ताज्या घडामोडी - भाग ३२
बातमीत यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असं म्हटलंय.
राष्ट्रपतींच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश नसतो का?
आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार
यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.
💬 प्रतिसाद
(309)
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 08:46
नवीन
<<<रेलवे का उशिरा येतात याची काही कारणमीमांसा केली आहे का? >>
==>> कारणमीमांसा ह्या भागामध्ये दिली नाही हे मला देखील खटकले आहे. पण अजून सेरीस चालवली जाणार आहे ज्या मध्ये इतर राज्यातील रेल्वेच्या कारभाराला आरसा दाखवला जाईल. येणाऱ्या भागात कारणमीमांसा देऊन दुसरी बाजू देखील दाखवलं पाहिजे.
===
<<< जर केली असेल तर मग ठरवता येईल ना कि रेल्वे मंत्री यासाठी काय करू शकले असते?>>
==>> मंत्री महोदयांना कारणमीमांसा माहित नसेल असे शक्य नाही.
===
<<<ओपन बायस्ड पत्रकारिता करणारे पत्रकार साहेब हवा तसा डेटा वापरण्यात एक्सपर्ट आहेत असे माझे मत नम्रपणे नमूद करू इच्छितो.>>>
==>> चला तुमचे मत ग्राह्य धरू पण सिस्टिम/सरकारच्या विरुद्ध आवाज उठवण्याने सामान्य लोकांच्या जीवनात काही चांगला बदल होत असेल तर चांगलेच आहे की. जाऊ द्या बातमीदाराला श्रेय देऊन टाकू, नेहमी खूप उशिरा येणारी रेल्वे बऱ्याच फरकाने लवकर येऊ लागली, काय वाईट आहे यात?
का मंत्री भाजपचा म्हणून पत्रकार बायस्ड असे काही आहे का?
===
<<<खाली कोरावर हा प्रश्न टाकण्यात आला होता, एक दोघांनी काही शक्यता आणि कारणे टाकली आहेत. ती पाहता हा प्रॉब्लेम सोडवणे जादूची कांडी फिरवण्यासारखे नसावे असे दिसते.>>>
==>> QUORA वर लिहणारे बहुदा वातानुकूलित डब्बातून प्रवास करणारे दिसतात.
दोघांचं सगळं मान्य पण पहिल्याने खाली या ओळी लिहल्या आहेत .
And since the traffic run here is a chain like system so if anything happens ,all of them gets affected. Just like if any thing happens to the Rajdhani gang due to signalling problem or late signalling. All the other trains behind them gets severely affected. And since behind this gang runs the Sampoorna Kranti and Poorva Express, so all things these two trains has to suffer. Hence these two trains always gets delayed
"" signalling problem or late signalling "" मंत्री महोदयांनी एवढे जरी सुधारले तरी बराच फरक पडेल.
--
दुसऱ्या नुसार-
Forced inclusions - This makes it difficult for the authorities to run these trains with proper planning. (एवढ्या वर्षांचा अनुभव असून प्रॉपर प्लांनिंग करता येत नाही? अजब आहे)
Shortage of staff: - हा प्रश्न का सतावतोय रेल्वे खात्याला ? भरत्या काढा की म्हणावं. सुशिक्षित बेरोजगार पोटापाण्याला तरी लागतील.
रेल्वे मंत्री यावर काम करू शकतात ना. त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाला आहे.
<<<रेल्वे तोट्यात न जाऊ देता बऱ्याच गोष्टी बदलायच्या असल्या कारणाने मी तरी गोयल साहेबांना वेळ घेऊ देणे पसंत करेन.>>>
==>> ४ वर्ष काय करत होते मग हे खाते? प्रभुनी फक्त ट्विटरवर प्रश्न सोडवायचे काम केले की काय? गुड गव्हर्नन्स कुठे गेले ? (हे आपल्याला प्रश्न नाही आहेत कृपया अंगावर ओढून घेऊ नका )
आता फक्त १ वर्ष राहिले आहे. जे काय कराचे आहे ते एकाच वर्षात करावे लागेल.
===
<<<या लिंकवर लोकांनी त्यांचे रेल्वेतल्या बदलांबद्दलचे मत नोंदवले आहे.>>
==>> १. New Coaches अँड Punctuality बद्दल काय अवस्था आहे हे विडिओ मध्ये दाखवले आहेच.
२. Cleanliness - फक्त वातानुकूलित डब्ब्यात पाहायला मिळतात निळ्या ड्रेस वाले. बायो टॉयलेट्स २०१४ पूर्वीच चालू झाल्या होत्या बसवायला.
त्याची पण दुःखद कहाणी आहे. दुसऱ्या प्रतिसादात लिंक देतो.
३. Stations have improved a lot in terms of display boards, wifi, cleaner toilets, platform expansion. They have also become
more cleaner than before.-- लोकांना वेळेवर आपल्या इच्छित स्थळी पोहचायचे असते, प्लॅटफॉर्म वर संसार मांडायचा नसतो. त्यामुळे आधी
ट्रेन वेळेवर सोडणे/येणे आणि इच्छित स्थळी वेळेवर पोहचणे याला रेल्वे खात्याने जास्त प्राधान्य दिले पाहिजे.
