Skip to main content

कविता

त्यांचाच जीव घे तू ..

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 21/04/2013 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांचाच जीव घे तू ..... हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता मातीत राबताना इतके कळून आले फुकटात ठोस जखमा!

स्वप्नांची शाळा

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 21/04/2013 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांच्या शाळेत झालो मी भरती ,झालो ससाणा पोचलो ढगा वरती, दिसला ससा धरती वरी ,झेप घेतली त्यावरी, ससा झाला कावरा बावरा,माझा झाला बैजूबावरा , घेऊ लागलो तान-लकेर ,क्षणात झालो मी फकिर , दुसऱ्या क्षणी होतो मी राजा,वाजू लागला सनई-बाजा, झालो मी राजाचा रंक ,कधी झालो येसाजी कंक , आला हाती दाणपट्टा माझ्या ,चिरू लागलो ताज्या भाज्या, मौजेची ती स्वप्ने पडती ,स्वप्नात माझ्या झाडे उडती, गजर झाला जाग मला आली ,स्वप्नांच्या शाळेची सुट्टी झाली .
काव्यरस

मेळ घाट

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 20/04/2013 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
अजुनी आठविते भय रात्र मज ती,कोणी न्हवते अवती भवती, त्यातून बिबट्याची डरकाळी ,मेळ घाटातली ती रात्र काळी, रान गव्यांचे हुंकार भिवविती ;वानरांचे चित्कार घुमती, हरीणांचे बिथरून पळणे ,रस्त्यांची ती अद्भुत वळणे, पहाट होता किलबिल होते,मनावरचे दडपण जाते, पहाट किती रम्य वाटते,झाड -फुलांना शोभा येते, भयाची जागा हुशारी घेते,निसर्ग त्याला साथ देते.
काव्यरस

सुप्रभात -

लेखक विदेश यांनी शनिवार, 20/04/2013 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ झाली हो चहाची सूर्य सांगे तो पहा कोंबडाही साद घाली स्मरण द्याया तो पहा पाखरे घेण्या भरारी आळसाला झटकती छान वाटे गार वारा झोंबणारा तो पहा वर्दळीला जाग आली चालली रस्त्यावरी श्वान भुंके आणि सांगे मीहि जागा तो पहा दूध पिशव्या लागल्या की लोंबण्या दारावरी स्वच्छता मोहीमवाला शीळ घाली तो पहा छान सजली आज दारी नक्षिची रंगावली पाहुणाही थबकला का पाहण्याला तो पहा .
काव्यरस

भुलैया

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 18/04/2013 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
मन धावे....... मन धावे...... पालवी नवी अंगावरती ओलावे... ओठात नवे जीवनगाणे.. वाटे गावे... मन धावे... मोकळ्या दिशा आकाश कडेवरती,.. वाकुन बोलावे ओणवे मेघ मल्हार कधी अमृत घन पान्हावे... साकेत अंगणी पुष्करिणीसह दान पसा पावे... मन धावे... साधार कल्पना स्वप्न अकल्पित दावे... जे काय हवे ते हृदयी भावे..... संकेत संगमी, रंजन संगर भुलवे... मन धावे...... मन धावे..... .....................अज्ञात
काव्यरस

असही तसही....

लेखक निश यांनी बुधवार, 17/04/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी दाढी करता करता टिव्ही चालु केला बातम्या होत्या लागल्या भीषण दुष्काळाच्या फार फार वाईट वाटल ते बघुन बेसिनचा नळ मात्र माझा ओकत होता पाणी बदाबदा भरभरुन. दुपारी जेवताना परत टिव्ही लावला बातमी होती लागली अन्न पाण्यावाचुन मरणार्‍या जनावरांची. मी परत ऐकदा ह्ळहळलो ते बघुन अन मी उठलो ताटात जास्त झालेल अन्न टाकायला कचर्‍याच्या डब्ब्यात. रस्त्यातुन जाताना मोबाईल वर फेसबुक पहात होतो. मित्राने कुपोषित मुलाचा फोटो पाठवला होता लाईक करायला. मनात परत ऐकदा दुखावलो, मित्राला मनातल्या मनात शिव्या दिल्या. फोटो कसला पाठवतो लाईक करायला , त्यापेक्षा त्या मुलाना मदत द्यायला हवी त्यानें. मी मात्र हाकलल त्या

आई

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 17/04/2013 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
आयुषभर कष्ट करुन जिने तुला वाढवल । आयुष्याच्या संध्याकाळी तिलाच तू रडवल॥ध्रु॥ चिऊचा काऊचा घास करुन, जिने तुला भरवल । कड्या खांद्यावर घेऊन तुला, गावभर फिरवल । माझा बाळ्,माझा सोन्या म्हणून, गावभर मिरवल । नऊ महिने तुला आपल्या उदरी वाढवल...॥१॥ अनंत कळा सहन करून, तुला हे जग दाखवल । चिमुकल्या बोटला धरुन, चालायला शिखवल । खोकला येताच तुला, मधाच बोट चाखवल । तळहाताच्या फोडप्रमाणे जिने तुला वाढवल...॥२॥ तुझ्यासाठी तिने आपल, रक्त आटवल । शिक्षणासाठी तुला, चांगल्या शाळेत पाठवल । जीवनभराच दु:ख , आपल्या पोटात साठवल । स्वतःच्या स्वप्नांना तिने पायदळी तुडवल...॥३॥ सगळेच काय अगदी, श्रावण किंवा पुंडलीक नसतात। ज

हुंकार

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 15/04/2013 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
नि:शब्द शब्द, हुंकार मनाचे ओले किनारे, खार्‍या पाण्याचे काळजाचा साचा, उघडून वाचा श्वास बाळाचे, ध्यास मायेचे वळणांचा घाट, वारा मोकाट सारे सारे कांही, होते आट पाट आलेली पहाट, पावलांची वाट आईची सय करते, साय घनदाट ...........................अज्ञात
काव्यरस

॥ अज्ञान ॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 14/04/2013 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
तिर्थयात्रा सर्व करुन आली । परी देवाची भेट नाही झाली । वेळ आणि अर्थिक वाया गेली । व्यर्थ तुझी ही काया झिजवली । देव नाही हो कुठे तिर्थस्थानी । जेथे जावे तेथे धोंडा-पाणी । धंदा मांडला तेथे पुजार्‍यांनी । पावतीविना सोडिना आत कोणी । देवा नाही हो गिरी कपारीत । तो आहे आपल्याच ह्रुदयात । शोधा त्याला आपुल्याच घरात । आईवडिलांच्या शुध्द स्वरुपात । आला आजार भगताकडे गेला । लिंबू देऊन चमत्कार केला । राख ताबीत घेऊन घरी आला । काय म्हणावे ह्या अज्ञानाला । अस्वलाच्या एका केसावरी । म्हणे सामर्थ्य आहे तेथे भारी । ते अस्वल असते त्याच्या करी । मग तो का हिंडतो दारोदारी । कोणी काढती फुले हातातुन । कोणी काढती स

वृक्षारव

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 12/04/2013 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाचोळा माझाच पेटला झळा लागुनी दग्ध विशाखा अंगावर जळली पाने पण आत अबाधित बहर अनोखा ना सूडाचा लेश तसूही ना रिपुकांचा जंगम विळखा डाव मांडला ऋतुचक्राचा ना कोणी मज आपला परका कुणी न माझा असो तरीही "मी" माझ्यातिल उत्कट झोका पवनाचे हुंकार झेलतो जरी कधी असतो तो धोका .........................अज्ञात
काव्यरस