वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
तयारी म्हणण्यापेक्षा हिंमत पाहिजे. जग हे हिंमतीवर झुकवले जाते.केवळ काही काळाकरिता दाखविलेल्या हिंमतीपुरता हा प्रश्न मर्यादित राहत नाही... त्याचा आवाका त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे.. सद्याच्या समाजात तसा निर्णय घेण्याचे अनेक परिणाम असू शकतात. त्यातले महत्वाचे काही असे : १. ही हिंमत केवळ हा निर्णय घेण्यार्यांनी आयुष्यभर (किंवा त्याच्या नशिबाने त्याअगोदर समाज बदलला तर तोपर्यंत) दाखवावी लागेल. ते समाजातच राहत असल्यामुळे, हे सर्व करण्यात त्यांना बर्याच शक्तीचा, मानसिक त्रासाचा आणि कदाचित आर्थिक नुकसानीचा ताण सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल. २. याउप्पर, जर अश्या जोडप्याने मुलांना जन्माला घालायचे म्हटले तर त्या मुलांनाही लहान वयापासून समाजाचा विरोध सहन करावा लागेल. जोडपे मनाने कितीही हिंमतीचे असले तरी ती बालके तशी मनोधारणा घेऊन जन्माला येणार नाहीत आणि त्यांना ती परिस्थिती खडतर वाटेल हे आजही खात्रीपूर्वक सांगता येईल. शिवाय ज्या निर्णयामुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहेत तो त्यांचा नाही / त्यांचे मत जमेस धरून घेतलेला नसणार आहे. ३. जर अश्या मुलांच्या वयात येण्याच्या काळापर्यंत समाजातील परिस्थिती जोडप्याच्या निर्णयाला अनुकूल झालेली नसली तर अजून समस्या उभ्या राहणार आहेत. एखादी गोष्ट तत्वतः मान्य असणे आणि तिचे तात्काळ व दूर्गामी परिणामांना तोंड देणे या अत्यंत भिन्न गोष्टी आहेत. जगाला हिमतीवर झुकणारे मानव विरळा जन्माला येतात... आणि समाजाकडून होणारा तीव्र त्रास सहन करणे ते टाळू शकत नाहीत.