(ST उशिरा आली आणि आत चढल्यावर voot चा डब्बा दिसला की रावतेचा उद्धारच होतो)
४. Services - Ticket booking, SMS, Twitter Responses - ये तो होणा ही था. यात विशेष कौशल्य नाही आहे रेल्वे खात्याचे.
५. Go Green - Paperless टिकेट्स ---ई-मेल च्या खाली Go Green लिहणाऱ्यांचे मला विशेष कौतुक वाटते. त्यांचा एरंडाच्या
फुलांची माळ घालून सत्कार करावा असे नेहमी मनात येते. असो अवांतर आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 08:50
नवीन
http://www.indiaspend.com/cover-story/new-toilets-in-indian-trains-no-better-than-septic-tanks-iit-study-64093
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 05/09/2018 - 10:43
नवीन
प्रत्येकाचे वेगवेगळे प्राधान्य असतात. प्लॅटफॉर्मवर संसार मांडायचा नसतो म्हणून प्लॅटफॉर्म चांगले नको? आणि त्याऐवजी रेल्वे वेळेवर यायला हव्यात? असं नाही ना चालत, प्रत्येक गोष्टीला एक ठराविक महत्व असायला नको का?
-----------------------------------
भारतात किती रेल्वे चालतात, त्यातल्या किती वेळेवर पोहोचतात वगैरेचा कसलंही गणित न घालता काही ठराविक मार्गांवरील रेल्वेच्या वेळापत्रकांची चिरफाड सहेतुक असल्याची शंका आल्याशिवाय राहत नाही. अर्थातच पत्रकारांनी चिरफाड करावीच पण ती करताना काय आणि कुठल्या दिशेला बदललं हे सांगण्याचं टाळणं हेतू दर्शवतं असं मला वाटतं.
------------------------------------
तुलनात्मक मांडणी करणं तर अत्यंत गरजेचं आहे. ह्या अमुक गोष्टी मागच्या सरकारमध्ये अशा होत्या त्या आता अशा सुधारल्या किंवा अशा बिघडल्या हे न सांगता विश्लेषण कसं काय होऊ शकतं? तरच कारभार खराब चालू आहे, सुधारला आहे कि उत्तम चालू आहे हे कळू शकेल ना?
------------------------------------
काही पावले- उपयोगात येतील कि नाही काळ ठरवेल.
https://www.financialexpress.com/infrastructure/railways/say-goodbye-to-late-trains-indian-railways-taking-these-10-steps-to-ensure-punctuality/1092900/
-----------------------------
असो, मंत्री भाजप चे आहेत म्हणून सगळं पाच वर्षात व्हायला पाहिजे असंही व्हायला नको.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 11:54
नवीन
<<<प्रत्येकाचे वेगवेगळे प्राधान्य असतात. प्लॅटफॉर्मवर संसार मांडायचा नसतो म्हणून प्लॅटफॉर्म चांगले नको? आणि त्याऐवजी रेल्वे वेळेवर यायला हव्यात? असं नाही ना चालत, प्रत्येक गोष्टीला एक ठराविक महत्व असायला नको का?>>>
==>> प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असले तरी प्रत्येक प्रवाश्याला एकच कॉमन गोष्ट हवी असते ती म्हणजे ट्रेन वेळेवर येणे आणि वेळेवर पोहचवणे.
फक्त फ्लॅटफॉर्म स्वच्छ ठेवून वायफाय चालवून त्याच्या पदराआड राहून चालणार नाही.
===
<<<भारतात किती रेल्वे चालतात, त्यातल्या किती वेळेवर पोहोचतात वगैरेचा कसलंही गणित न घालता काही ठराविक मार्गांवरील रेल्वेच्या वेळापत्रकांची चिरफाड सहेतुक असल्याची शंका आल्याशिवाय राहत नाही.>>>
==>> आताशी ही सिरीज चालू झाली आहे, पुढे पुढे त्याबाबत पण काही खुलासे होतील. फक्त तुमचा असा दावा तर नाही ना की इतर मार्गांवरती सगळे आलबेल आहे.
===
<<<अर्थातच पत्रकारांनी चिरफाड करावीच पण ती करताना काय आणि कुठल्या दिशेला बदललं हे सांगण्याचं टाळणं हेतू दर्शवतं असं मला वाटतं.>>>
==>> काहीच भरीव बदल झालेला दिसत नाही आहे. जे काही बदलले ते ग्रॅड्युअल चेंज आहे, जे आधीच पाईप लाईन मध्ये होते. (मी गेली ७-८ वर्ष देशातील सर्व मार्गांवरती ट्रेन ने नियमित प्रवास करतोय.)
===
<<<तुलनात्मक मांडणी करणं तर अत्यंत गरजेचं आहे.>>
==>> वस्तुस्थिती समोर आहे आणि तुलनात्मक मांडणी करण्यासाठी विशेष फरक झालेलाच नाही. एकसारख्या दिसणाऱ्या गोष्टींची काय आणि किती तुलना करणार!
