Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरूके गुलाम

क
क्लिंटन
Tue, 03/31/2015 - 18:20
🗣 893 प्रतिसाद
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया द्या
206836 वाचन

💬 प्रतिसाद (893)
ह
होबासराव Wed, 06/10/2015 - 12:57 नवीन
भविष्यात कुणी राजकारणी असा फ्रॉड करायचा विचारसुद्धा करणार नाही ह्या करता पक्षिय राजकारण बाजुला ठेवुन अशा तर्हेच्या समस्या हँडल केल्या जाव्या असे वाटते. फसवणारी व्यक्ति मग ति कुठल्या हि पक्षाचि असो, झटपट ट्रायल आणि निकाल हवा. राहता राहीला प्रश्ण कांगावखोर पणाचा तर आता त्याने काहिहि होणार नाहि. "तोमरला मारहाण करून जबरदस्तीने त्याच्याकडून खोटा कबुलीजबाब पोलिसांनी लिहून घेतला असे तारस्वरात आशुतोष किंचाळत होता" ... हा इतका वरिष्ठ पत्रकार असुन जर ह्याला पोलिस कोठडि चा अर्थ माहित नसेल तर त्याला आपण इतके सिरियसलि घ्यायचि गरज नाही. तसेहि रडण्याची नौटंकि करुन त्यान आपल ह्स करुन घेतलय.
↩ प्रतिसाद: होबासराव
क
काळा पहाड Wed, 06/10/2015 - 12:16 नवीन
काय हालत करून टाकलीय. दिल्ली सरकार कडे सॅलरी देण्यासाठी पैसा नाही आणि अशा वेळी खरं म्हणजे केंद्र सरकारशी जुळवून घ्यायचं सोडून केजरीवाल नगरपालिकांना सांगतायत की केंद्राकडे पैसे मागा. Politics is the art of the impossible असं असताना ते सोडून यांना धरणं, आंदोलनं यातच रस. जुने राजकारणीच बरे वाटायला लागलेत. खरं सांगायचं तर चक्क शीला दिक्षीत या माणसापेक्षा बरी वाटायला लागलीय. http://www.firstpost.com/india/garbage-wars-delhi-kejriwal-blinks-doles-500-crore-striking-workers-2285996.html
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 12:36 नवीन
शीला दिक्षीतच्या वेळेस केंद्रामध्ये पण काँग्रेसचे सरकार होते . आणि मेट्रो प्रकल्प हे शीला दिक्षित सरकारचे मोठे यश आहे. बाकी केजरीवालने केंद्र सरकर सोबत जुळवून घ्यायला पाहिजे होता. २-३ वर्षांनी ३ राज्यसभेच्या सीट्स मिळाल्यावर त्याचा वापर सुद्धा करता आला असता. शेवटी राजकारण हे तडजोडीवर चालता .
↩ प्रतिसाद: काळा पहाड
च
चिंतामणी Wed, 12/23/2015 - 14:24 नवीन
मेट्रो प्रकल्प हे शीला दिक्षित सरकारचे मोठे यश आहे. भाजप विरोधाची ही परिसीमा आहे. अनेक वर्षे आणि अनेक लोकांच्या परिश्रामाचे यश आहे. Physical construction work on the Delhi Metro started on 1 October 1998. After the previous problems experienced by the Kolkata Metro, which was badly delayed and 12 times over budget due to "political meddling, technical problems and bureaucratic delays", DMRC is a special purpose organisation vested with great autonomy and powers to execute this gigantic project involving many technical complexities, under a difficult urban environment and within a very limited time frame. DMRC was given full powers to hire people, decide on tenders and control funds. The DMRC then consulted the Hong Kong MTRC on rapid transit operation and construction techniques. As a result, construction proceeded smoothly, except for one major disagreement in 2000, where the Ministry of Railways forced the system to use broad gauge despite the DMRC's preference for standard gauge. The first line of the Delhi Metro was inaugurated by Atal Bihari Vajpayee, the Prime Minister of India, on 24 December 2002 and thus, it became the second underground rapid transit system in India, after the Kolkata Metro. The first phase of the project was completed in 2006, on budget and almost three years ahead of schedule, an achievement described by Business Week as "nothing short of a miracle".
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ह
होबासराव Wed, 06/10/2015 - 13:05 नवीन
मुनिवर्यांशी सहमत. प्रत्येक गोष्ट आपल्या ईगो वर नेउन, बाकि सगळ्या पक्षांशी वैयक्तिक शत्रुत्व असल्यासारखे वातावरण निर्माण करुन, आपले तेच बरोबर नाहि तर सगळे भ्रष्टाचारि एक झालेयत वगैरे ने केलेल्या घोषणा पुर्ण करणे तर दुरच पण ह्या सगळ्या पोरखेळात सरकार चालवणे मुष्किल होइल.
