Skip to main content

कविता

दर्द - ऐ - दात

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 20/03/2012 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी आताशा ठरवुनच टाकलंय, पुढचं प्रेम या डॉक्टरवरच करायचं. सगळे दात काढले तिनं, तरी तिच्यावरच मरायचं. मी आताशा ठरवुनच टाकलंय... एक दिवस काय झालं, बासुंदी पिता पिता हाटेलात पुढचा एक दात कर्रकन हलला मला वाटलं त्याचा बेरिंगच निसटला घरी येता येता दवाखान्यांत गेलो तिथली रांग पाहुन मनोमन सुखावलो बाहेर एक बाउन्सर बहुधा कंपाउंडर असावा आत नाही जमलं की इथंच उपटत असावा. शेवटी माझा नंबर आला, हळुच आत गेलो बेसिनमधले गोरे हात पाहुनच गार झालो या हातानी एक काय चार दात काढा जमलं तर भरुन द्या मागच्या दोन दाढा 'येस,प्लिज, य, खुर्चीवर बसा,' आवाज बरा नव्हता, काळी तिन पांढरी दोनच्या मध्ये अडकला होता काय झालंय ते
काव्यरस

प्रतिशोध

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 20/03/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
काय कायदा काय वायदा कसले पोलिस ठाणे ओलिस आहे मुके रांगणे गुंडच इथे शहाणे डोंबाच्या हाती सत्तेचे उजवे चलनी नाणे डावे पाठी री ओढे गुणगुणे पोरके अन गाणे सारे गनिमी व्याध; अमीषे त्यांची मिठास वाणी माया भरते दारी त्यांच्या अथक कृपेचे पाणी कळसावर लखलखते सोने वार सोसते कोणी आटपाटची नगरी ही तर; ताक चोरते लोणी सांग विठू तू बद्ध करांनी का अजुनी रे मौनी पायाखालिल वीट क्रयास्तव कलली पाहुन चैनी रेत जाळते पाणी रानी चौखुर आणीबाणी आक्रंदे प्रतिशोध; संयमी जनता केविलवाणी ..............................अज्ञात
काव्यरस

(रे मना ..)

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 20/03/2012 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ गझल : http://www.misalpav.com/node/21076 - सांजसंध्या त्यावरुन पॉझिटीव्ह कविता : रे मना नभ पुन्हा उजळून आले शब्द भावनांची माळ माळून आले. आस रात्रीस, ह्या चांदण्या नभाची मेघ तेंव्हा मिठीत न्हावून आले हे श्वास होते भारलेले कधीचे क्षण तुझ्यासवे आज दरवळून आले देहात रुजलेली जाणीव मिलनाची तव स्वप्न मनी आज फुलून आले जीवनाचे डाव कित्येक खेळले मी तुझेच प्रितवार आज झेलून आले. --- शब्दमेघ
काव्यरस

बळी राजाच देण ह्याजन्मि तरी फीटणार नाही.

लेखक निश यांनी मंगळवार, 20/03/2012 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
(मराठवाडा, कोकण व इतर जागीही शेतकरी जीव देत आहेत. म्हणुन ही कविता.) आक्री त अस घडल, शेत करपुन गेल सावकारी कर्ज, डोंगरा एव्हढ झाल. वाट अशी खडतर, देव झाला गायब देव भेटला तरी , राक्षस सरकारी साहेब. पेरण्या आणल बी, सरकारवानी बोगस होत. सरकारतरी कस, मा़झ नशिब फुटक होत. विहिरीने घात केला , पाण्याने एकदम तळ गाठला. त्रासामुळे मग संसारही भार वाटला. पाणी आणायच कस? चिंतेत मन विटल जीव संपवायच वादळ, डोक्यात पुन्हा उठल. जीव दिला तरी , उत्तर मिळणार नाही. बळी राजाच देण ह्याजन्मि तरी फीटणार नाही. बळी राजाच देण ह्याजन्मी तरी फीटणार नाही.
काव्यरस

असाध्य स्वार्थ...!

लेखक वेणू यांनी मंगळवार, 20/03/2012 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
वेदनांचे सण साजरे करण्याची ना हिम्मत होती, ना ऐपत..! त्यांना पापण्यांमागे साठवून अश्रु गाळण्याइतकी, श्रीमंती कधी नव्हतीच! उलट त्यांची धार बोथट करण्यासाठी प्रसंगी काळाशीही निग्रही स्पर्धा....! सुखाशी जितकी सलगी, तितकीच वेदनांशी फारकत! तसं नुकसान फारंसं नाही मात्र, 'वेदनेतले कंगोरे आज जपले, तर उद्या काव्यही बहरेल' हा स्वार्थ साधायचा राहूनच गेला! -बागेश्री

उंच माझा झोका ..

लेखक अरूण म्हात्रे यांनी मंगळवार, 20/03/2012 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
झी मराठीवर सध्या चालू असलेल्या उंच माझा झोका ह्या मालीकेचे शीर्षकगीत मी लिहीले आहे. चांदणचाहूल होती.. कोवळ्या पावली माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय.. अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या ..भरे नभाचा आशय थबकले उंबऱ्यात मी ..पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने ..भरता हा मळवट हाती अमृताचा वसा , साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात..

मिड्लाईफ क्रायसीस.

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 19/03/2012 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
टळट्ळीत दुपारी, पायाशी पडलेल्या सावलीने, हळुच मागे वळुन पाहिल्या, स्वतःच्याच पावुलखुणा. काही ठसठशीत होत्या दुरवर, मातीत जवळ्च्या काही विरलेल्या.. एका रेषेत रस्ताही नव्हता, पावलही पडलेली झिंगल्यासारखी, आठवतात आता वाटांचे ईषारे, मागच्या वळणांची निमंत्रणही.. हसत स्वीकारलेली, रडत अव्हेरलेली, मुकी अजुनही उभी माझ्यासाठी.. काही अत्रुप्त इच्छांचे भोग, काही अत्रुप्त भोगांच्या ईच्छा.. काही त्रुप्तल्या भोगांच्या आवर्तनांची, जळजळुन उठणारी वखवख.. आजही बनवतोय एक नैतिक चौकट, माझ्या पापांच्या मापाची.. कधी वार्‍यावर वाहत गेलेलं मन, कधी मनावरुन वारं गेलेलं, दगडी पायाला फुटलेली शेवाळ, अन मातीच्या धरणांत अडले

शूरवीर

लेखक निश यांनी सोमवार, 19/03/2012 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा सीमेवर गोळी वर गोळी चालली तेव्हा तेव्हा मॄत्युची गिधाडे आस पास वावरली. झेलले घाव छातीवर होउन रक्तबंबाळ कितीदा घेतले पाय मागे न कधीही लढलो परी शूरासारखा. घर ठेवले मागे, नाती सगळी विसरलो झुंजता झुंजता शत्रुशी, नमकहराम दोस्तामुळे घायाळ हा झालो. श्वास असे जोपरी तनात, करीन शत्रुवरी मात. मेलो जरी रणात तरी, अमर होउन राहिन नेहमी जिवंत तुमच्या मनात. राहिल देशभक्ति मनात राहिल देशभक्ति मनात
काव्यरस

सामान्य !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी सोमवार, 19/03/2012 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
लावुन काळा चष्मा, करतो माझ्यापुरता ताप कमी, उतरवुनी अन् विमा, उद्याची मनात मी मानतो हमी । सामान्यच मी, असेच आहे जगणे माझे नित्याचे मला कसे हो जमेल करणे, 'प्रयोग माझे सत्याचे'? चालविते मज गरजच माझी, नसे प्रेरणा वा स्फूर्ती (मला सोसणे नको, नको अन् सोसण्यातली सत्कीर्ती !