===
<<<काही पावले- उपयोगात येतील कि नाही काळ ठरवेल.>>
==>> आता ग्रेडिंग करणार, माहिती संकलित करणार, मग त्यावर विचार करणार, म्हणजे अजून अभ्यासच का ?
===
<<< असो, मंत्री भाजप चे आहेत म्हणून सगळं पाच वर्षात व्हायला पाहिजे असंही व्हायला नको.>>>
==>> भाजप संदर्भातील माझी टिपणी अनावश्यक होती. त्याबद्दल क्षमस्व..!!
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 05/09/2018 - 12:49
नवीन
बदल झालाच नाहीये असा पक्का निर्धार आहे म्हणल्यावर विषयच खुंटतो.
-----------------------------
सगळं आलबेल आहे किंवा काहीच आलबेल नाही अशी दोनच टोकं असू शकत नाहीत. रेल्वेबाबत सगळं आलबेल नाही असा कोणी दावा करत असेल तर तोही धादांत खोटा आहे असे मला वाटते.
-----------------------------
अजून अभ्यासच का ? - अभ्यास न करता गोष्टी मागचे सरकार करत होते. हे सरकार अभ्यासू दिसतेय आणि कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करणे नेहमी चांगलेच असते.
----------------------------
२०१४ आधी किती गाड्या उशिरा चालायच्या, किती वेळ उशिराने चालायच्या, आता किती गाड्या उशिराने चालतात, किती वेळ उशिराने चालतात, आधी एकूण किती गाड्या धावायच्या, आता किती धावतात, आधी किती नवीन भाग प्रत्येक वर्षी रेल्वेने जोडले जायचे, आता किती जोडले जातात, आधी मालगाड्या किती असायच्या, आता किती असतात, आधीची रुळांची स्थिती कशी होती, आता रुळांची स्थिती कशी आहे, आधी किती क्रॉसिंगला रेल्वे फाटक होते, आता किती आहेत, किती ऑटोमेटेड होते/आहेत, किती मानव संचालित होते/आहेत, आधीचा महसूल आणि नफा किती, आता महसूल आणि नफा किती, आधीचे अपघात, आताचे अपघात, आधीच्या सुविधा, आताच्या सुविधा, आधीची सेवा तत्परता, आताची सेवा तत्परता, आधीची सुरक्षितता आताची सुरक्षितता असे अनेक मुद्दे जेव्हा तथ्य आणि आकड्यांवर सिद्ध करता येतील तेव्हा तुलना होऊ शकते.
----------------------------
असे आकडे सध्यातरी माझ्याकडे नसल्यामुळे आणि बिना आकड्यांची कुठली न्यूज सिरीज चालवायची नसल्यामुळे मी थांबतो. त्या सिरीज मध्ये जर काही आकड्यांवर आधारित, किंवा वरील मुद्द्यांवर आधारित तुलना आढळली तर जरूर शेअर करा.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 13:11
नवीन
<<<बदल झालाच नाहीये असा पक्का निर्धार आहे म्हणल्यावर विषयच खुंटतो.>>
==>> बदल ग्रॅड्युअल होत आहे हे मी आधीच नमूद केले आहे.
===
<<<सगळं आलबेल आहे किंवा काहीच आलबेल नाही अशी दोनच टोकं असू शकत नाहीत.>>>
==>> "काही ठराविक मार्गांवरील रेल्वेच्या वेळापत्रकांची चिरफाड सहेतुक" या वाक्य रचनेमुळे मला तसे लिहावे लागले. बाकी सहमत आहे.
===
<<< अभ्यास न करता गोष्टी मागचे सरकार करत होते>>>
==>> याला काही आधार ?
===
<<<हे सरकार अभ्यासू दिसतेय आणि कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करणे नेहमी चांगलेच असते.>>>
==>> नुसते अभ्यासू असून चालत नाही. व्यवहार्य आणि अचूक वेळेत निर्णय घेणे महत्वाचे. ग्रेडिंग करायला एवढा काय अभ्यास लागतो. लॉग बुक काढली तर काही दिवसात सर्व विश्लेषण करता येतील.
<<< त्या सिरीज मध्ये जर काही आकड्यांवर आधारित, किंवा वरील मुद्द्यांवर आधारित तुलना आढळली तर जरूर शेअर करा.>>>
==>> नक्की
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 05/09/2018 - 14:11
नवीन
एखादा निर्णय जसा चूक आणि अव्यवहार्य ठरवायला आधाराची गरज लागत नाही तसेच अभ्यासूपणाचेही आहे. आधीचे सरकार अभ्यासू होते असा आपला दावा असेल तर मग रेल्वेच्या प्रॉब्लेम्सवर त्यांनी काय उपाय (अभ्यास करून?) केले तेही मांडावे लागेल ना. त्यांच्या तथाकथित अभ्यासाने अडचणी दूर झाल्या नाहीत हे वास्तवच आहे.
-----------------------------------
बाकी ते ग्रेडिंगचं लॉजिक फक्त लॉगबुकनुसार वर्गीकरण असं नसावं असं दिसतंय. पुढील काळातील डेटावरून वर्गीकरण करून नॅशनल ट्रान्सपोर्टरला रिपोर्ट करणे आणि त्यानुसार परफॉर्मन्स ठरवणे हा उद्देश असावा असं बातमीवरून दिसतंय. शिवाय इतर अनेक मुद्दे आहेत बातमीत.
