Skip to main content

कविता

आमची बी एक

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 18/08/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

हे गणराज्य की धनराज्य?

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 17/08/2011 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
हे गणराज्य की धनराज्य? प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही...!! एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती सदाचाराचा मुडदा पडतो, मदांध उन्मत्तशाही...!! डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवीत नेती धनमत्ता किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही ...!! विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतान

पंख मोकळे नभात..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/08/2011 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाच जन्म मिळतो, घेउ दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा गर्भ राहिला म्हणून, माय-बाप हर्षिले वाटले जसे अकाश बोट एक राहिले मास हे नऊ असे बहरु दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा जन्मण्याअधीच मी, 'गुन्हा'च जाहले कशी माय! सावली तुझीच, वाढते तुझ्या कुशी अंतरी तुझ्या निवांत, पाहते चराचरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा "मी न भार!' सांगतेय, मांडते अकांत मी 'स्त्रीच जाहले म्हणून, का तुम्हा नकोय मी?? मी तुझाच श्वास माय, दे तुझाच आसरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा मी नसेन तर जगात पाळणा हलेल का? माय अन बहीण..
काव्यरस

अण्णा हजारे

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 16/08/2011 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही एकटे नाही आता, साथीला आम्ही सारे आहोत. एकच अण्णा नाही आता, सारे अण्णा हजारे आहोत. वावटळ आहे वादळ आहे अन अण्णांचे पायदळ आहे तुम्हा वाटले आम्ही सारे संध्याकाळचे वारे आहोत दिशाभुल करण्या अमुची, तु ध्रुवाला लपवले आहे ठावुक नाही तुम्हाला आम्ही सारे ध्रुव तारे आहोत (मिसळपाव च्या अण्णा हजारेंना पाठिंबा देणार्‍या सर्व सभासदांना नम्र विनंती आहे, कि या कवितेत आणखी कडव्यांची भर घालावी अन हि कविता जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. मी या कवितेला हक्कमुक्त करत आहे.)

आरसा

लेखक निनाव यांनी मंगळवार, 16/08/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझाच चेहरा बघतो मी रोज, हल्ली विद्रुपच.. बदळणारा - वेळो वेळी पण पुन्हा - विद्रुपच एवढ्यात, हसणे तसे बरेच कमी झाले आहे, चेहर्‍यावर - आजारपणानं रेघोट्या काढल्या आहेत, हास्य शोधण्याचा प्रयत्न असतो, -सुंदर दिसण्याचा प्रयत्न होतो - विफल असहाय मी, मग आरसा बदळण्याचा प्रयत्न होतो मनी. पण, हा दोष आरस्याचा नाही, हा दोष आहे माझ्या चेहर्‍यात, जो सुंदर-सुबक दिसण्यास तयार नाही, अंगवळणी पडलेले आजारपण, आवडायला लागले आहेत. प्रामाणिकता मात्र जगू देत नाही, बदलायचा हट्ट सोडत नाही. अन चीड येते माझीच मला, उठतो, उचलतो शोधून मी कागद-कुंचला , काढतो रेघोट्या - एक नवा चेहरा शोधण्यास पण नकळत, पुन्हा तोच चेहरा बनवत

दोर

लेखक निनाव यांनी मंगळवार, 16/08/2011 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुटली दोर - मोकळे आकाश विसरले पंख - भरारी घेताच क्षणात सारे - घायाळ आघात न आठवे कुणाच कुणी न वाटे आठ्वावेसेही बेधुंध उडायची ताकत का दिशा यावी आड? युगे बदलली - दोर वेगळीच ह्या वेळीस न कळे ह्या जीवास - कदाचित घडावेच ज़णू पुन्हा ते संग्राम!!

मिसळपाव

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 16/08/2011 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
खोबरे मृदु प्रेमाचे अन मिर्ची्चा घाव आहे. आयुष्य तरी हे काय, एक मिसळपाव आहे. सोडुनी गेली होती त्या जुन्या पिंपळाखाली तिथेच भेटशील मजला हे मला ठाव आहे धरतीचा कंप होऊनी ते डोंगर मिटुनी गेले सांगावे लागले मजला, इथेच गाव आहे ज्याने प्रदुषित केले त्यालाही तोय दिधले गंगेकडेही कडेही माझ्या आई्चा स्वभाव आहे खोटे पसरते आहे मजला अजुन आस आहे अजुन माझ्या शरिराला माझे्च नाव आहे

बहरणारा ऋतू संपत आलाय ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 15/08/2011 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
झाडांनी दखल घेतलीय बहरणारा ऋतू संपत आल्याची कशी जाणीव होते झाडाना ..? या बर्फाळ हवेची श्वास गुदमरू लागल्याची पाने पिवळी होऊ लागलीत आता कधीपण सुरु होईल पानगळ झाडांनी सर्व तयारी केलीय काळीज घट्ट करून पानाना निरोप देण्याची निष्पर्ण होऊन जातील सर्व झाडे कालच कितीतरी पाने गळून गेली नि आज सकाळी खच्चून सडा पडला पानांचा ... काष्ट शिल्प तशी झाडे ओकीबोकी ...!! त्यांच्या जाण्याच्या जाणीवेने दिशाही झाकोळून गेल्या ढगाचा कल्लोळ आभाळात आणि झाडे केविलवाणी ..... गळत्या पानाना कुशीत घेऊन फक्त मुकी मुकी झाडांनी मन घट्ट करून तयारी केलीय कधीपासून आपल्या पानाना निरोप देण्याची......! तो ह्या प
काव्यरस

माझी ललाटरेषा

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 13/08/2011 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ललाटरेषा धुंदीत वैभवाच्या, मस्तीत चूर झाली माझी ललाटरेषा, मजला फितूर झाली तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला औलाद आज त्यांची, का "जी हुजूर" झाली? घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे भासे असे जसे की, दमछाक दूर झाली घे हा 'अभय' पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली                                  गंगाधर मुटे ------------------------------------------

आजी

लेखक अभिजीत राजवाडे यांनी शुक्रवार, 12/08/2011 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजी म्हणजे मैत्रीण असते सगळ्या घराची वीण असते, मेणबत्तीला उभारण्यासाठीचे खाली वितळवलेले मेण असते. आजी ज्ञानाचे भांडार असते अंधारात प्रकाशाचे दार असते, कधी मायेची हळुवार फुंकर कधी छडीचा कडवा वार असते. आजी आमचे होकायंत्र आहे तीचे शब्द आम्हाला मंत्र आहे विचारात नेहमी गुरफटतो आम्ही ती मात्र अजुनही स्वतंत्र आहे. आजी म्हणजे दरारा असतो आजी म्हणजे शहारा असतो कुठलही पाऊल चुकत नाही नजरेचा खडा पहारा असतो. आजी म्हणजे दडपण आहे आजी म्हणजे प्रेम पण आहे पाहता क्षणी डोळ्यात भरणारे घराचे भारदस्त घरपण आहे. स्वराज्य घडविले शिवबाने पण लढविले बाजीने आहे जन्म आई-वडिलांनी दिला संस्कार दिले आजीने आहे घरटे साजिरे