ह
होबासराव Wed, 06/10/2015 - 13:07 नवीन
म्हणजे ज्या कामासाठि जनतेने निवडुन दिलय तो कारभार करणे वेळेअभावि मुष्किल होइल
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Wed, 06/10/2015 - 13:17 नवीन
माणूस थोडा प्रगल्भ होतो आणि खऱ्याखोट्याची समजही यायला लागते. तसच आमचही समजा सेम हिअर
न
नांदेडीअन Wed, 06/10/2015 - 13:28 नवीन
साधारण २-३ महिन्यांपूर्वी मी CCTV चे काम कुठवर आले यासंदर्भात एक पोस्ट टाकली होती. सगळीकडे काम सुरू आहे CCTV लावायचे. त्या अल्बमची लिंक देतो परत. http://imgur.com/a/EJkub अजून काही माहिती हवी असेल तर आपच्या आमदारांचे Twitter हॅंडल फॉलो करा. स्मार्ट सिटीबद्दल वैंकय्या नायडू यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते. We have not launched the scheme yet. So there is no question of any expenditure on that account. १२ मे २०१५ ला Ministry of Urban Devl. ने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले की १०० शहरांची आमच्याकडे अजून कोणतीही माहिती नाही. http://www.jantakareporter.com/india/rti-reply-poses-serious-questions-to-pms-ambitious-smart-city-project/1605 या लिंकवर जाऊन ती RTI कॉपी पाहू शकता तुम्ही. आणि स्मार्ट सिटीजचा काय घोळ सुरू आहे हेसुद्धा वाचा.
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 13:43 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
च
चिनार Wed, 06/10/2015 - 13:59 नवीन
वरील उत्तरात काय वावगं आहे हे जर सांगाल का ? माहिती उपलब्ध नसताना किंवा वरून तसे काही आदेश नसताना ,"अहो रोशन भाऊ काय सांगू ,लय जोरात सुरु आहे स्मार्ट सिट्या बांधणं..५० बांधून झाल्या बघा" असं उत्तर अपेक्षित होतं का ? स्मार्ट सिटी हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याचा आराखडा इतक्या लवकर तयार होण्याची अपेक्षा करणं हास्यास्पद आहे. स्मार्ट सिटीकरिता लागणाऱ्या पायाभूत सुविधा संबंधित काम सुरु झाले आहे. माझ्या कंपनीत आणि आमच्या क्षेत्रातल्या इतर कंपनीत याबाबतीत सरकारच्या एका संस्थेकडून विचारणा झाली आहे. याबाबतीत अधिक माहिती मिळाल्यास कळवतो.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 14:11 नवीन
किती बजेट अलोकेट केला आहे एव्ढा तरी सांगू शकतात. )जे विचारला आहे)
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Wed, 06/10/2015 - 14:16 नवीन
"budget allocation for each city " असा प्रश्न विचारलाय बहुतेक. बजेट प्रत्येक शहरासाठी वेगवेगळा सौ शकतं. ज्याचा तपशील इतक्या लवकर उपलब्ध होणार नाही. अर्थात स्मार्ट सिटी म्हणजे नेमकं काय ? त्याचं स्वरूप काय ? हे सरकारने जाहीर करावे असे मला मनोमन वाटते.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Wed, 06/10/2015 - 19:58 नवीन
>>> सगळीकडे काम सुरू आहे CCTV लावायचे. CCTV चं काम खरंच सुरू झालेलं दिसतंय. CCTV खरेदीत आआपच्या राखी बिडलांनी घोटाळा केल्याचा आरोप होतोय. http://hindi.oneindia.com/news/new-delhi/aap-mla-rakhi-birla-is-involved-in-corruption-says-bjp-359815.html
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
काळा पहाड गुरुवार, 06/11/2015 - 11:24 नवीन
