मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असतेहा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे?इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? हे मी लिहिलं आहे?हो. हे वाचा. *************************** गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असते मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे? गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे. मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का? गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे) मोदक - इंग्रज शेतकर्याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा. मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत? ***************************तुमचा नक्की काय मुद्दा आहे?सगळ्या सरकारांनी शेतकर्याचा घात केला तो कसा केला ते बोला. तुमचा मुद्दा (तुम्हाला) स्पष्ट असेल तर त्याचे पुरावे द्या. माहिती द्या. कोणती सरकारची पॉलिसी कशी चुकली आणि ती कशी सुधारावी याचा अभ्यास केला असला तर त्याची माहिती द्या. मिपावर अनेक तज्ञ लोक आहेत ते सांगतील सरकारशी कसा लढा द्यायचा. त्यांची मदत घ्या आणि तुमचे जे काही असेल ते उद्दिष्ट पूर्ण करा. ..आणि तुम्हाला उगाच गोल गोल गफ्फा हाणायच्या असल्या तर तसे सांगा. तुम्ही शेती करता म्हणजे जगावेगळे काम करत नाही आहात. लाखो करोडो शेतकरी आहेत भारतात. परिस्थीतीमुळे आत्महत्या करतात ही दुर्दैवी बाब आहे पण त्या आत्महत्यांना ठेवी बनवून रडगाणे गायचे असेल तर खुशाल गा.दुर्दैव हे आहे की शेतकर्याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्याच घात करत असते. शल्य आहे ते एवढेच!हे तुम्हीच लिहिले आहे ना? मग "हे कसे?" असे विचारल्यावर कशाला गोल गोल फिरताय? तुम्ही लिहिले ते वाचले. सगळ्याच सरकारांनी कसा घात केला ते समजले नाही म्हणून तुम्हाला विचारत आहे. एखादी कविता मला उद्देशून लिहिली तरी हरकत नाही. पण तुम्ही केलेले दावे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमचीच असते.