भितीत परावर्तीत झालेली होती, त्यामुळे ब्रिटीशांना अफगाणीस्तानापर्यंत वेळ प्रसंगी हस्तक्षेप करता येईल एवढा इलाका भारता पासून वेगळा ठेवण्यात रस होता , त्या दृष्टीने अगदी राष्ट्रभक्त मुसलमांनानाही प्रलोभने दाखवून फुटतील याची काळजी ब्रिटीश घेत होते यात जीना आलामा इक्बाल इत्यादी मडंळींनी संधी साधली, अर्थात ब्रिटीशाम्नी तोडा आणि फोडा केले म्हणून स्वतःचे राष्ट्र प्रेम विसरुन देशद्रोह करणार्‍या जीना आणि आलामा इकबालांची आरती ओवाळता येत नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com Tue, 05/08/2018 - 09:32 नवीन
ब्रिटिशांनी अफगाण बाजूला केला , 1880 ते 2000 सालात जिनांचा जन्म 1876 आणि इकबालाचा 1877
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
M
manguu@mail.com Tue, 05/08/2018 - 09:33 नवीन
ब्रिटिशांनी अफगाण बाजूला केला , 1880 ते 1900 सालात जिनांचा जन्म 1876 आणि इकबालाचा 1877
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार Tue, 05/08/2018 - 10:11 नवीन
ब्रिटीशांना रशियाच्या वाटणार्‍या परंपरागत भितीचा इतिहास , त्या भितीने ते किती ग्रासलेले असत आणि आताही असतात, हा मोठ्या अभ्यासाचा विषय असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 05/08/2018 - 12:29 नवीन
1880 साली 3 - 4 वर्षाचे असलेले जिना व इकबाल रांगत रांगत गेले ब्रिटिशांना बोलले अफगाण वेगळा करा ! असे चित्र डोळ्यापुढे आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अर्धवटराव Tue, 05/08/2018 - 14:22 नवीन
जिना, सावरकर वगैरे मंडळी कुठे, कोणाला भेटल्या मला नाहि माहित. गुजरात इलेक्शनच्यावेळी मणीभाऊ काहितरी बरळला आणि भाजपला निसटता फायदा झाला (हे एक गृहीतक). तसच काहितरी आता होईल अशी शक्यता जाणवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
म
माहितगार Tue, 05/08/2018 - 14:45 नवीन
केवढा हा आशावाद , मणि मणभर बरळू दे , भाजपाचे राज्य येऊ दे !! असेच ना :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 05/08/2018 - 20:57 नवीन
:ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 05/08/2018 - 08:57 नवीन
Senior advocate Kapil Sibal on Tuesday withdrew the petition challenging vice-president and Rajya Sabha chairman Venkaiah's Naidu decision to reject the notice of removal motion against CJI Dipak Misra from the Supreme Court. या वेळेस, न्यायालयाकडून, अजून एकदा थोबाडीत बसण्याअगोदर गाल काढून घेऊन काँग्रेस+ ने, कर्नाटक निवडणुकीकडे पाहत, आपल्या नाटकाचा अजून एक अंक आटपता घेतला ! गेल्या चार-सहा महिन्यांचा आलेख पाहता २०१९ च्या मध्यवर्ती निवडणूकीअगोदर या नाटकाचे अजून किती अंक पहायला लागतील ते सांगता येणार नाही. देशाच्या सगळ्या वैधानिक संस्था-पदांवर विनापुरावा शिंतोडे उडवत बसण्याचे उद्योग करण्याऐवजी, "स्वतःचे चार गुण आणि भविष्यात करायची इच्छा असलेले दोन प्रकल्प" जनतेसमोर मांडले असते तरीसुद्धा जनतेची जराशी सहानुभूती त्यांना मिळाली असती. स्वतःला घटनातज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातले वरीष्ठ वकील म्हणवणार्‍या लोकांचे असे सर्व नियम-पायंडे सोडून चाललेले वर्तन केवळ खुद्द त्यांच्यासाठीच नामुष्कीचे नाही तर त्यांच्या पक्षांची जनमानसातली पत दिवसेदिवस खालीखाली नेत आहे. हे इतक्या विद्वान समजल्या जाणार्‍या मंडळींच्या ध्यानात येत नाही हे अगम्य आहे !!! (कपाळावर हात मारणारी स्मायली) की, सर्वस्वी अगतिक होऊन ते "विनाशकाले... " या न्यायाने सतत असे वागत आहेत ???