प्रश्न असा आहे, की १६,००,०००/(३६५*५)=८७६. म्हणजे १०० दिवसात ८७६०० कॅमेरे बसवले जायला पाहिजेत. की एक वर्षात ३.५ लाख कॅमेरे बसवणार आहेत? कॅमेरे बसवण्याची ऑडिटींग माईलस्टोन कधी आहे? बाकी खालील गोष्टींचं कॅल्क्युलेशन केलंच असेल म्हणा त्यांनी. १) १६ लाख कॅमेर्‍यांचं फीड घ्यायला गेलाबाजार ४ लाख एल.सी.डी. स्क्रीन्स (एका स्क्रीन मध्ये ४ कॅमेर्‍यांचं फीड) २) डेटा स्टोअर करायला १.६ लाख हार्ड डिस्क्स (एका हार्ड डिस्क मध्ये १० कॅमेर्‍यांचं स्टोअरींग) ३) मेन्टेनन्स साठी १६०० लोकांची टीम (१००० कॅमेर्‍यांसाठी १ माणूस) ४) या स्क्रीन्स वर लक्ष ठेवायला १ लाख लोक (एक माणूस १६ कॅमेरा फीड्स वर रियल टाईम लक्ष ठेवू शकेल) ५) डेटा बॅकअप घेण्यासाठी बॅकअप डिस्क्स इत्यादी इत्यादी.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/11/2015 - 12:17 नवीन
१. पाच वर्षात १६ लाख कॅमेरे बसवण्याचे उद्दिष्ट असेल तर रोज सकाळी उठुन "मग किती बसवले क्यामेरे?" हा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. हे म्हणजे मोदी सरकारला रोज सकाळी उठुन "मग किती रुपयांनी कमी झाली महागई असे विचारण्ण्यासारखे झाले. प्रत्य्येक गोष्टीची एक प्रोसेस असते. ती प्रोसेस पुर्ण केली की एंड प्रॉडक्ट निघते, शिवाय सरकार जर १६ लाख क्यामेर्‍यांचे डील करत असेल तर ते रोज बाजारात जौन ८७६ क्यामेरे आणतील आणि बसवतील असे तर घडणे शक्यच नाही. एक निगोशियेटेड प्राइस ठरवली जाइल आणी त्याप्रमाणे कंत्राटे दिली जातील. त्याशिवाय जिथे कॅमेरे बसवणार आहे त्या जागेची पाहणी, तंत्रज्ञांचे नियोजन या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यासाठीदेखील काही काळ जाइल आणि मगच प्रत्यक्ष इंस्टॉलेशन सुरु होइल. या सगळ्या प्रकाराला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही. अतिकार्यक्षम युगपुरुषांकडुन कदाचित हे कार्य एव्हाना सुरु व्हायला हवे होते. पण ते वेगळ्या कार्यात गुंतले आहेत असे मान्य करुन त्यांना किमान २ वर्षे तरी द्यायला हवीत. २. मोठे एलसीडी घेतले तर एकामध्ये साधारण २५ कॅमेर्‍यांचे फीड यायला हवे. अश्याप्रकारे या कामासाठी ६०००० स्क्रीन्स पुरतील. शिवाय् केजरीवाल सरकारने लाइव्ह मॉनिटरिंगचे आश्वासन दिलेले नाही. म्हणजेच्ज प्रत्येक कॅमेर्‍याचे लाइव्ह फीडिंग स्क्रीनवर दिसणे अपेक्षित नाही. याचाच दुसरा अर्थ असा की कमी स्क्रीन्स पुरतील. नक्की किती ठिकाणचे लाइव्ह मॉनिटरिंग करायचे हे ठरले की स्क्रीन्सचा आकडा फायनल होइल. ३. डेटा मेमरी व्हिडीयो रिझोल्युशन वर अवलंबुन असेल तरीही इतके नक्की सांगु शकतो की १६ लाख कॅमेर्‍यांचा एका महिन्याचा डेटा साठवण्यासाठी जितका खर्च येइल त्यासाठी केजरीवालांना पाणी आणी वीजच काय कपडे घालणे, बायकोचा हात हातात घेणे, बघणे, ऐकणे, श्वास घेणे या सगळ्यावर भरभक्कम टॅक्स लावायला लागेल. अर्थात केंद्रात मोदी असतील तर त्यांनी पैसे दिले नाहित म्हणुन हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुर्णत्वास नेता आला नाही अश्या बोंबा माराव्या लागतील. अर्थात अ‍ॅज आय सेड, केजरीवालांना किमान २ वर्षे तरी वेळ द्यावा लागेल. जर त्यांनी ही गोष्ट करुन दाखवली आणि यशस्वीपणे राबवुन दाखवली तर त्यांना तहहयात भारताचा पंतप्रधान करुन टाकावे अशी सूचना करतो. ४. मेंटेनन्ससाठी १००० लोकांची टीम हे अनुमान मात्र योग्य वाटते. कदाचित अधिकच लोक लागतील. ५. लाइव्ह मॉनिटरिंग सगळ्या कॅमेर्‍यांचे करायची गरज नसल्याने अर्थात १ लाख लोकांची गरज नाही पडायची.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड गुरुवार, 06/11/2015 - 13:14 नवीन
इथे थोडंसं अ‍ॅनॅलिसीस आहे: http://www.quora.com/How-will-AAP-install-15-lakh-CCTV-cameras-in-Delhi
लाइव्ह मॉनिटरिंग सगळ्या कॅमेर्‍यांचे करायची गरज नसल्याने अर्थात १ लाख लोकांची गरज नाही पडायची.
