Skip to main content

उत्तुंगतेचा प्रवास...||२||

लेखक यांनी शुक्रवार, 17/03/2017 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटेचे चार वाजले मी आणि माझा मित्र घड्याळाच्या गजराने उठलो रोजचे सोपस्कार उरकून,रूम च्या बाहेर आलो,अजून बाहेर पहाटेचा अंधार आणि हवेत आल्हाददायक गारवा होता बाहेर पडल्यावर ढाबा वजा हॉटेल वर सकाळचा चहा घेतला आणि त्याच धाब्यावर रुपये 20 प्रति काठी ह्या दराने मी व मित्राने 2 काठ्या घेतल्या,कि जेणे करून आमचं ट्रेकिंग सोपं होईल आता आम्ही ओम नमः शिवाय म्हणत,तृतीय केदार असलेल्या तुंगनाथ आणि चंद्राशीला ट्रेक ला सुरवात केली घनदाट जंगला मधून जाणारा तो रस्ता फारच सुंदर होता,तुंगनाथ मंदिरा पर्यंत चा रास्ता उत्तराखण्ड सरकारने सिमेंट चा बनवुन यात्रेकरूंची चांगली सोय केली आहे , आज पर्यंत एवढ्या सुंदर रस्त

कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....

लेखक परशु सोंडगे यांनी शुक्रवार, 17/03/2017 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!! चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची . "सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा. थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? " धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ." रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला.

टकटक

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 17/03/2017 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
"मी पोलिसांना फोन करीन, असा माझ्या मागे का येतोय?" अचानक माधवी संतापून मागे वळत म्हणाली. तिने एक हाक दिली असती किंबहुना किंचाळली असती तरी आजूबाजूच्या बिल्डींगमधले कोणी ना कोणी पळत आले असते. तिचा स्वर कापत होता मात्र ती ठाम दिसत होती. "न..नाय वो म्याडम, मी घराकडं निघालोय.." तो गुटखा खाणाऱ्या पोऱ्या या अनपेक्षित हल्ल्यानं बावचळून गेला. मोबाईलवर वाजणारं "भीगे होंट तेरे.." नामक गाणं त्यानं घाईघाईनं बंद केलं. "मी तसला नाय वो" काकुळतिला येऊन तो म्हणाला. एव्हाना त्याला घामही फुटला होता. "चालता हो इथून आधी" तप्त सुरात माधवी म्हणाली. गेले बरेच दिवस तो पुलाखालच्या टपरीवर उभा असलेला तिला दिसायचा.

दृष्टीकोन

लेखक संदीप-लेले यांनी गुरुवार, 16/03/2017 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
नेत्रभिंग बसवले नवीन, पण कोन तोच दृष्टीचा, वैद्यकीय प्रगती अफाट, उपयोग काय हो त्याचा ! लांबले आयुष्यमान, भर शून्य कर्तुत्वाचा, तगले जीव अनेक, उपयोग काय हो त्याचा ! जल, रस्ते, हवाई मार्गे, आक्रसला भूगोल जगाचा, वेळ नाही घरी थांबायाला, उपयोग काय हो त्याचा ! वसविली आडवी नगरे, गाठला कळस उंचीचा, निसर्ग नाहीसा केला, उपयोग काय हो त्याचा ! लडबडला, मग गडबडला, भाव अहो तेलाचा, अर्थशास्त्रात खुलासे अनेक, उपयोग काय हो त्याचा ! महागाई आली गेली, झगडा चालूच आयुष्याचा, सुगी जगाच्या बाजारी, उपयोग काय हो त्याचा ! उपसुनी खनिजं बेसुमार, गल्ला भरती बाजाराचा, मिटे ना दारिद्र्यरेषा, उपयोग काय हो त्याचा ! खुळखु

एका बोक्याची गोष्ट - भाग ४

लेखक निलम बुचडे यांनी गुरुवार, 16/03/2017 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
एका बोक्याची गोष्ट - भाग ४ हा भाग समजण्यासाठी मी आमच्या मांजरांची वंशावळ देत आहे. ****वंशावळ क्रमांक १ **** १. आमचा बोका - त्याचे नाव "बाबू" पांढरा रंग पण मानेवर पाठीवर केशरी आणि शेपटी केशरी. २.

होऊन आज सूर्य (गझल)

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी गुरुवार, 16/03/2017 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी माझ्या पराभवाची चिंता तुला कशाला झेलुन वार सारे मस्तीत गायलो मी केला किती तयांनी जन्मांतरी दगा तो त्यांनाच गोडव्याचे हे दान द्यायलो मी युद्धात दुःखितांच्या योद्धा कठोर होतो भेटुन सज्जनांना अश्रुंत न्हायलो मी बांधुन ठोकताळे जोखु नको मला तू ते घास विस्तवाचे आजन्म घ्यायलो मी पर्वा जरी नसे ती उन्मत्त भामट्यांची बोलास लाघवाच्या किंचित भ्यायलो मी जातो आहे किनारा तो गूढ लांब आता नौकेत या कळेणा नि काय न्यायलो मी? - शार्दुल हातोळकर
काव्यरस

माझ्या कवितेची शाई

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 16/03/2017 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कवितेची शाई आहे अजब मिश्रण भस्म अधुऱ्या स्वप्नांचे त्यात अश्रुंचे शिंपण कधी माझ्या कवितेचा शब्द निनादे आभाळी कधी धरती विंधतो कधी गुंजतो पाताळी कवितेची ओळ माझ्या कधी फुलांनी वाकते कधी बोलता बोलता गहनाशी झोंबी घेते माझ्या कवितेत जेव्हा फुंकीन मी प्राण नवा तेव्हा तुम्हा रसिकांचा पाठीवरी हात हवा
काव्यरस

जाऊ शकते-तीच जात!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 16/03/2017 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
म. टा. व्रुत्ता प्रमाणे एक नवीन कायदा येतोय.. 'अंतर्जातीय विवाहितांच्या संरक्षणाचा'. सदर कायदा हा आमच्या मते अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे. https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17310118_1814617218860381_2113214286324950828_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dd09ddc726cae9ec913d2f3f4c972085&oe=59586BDB पण.....

शून्य....

लेखक यांनी गुरुवार, 16/03/2017 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा एकदा विरुनी जावे वाटते शून्यातले शून्य पण अनुभवावे वाटते शून्य व्हावी आज काया, शून्य व्हावेत पंचप्राण विरुनी जावेत जड देहातील पंचभुंतांचे भासमान गळून जावेत पंचकोश,अन गळून जावा हा अहंकार त्यातूनच होऊ दे पुन्हा नादब्रह्मचा ओंकार नाद शून्य होऊन जाऊदेत गुंतलेले हे भावनिक इंद्रजाल रिक्त होऊ दे पुन्हा इच्छांनी ओथंबून भरलेले माठ शून्यातले शून्य विश्व आज पुन्हा जगून पाहू दे शून्य असलेल्या मनाची शून्य भावना अनुभवू दे नष्ट व्हावे द्वैत सारे ,आज अद्वैत भरुनी उरुदे भस्म होऊनि उरलेल्या राखे प्रमाणे शाश्वत असुदे विखुरलेले ब्रम्हांड सारे आज विलीन होउदे आज पुन्हा अंधाराला शून्य होऊन राहूदे
काव्यरस