------------------------------------
रेल्वेची परिस्थिती गेल्या चार वर्षात बिघडली आहे का हा एक मुद्दा आहे. जर रेल्वेची परिस्थिती खराब आहे असे मत ठेवायचे असेल, आणि वरून चार वर्षात काहीच बदल दिसत नाही म्हणायचे असेल तर २०१४ च्या आधीच्या दहा वर्षात रेल्वे खराबच होती हे ओघाने येतेच. मग काय हेही तसले तेही तसले असे म्हणून आवडत्या पक्षाला सपोर्ट किंवा नावडत्या पक्षाला विरोध करत राहायचं आणि निवडणुकीत तसं मतदान करायचं. हाय काय अन नाय काय! :):)
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 14:36
नवीन
मी आवडत्या नावडत्या पक्षाला विरोध समर्थन दिलेच नाही आहे. उलट तुम्हीच २०१४ च्या पूर्वी आणि आताची तुलनेचा होरा लावला आहे.
मी म्हणत होतो की जिना प्रकरण अधिक चघळण्यापेक्षा जे प्रश्न लोकांना भेडसावत आहेत याबद्दल कोणी पत्रकार विषय मांडत असेल तर काय वावगे आहे?
तो किती बायस्ड वगैरे आहे याच्याशी जास्त देणे घेणे न ठेवले तरी चालू शकले असते. भले त्याने सॅम्पल सेट मध्ये घेतलेल्या फक्त २-३ का ट्रेन असू देत. पण जर मंत्री महोदयांनी त्यावर कृती केली तर त्या २-३ ट्रेननी जाणाऱ्या हजारो प्रवाश्यांचा फायदाच होणार आहे. मागे नाही का मंत्रांना ट्विट केले ते लहान मुलाचे डायपर पण पुरवायचे. त्याची तर बरीच चर्चा होत होती.
====
नाईलाजाने म्हणावे लागते भाजप समर्थकांना निवडणुकांशिवाय बाकी कोणाचे काही पडलेलंच नाही.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 05/09/2018 - 14:49
नवीन
रूळ बदल्याबद्दल, शुभेच्छा. शेवटी कसं कि भाजप समर्थक वगैरे आणलं कि मगच चर्चा थांबवता येते.
---------------------------
ते डायनॅमिक मंत्री, आरसा दाखवणे, काहीच बदल झाले नाही वगैरे वार्यावरच गेलेले दिसतेय. असो, परत एकदा वरपासून खालपर्यंत प्रतिसाद वाचा (वाचावं वाटलं तर) अशी विनंती. आणि ते बायस्ड पत्रकार महोदय दोन-तीन रुटवरून सीरिज चालवून आरसा दाखवणार म्हणे. जरूर दाखवा कि आरसा, पण तथ्यांवर आधारित, नाहीतर लोकांना होणारा त्रास पुढे आणण्यासाठी इतर पत्रकार याची "एक बातमी" देतात.
--------------------------
तुलना न करता अमुक एक चांगले आणि अमुक एक वाईट कसे काय ठरवतात लोक काय जाणे? आम्हाला हे कसब कधी जमायचे ते देवच जाणो.
-------------------------
असो.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 15:12
नवीन
<<<रूळ बदल्याबद्दल, शुभेच्छा. शेवटी कसं कि भाजप समर्थक वगैरे आणलं कि मगच चर्चा थांबवता येते.>>>
==>> रूळ तुम्ही इथे बदलला होता.
"""मग काय हेही तसले तेही तसले असे म्हणून आवडत्या पक्षाला सपोर्ट किंवा नावडत्या पक्षाला विरोध करत राहायचं आणि निवडणुकीत तसं मतदान करायचं. हाय काय अन नाय काय! :):)"""
फक्त मला शुभेच्छा द्यायला उशीर झाला. असो.
बाय द वे शेवटचं वाक्य तुमच्यासाठी नव्हते. तुम्ही भाजप समर्थक आहात का? नसाल तर उगाच अंगावर कशाला ओढून घेताय ?
===
<<<ते डायनॅमिक मंत्री, आरसा दाखवणे, काहीच बदल झाले नाही वगैरे वार्यावरच गेलेले दिसतेय.>>>
==>> दिलेल्या विडिओ मध्ये डायनॅमिक शब्द वापरला गेला म्हणून मंत्रांना आरसा दाखवला असे म्हणालो. यात कुठे बिघडले?
===
<<<आणि ते बायस्ड पत्रकार महोदय दोन-तीन रुटवरून सीरिज चालवून आरसा दाखवणार म्हणे. जरूर दाखवा कि आरसा, पण तथ्यांवर आधारित, नाहीतर लोकांना होणारा त्रास पुढे आणण्यासाठी इतर पत्रकार याची "एक बातमी" देतात.>>>
==>> प्रॉब्लेम इथे आहे. प्रॉब्लेम सांगितला की पत्रकार कसा बायज्ड आहे असे म्हणून वेळ मारून न्यायची. अभ्यास चालू आहे ही तर लय भारी ढाल आहे.
===
<<<तुलना न करता अमुक एक चांगले आणि अमुक एक वाईट कसे काय ठरवतात लोक काय जाणे?>>>
==>> अमुक एक वाईट मी कुठे म्हणालो सांगता का ? मी तुलना जिना प्रकरण आणि रेल्वेच्या समस्या याची केली होती. २०१४ पूर्वीची आणि आताची नव्हे.
===
<<<आम्हाला हे कसब कधी जमायचे ते देवच जाणो.>>
==>> तुम्ही वयक्तिक का होताय ??
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 05/09/2018 - 16:38
नवीन
मी बायस्ड पत्रकाराबद्दल बोलतोय, तुम्ही कशाला लोड घेताय. तुम्ही नाही ना बायस्ड, झालं तर मग.
---------------
तुमच्या वरच्या प्रतिसादाला उत्तर द्यायला किबोर्ड शिवशिवत आहे, पण मूळ मुद्द्याला धरून त्यात काहीच नाहीये. इतरांना इंटरेस्टिंग वाटतील असे मुद्दे तर अजिबातच नाहीयेत. त्यामुळे उगाच शेपूट लांबवत नाही, तुमचं बरुबरंय म्हणतो.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 17:17
नवीन
तुमच्या कडे ना आकडेवारी आहे ना मुद्दे. त्यामुळे डोक्याखाली लोड घेऊन झोपू शकता.
===
राविश कुमार बरोबर च बोलत होता.
ट्रेन ऊशीरा आली म्हणून काय झाले जिना चा विषय चघळायला घेतला तर वेळ कसा गेला समजणार पण नाही.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 05/09/2018 - 17:28
नवीन
ह्याह्यह्या. देशाच्या फाळणीच्या इतिहासाबद्दलचे मुद्दे महत्वाचे नसतात होय, मंग बरुबरंय. तुमची आकडेवारी आणि मुद्दे शोधतो वर वेळ मिळाला की. तेवढी आकडेवारी दिली त्या पत्रकाराने वरच्या माझ्या मुद्द्यांवर तर टाका. लै शुभेच्छा!
--------------
आता थांबतोच.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 17:41
नवीन
मी कुठे म्हणालो फाळणीचे मुद्दे महत्वाचे नाहीत?
===
विडियो मधे बरीच आकडेवारी दिली आहे. मला वाटतय तुम्ही वरवर बघितलेला दिसतोय.
===
तुम्ही थांबत नसता.
===
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 05/08/2018 - 17:30
नवीन
नको नको राष्ट्रपित्याकडे असे दुर्लक्ष करू नका ! :)
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Tue, 05/08/2018 - 18:06
नवीन
'Fake voter' scandal hits Karnataka "
काँग्रेसचा कर्नाटकातील निवडणुका जिंकण्यासाठी आणखी एक डाव !
आताच्या कर्नाटकातील राज्य सरकारने येती निवडणुक जिंकाण्यासाठी बोगस मतदारांची मोठी फळीच निर्माण केलेली असल्याच समोर आलेल आहे. गेल्याच आठवड्यात कित्येक कोटी रुपये नगद, त्याशिवाय दारु, भेट वस्तु निवडणुक आयोगाने जप्त केलेले होते.
एवढ सर्व करुन सुद्धा काँग्रेस निवडणुक हारणार हे नक्कीच !!
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Tue, 05/08/2018 - 18:44
नवीन
पक्षाचा उल्लेख नव्हता
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Tue, 05/08/2018 - 19:15
नवीन
गेल्याच आठवड्यात कित्येक कोटी रुपये नगद, त्याशिवाय दारु, भेट वस्तु निवडणुक आयोगाने जप्त केलेले होते.
निवडणूक आयोग हे सर्व जप्त करून त्याचं नक्की काय करतो ?खासकरून दारू आणि भेटवस्तू.
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 05/09/2018 - 00:40
नवीन
ट्रम्पतात्यांनी ओबामामामांनी इराणशी केलेला करार मोडीत काढून इराणवर पुन्हा निर्बंध लादले आहेत!