थोडक्यात, गुन्हा झाल्यानंतर शोधण्यासाठी याचा उपयोग होईल. गुन्हा रोखायला नाही.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
च
चिनार गुरुवार, 06/11/2015 - 12:28 नवीन
१६००००० की १५०००० ? दीड लाख बसवणार असा ऐकला होतं
↩ प्रतिसाद: काळा पहाड
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/11/2015 - 13:56 नवीन
प्रॉमिस दहा ते पंधरा लाखांचे होते. दीड लाख पहिल्या फेज मध्ये बसवणार आहेत. तसा आपचा एक प्रयत्न करुन झाला असे काही प्रॉमिस दिले नव्हते म्हणुन. संजय सिंग तसे म्हणाले एकदा. पण ते अंगलट आल्यावर त्या फेकुगिरीबद्दल तरी शांतता आहे अजुन. युगपुरुषांनी मी असे कधी म्हटलोच नव्हतो असे अजुनतरी म्हटलेले नाही. याशिवाय एक प्रॉमिस अजुन केले होते. ते पुर्ण करायला हरकत नव्हती आत्तापावेतो. पण ठीक आहे. त्यासाठी देखील त्यांना थोडा वेळ देउयात. ते प्रॉमिस होते प्रत्येक सिटी बसमध्ये एक सुरक्षारक्षक पुरवण्याचा. दिल्लीत साधारण ३००० सिटी बसेस आहेत. बस मध्ये सुरक्षारक्षक देणार म्हणजे मेट्रो मध्येही देणार असावेत. प्रत्येक मेट्रो मागे एक म्हटले तर साधारण २०० सुरक्षारक्षक लागतील + ३००० बसेस. म्हणजे ३२०० सुरक्षारक्षक झाले. हे दिवसातुन १८ तास चालणार म्हणजे २ शिफ्ट म्हणजे ६४०० सुरक्षारक्षक हवेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अजुन १०० लोक पकडा. साधारण ८००० रुपये प्रत्येकी वेतन धरल्यास हा आकडा साधारण ५२ कोटींचा होतो. केजरीवाल सरकार हा खर्च लोकांसाठी करायला तयार असल्यास ही नक्कीच स्वागतार्हे गोष्ट आहे. पण अजुनतरी या योजनेवर पुढे काही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. केजरीवालांनी सांगितले होते की सुरक्षारक्षकांमुळे लवकरच रेप केसेस बंद होतील. अजुन सुरक्षारक्षक तैनात केले गेले नसल्याने तसे काही झालेले दिसत नाही. २०१४ मध्ये दिल्लीत एकुण २०६९ बलात्काराचे गुन्हे झाले होते. २०१५ च्या पहिल्या ४ महिन्यात एकुण ६२१ गुन्हे दाखल झाले आहेत. याचा अर्थ वार्षिक सरासरी १८६० होइल. अर्थात हे २०१४ च्या तुलनेत कमीच असतील. मात्र विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसुन येते. २०१४ मध्ये एकुण ४३२५ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. तर २०१५ च्या पहिल्या ४ महिन्यात १४७४ गुन्न्हे दाखल झाले आहेत म्हणजे वर्षाची सरासरी ४४२० होइल.
↩ प्रतिसाद: चिनार
च
चिनार Wed, 06/10/2015 - 13:42 नवीन
केजरीवाल यांनी राजकारणात येण्याआधीच अनेकांशी शत्रुत्व पत्करले होते. असे करण्यास काहीच हरकत नाही पण ते शत्रुत्व निभवतासुद्धा आले पाहिजे. थयथयाट करणे म्हणजे राजकारण नव्हे. राजकीय शत्रूंना राजकारणानेच संपवावे लागते. १. शरद पवार आणि स्व. बाळासाहेब ठाकरे हे एकमेकांचे राजकीय शत्रू होते पण त्यांनी कधीच एकमेकांवर वैयत्तीक पातळीवर जाऊन चिखलफेक केली नाही (आणि आता बाळासाहेबांचे दोन्ही वंशज तीच चूक करत आहे ) २. स्व. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांचे राजकीय वैर सगळ्यांना माहिती आहे. गोपीनाथरावांनी राष्ट्रवादी आणि कोन्ग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने भुजबळांना तेलगी प्रकरणात अडकविले. यामुळे भुजबळ यांची कारकीर्द जवळजवळ संपली होती. वास्तविक तेलगी प्रकरणात सर्व पक्षातले बडे बडे नेते फसले असते. पण फसले ते केवळ भुजबळ ! कोणी विकासाचे राजकारण जर खरच करत असेल तर तर जनतेच्या ते लक्षात आल्याशिवाय राहत नाही. केजरीवाल यांच्या कडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. त्यांनी दिल्लीचा विकास करावा. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी न झेपणारे आणि बालिश पद्धतीचे राजकारण करू नये. प्रत्येक वेळी त्यांच्या अश्या बालिश राजकारणाने जनता त्रस्त होते आहे. १. गजेंद्र सिंगच्या प्रकरणात आप दोषी असो किंवा नसो पण त्यांनतर केलेले तमाशे असमर्थनीय होते. यांचे नक्राश्रू न ओळखण्याएवढी जनता मूर्ख नाही. २. नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार संविधानाने ठरवून दिलेले आहेत. त्यात संधीग्नता असल्यास हे प्रकरण चर्चेने आणि सामंजस्याने सोडवता आले असते. थयठयाट करण्याची अजिबात गरज नव्हती. जनतेने प्रचंड बहुमत दिले म्हणून संविधान हातात आल्यासारखे वागणे मुख्यमंत्री महोदयांना शोभत नाही. ३. तोमर दोषी आहेत की नाही हे कोर्ट ठरवेल. पण तोमर यांना पोलिसांनी मारहाण केली आणि जबाब नोदान्वून घेतला असे बाळबोध आरोप करणे म्हणजे मूर्खपणा आहे. आतातरी या असल्या गोष्टी थांबवून कामाला सुरवात करावी.
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 13:52 नवीन
केजरीवाल यांनी कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसताना जे यश मिळवला ते निश्चितच कौतुकास्पद आहे. कोणी राजकीय विश्लेषक काहीही म्हणोत, ये पब्लिक सब जानती है ! म्हणूनच लोकांनी लोकसभेला भाजपा आणि राज्यात आप निवडून दिले . आता मात्र केजरीवाल यांनी मॅच्युरीटीने काम केले पाहिजे. ते योग्य काम करत असतील तर जनता पुन्हा निवडून देइलच मग कोणी कसाही प्रचार करोत. सतत वादविवादामुळे चांगले काम मागे पडते . मोदींचीही गत काहीशी अशीच झाली आहे. साक्षी महाराज व इतर हिंदुत्ववादी नेत्यांच्या उथळ वक्तव्यामुळे व स्वतःच्या प्रचारकी थाटामुळे मूळ मुद्दे बाजूला पडत आहेत. प्रत्यक्षात दोन्ही बाजूंचे लिंकाळे आपापले नेते , पक्ष काम करत आहेत असे लिंका देउन देउन सांगत आहेत पण इथे बसून आम्हाला फक्त केजरीवालचे वाद विवाद आणि मोदींची प्रचारकी भाषणे दिसत आहेत. असो. तूर डाळ १०० ओलांडून गेली एव्ढाच आमचा प्रश्न :)
स
सतीश कुडतरकर गुरुवार, 06/11/2015 - 07:26 नवीन
पटेश!
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 06/10/2015 - 13:58 नवीन
शरद पवार आणि स्व. बाळासाहेब ठाकरे हे एकमेकांचे राजकीय शत्रू होते पण त्यांनी कधीच एकमेकांवर वैयत्तीक पातळीवर जाऊन चिखलफेक केली नाही
चिखल्फेक एकतर्फी होती. मैद्याचे पोते,दाउदशी मैत्री ...हे सगळे कोणी म्हंटले? असो. खाजगीत मात्र हे दोघेही मित्र होते हे वाचले होते. स्व. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांचे राजकीय वैर सगळ्यांना माहिती आहे. गोपीनाथरावांनी राष्ट्रवादी आणि कोन्ग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने भुजबळांना तेलगी प्रकरणात अडकविले हे मात्र खरे. मुंडेंचे भाजपापेक्षा कॉन्ग्रेसमध्ये संबंध अधिक चांगले होते असे म्हंटले जायचे.
ह
होबासराव Wed, 06/10/2015 - 14:00 नवीन
अगदि असेच म्हणणार होतो
ह
होबासराव Wed, 06/10/2015 - 14:07 नवीन
गोपीनाथ मुंडे माणुसच असा होता कि त्याचे सगळ्या पक्षातल्या लोकांबरोबर चांगले संबध होते, तसाच राजकिय द्रुष्ट्या परिपक्व माणुस विलासराव देशमुख.
ह
होबासराव Wed, 06/10/2015 - 15:45 नवीन
"AAP Lawmaker Somnath Bharti's Wife Files Complaint of 'Domestic Violence, Mental Torture" हे घ्या, आणि हे स्त्रियांच्या सुक्षेबाबत बाता हाणत होते. आपण ह्यावेळेस तरी आशा करुया कि निदान ह्याचे खापर तरी केंद्र सरकार वर येणार नाही.
श
श्रीगुरुजी Wed, 06/10/2015 - 20:10 नवीन
http://indiatoday.intoday.in/story/aap-somnath-bharti-wife-domestic-abuse-case-dcw/1/443562.html सोमनाथ भारती केजरीवालांच्या पहिल्या इनिंगमध्ये कायदामंत्री होते आणि तोमर आताच्या इनिंगमध्ये. एकंदरीत केजरीवालांच्या मंत्रीमंडलातल्या कायदा मंत्र्यांचं काही खरं दिसत नाही. आता कपिल मिश्रा कायदामंत्री झालेत. बघूया त्यांचं काय होतंय ते.
↩ प्रतिसाद: होबासराव
स
स्पार्टाकस गुरुवार, 06/11/2015 - 03:05 नवीन
लेख आवडला. ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याची लायकी नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला तर कशी वाट लागू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे केजरीवाल सरकार म्हणता येईल. रच्याकने, मायबोलीवरील केजरीवाल भजन मंडळाचा धागा कोणी वाचला आहे काय? भरपूर करमणूक आहे त्यात!
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/11/2015 - 08:07 नवीन
त्या धाग्याचा दुवा इथे देऊ शकाल का ?
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
स
सतीश कुडतरकर गुरुवार, 06/11/2015 - 08:18 नवीन
http://www.maayboli.com/node/53007 हा पण दुवा पाहून घ्या.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 06/11/2015 - 08:22 नवीन
हा दुवा नाही "केजरीवाल भजन मंडळ" चा दुवा हवा होता !
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
स
स्पार्टाकस गुरुवार, 06/11/2015 - 09:06 नवीन
हा तो दुवा - http://www.maayboli.com/node/52730
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
होबासराव गुरुवार, 06/11/2015 - 11:17 नवीन
वेलकम बॅक
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
क
कपिलमुनी गुरुवार, 06/11/2015 - 09:02 नवीन
ह्याविषयी भरपूर चर्चा झालेली आहे. पुन्हा तो विषय इथे मांडण्याचे प्रयोजन काय ?
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
स
सतीश कुडतरकर गुरुवार, 06/11/2015 - 14:01 नवीन
इथे देण्याचे कारण त्यांनी वापरलेली भाषा.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/11/2015 - 08:25 नवीन
तुला परत बघुन आनंद झाला. लिहिता हो परत. व्यालकम ब्याक
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/11/2015 - 09:21 नवीन
>>> ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याची लायकी नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला तर कशी वाट लागू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे केजरीवाल सरकार म्हणता येईल. ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याची लायकी नसलेला माणूस भूतकाळात एकदा भारताचा पंतप्रधान झाला होता.
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
स
स्पार्टाकस गुरुवार, 06/11/2015 - 09:26 नवीन
देवेगौडा, गुजराल का चंद्रशेखर?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/11/2015 - 09:50 नवीन
यापैकीच १. ओळखा. उत्तर अगदी सोपे आहे.
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
क
कपिलमुनी गुरुवार, 06/11/2015 - 11:13 नवीन
सोसायटीचे सेक्रेटरी होण्याची पात्रता नसलेले डायरेक्ट भारताच्या माजी पंतप्रधानांची लायकी काढतात. आणि काहींना इतर धाग्यावर मोदींचा एकेरी उल्लेख चालत नाही. मिपावरची एक जुनी स्वाक्षरी आठवली ! अरे तुझा पगार किती तु बोलतो किती
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/11/2015 - 17:01 नवीन
>>> सोसायटीचे सेक्रेटरी होण्याची पात्रता नसलेले डायरेक्ट भारताच्या माजी पंतप्रधानांची लायकी काढतात. आणि काहींना इतर धाग्यावर मोदींचा एकेरी उल्लेख चालत नाही. म्हणजे सोसायटीचा सेक्रेटरी होण्याची किमान पात्रता असलेल्यांनी डायरेक्ट भारताच्या माजी पंतप्रधानांची लायकी काढली तर चालेल! बादवे, सोसायटीचा सेक्रेटरी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत निवडणुकीला उभा राहून सभासदांच्या मतांवर निवडून आलेला असतो. तो सोसायटीचा अनेक वर्षे रहिवासी असल्याचा खोटा दाखला देऊन, निवडणुकीला उभे रहायचे टाळून मतदारांना सामोरे न जाता सेक्रेटरी झालेला नसतो. जेव्हा माजी पंतप्रधान देशहिताचा विचार करण्याऐवजी आपल्या बॉसच्याच हिताचा विचार करतात, आपल्या डोळ्यांदेखत लुटारूंना मोकळे रान देतात, त्यांना बिनदिक्कत देशाची लूट करून देतात, देशाची लूट होत असताना स्थितप्रज्ञपणे बसून राहून लुटारूंकडे दुर्लक्ष करतात आणि लुटारूंचे समर्थन करतात, तेव्हा सोसायटीचे सेक्रेटरी होण्याची पात्रता असलेल्या व नसलेल्यांना त्यांच्यावर टीका करण्याचा पूर्ण हक्क आहे.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
काळा पहाड गुरुवार, 06/11/2015 - 17:46 नवीन
आणि फक्त तेवढंच नव्हे, तर जेव्हा हवं तेव्हा त्यांना कंठ सुद्धा फुटतो ("हजारों जवाबों से अच्छी मेरी खामोशी", "पैसे पेड़ पर नहीं उगते", "राहुल गांधी के लिए कुर्सी खाली करने को तैयार हूं", "मैं एक खुली किताब हूं"). बाकी वेळी आळी मिळी गुप चिळी.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सतीश कुडतरकर गुरुवार, 06/11/2015 - 08:02 नवीन
२००४ आणि २००९ च्या निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र सादर करताना मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील बीएच्या पात्रता परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी मी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातून ही पात्रता परीक्षा उत्तीर्णही झालो होतो. त्यानंतर मला बीएच्या अभ्यासक्रमासाठी रितसर प्रवेशही मिळाला. मात्र, त्यानंतर काही कारणास्तव मी बीएच्या परीक्षेत पास होऊ शकलो नाही. मी २०१४ साली निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माझ्या मुळ शिक्षणाचा म्हणजे पाचवी पास असल्याचा उल्लेख केला. यासंबंधी काहीजणांचा गैरसमज झाला असून मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटून हे गैरसमज दूर करण्यास तयार आहे. - बबनराव लोणीकर>>>>>>> बीए ची परीक्षा दिली म्हणजे आपण पदवीधर समजले जातो का???? नापास होऊन सुद्धा प्रतिज्ञापत्रात पदवीधर असल्याचे खोटेच नमूद केले. वरील स्व-कथनात या मंत्र्यांनी स्वतःच गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. आणि मंत्रीसाहेब सर्वाना वैयक्तिकरीत्या भेटून लोकांचे गैरसमज दूर करणार आहेत. मुख्यमंत्री कधी कारवाई करणार आहेत कि आपल्याच सरकारची आणखी बेअब्रू होण्याची वाट पाहतायेत. http://www.loksatta.com/mumbai-news/fake-degree-row-bjp-mla-babanrao-lonikar-is-maharashtras-tomar-1112264/
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/11/2015 - 17:21 नवीन
लोणीकरांच्या केसमध्ये फारसा दम वाटत नाही. मुक्त विद्यापीठात प्रवेश घेताना अमुक एक इयत्ता पास झालीच पाहिजे अश्या अटी नसतात. १२ वी पास नसताना सुद्धा (खरं तर १० वी पास नसताना सुद्धा) मुक्त विद्यापीठात बी.ए. च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळू शकतो. मुक्त विद्यापीठ हे आपल्या आवडीचा कोणताही विषय कोणत्याही अटीविना शिकण्याची संधी मिळण्याची संस्था आहे. त्यामुळे ५ वी पास असूनसुद्धा मुक्त विद्यापीठात लोणीकरांना बी. ए. च्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळणे शक्य आहे. त्यांच्या स्पष्टीकरणानुसार त्यांचे शालेय शिक्षण ५ वी पास असले तरी त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी.ए. ला प्रवेश मिळाला होता. बीए चे प्रथम वर्ष पूर्ण केल्यावर त्यांना पुढे शिकणे जमलेले नाही. निवडणुक अर्जात त्यांनी पदवीधर आहे असे म्हटले नसून सुरवातीला आपण मुक्त विद्यापीठातून प्रथम वर्ष बीए पास होतो असे लिहिले होते व २०१४ च्या निवडणुकीत आपले शालेय शिक्षण ५ वी पास आहे असे लिहिले होते. दोन्हीत फरक आहे परंतु त्यांचे स्पष्टीकरण बरोबर वाटते. लोणीकर व तोमर यांची तुलना होऊच शकत नाही. लोणीकरांच्या शालेय शिक्षण व मुक्त विद्यापीठातील शिक्षण इतकाच घोळ आहे पण तोमरांनी आपल्या अस्तित्वात नसलेल्या दोन्ही पदव्यांच्या बनावट गुणपत्रिका व बनावट पदवी प्रमाणपत्रे तयार करून वकीलीची सनद मिळवून वकीली करून बार कौन्सिल व आपल्या अशीलांची फसवणूक केली होती.
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
प
पिंपातला उंदीर Sat, 06/13/2015 - 05:58 नवीन
लोणीकर साहेब मोठे वस्ताद निघाले . डिग्री मध्ये घोळ आहेच पण बायका पण दोन आहेत . एकीची माहिती अर्थातच लपवली आहेत . या बातमीत लोणीकर यांच्याबद्दल सुरस किस्से वाचा . संस्कारी पक्ष , माय फुट http://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-bjp-minister-in-trouble-over-academic-qualification-two-marriages-1113222/
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नांदेडीअन Sat, 06/13/2015 - 12:42 नवीन
होय... मी बीए पास नाही! पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांची कबुली. http://abpmajha.abplive.in/maharashtra/2015/06/13/article617564.ece/water-supply-minister-babanrao-lonikar याला म्हणतात स्वाभिमानी माणूस ! चटकन खरे काय ते सांगून टाकले . पण मी म्हणतो यांना असे स्वतःहून सांगायची काय गरज पडली ? जी व्यक्ती भाजपामध्ये असते, ती बाय डिफॉल्ट सगळ्यात प्रामाणिक, एक नंबरची देशभक्त आणि जनतेच्या हितासाठी झगडणारीच असते. एव्हढे सगळे चांगले गुण अंगी असतांना कशाला विनाकारण आपल्या डिग्रीबद्दल स्पष्टीकरण देत बसायचे ? स्मृती इराणींकडून काही आदर्श घेतला नाही यांनी अजून.
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
श
श्रीगुरुजी Sat, 06/13/2015 - 17:07 नवीन
आपण बी. ए. पास आहोत असा दावा लोणीकरांनी कधीच केला नव्हता. त्यांच्या अर्जात 'बी.ए.(प्रथम वर्ष) अ‍ॅपिअर्ड' इतकेच लिहिले होते, जे बरोबर होते. याउलट तोमरांनी फक्त १२ वी पास असताना बी.एस्.सी. व एल.एल्.बी. च्या खोट्या गुणपत्रिका व खोटी पदवी प्रमाणपत्रे तयार करून आपण एल.एल.बी. असल्याचा बार कौन्सिलकडे दावा करून वकीलीची सनद मिळविली होती व काही वर्षे वकीली सुद्धा केली होती. अर्थात ते आआपचे असल्याने आआपभक्तांना त्यात काहीच चुकीचे वाटणार नाही आणि लोणीकरांनी आपण बी.ए. आहोत असा दावा कधीही केला नसताना आपटार्डस् त्यांनी पदवीची खोटी माहिती दिली असा अपप्रचार करून तोमरप्रमाणेच त्यांनाही अटक करावी असा आग्रह धरणार.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
स
सव्यसाची गुरुवार, 06/11/2015 - 10:00 नवीन
सध्या दिल्ली मध्ये जे काही चालले आहे ते खरेच दुर्दैवी आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार मधील प्रश्नांचा निर्णय न्यायालय घेईलच. परंतु ज्या गोष्टींवर केजरीवाल यांच्याकडे पूर्णपणे अधिकार आहेत त्याबाबत तरी त्यांनी त्यांचे काम सुरु करावे. यामध्ये खालील विषय आहेत. १. शिक्षण २. आरोग्य ३. वीज ४. पाणी ५. परिवहन हे सर्व असे विषय आहेत जे सामान्य लोकांसाठी अधिक महत्वाचे आहेत. या विषयावरती दिल्ली सरकारने काम सुरु करून जश्या जश्या अडचणी येतील तसे तसे केंद्राकडून अधिकार मागावेत. जे आहे त्यात कितीतरी चांगल्या गोष्टी करून दाखवण्याची संधी दिल्ली सरकारला आहे. त्या गोष्टी त्यांनी कराव्यात एवढीच अपेक्षा दिल्लीकरांची असावी.
क
काळा पहाड गुरुवार, 06/11/2015 - 11:14 नवीन
ते करण्याची त्यांची इच्छा किंवा क्षमता असती तर त्यांनी सुरू केलंही असतं. १. यांना काम करण्याची इच्छा नाही २. लक्षात ठेवा, की नोकरशाहीला हाताळणं सोपं नसतं. नोकरशाहीला जर कळलं की तुम्ही पप्पू आहात तर तुम्हाला मामा बनवायला त्यांना वेळ लागत नाही. यांना काम करता येत नाही, नोकरशाहीला वेसण घालता येत नाही (आणि आता पोलीस, मनपा, नोकरशाही आणि गव्हर्नर या सर्वांना शिंगावर घेण्याचा प्रयत्न केल्यामुळं ते ही जीव तोडून काम करण्याची शक्यता नाही). ३. भरमसाठ आश्वासनं दिलेली आहेत, जी त्यांना बहुधा पूर्ण करता येणार नाहीत याची आता जाणीव झालेली आहे ४. आणि आता पूर्वीप्रमाणं राजीनामाही देता येत नाही. त्यामुळं जबरदस्तीनं हुतात्मा होण्याचा प्रकार सुरू आहे.
↩ प्रतिसाद: सव्यसाची
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/11/2015 - 17:27 नवीन
>>> परंतु ज्या गोष्टींवर केजरीवाल यांच्याकडे पूर्णपणे अधिकार आहेत त्याबाबत तरी त्यांनी त्यांचे काम सुरु करावे. यामध्ये खालील विषय आहेत. १. शिक्षण २. आरोग्य ३. वीज ४. पाणी ५. परिवहन हे सर्व असे विषय आहेत जे सामान्य लोकांसाठी अधिक महत्वाचे आहेत. या विषयावरती दिल्ली सरकारने काम सुरु करून जश्या जश्या अडचणी येतील तसे तसे केंद्राकडून अधिकार मागावेत. जे आहे त्यात कितीतरी चांगल्या गोष्टी करून दाखवण्याची संधी दिल्ली सरकारला आहे. त्या गोष्टी त्यांनी कराव्यात एवढीच अपेक्षा दिल्लीकरांची असावी. +१ परंतु अंगी जन्मजात थिल्लरपणा, नाटकीपणा, हुकूमशाही वृत्ती आणि कमालीची अपरिपक्वता असल्याने, केजरीवाल हे करण्याची सुतराम शक्यता नाही. आपला नाकर्तेपणा व अपयश झाकण्यासाठी आपला अधिकार नसलेल्या क्षेत्रात अतिक्रमण करून ते उपराज्यपाल, गृहमंत्रालय, केंद्र सरकार इ. बरोबर रोज भांडत बसतील व आपण या सर्वांच्या कारस्थानांचा बळी होत असल्याची बतावणी करीत राहतील.
↩ प्रतिसाद: सव्यसाची
व
विकास गुरुवार, 06/11/2015 - 18:53 नवीन
केजरीवाल यांचे वागणे पहाताना कायम "रडीचा डाव खडी" ही म्हण आठवते. पण ते जाउंदेत... लोकायुक्त नियुक्तीचे काय झाले? आणि हो, शीला दिक्षित अजून तुरंगाच्या बाहेर आहेत का आत? म्हणजे त्यांच्यावर पण एके आरोपपत्र ठेवणार होते ना? आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रू.१० लाख पर्यंत कर्ज योजना काढली. ती वरकरणी चांगली वाटली. असे काहीतरी नक्की असायला हवे असे देखील वाटले. पण त्यातील एक गोच अशी आहे, की हे कर्ज देताना कुठल्याही प्रकारचे तारण, हमी, वगैरे लागणार नाही. म्हणजे मोफत जनतेचा पैसा वाटण्याचे धंदे आहेत. त्यानिमित्ताने मुलं शिकली अथवा नाही शिकली तरी मिळालेल्या कर्जाला जागून किमान आप्टार्ड तरी होतील अशी आशा असावी झालं!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा