Skip to main content

कविता

जगणे असेच का असते?

लेखक निश यांनी गुरुवार, 15/03/2012 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे असेच का असते? जगता जगता मरायचे असते. जगण्याकरिता लढणे असेच का असते? लढता लढता हरायचे असते. जगण्यातले सुख असेच का असते? सुखाचि वाट बघता बघता दु:ख भोगायचे असते. जगण्यातली आशा अशीच का असते? आशेवर जगताना निराश व्हायचे असते. जगणे हे स्वप्नासारखे का असते ? सत्यात येता येता मोडुन ते पडते. खरच जगण हे एक कोड असते. ऊत्तर सापडल अस वाटत असताना नव कोड देउन ते शोधण्यात संपायचे असते.

जोवरी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 15/03/2012 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
सागराच्या तळाशी किती रत्नराशी जगाच्या नकाशाशी झुंझतो शशी मानवाची स्थिती वादळे संगती मरणबाजार अवघा लढे पावसाशी जात जातीत भेदे कुणी क्षूद्र वंशी कळे ना कसे तो तयाचाच अंशी बिचारे विचारांचे क्षेत्र कोरडे स्नेह जाळून आळवे ती प्रार्थना कशी यातना ही खरी अंत तो तूच आहे पसारा दिगंत खंत पामरास दाहे जगावे उरावे जिणे तोषवावे जपावे झरे जोवरी श्वास वाहे ............................अज्ञात

अजि ये प्रोभाते - आज पहाटे रविकर आला

लेखक यकु यांनी गुरुवार, 15/03/2012 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
कवी मग तो कुठलाही असो, त्याच्यात ऋषि बनण्याची संभाव्यता असते. कारण मनाच्या एका विशिष्‍ट अवस्‍थेत त्याला जे झप्पकन दिसून जातं ते तेवढ्याच झगझगीतपणे व्यक्त होणार्‍या शब्दांत बांधण्याचे कसब कवीकडे असते. ऋषिलाही ते दिसत असते; पण त्याला कविता करण्‍याची गरज पडत नाही कारण ऋषिने पाहिलेले आणि समोर मांडलेले 'सत्य' असते. म्हणून ऋषिच्या वाणीला धर्मग्रंथांत स्‍थान मिळते. कवीची अवस्था मात्र जाणीवेच्या दृष्‍टीने काहीशी खालची मानली जाते कारण कवी सत्य आणि सामान्यत: जग जसे असते त्यातील सीमारेषेचे सतत अतिक्रमण करीत असतो.

आज कुणी का राम व्हावे

लेखक सांजसंध्या यांनी बुधवार, 14/03/2012 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
कलियुगाचे वायदे नि, कायदे ही फोल सारे गीता वचने खरी इथे ना, शपथांना दे, मोल ना रे ........||धृ|| मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|१| शापित जरी त्या आणाभाका, जपले बंधही सरणाने करार नामे अती जाहले, पाळले ना मरणाने शिळा बनावे, कसे कुणी ..ना, राम स्पर्शितो चरणाने आज कुणी का राम व्हावे, भरत इथे निर्मळ ना रे......... |२| - संध्या
काव्यरस

प्रेमात ''हे'' -असच असतं ;-)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 14/03/2012 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/21009# मी आणी ती पोहोत होतो ती आणी मी पोहोत होतो पोहता पोहता येकदम डुबुक :-p होइल असं वाटलच नव्हत खरच पोहोताना हे असच होतं ;-) मी आणी ती लोळत होतो ती आणी मी लोळत होतो लोळता लोळता येकदम बुदुक :-p होइल असं वाटलच नव्हत खर्रच लोळताना---हे--असच होतं ;-) मी तीच्या घरी जायचो ती माझ्या घरी यायची येता जाता एक दिवस तिचा बाप (मला) धरेल असं वाटलंच नव्हतं खरच(?) प्रेमात हे-असच असतं...?
काव्यरस

रेशमी सलवार कुडता जाळीचा

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 13/03/2012 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
मुलगा: रेशमी सलवार कुडता जाळीचा | रूप सह्य न, नखराही कमालीचा || मुलगी: जा रे पिच्छा सोड मज मतवालीचा | का रे रस्ता शोधतोसी चौकीचा || धृ || मुलगा: पाहे जेव्हा तुला मी | फुलझड्या अंतरी झडती || मी करेन पिच्छा, पडल्या | जरी हातकड्याही हाती | पाड काय चौकीचा || १ || मुलगी: आहे घरंदाज मी नारी | मला समज न असली तसली || बड्याबड्यांची केली | मी आहे ऐशी तैशी | तू कुण्या गणतीचा || २ || ही कविता माझी नाही. मात्र, हा आविष्कार माझाच आहे. चाल ओळखीची वाटू शकते. उमगली तर अवश्य सांगा. मूळ कवितेतला मुलगा गातो ते मात्र 'आशा भोसले' ह्यांच्या आवाजात!
काव्यरस

" चार चारोळ्या - "

लेखक विदेश यांनी मंगळवार, 13/03/2012 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
खांदा देण्या कितिदा गेलो इतक्या वेळा मी गेलो - आपल्यासाठी उरले कोणी ... पहावयाचे विसरून गेलो ! |१| एक तारखेची गंमत असते आमच्या प्रेमा भरती येते - माझ्या नयनीं पत्नी असते तिचिया नयनीं वेतन असते ! |२| कचरामुक्त जगास बघावे ध्यास मनीं जरि धरतो - अशक्य मजला परि वाटते, जोवर मी लेखन करतो ! |३| सावलीतही गॉगल लावून हीरो बनण्या गेलो , ' डोळे नाहीत आले- ' सांगत घामाघूम झालो ! |४| (पूर्व प्रसिद्धी: हास्यगाssरवा २०१२)

कोण येथे गुरुवर्य ?

लेखक गणेशा यांनी सोमवार, 12/03/2012 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ (कविता पुन:प्रकाशित, नविन काव्य सुचत नसल्याने फक्त कविता वाचताना आपलीही एखादी कविता आता असावी या भावनेमुळे पुन्हा येथे कविता देत आहे. गोड माणुन घ्यावी.)
काव्यरस

बालपण

लेखक संदीप२७ यांनी सोमवार, 12/03/2012 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे पुन्हा एकदा त्या निरागसकतेचे प्रतिक व्हायचे आहे.. कधी घाबरता जगातील दुष्ट प्रवृत्ती,गोष्टींना हलकेच आईच्या कुशीत शिरायचे आहे पुन्हा एकदा मला तिच्या कुशीतील उबदारपण अनुभवायचे आहे..