चाळ नावाची वाचाळ संस्कृती
कॅनडामध्ये आल्यापासून भारतातल्या कित्येकतरी गोष्टी मिस करत आहे. सर्वात महत्वाची म्हणजे आमची मुंबई आणि त्या मुंबईमधली चाळ . चाळ म्हटलं की लोकांच्या अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. काय करणार आपण त्याला?? कारण बिल्डिंग म्हटलं कि मला पाहिलं आठवतात ती बंद दार आणि त्या बंद दारामध्ये नसलेला शेजारधर्म . कदाचित मी चुकीचा असेन, कदाचित म्हणून काय चुकीचाच असेन.कारण आमच्या जन्मापासूनच आतापर्यंतच आयुष्य ह्या चाळीतच घडल आहे .आम्ही कधी बिल्डिंग मधल आयुष्य अनुभवलं नसेल म्हणूनच ही मत बनली असतील. तसचं काहीस बाकी लोकांच असेल ज्यांनी कधी चाळीतल जीवन पाहिलं नाही त्यांच्या मनात काही गैरसमजुती असतील .
R2T (भाग १)
(नमस्कार मिपाकरांनो ! __/\__
अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकेतल्या 'ललितलेखनानंतर' सार्वजनिक लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. सांभाळून घ्याओ)
अनेक वेळा ठरून सुद्धा राजगड ते तोरणा ट्रेक काही मूर्त स्वरूप घेत नव्हता. राजगड आणि तोरण्याच्या अनेक वाऱ्या झाल्या होत्या पण R2T खुणावत होता. शेवटी हो-नाही करत ४ टाळकी जमली. मी, मयूर आणि २ भूषणस. पुण्यातून निघावयास शुक्रवारी रात्री १० वाजलेच. गडावर जात असल्यामुळे, शिवापुर् जवळ इतरांचा सामिष खावयायचा डाव हाणून पाडून चना मसाला चापून मार्गस्थ झालो. एव्हाना १२ वाजलेच होते. गुंजवणे गावात पोचायला अमंळ उशीरच झाला.
विसरभोळा
[ओ. हेन्री यांच्या 'द रोमान्स ऑफ द बिझी ब्रोकर' वर आधारित]
हार्वे मॅक्सवेल एक यशस्वी शेअर ब्रोकर होते. पीचर त्याच्या कार्यालयात स्वीय स्वचिवाचे काम करत होता. तो गुरूवारचा दिवस होता. सकाळी साडेनउला मॅक्सवेल नेहेमीप्रमाणे घाईघाईने आपल्या स्टेनोबरोबर ऑफिसमधे आले. स्टेनोचा बदललेला आविर्भाव बघून एरवी मख्ख असणार्या पीचरच्या चेहर्यावर एक क्षण आश्चर्याचे भाव नकळत उमटले. एका क्षणार्धात "गुड मॉर्निंग, पीचर" म्हणत मॅक्सवेल चित्त्याच्या चपळाईने आपल्या टेबलाकडे झेपावले. ग्राहकांची पत्रे आणि तारा यांचा एक मोठा ढीगच त्यांची वाट बघत होता. स्टेनो आपला रिवाज सोडून अजूनही मालकिणीच्या रूबाबात वावरत होती.
घे उत्तुंग भरारी,
घे उत्तुंग भरारी,दाही दिशा मोकळ्या आहेत
भिऊ नकोस डगमगू नकोस,अनंत वाट खुल्या आहेत
रस्ते बंद आहेत म्हणून, चालायचे तू थांबू नकोस
नवीन रस्ता शोधण्याचा, प्रयन्त मात्र सोडू नकोस
एका जागी थांबून, तुला कोणी काही देणार नाही
हात हलवल्याशिवाय, घास तोंडात जात नाही
सुरुवातीच्या अपयशानंतर हि, पुढे उज्वल यश आहे
दाट अंधारानंतरही, पुढे तेजस्वी प्रकाश आहे
चढ उतार,सुख दुख: तर जीवनात येतच असतात
इथे समर्थपणे लढनारेच, यशस्वी होत असतात
ओढ तुझी
अद्रुश्य भावनांचे,
अस्तित्व जाणवावे.
विसरुनी या जगाला,
तुजला मिठीत घ्यावे.
स्पंदनांनी ही मग,
वेगळे नसावे.
असल्या एका क्षणाचे,
मी काय मोल द्यावे.
असता जवळ तूची,
इतरत्र क्षुद्र आहे.
बिन तू चातक हा मी,
तव-वृष्टी वाट पाहे.
आठवणी तुझ्याच,
एकेक गोड आहे.
या कोरड्या निशांना,
तुझीच ओढ आहे.
<अवाक्षर>
कोणालाही न पटणार्या, पण लिहीलेल्या लेखांची ही स्टोरी. न पटता (किंवा पटण्याची शक्यता नसताना) ते कशाला लिहीले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. ते पटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा प्रतिसादतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायचं नाही.... फक्त लिहायचं.
लेखनाचा उद्देश ठाऊक नाही पण लिहायचं,... वेड्यासारखं लिहायचं.
आजूबाजूच्या मिपाकरांना जुमानतंय कोण?
शब्दाशब्दातून 'मी'पण त्यात लॉजिक कुठले बोंबलायला ?
आपलंच मिपा म्हटल्यावर झक मारत वाचणारच आणि लोकं चुका काढतायत म्हटल्यावर आपलंच खरं न करून सांगतोय कुणाला?
अरे एक सांगायच राहिलं, अतार्किक लिहायच....फार मजा येते.
मस्कत कट्टा - दोघांचाच पण दिलखुलास..
नमस्कार मंडळी,
कामानिमित्ताने कुठे कुठे फिरणं होत असतं हे तुम्हाला माहिती आहेच, असाच उडतउडत इकडे मस्कतमधे आठवडाभर येउन पडलो, एक दिवस इकडे जरा स्थिरस्थावर होण्यात गेला, मग नेहेमीप्रमाणे इथे पहायला काय आहे, फिरायला काही आहे का वगैरे शोध चालू झाला, फेसबूकावर ज्योतीतैशी गप्पा मारता मारता, तिने सांगीतले आपले मिपाकर प्रभाकर पेठकरकाका तिकडेच असतात, जमलं तर भेट.
काकबन
एका काकबनात असंख्य कावळे नांदत होते. वेगवेगळ्या मतप्रवाहाचे थवे होते त्या काकबनात. पत्येक थवा आपापल्या मतप्रवाहांवर ठाम होता. त्या मतप्रवाहांमधली विवीधता त्या काकबनाचे वैषिठ्य होते. अनेक नविन कावळे त्या बनात येऊन आनंदाने विहार करायचे. बरेच कावळे त्या काकबनात असलेल्या थव्यांना बिचकूनही असायचे. कारण हे थवे कधी कधी झुंडीने काही वेगळेपणा दाखवणार्या कावळ्यांवर तुटून पडायचे. त्या काकबनाच्या इतिहासात असे बरेच वेगळे असणारे कावळे हार मानून काकबन कायमचे सोडून निघून गेले होते. त्यात त्या काकबनाचेच नुकसान झाले. पण हे त्या थवे करुन रहणार्या कावळ्यांच्या कधी लक्षात आलेच नाही.
मिसळपाव
***