https://www.washingtonpost.com/politics/trump-will-announce-plans-to-pull-out-of-iran-nuclear-deal-despite-pleas-from-european-leaders/2018/05/08/4c148252-52ca-11e8-9c91-7dab596e8252_story.html?hpid=hp_hp-banner-main_trumpiranhed-150pm%3Ahomepage%2Fstory&noredirect=on&utm_term=.c925d8978632
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Wed, 05/09/2018 - 07:46
नवीन
हे कवडीचा इतिहास नसणारे लोक परत एखाद्या प्राचीन संस्कृतीचा बट्ट्याबोळ करतील. त्या इस्लामिक स्टेट वाल्या भडव्यांनी आधीच पलमर्या शहर पूर्ण नेस्तनाबूत केले च्यायला लैच वंगाळ होतंय सगळं.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 05/09/2018 - 11:01
नवीन
येणारी पुढची संस्कृती मागच्यला खड्ड्यात घालत असते
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Wed, 05/09/2018 - 13:46
नवीन
लाख मोलाचे लिहिले जेम्स भाऊ
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 05/10/2018 - 12:07
नवीन
इतर समकालीन मेसोपोटेमियन राज्यांप्रमाणे इराण इस्लामिक विचारात आकंठ बुडलेलं नाहीये. आजही नॉर्मल इराणी माणसाला 'इराणी शिया' अगोदर आपल्या 'पर्शियन मुळाचा' सार्थ अभिमान असतो. इतर मुस्लिम झालेल्या राष्ट्रांप्रमाणे यादवी माजल्यावर जुने सांस्कृतिक वारसे नष्ट करण्याचा नातद्रष्टपणा इराणी लोकांनी केला नाही. अगदी खोमेनी प्रणित १९७९च्या 'इस्लामिक क्रांतीत' सुद्धा 'पर्शियन चिन्हे' बऱ्यापैकी सेफ राहिली. आज तेहरान म्युझियम त्यातले कितीतरी नमुने अभिमानाने डिस्प्ले करतं बहुतेक. ह्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे सध्याचा 'इराण एयरचा लोगो' , प्राचीन पर्सेपोलिस शहरात सापडलेला ग्रीफिन हा पर्शियन पुराणात पवित्र मानलेला प्राणी-पक्षी (गरुड मुख सिंह शरीर) ह्यावरून स्फूर्ती घेऊन डिझाईन केलेला आहे.
काही इराणी लोकांसोबत एका प्रकल्पदरम्यान कंपनीत बोलणे चालणे होते अतिशय सुंदर, मनमिळावू अन शांत लोक वाटले होते. त्यांच्यातल्या स्त्रिया सुद्धा फक्त केस झाकण्याचा कायदा पाळत निवांत जीन्स मध्ये वगैरे वावरत असत. हल्लीच झालेल्या लोकशाहीवादी चळवळीत तर त्या कायद्यालाही तिलांजली द्यायला हवी असे एकंदरीत जनमत उभारून आलेले दिसले होते.
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 05/09/2018 - 07:21
नवीन
मल्ल्याच्या तिकडच्या प्रॉपर्टी खरंच विकून त्याला तिकडेपण दिवाळखोर करता आलं तर लै मज्जा येईल!
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/mallya-loses-uk-case-his-england-wales-assets-can-be-sold-by-indian-banks/articleshow/64084497.cms
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 05/10/2018 - 02:05
नवीन
पण प्रत्यकशात घडेल असे वाटत नाही,
म्हणजे मला चावलेला साप आता तुझ्या पायावर बसला आहे , म्हणून तुझ्या पायावर दगड हाणायची मला परमिशन दे , अशापैकी आहे ते,
फारफार तर डॉ. मल्ल्याला ते भारताच्य स्वाधीन करतील,
पेपरात डॉ. मल्ल्या लिहिले आहे. कसला डॉ. आहे हा ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 05/09/2018 - 07:36
नवीन
दिवसरात्र मोदींविरुद्ध ओरडायची इतकी सवय लागली आहे कि नरेंद्र म्हणलं कि पुढे आपोआप मोदीच येत असेल. :):).
https://www.ndtv.com/karnataka-news/siddaramaiah-praises-pm-modi-in-new-karnataka-poll-blooper-1849378?pfrom=home-topscroll
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Wed, 05/09/2018 - 07:48
नवीन
आहेत म्हणे हे सिद्धरामैय्या?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Wed, 05/09/2018 - 08:39
नवीन
https://www.ndtv.com/india-news/oops-amit-shah-just-called-bjps-yeddyurappa-most-corrupt-in-a-slip-1829206
दोन्ही पक्षांना आपला पक्ष कर्नाटकात जिंकू नये असं वाटत असावं.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 08:52
नवीन
ती काय तरी थेरी आहे ना कर्नाटकात सत्ता आली की केंद्रात सत्ता मिळत नाही वगैरे वगैरे...
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Wed, 05/09/2018 - 09:09
नवीन
हो, मागे गुरुजींनी त्यावर लिहिले होते. केंद्रातील सरकारचा स्वतःच्या विकास कामांवर विश्वास नाही का?
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 05/09/2018 - 09:06
नवीन
काश्मिरातल्या दगडफेक करणार्या लोकांनी काश्मिर बघायला गेलेल्या फॅमिलीतील एका मुलाचा बळी घेतला. देगड फेक करणार्या लोकांनी पर्यटकांच्या चार बस वर तुफान दगड फेक केली व त्यात बरीच लोक जखमी झाली व एक तरुणाचा बळी गेला.
ह्या बळी गेलेल्या मुला बद्दल काँग्रेस व कम्युनिस्ट राजकीय पक्षा कडुन , बॉलिवुडच्या बोलणार्या अॅक्टर्स कडुन काडीचीही निंदा झालेली नाही.
आता देशातल्या लोकांनी काश्मिरला जाण्याच बंद केल पाहीजे, तसेच बाहेर देशातुन येणार्या पर्यटकांना सुद्धा काश्मिरला जाऊ न दिल नाही पाहीजे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 09:13
नवीन
<<<आता देशातल्या लोकांनी काश्मिरला जाण्याच बंद केल पाहीजे, तसेच बाहेर देशातुन येणार्या पर्यटकांना सुद्धा काश्मिरला जाऊ न दिल नाही पाहीजे.>>>
==>> पीडीपी-भाजप आणि केंद्र सरकारचं अपयश समजायचं का हे ?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Wed, 05/09/2018 - 09:13
नवीन
आता देशातल्या लोकांनी काश्मिरला जाण्याच बंद केल पाहीजे, तसेच बाहेर देशातुन येणार्या पर्यटकांना सुद्धा काश्मिरला जाऊ न दिल नाही पाहीजे.
टाका ह्यावर एक लेख.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Wed, 05/09/2018 - 12:25
नवीन
इतक्या कमी पैशात, इतक्या लांब लांब अंतरावर, इतक्या प्रचंड प्रमाणावर *प्रवासी अन मालवाहतूक करणे हे जगातल्या तथाकथित टॉप रेल्वेज ने करून दाखवावे मग मानता येईल!.
* कुठल्याही एका क्षणी रेल्वेत बसलेली जनता ग्राह्य धरले तर कैक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आकडा भरतो!
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Wed, 05/09/2018 - 12:50
नवीन
कुठल्याह क्षणी रेल्वेत बसलेली जनता ग्राह्य धरले तर कैक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आकडा भरतो!
खरंय.
रेल्वेचे क्रॉसिंग आणि छोटे मोठे अपघात , जसे रुळावर जनावरे येणे, ह्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडते. अर्थात हेच रेल्वे वेळापत्रक कोलमोडण्याचे एकमेव कारण नाहीये. बाहेर गावच्या गाड्यांमध्ये साखळी ओढून गाडी थांबवण्याचे प्रकार सर्रास चालतात. मुंबईची लोकल क्षमतेपेक्षा चौपट प्रवाशांची वाहतूक करते, तरीही अपघाताचे प्रमाण कमी आहे . परंतू अतिरिक्त भार वाहिल्याने रेल्वे रुळाचे नुकसान होते. मला तरी भारतीय रेल्वे एक आश्चर्यच वाटते.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 05/09/2018 - 13:52
नवीन
कधी नव्हे ते मार्मिक गोडसे यांच्याशी सहमत. खरंच भारतीय रेल्वे हा एक चमत्कार आहे.
-गा.पै.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 05/09/2018 - 13:52
नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-will-be-biggest-party-in-karnataka-predicts-bookie-1676556/
सध्या राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये कर्नाटक निवडणूक कोण जिंकणार यावर चर्चा सुरु असून, सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. कर्नाटक निवडणुकीवरुन सर्व्हे आणि ओपनियन पोलच्या माध्यमातून निकालाचा अंदाज बांधला जात असताना सट्टा बाजारही मागे राहिलेला नाही. कर्नाटकमध्ये अतिशय अटीतटीचा सामना होणार असल्याचा सट्टा बाजाराचा अंदाज आहे. सट्टा बाजारानुसार, भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिल. जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर राहून किंगमेकरची भूमिका निभावण्याची शक्यता आहे.
कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसून, एकट्याच्या बळावर सरकार स्थापन करु शकणार नाही असं सट्टेबाजांचं म्हणणं आहे. सट्टा बाजाराच्या आकडेवारीनुसार, भाजपा ९२ ते ९४ जागांवर विजयी होईल. तर काँग्रेस ३२ ते ३४ जागा मिळवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जेडीएस ३२ ते ३४ जागा आपल्या नावे करु शकतं. कर्नाटकात २२४ जागांसाठी निवडणूक असून, बहुमतासाठी ११३ जागांची गरज आहे.
एका बुकीने दिलेल्या माहितीनुसार, जर एखादी व्यक्ती भाजपाच्या ९२ जागा जिंकण्यावर १ लाख रुपये लावत असेल आणि भाजपाला ९२ किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर पैसे लावणाऱ्या व्यक्तीला एक लाखाच्या बदली दोन लाख रुपये मिळतील. पण जर भाजपा ९३ किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर जिंकली तर पराभव होईल आणि त्याला काहीच मिळणार नाही.
--------------------------------------------
मोदींसारखे कणखर नेत्रुत्व असुनही सट्टा सुरुच आहे का?
सट्टेवाले जीएस्टी , आय टी भरतात का ?
मोदीजी ह्याना पकडत का नाहीत ?
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 05/09/2018 - 14:25
नवीन
सट्टा भारतात वैध आहे कि अवैध?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 05/09/2018 - 14:33
नवीन
सटटा लीगल असता तर सरकारनेच लोटरीसारखी तिकिटे छापली असती की,
http://www.onlinegambling.co.in/legal-forms-of-gambling-in-india/
सरकारमान्य सट्टा केंद्रही निघाले असले की ,
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 05/09/2018 - 14:37
नवीन
काय झाले असते आणि काय झाले नसते हा मुद्दा नाहीये. सट्टा याबाबतीत कायद्यात स्पष्ट तरतुदी आहेत का? सट्टा लावणे, सट्टा चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे का यावर प्रकाश टाकावा. कि वैधही नाही आणि अवैधही नाही?
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 05/09/2018 - 15:45
नवीन
सुजाण नागरीक हे देशाच कान व डोळे असतात, सुजाण नागरीकांच कर्तव्य आहे की काही असंवैधानीक बेकायदेशीर घटना होत असतील तर त्याची माहीती संबंधीत सरकारी खात्याला द्यायची.
मोदींसारखे कणखर नेत्रुत्व असुनही सट्टा सुरुच आहे का?
कारण तुमच्या सारखे नागरीक ह्या देशात आहेत, सत्तेच्या निवडणुकीवर चालणार्या सट्ट्यावर तुम्हाला स्वतःला ईतकी माहीती असताना सरकारला ती माहीती का दिली नाही ? माहिती दिली असती तर सट्टॅबाज पकडले गेले असते, असेही ह्या निवडणुकां दरम्यान कर्नाटकात
व्होटरसाठी वाटायला आलेला बराच पैसा , दारु, भेट वस्तु पकडल्या गेल्यात.
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 05/09/2018 - 15:53
नवीन
पेपरात छापून आले आहे.
आता तुम्हालाही ते माहीत आहे , तर तुम्ही ते पोलिसांना सांगून बंद करा अन तुमचे राष्ट्रप्रेम सिद्ध करा .
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 05/09/2018 - 18:41
नवीन
माझ्या आधी तुम्हाला माहित होत ना मग का तोंडात मीठाची गुळणी धरलेली ?
सगळी कडे गरळ ओकताना काही वाटत नाही ?
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
गुरुवार, 05/10/2018 - 00:22
नवीन
तुमचया आधी किती लोकांना माहिती होती , हे बघत बसणार ?
आता तुम्हाला माहीत झाले ना , जा पोलिसात अन घ्या action .
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 05/09/2018 - 15:24
नवीन
बंगळूरूतील राज राजेश्वरी नगरमधील जलाहल्ली भागात बुधवारी सकाळी ज्या फ्लॅटमध्ये बनावट निवडणूक ओळखपत्रे आढळून आली होती. तो फ्लॅट भाजपाच्या माजी नगरसेविकेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच काँग्रेसने या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याने भाजापाच्या अडचणी वाढल्या आहेत.
किती गलीच्छ !
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-would-faces-problems-in-fake-election-identification-card-case-1676664/
- Log in or register to post comments
ब
बिटाकाका
Wed, 05/09/2018 - 17:22
नवीन
अरारारा, लै घाई!
१. बाई राजकारणात २००२ पर्यंत होत्या म्हणे. त्यांच्याच म्हणण्यानुसार त्या आता सक्रिय राजकारणात नाहीत. भाजपच्या पाठिंब्यावर गृहिणीची नगरसेवक झाले, म्हणून भाजप विचारसरणीला त्यांचा पाठिंबा आहे.
२. काँग्रेस म्हणतंय तसं फ्लॅट तिचा मुलगा राकेशला, जो भाजपच्या तिकिटावर २०१५ ला निवडणूक लढला होता, त्याला भाड्याने दिला नव्हता.
३. मुळात या बाईंचा एकुलता एक मुलगा म्हणतोय की राकेश या बाईंचा मुलगाच नाही. तो बाईंच्या पुतण्याचा मुलगा आहे. आणि त्याचा त्या फ्लॅटशी काहीही संबंध नाही.
४. हा फ्लॅट गेल्या महिन्यापासून रंगराजू आणि रेखा या जोडप्याला दिला असून त्यांनी तो ऑफिसची सामग्री ठेवण्यासाठी भाड्याने घेतला होता.
५. आता हे जोडपं काँग्रेस कि भाजप कि आणखी कोणाचं निघतंय तवर वाट बघावं लागंल की मंगुसाहेब. मंग कळतंय कुणाचं गलिच्छ राजकारण ते.
६. तसंही भाजपचे लोक त्या फ्लॅटमध्ये प्रचाराला तिथे गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. भाजपने स्वतःचाच वोटर कार्ड वापराचा प्लॅन फेल केला म्हणायचा :):).
- Log in or register to post comments
M
manguu@mail.com
Wed, 05/09/2018 - 18:28
नवीन
कुणाचेही असले तरी गंदे politics च
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 18:40
नवीन
राजकारण गलिच्छ वगैरे काही नसते.
इलेक्शनला प्रत्येक उमेदवारने फक्त अलर्ट राहायचं असते.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Wed, 05/09/2018 - 18:41
नवीन
राजकारण गलिच्छ वगैरे काही नसते.
इलेक्शनला प्रत्येक उमेदवारने फक्त अलर्ट राहायचं असते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 05/10/2018 - 08:30
नवीन
( बाकी वरीच चर्चेचा काँटेक्स्ट जरावेळ बाजूला ठेऊन ) या वाक्या साठी जयजयकार कोणत्या राष्ट्रपित्याचा कराय राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय !! म्हणावे ? कि, राष्ट्रपिता जीना की जय !! म्हणावे ?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- ›
- »