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 05/08/2018 - 09:09 नवीन
सहमत.. काही गरज नव्हती एवढे ताणायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ज
जेम्स वांड Tue, 05/08/2018 - 09:36 नवीन
कसलं नीट लिहिलंय काका, आवडलं अन पटलं ही, मणिशंकर पाकिस्तानात अन सिब्बल कोर्टात जबरी काम करत आहेत असेच म्हणावे लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 05/08/2018 - 10:00 नवीन
धाग्यात ताज्याच घडामोडी असाव्यात ही अपेक्षा.! पूर्वी मराठी मंडळी गप्पांना बसली की गप्पांच्या ओघात नेहमी नेहरू/गांधी/आंबेडकर्/सावर्कर्/जिना येत. गप्पांचा शेवट "सगळे गांधींमुळे झाले' म्हणायची पद्धत होती. काळ बदलला पण ढाचा तोच.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 05/08/2018 - 10:07 नवीन
गांधी आडवा येतो .या नावाचे एक नाटक आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माहितगार Tue, 05/08/2018 - 10:08 नवीन
नेहरू/गांधी/आंबेडकर्/सावर्कर्/जिना
सध्या तरी चिरंजिवी आहेत . गौतम बुद्ध अपेक्षांना कमी ठेवले म्हणजे अपेक्षा भंगाचे दुख्ख येण्याची शक्यता कमी होते असे म्हणाले असावेत (चुभूदेघे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बिटाकाका Tue, 05/08/2018 - 11:02 नवीन
युपीएचे पीएम उमेदवार घोषित झाले म्हणायचे काय? https://www.ndtv.com/india-news/why-not-rahul-gandhi-says-ready-to-become-pm-1848869?pfrom=home-topscroll http://www.republicworld.com/india-news/politics/rahul-gandhi-declares-himself-as-the-pm-candidate-says-i-will-be-the-pm
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 05/08/2018 - 11:14 नवीन
काँग्रेस व भाजपा, दोघांचेही उमेद्वार ठरलेलेच आहेत रे बिट्या.'एकमताने निवडीचा' फार्स मग नंतर खेळला जातो. कर्नाटकात पुन्हा कॉंग्रेस सत्तेवर आली तर यशाचे सगळे श्रेय काँग्रेसजन राहूल ह्यास देतील..व बिगर-भाजपा असंतुष्ट पक्ष पुढार्यांना जरा बळ मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
म
माहितगार Tue, 05/08/2018 - 11:43 नवीन
बिटाकाका हे काय ? राहूलनाच युपिएचे उमेदवार करायचे हे आपले मागेच ठरले होते ना ? मग हे माहित नसल्यासारखे काय दाखवताय ? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 05/08/2018 - 12:20 नवीन
मी "घोषित" केले का असं म्हणतोय. काँग्रेस राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याचा मार्ग निवडेल का अशा अर्थाने. नंतर बहुमत आल्यावर करतीलच पण आधी घोषित करून मोदी वि. राहुल गांधी असं रूप आधीपासूनच देतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विशुमित Tue, 05/08/2018 - 14:50 नवीन
माझ्या मते काँग्रेस आणि भाजप ने शहाणे असतील तर दोघांना आप आपल्या पार्टी तर्फे राहुल आणि मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार आधी घोषित करू नये. त्यामुळे काय होऊ शकते -- जनतेच्या आताच्या ट्रेंड नुसार भाजप अल्प मतात येईल आणि त्यांना युतीतील इतर पक्षांची मदतीने खिचडी सरकार चालवावे लागेल, जे मोदींना आता जेवढे सोपे वाटते तेवढे नसणार आहे कारण हे मित्र पक्ष मागचे सगळे हिशोब चुकते करणार. काँग्रेस ची तर काय हालत होईल हे मी सांगायची गरज नाही. याचा सर्वात जास्त फायदा स्थानिक पक्ष उठवणार. ====
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Tue, 05/08/2018 - 17:28 नवीन
भाजप ला घोषित वगैरे करण्याचे काहीच कारण दिसत नाही. भाजपचा सेलिंग पॉइंटच मोदी असल्याकारणाने ते उमेदवार असणे निर्विवाद आहे. कांग्रेसचा सेलिंग पॉईंट राहुल ठरतील का हा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
माहितगार Tue, 05/08/2018 - 15:10 नवीन
मिपाच्या दोन्ही पार्ट्यांना चघळण्यासाठी एक लेटेस्ट ओपीनीयन पोल आला आहे बघा ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
म
मार्मिक गोडसे Tue, 05/08/2018 - 17:27 नवीन
येत्या तीन महिन्यातील आंतरराष्ट्रीय कच्चा तेलाचे भाव ठरवेल प्रधान सेवकांची लोकप्रियता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ज
जेम्स वांड Tue, 05/08/2018 - 12:46 नवीन
व्यवहारात सक्तीने अन अग्रक्रमाने मराठीच वापरा प्रस्तुत निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 05/08/2018 - 16:28 नवीन
जिना वगैरे या विषयावर अकारण अतिरिक्त वेळ घालवण्यापेक्षा राविश कुमारचा प्राईम टाईम मला खुप आवडतो. डायनामिक रल्वेमंत्रीना त्यांच्या कामाचा आरसा दाखवला आहे. https://youtu.be/tEsJgW99rhc
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Tue, 05/08/2018 - 17:24 नवीन
रेलवे का उशिरा येतात याची काही कारणमीमांसा केली आहे का? जर केली असेल तर मग ठरवता येईल ना कि रेल्वे मंत्री यासाठी काय करू शकले असते? ओपन बायस्ड पत्रकारिता करणारे पत्रकार साहेब हवा तसा डेटा वापरण्यात एक्सपर्ट आहेत असे माझे मत नम्रपणे नमूद करू इच्छितो. ---------------------- खाली कोरावर हा प्रश्न टाकण्यात आला होता, एक दोघांनी काही शक्यता आणि कारणे टाकली आहेत. ती पाहता हा प्रॉब्लेम सोडवणे जादूची कांडी फिरवण्यासारखे नसावे असे दिसते. रेल्वेचे काम लगेच दिसणे अवघड आहे, रेल्वे तोट्यात न जाऊ देता बऱ्याच गोष्टी बदलायच्या असल्या कारणाने मी तरी गोयल साहेबांना वेळ घेऊ देणे पसंत करेन. https://www.quora.com/Why-trains-in-UP-and-Bihar-are-running-late-even-if-there-is-no-fog -------------------- या लिंकवर लोकांनी त्यांचे रेल्वेतल्या बदलांबद्दलचे मत नोंदवले आहे. https://www.quora.com/in/Has-Indian-railway-improved
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा